AddThis code

Friday, August 25, 2023

बॅरिस्टर वीरचंद गांधी यांनि विश्वधर्म परिषदेत सांगितलेला अकबर बद्दलचा प्रेरणादायी प्रसंग

पोर्तुगिजांनी एकदा मुस्लिमांचे एक जहाज लुटले. जहाजावरच्या सर्वांना कैद केले. जहाजावर कुराणाच्याही प्रती होत्या त्या जप्त केल्या. किना-याला लागल्यावर पोर्तुगिजांनी कुराणाच्या प्रती कुत्र्यांच्या गळ्यात बांधून त्यांना पिटाळले. नंतर पोर्तुगीजांचे जहाज अकबर च्या सैन्याने पकडले. अकबरापर्यंत ही वार्ता गेली. त्याची आई संतापली. ती अकबराला म्हणाली. "तू बायबलची अशीच विटंबना कर!"
अकबर म्हणाला, "आई, कुराण श्रेष्ठच आहे. पण बायबलही त्याच्या जागेवर तेवढेच श्रेष्ठ आहे. बायबलची विटंबना करून मी त्या पोर्तुगिजांच्या अधम पातळीवर उतरू शकत नाही."
ही सम्राट अकबराबद्दल ची घटना *वीरचंद गांधीं* यांनी विश्व धर्म संसदेत सांगितली होती.
मागच्या वर्षी बॅरिस्टर वीरचंद गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने *इतिहास संशोधक संजय सोनवणी* सरांची मुलाखत घेतली त्यात त्यांनी सांगितलेली ही कथा आज पुन्हा आठवली.
(मुलाखतीची लिंक कमेंट मध्ये)
शिकागोला १८९३ साली ज्या धर्मपरिषदेत स्वामी विवेकानंद गेले होते त्याच धर्मपरिषदेत जैन धर्माचे तत्वज्ञान सांगायला जे अधिकृत रित्या उपस्थित होते, स्वामी विवेकानंदांच्या भाषणाप्रमाणेच ज्या गाजलेल्या भाषणामुळे अमेरिकेत अनेक व्यक्ती जैन धर्मात प्रविष्ट झाल्या, ज्यांचे अनेक भाषांवर प्रभुत्व होते, जे जागतीक धर्मांवर अधिकृतपने सातत्याने लिहित व भाषणे देत राहिले ते वीरचंद गांधी.
शिकागो परिषद आपल्याला स्वामी विवेकानंदांमुळेच माहित आहे. त्यांची जेवढी प्रसिद्धी भारतात केली गेली तेवढी वीरचंद गांधीं यांची केली गेली नाही. खेदाची गोष्ट म्हणजे बहुतेक जैन लोकांना ही ते माहीत नाहीत. वीरचंद गांधी यांच्या भाषणाने अमेरिकन तत्वज्ञांना प्रचंड प्रभावित केले होते हे आपल्याला माहित असले पाहिजे.
त्यांना अजून दोन वर्ष अमेरिकेतच थांबवून ठेवले गेले व त्यांच्या भाषणांवर केवळ लेख नव्हेत तर पुस्तकेही लिहिली गेली. त्यांची स्मारके ही अमेरिकन लोकांनी बांधली आहेत.
अमेरिकेतील त्यांच्या अन्यत्र झालेल्या व्याख्यानांमुळे अनेक अमेरिकन जैन धर्माच्या अभ्यासाकडे वळाले. भगवान महावीरांचा अहिंसावाद आजच्या जगाच्या शांततामय सौहार्दासाठी कसा उपयुक्त आहे हे त्यांनी अमेरिकेत दिलेल्या ५३५ व्याख्यानांतून सांगितले. त्यांचे चाहते हर्बर्ट वॉरेन यांनी जैन धर्म तर स्विकारलाच पण वीरचंद गांधींच्या भाषणांचे संकलन करून त्याचे पुस्तकही प्रकाशित केले.
