ते न पटण्याचे कारण त्यांचे #पंतप्रधान म्हणून शांत राहून काम करणे
पंतप्रधान कसा असावा तर मस्त भरपूर #भाषणे करणारा ,जे केले नाही ते पण मी केले असे सांगणारा, स्वतःच्या चुकांचे खापर पूर्वीच्या सरकारवर टाकणारा, मस्त बॉलीवूड च्या लोकांसोबत, पशु पक्ष्यांसोबत रोज वेगवेगळ्या पोसे मध्ये फोटो शूट करणारा आणि असा सगळा टाइमपास करूनही पहा ;''मी कसा १८-१८ तास काम करतो'' अश्या थापा मारणारा ...
पण डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधान असूनही यातले काहीच जमत नव्हते, मोठं-मोठ्या थापा मारत आक्रस्ताळी भाषणे न करता शांतपणे काम करत स्वतःच्या निर्णयातून ते इतिहास घडवत राहिले? खरं तर करायला काय हवं होत त्यांनी तर प्रत्येक दिवसाचा इव्हेंट करायला हवा होता,आज हे कसे भारी केले असं सांगत प्रत्येक दिवस #ऐतिहासिक कसा आहे हे सांगायला हवे होते पण डॉ मनमोहनसिंगांना हे जमत नव्हते .#दुर्बुद्धी च म्हणा त्यांची
त्यांनी #चुकीचे अनेक मोठे मोठे #निर्णय घेतले पण त्यातले ५ निर्णय खूप भयानक होते
1.त्यातील पहिला म्हणजे #Economic_Reforms_1995- देशाची अर्थव्यवथा बुडते का काय? असं लोकांना वाटतं असतांना डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थविषयक काही धोरणे आखून भारताची अर्थव्यवस्था मजबूत केली लायसन्स राज संपवले ,ते पंतप्रधान असताना एक काळ असा होता कि पूर्ण #जग मंदीच्या गर्तेत होते, रोज शेयर मार्केट ढासळत होते, खरतर यावेळी करायला काय हवे होते तर नोटबंदी किंवा इतर कुठला निर्णय किंवा थाळी वाजवा , टाळ्या वाजवा सारखा निर्णय ज्यामुळे पूर्ण जग नैराश्यात आहे पण आपण एकत्र कसे आहोत हे लोकांना सांगता आले असते पण केले काय तर, मनमोहन सिंग यांनी अशी काही धोरणे आखली कि भारताला याचा धोकाच पोहोचला नाही ,त्यांनी भारताची अर्थव्यवस्था जगात दुसऱ्या स्थानावर नेऊन ठेवली होती.
2. त्यांचा चुकीचा दुसरा निर्णय म्हणजे #माहिती_अधिकार_कायदा ज्याच्यामुळे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर थांबला, अरे #भ्रष्टाचार काय थांबवायची गोष्ट असते काय ?
उलट ''ना खाता हू , न खाने दूंगा'' असं म्हणत भरमसाठ भ्रष्टाचार करायचा असतो, ED, CBI, RBI आणि अश्या सगळ्या स्वायत्त संस्थांना आपले बाहुले बनवायचे असते.आणि तरीही विरोधी कोणी जिंकले तर त्यांच्यातील लोक शेकडो कोटी देऊन विकत घ्यायचे असते, वृत्तपत्रात पहिल्या पानावर आणि टीव्ही च्या सगळ्या वाहिन्यांवर स्वतःच्या हजारो कोटींच्या जाहिराती द्यायच्या असतात एवढे करायला पैसे कुठून आले त्याचा हिशोब विचारायचा नसतो, तो भ्रष्टाचार थोडीच असतो?.
3. तिसरा चुकीचा निर्णय म्हणजे ग्रामीण भागातील लाखो लोकांना रोजगार देणारी #मनरेगा योजना, तुम्हाला आठवत असेल तर आपले आपले पंतप्रधान मोदीजी यांनी या योजनेवर प्रचंड टीका केली आणि स्वतः १ कोटी रोजगार दर वर्षाला देऊ म्हटले पण आज आपण पाहतो कि नवीन रोजगार सोडा, आहे ते रोजगार गेले आहेत, शेवटी आजही याच मनरेगा योजनेअंतर्गत अनेकांना रोजगार मिळतो पण खरं करायला काय हवे होते लोकांना सरळ ''भजी तळा'' वगैरे सारखे सल्ले द्यायला हवे होते आणि जो काही राष्ट्रीय रोजगार सर्वे चा चार्ट आहे तोच बंद करायला हवा होता पण त्यांना ते जमले नाही.
4. चौथा महत्वाचा चुकीचा निर्णय म्हणजे #Civil_Nuclear_Deal - या निर्णयवेळी त्यांच्यासोबत जे सत्तेत होते त्यांनी या्ला विरोध करत पाठिंबा काढून घेऊअसे म्हटले, पण डॉ मनमोहन सिंग यांनी ते बिल पारित करून त्यांचा पाठींबा जाऊनही पुन्हा मजबूत सरकार स्थापन केले. इथे एक मुद्दा चमचा म्हणण्याचा पण येतो ते जर दुसऱ्या कुणाचा चमचा असते तर असा निर्णय घेणे शक्य झाले असते का ? नाही ना ? पण तरीही त्यांनी हा निर्णय घेतला पण आपण मात्र त्यांना असं असूनही बाहुला म्हणूया...
