AddThis code

Saturday, September 30, 2023

डॉ. Prasannakumar Bamb आणि त्यांचा मुलगा Oshin Bamb , आर्वी , वर्धा यांची घरी सदिच्छा भेट

काल सन्मित्र डॉ. Prasannakumar Bamb आणि त्यांचा मुलगा Oshin Bamb , आर्वी , वर्धा यांनी घरी सदिच्छा भेट दिली. Oshin ने माझे कुठले तरी व्याख्यान ऑनलाईन ऐकले तेव्हा त्याच्याशी ओळख झाली त्यानंतर त्याने त्याच्या वडिलांना पण त्यात जोडले 
 2 वर्षापूर्वी मला नागपूर आणि यवतमाळ येथून व्याख्यान देण्यास निमंत्रण मिळाले तेव्हा डॉ. प्रसन्नकुमार मला खास त्यांच्या घरी घेऊन गेले आणि त्यांनी आर्वी, कोंढणपुर , पवनार आश्रम आणि विविध गोष्टी दाखवल्या. मागच्या वर्षी सुद्धा पुन्हा आर्वी येथे व्याख्यानास गेलो तर तेव्हा ही आयोजक दुसरे असले तरी ते आग्रहाने त्यांच्या घरी घेऊन गेले. आणि त्यांच्या घरी खूप छान पाहुणचार केला. 

डॉ. प्रसन्नकुमार हे पशू वैद्यकीय चिकित्सक अधिकारी होते. त्यांनी सरकारी नोकरी असूनही Retirement च्या 5 वर्षापूर्वीच VRS घेतली. ते गांधी विनोबा या दोन्ही वर कार्य करत आहेत. "याला जीवन ऐसे नाव", "मनाचिये द्वारी उभा क्षणभरी", "गौलाऊ विदर्भाचे गौरव" अशी त्यांची 3 पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

विविध विषयांवर त्यांनी लेख लिहले असून विदर्भात विविध ठिकाणी त्यांची संत साहित्य आणि समाजप्रबोधनपर व्याख्याने आयोजित झाली आहेत. 

ग्रामीण भागातील महिलांच्यासाठी त्यांनी 20 पेक्षा जास्त बचत गट काढले आहेत. अनेक गोशाला आणि पांजरपोळ मध्ये ते मोफत सेवा देतात.
त्यांचे वडील हे पहूर दाभा , यवतमाळ येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फॉरवर्ड ब्लॉक पार्टी चे काम करायचे आणि जवळपास 10 वर्षे सरपंच होते. जांबुवंतराव धोटे सारख्या नेत्यांशी त्यांचे मैत्रीचे नाते होते.
ओशिन डेक्कन कॉलेज , पुणे येथे archeology मध्ये PHD करत आहे.Oshin पण अनेक सामजिक चळवळीत सक्रिय असून पुणे विद्यापीठ , फर्ग्युसन कॉलेज मध्ये visiting faculty आहे. तो आत्तापर्यंत बहुतेक सर्व परीक्षांत मेरिट मध्ये आला असून CET NET qualified आहे. 
डॉ. प्रसन्न कुमार बंब माझे Financial plannning चे client ही आहेत.
त्यांना माझे काम आवडते आणि फोन केल्यावर पण दरवेळी आपको टाईम है ना? माफ किजिये मैने आपका इतना समय लिया वगैरे ते खूप विनम्रतेने म्हणतात हे त्यांचे मोठेपण आहे. 
Oshin ने भेटीत एक महत्वाची गोष्ट सांगितली. सम्राट अशोकाचे एवढ्या मोठ्या राष्ट्राचा सम्राट  आणि बौद्ध धर्माचा अनुयायी आणि प्रसारक असूनही त्याने कधी हे राष्ट्र बौद्ध राष्ट्र व्हावे वगैरे म्हटले नाही. उलट त्याने शिलालेखात सर्वांचा आदर करण्यात यावा असे लिहले आहे.
असो अशी प्रेमळ माणसे भेटली की हृदयातील प्रेम अधिक वृध्दींगत होते.❤️ प्रेम पसरवत राहूया
संकेत मुनोत


Comment, Share ,Follow and Subscribe.

Actor , Director शार्दुल सराफ ग्रेट भेट

लेखक, दिग्दर्शक , अभिनेते असलेले मित्र शार्दुल सराफ यांच्याशी परवा भेट झाली.खर तर ते स्पेशल भेटण्यास आले त्याबद्दल त्यांचे आभार.  आमची ही पहिलीच भेट होती ज्यात जवळपास 4-5 तास मस्त चर्चा झाली. 