वीरचंद गांधीं यांनी केवळ जैन धर्माची माहिती सांगितली नाही तर स्वामी विवेकानंद यांच्या भाषणावर आणि वैदिक धर्मावर जी टीका झाली ती खोडून काढली.
वीरचंदजींचे कार्य केवळ धर्म-तत्वज्ञानापुरते मर्यादित नव्हते. स्त्रीयांबद्दलचा त्यांचा दृष्टीकोण उदार होता. त्यांना आधुनिक शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी सोसायटी फॉर द एज्युकेशन ऑफ वुमेन इन इंडिया ही संस्थाही स्थापन केली आणि देशभर स्त्री-शिक्षणासाठी प्रयत्न केले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतही ते उतरले.
वीरचंद जसे स्वामी विवेकानंदचे मित्र होते, तसेच महात्मा गांधी यांनीही वीरचंद गांधींना ‘भावासारखे मित्र’ अशी उपमा दिली होती. अशा या भारतपुत्राचे 07 ऑगस्ट 1901 रोजी वयाच्या अवघ्या 37व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
आज देशात द्वेष प्रचंड वाढत आहे
दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश यांच्यासारख्या सामजिक कार्यकर्ता, पत्रकार, न्यायाधीश, विचारवंतांच्या हत्या करून "मेली काही कुत्री तर फरक काय पडतो"* असे अनेक समाजकंटक सामजिक माध्यमावर उघडपणे बोलत आहेत. महिलांवर अमानुष अत्याचार करणाऱ्या लोकांना सोडून देऊन मिठाई वाटली जात आहे*
कुठेही कोणी काही प्रश्न उपस्थित केला रे केला कि सरळ त्याला देशद्रोही ठरवत जा पाकिस्तान ला , जा अफगाणिस्तान ला, वगैरे म्हणत अन्न, वस्त्र, रोजगार, शिक्षण या मूळ गोष्टींकडे दुर्लक्ष केले जात आहे.
चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, बादशाह अकबर सारखे उत्तम प्रशासक याच देशात जन्मले का ? याची आज आठवण होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांकडे जेव्हा सामान्य रयत कोणाची अन्यायाबद्दल ची तक्रार घेऊन जात तेव्हा ते असे तर म्हणत नव्हते ना अरे त्या औरंगजेब किंवा इतर लोकांच्या राजांपेक्षा तर इथे बर आहे ना? नाही, ते किंवा वरील इतर राजे अस कधीच बोलत नव्हते ते वेळोवेळी शासन करत होते, रयतेच्या हिताची कामे करत होते.
सध्या जो धार्मिक, जातीय, वर्गीय द्वेष वाढतोय तो असाच वाढत राहिला तर देश राहणार नाही. त्यामुळे वीरचंद गांधी यांचे तत्वज्ञान अभ्यासण्याची आणि ते आचरणात आणण्याची आज खूप गरज आहे.
तर चला त्यांच्या जयंती निमित्त जगाकडे मैत्रीभावाने बघूया, द्वेष कमी करूया, प्रेम वाढवूया
संकेत मुनोत
२५ ऑगस्ट २०२१
चित्र- प्रतिकात्मक
Comment, Share ,Follow and Subscribe.