5. पाचवा चुकीचा निर्णय फूड security बिल चा याबद्दल तुम्ही स्वतः जाऊन वाचा , याचे फायदे आपण आजही भोगत आहोत
पण वरील सर्व करतांना त्यांचे चुकले काय तर त्यांनी सामान्य लोक, मध्यमवर्गीय लोक ,छोटे-मोठे व्यापारी, शेतकरी,कामगार सर्वांचा विचार केला पण विचार कोणाचा करायला हवा होता तर अदानी अंबानी यांचा, त्यांच्यामुळे तर आपला देश चालतोय ना बाकी आपण कुठे काय करतोय पण इथे चुकलेच त्यांचे..
अजून एक मुद्दा सहानुभूतीचा पण आहे, त्यांनी भाषणात रडून स्वतःचे बालपणातील किस्से सांगून किंवा आपल्या आज्जीसोबतचेे फोटो टाकून किंवा जगभरातून मिळालेले पुरस्कार दाखवून कधी सहानुभूती गोळा नाही केली.फाळणीच्यावेळी बालपणीच त्यांना सर्वस्व गमावून भारतात यावे लागेल, त्याच दरम्यान आईचा मृत्यू झाल्याने आज्जीने त्यांना सांभाळले, त्या वेळी घरातील प्रचंड गरिबीमुळे रॉकेलच्या दिव्याच्या प्रकाशात रात्री जागून अभ्यास केल्यामुळे त्यांचे डोळे खराब झाले, त्यांच्या जाड भिंगाचा चष्मा याची साक्ष देतो ,शिक्षणातील प्रत्येक वर्षात पहिला नंबर मिळवत त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठापर्यत मजल मारली पण यातील कुठल्याही गोष्टीचा त्यांनी सहानुभूती गोळा करण्यासाठी उपयोग केला नाही, खरतर स्वतःच्या कार्यकाळात स्वतःच्या प्रेरणादायी आयुष्यावर एक मस्त चित्रपट काढता आला असता आणि त्याला भारतातूनच नव्हे तर जगभरातून प्रतिसाद मिळाला असता, त्यांच्या तर सगळ्या पदव्या सुद्धा खऱ्या होत्या
मान्य करू कि नसेल मगर पकडली बालपणी त्यांनी मोदीजींसारखी किंवा एकाच वेळी आपला एक एक अवतार हिमालयात, एक भिक्षा मागायला, एक चहा विकायला आणि एक शिक्षण करायला असे नसतील गेले त्यांचे
पण त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून जगातील नावाजलेलया केम्ब्रिज विद्यापीठाने ''सिंग शिष्यवृत्ती'' त्यांचा सन्मान म्हणून सुरु केली आहे मग करायचा ना एखादा मस्त चित्रपट तयार पण दुर्बुद्धी मुले नाही जमले त्यांना हे ..
एक मुद्दा #मौनी बाबाचा ही - पंतप्रधानाला भाषणात #थापा मारता यायला हव्यात, हे आज आपण पाहतो पण मनमोहन सिंग यांच्यात हा चांगला गुणच नव्हता, त्यांनी त्यांच्या कार्यकाळात तब्बल १९९८ एवढी भाषणे केली पण ती मनकी बात सारखी एककल्ली नव्हे तर लोकसभा आणि राज्यसभा सारख्या सदनांमध्ये केली आहेत, त्यांच्या मुलाखती पहिल्या तर मुलाखत घेणारे पत्रकार ही मूर्ख असावेतअसे दिसते, वेगवेगळ्या धोरणविषयी अवघड प्रश्न हे पत्रकार विचारत, पण अरे मुलाखतीत काय विचारावे हे समजायला नको का तुम्हाला ?तुम्ही आंबे कसे खाता?, तुम्ही खिशात पाकीट ठेवता कि नाही? तुम्ही कसे महान आहात वगैरे प्रश्न विचारायला हवेत ना? पण त्यावेळी पत्रकार पण चांगले नसावेत
आज पहा कसे मस्त मस्त पत्रकार आहेत लोकांचे मुख्य प्रश्न सोडून पूर्ण वेळ रिया कंगना ड्रुग्स इ वर बोलत असतात. अरे रोजगार जात आहेत , आरोग्यव्यस्था , शिक्षण , GDP यावर बोलायाच असत का कुठे?
डॉ.मनमोहनसिंग ्यांच्यावर काही लोक जेव्हा खालच्या पातळीवर जाऊन बोलत होते तेव्हा ते म्हणाले होते कि ''माझ्या कामाची दखल इतिहास घेईल''
आज आपली अर्थव्यवस्था रसातळाला गेल्यावर, बेरोजगारी प्रचंड वाढल्यावर त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपण घेतच आहोत. पण मला वाटतं त्यांनी तस बोलण्यापेक्षा सरळ जो कोणी त्यांचा विरोध सोडा, छोटासा प्रश्न सुद्धा विचारतोय त्याला #पाकिस्तानी , #देशद्रोही , #चमचा म्हणत ट्रोल करायला हवे होते, त्यांच्यावर खोट्या केसेस टाकून तुरुंगात टाकायला हवे होते पण असतात काही-काही लोक ज्यांना या महत्वाच्या गोष्टी समजत नाहीत ते असले प्रकार करायचे सोडून फक्त स्वतःचे काम करत राहतात
चूकभूल क्षमस्व
संकेत मुनोत
26 Sep 2020
#ManmohanSingh