Tuesday, August 22, 2023

अजमेर , राजस्थान के राष्ट्रीय गांधीवादी स्नेहसंमेलन में संकेत मुनोत का वक्तव्य

फरवरी में अजमेर के 3 दिवसीय राष्ट्रीय गांधीवादी सम्मेलन का निमंत्रण संजय सिंह, सर, दिल्ली इन्होंने दोस्त श्रीनिवास के साथ भेजा था। देशभर से करीबन 150-200 गांधी विचार पे काम करने वाले लोग यहां आए हुए थे।
राजस्थान सरकारने गांधी विचार प्रचार प्रसार के लिए खास अहिंसा आणि शांती मंत्रालय शुरू किया है । गांधी विचार पहुंचाने के लिए बहुत अच्छे प्रोग्राम्स इसमें लिए जाते है. हर महीने में अलग- अलग जिल्हों में इस बारे मे विशेष प्रोग्राम्स लिए जाते है।
बाकी सभी राज्यों ने भी इसका अनुसरण करना चाहिए ये बहुत बढ़िया प्रोग्राम है।
जब अलग अलग लोगों ने अपने वक्तव्य रखे तब मैने भी वक्तव्य रखा , मुझे लगा नही था की लोगो को वो इतना पसंद आएगा पर कई लोगो ने मुझे मिलकर उस बारे में सराहा और नंबर लिया । तो उसके कुछ मुद्दे भी यहां रख रहा हु।
Link - https://youtu.be/daOxROKXCJY?si=iGIyYEi_-We5DUHC
1. निर्भय बनना- ज्यादा से ज्यादा क्या करेंगे वो? क्यों डरना?
2. नये तरीके अपना के गांधी विचार फैलाना जैसे की memes,short videos, reels..etc
3. सोशल मीडिया को whatsapp University, whatsapp University बोलके नाम रखने के बदले तुम इसमें से प्यार फैलाओ , वे नफरत फैला रहे है तो तुम्हे प्यार फैलाने से किसने रोका है
4. मैने ग्रुप छोड़ दिया मत बोलो उसमे भले कुछ लिखो मत पर रहो जब तुम वो छोड़ दोगे तो उन्हे तो झूठ फैलाने के लिए खुला आंगन मिल जाएगा
5. युवाओं के प्रश्न और चुनौतिया रोजगार -
आपके विरोधी लोग बाकी लोगो को भले बेरोजगार करे उनके मुख्य मुख्य लोगो को तो रोजगार देते है और वो भी अच्छा रोजगार देते है
वो नौकरी हो तो अच्छी जगह reference देते है और व्यवसाय हो तो उसको अपने लोगोसे clients देते है हम अगर ये करेंगे नही तो युवा इस में रहेगा कैसे,? मैं खुद जानता हु की मेरी नौकरी/ व्यवसाय manage करके मैं किस तरह इस में आ पा रहा हु , मन में बहुत निष्ठा है इसलिए आ पा रहा हु लेकिन और कितने साल आ पाऊंगा? और मेरे कितने युवा दोस्त इस वजह से आज movement में नही है।
6. युवाओं का और एक बड़ा प्रश्न शादी -
आज के जमाने में शादी के लिए like minded जीवनसाथी मिलना बहुत बड़ी चुनौती है।
महात्मा गांधी के पीछे कोई जाति या धर्म ना होने से बड़ी दिक्कत ये भी आती है की वो घर या कही बताए नही जाते और बहुत से लोगों की उम्र 40/50 cross हो जाती है तब कहा उन्हे महात्मा गांधी समझ आते है। मेरे अन्य दोस्तो को ये दिक्कत नही आती क्योंकि कोई सावरकर का अभ्यासक या प्रचारक होगा तो उसे उनकी जाति में से जीवनसाथी मिलने के लिए दिक्कत नही आएगी क्योंकि भले उसे उनके बारे में अभ्यास न हो पर आदर अवश्य होगा यही बात अन्य नेताओ के बारे में है। गांधी इसमें exception है तो इसके लिए हमे खुद से प्रयास करने होंगे हमे ऐसे like minded युवक युवतीयो के वधूवर परिचय संमेलन लेने चाहिए, उनका मैट्रिमोनी app बनाना चाहिए ।
7.आपको daily memes, videos , short articles चाहिए हो तो आप भी हमारे knowing Gandhi Memes, Knowing Gandhi Videos , Knowing Gandhi Small articles या अलग अलग ग्रुप से जुड़े
8. रचनात्मक कार्य करने के लिए आप हमारे Jaihind People's Movement से जुड़े और अपने अपने गांव में काम शुरू करे
9. गांधीजी बताते वक्त कभी बहुत गंभीर चेहरा ना रखे गांधीजी की तरह ही चेहरे पे सदैव मुस्कान (smile ) रखे
कार्यक्रम के उपरांत आदरणीय मंत्री सी पी जोशी जी इनके द्वारा मेरा सत्कार किया गया।
बहुत अच्छा अनुभव रहा । मैं पहली बार ही राजस्थान गया था।
देरी से लिखने के लिए माफी चाहता हु
19 अगस्त 2023
संकेत मुनोत
8668975178








Comment, Share ,Follow and Subscribe.

Saturday, August 5, 2023

ज्येष्ठ समाजवादी आणि गांधीवादी विचारवंत साथी शेखर सोनाळकर यांना विनम्र आदरांजली!





 ज्येष्ठ समाजवादी आणि गांधीवादी विचारवंत प्रा. शेखर सोनाळकर यांचे परवा रात्री 1.15 मिनिटांनी वयाच्या 72 व्या वर्षी दीर्घ व्यांधींशी लढताना निधन झाले.

खूपच दुःख होतंय पण काहीच करता येत नाहीये. सरांसोबत अनेकदा भेट घ्यायचे ठरवले पण राहून गेले . 20 ऑक्टोबर 2022 ला जळगाव येथे गेलो होतो तर तिथे सरांना घरी जाऊन भेटणार होतो पण गडबडीत नाही भेटू शकलो लवकर दुसऱ्या गावी जावे लागले. त्यापूर्वी काही वर्षांपूर्वी सर पुण्यात होते तेव्हा सुद्धा आमचे भेटणे चालले होते पण माझ्या नोकरीच्या व्यापात भेटू नाही शकलो. सर पुण्यात होते तेव्हा एका सोलापूर च्या निर्माण मधील Friend चा स्पेशल फोन आला होता की तू सरांना भेट आणि त्यांची सगळी माहिती व्हिडिओ रेकॉर्ड करून घे खूप चांगले document होईल पण तेही करता आले नाही. सरांच्या सोबत अधे मध्ये फोनवर बोलणे व्हायचे. जेव्हा-जेव्हा बोलणे होई खूप जिव्हाळ्याने बोलत शेखर सर.

मी वर्षभरापूर्वी दिल्लीत एका राष्ट्रीय मीटिंग साठी गेलो होतो जिथे देशातील वेगवेगळ्या राज्यातून चांगले काम करणारे मान्यवर लोक आले होते त्यात मी जाऊ शकलो ते सरांच्यामुळेच . महाराष्ट्रातून निवडक 3 नावे सरांनी त्या मीटिंग साठी सुचवली होती त्यात माझे एक नाव दिले होते सर स्वतः पण येणार होते पण त्यांचा आजार वाढल्याने  आणि डॉक्टर ने प्रवास करण्यास नाही सांगितल्याने त्यांना अचानक येणे कॅन्सल करावे लागले होते...
देशभरातील लोकांना जोडणारे , विधायक काम करणारे होते सर. निदान 100 पर्यंत तरी जगायला हवे होते अजून खूप काम झाले असते सरांकडून. 
द्वेष पासरवणारी, दंगली घडवणारी, लोकांची डोकी भडकवणारी लोक 90 च्या पुढे जगत आहेत आणि सरांच्या सारखा प्रेमळ , सत्यवादी आणि संवेदनशील मनुष्य 72 मध्येच जग सोडून जातो हे चांगले नाही. यानिमित्त माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण आपल्या आरोग्याची पण तेवढीच काळजी घ्या. 
महात्मा गांधींनी सरदार पटेल आणि विनोबा भावेंना याबद्दल विशेष सुनावले होते. महात्मा गांधी स्वतः म्हणाले होते की मी 125 वर्षे जगणार अणि कदाचित त्यांच्या इतर वाक्यांचा प्रमाणे हे वाक्य ही सत्य झाले असते पण मध्येच दहशतवादी गोडसेने त्यांची हत्या केली.

शेखर सर CA होते, CID मध्ये होते. त्यांनी CBI ला आणि अनेक संस्थांना आपल्या अभ्यासाद्वारे अनेक गुन्हे तपासण्यात मदत आणि मार्गदर्शन केले होते, ते अजून बरेच काही करत होते...त्यांचे संदर्भ पूर्ण लेख वाचणे आणि भाषण ऐकणे ही खूप मोठी वैचारिक मेजवानी असे...
माझे चुकले हे की मी निदान त्यांची ZOOM वर तरी मुलाखत घ्यायला हवी होती किंवा फोनवर त्यांना विविध प्रश्न विचारून ते रेकॉर्ड करून ठेवायला हवे होते पण मला कल्पनाच नव्हती की एवढ्या लवकर असे काही होईल. पण यापुढे काळजी घेईल. 

शेवटी एवढेच सांगेन की लोकांना हिंसेचे कौतुक करणारे खूप प्रक्षोभक बोलणारे भडक लोक आवडतात पण गांधिविचाराच्या माध्यमातून शांतपणे आपले काम करणारे लोक अधिक परिणामकारक असतात. कारण भडका उडतो आणि लगेच शांत ही होतो पण पणती अनेक दिवे प्रकाशित करत राहते. आपले काम एवढेच की या पणत्या बनुया आणि अश्या पणत्या लोकांना आदर्श म्हणून समोर आणुया.
आपलेही शेखर सरांच्या समवेत चे अनुभव कमेंट मध्ये मांडा 

Shekhar Sonalkar  सरांना भावपूर्ण आदरांजली...

संकेत मुनोत

Comment, Share ,Follow and Subscribe.