 खर भेटण्यापुर्वी ते एवढे काही करतात हे माहीत नव्हते. समविचारी मित्र आहेत एवढेच माहीत होते. एकमेकांचे लेख वाचणे वगैरे गोष्टी होत्याच पण यात अजून विशेष म्हणजे 2 वर्षापूर्वी ते माझ्यासाठी लग्नाचे स्थळ सुद्धा शोधत होते...😊

असो त्यानिमित्त त्यांचा थोडक्यात परिचय पाहूया

प्रायोगिक पातळीवर रात्रंदिन आम्हां, जनक ह्या पारितोषिक विजेत्या नाटकांचे ते लेखक - दिग्दर्शक आहेत

वळू, गाभरीचा पाऊस, सलाम, होम स्वीट होम ह्या चित्रपटांचे प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केलं आहे

कमला, दुर्वा, पसंत आहे मुलगी, लव्ह लग्न लोच्या, अंजली, जीव माझा गुंतला, शाब्बास सूनबाई अशा मालिकांचे लेखक आहेत

तर आमिर खान ह्यांच्या पाणी फाऊंडेशन च्या ' तुफान आलंया ' ह्या कार्यक्रमाचे ते लेखक - दिग्दर्शक आहेत. 

आमची ओळख गांधी विचारांच्या मुळे... शार्दुल पण पूर्वी गांधीजींची चेष्टा उडवायचे पण गांधीजींची आत्मकथा वाचली आणि त्यातून नवीन दृष्टी त्याला मिळाली असे ते म्हणाले...

 गांधीविचार अजून प्रभावी पद्धतीने लोकांच्या पर्यंत कसे पोहोचवता येतील याबाबत थोडे नियोजन ही या भेटीत केले.

 शार्दुल ने आरे तुरे बोलायला सांगितले ते पण अजून बोलू शकलो नाही पण प्रयत्न  सुरू आहेत.

संकेत मुनोत


Comment, Share ,Follow and Subscribe.

Sunday, September 24, 2023

गांधी जन्मले तेव्हा शून्य होते आणि गेले तेव्हाही शून्य होते..

आत्ता कोणी तरी गणितात महापुरुषांच्या बद्दल बोलत होते त्यावरून  सहज सुचले...
महात्मा गांधी हे जन्मले तेव्हा #शून्य होते ... ...आणि गेले तेव्हा आणि त्यापूर्वी अनेक दशके शून्यच होते...कुठले मंत्रीपद नाही, कुठली संपत्ती नाही की इतर काही नाही ...

पण ज्याला ते जुळले गेले त्यांचे त्यांनी त्या-त्या व्यक्तीच्या क्षमतेनुसार त्यातून  दशक, , शतक, सहस्त्र आणि बरेच काही घडवले...

अगदी तो चांगला विरोधक असला तर त्याचेही त्यांनी शतक केले ..( स्वतःच्या निवडून आलेल्या लोकांना राजीनामे द्यायला लावून त्यांनी विरोधकातील लोकांना ते पद द्यायला लागले)

ते मौलाना आझाद असो, सरदार पटेल असो , विनोबा असो किंवा या देशातील लाखो सत्याग्रही असो ..सर्वच या शून्याशी जुळून त्यांच्यातून शतक, सहस्त्र, लक्ष झाले...  

पण ज्यांना लोकांना एककात ठेवून फक्त स्वतःलाच दशक, शतक करायचे होते, त्या विषमतावादी लोकांचे गांधीजीमुळे धाबे दणाणले..इतर सगळेच दशक , शतक झाले तर आम्ही कोणाला गुलाम करणार ?..मग असे लोक गांधींना पराभूत करण्यासाठी त्यांना  विभागण्याचे प्रयत्न करू लागले पण या शुन्याला भागच जात नाही म्हणून निराश झाले..
मग शेवटी त्यांनी या शून्यालाच संपवले पण ते हे विसरले की तोपर्यंत हा शून्य विचारांतून , कृतीतून हजारो ठिकाणी पोहोचला होता...त्याला जोडण्यासाठी लोकांना आता फक्त त्याच्या देहाची गरज नव्हती ...

त्या शून्याशी कधी आफ्रिकेत मंडेलानी स्वतः ला जोडून घेऊन वर्णभेदाचा लढा दिला. अमेरिकेत मार्टिन ल्युथर किंग ते बराक ओबामा ने घेतला तर पाकिस्तानात मलाला आणि असंख्य जणांनी या शुन्याशी जोडून घेऊन  त्यांचे दशक, लक्ष केले...
त्यामुळेच आईनस्टाईन सारखा शास्त्रज्ञ अश्याच शून्याने जगाचे भले होणार असल्याचे गणित मांडतो 

तर जो या शून्याचा नीट अभ्यास करतो, समजून घेतो, आचरणात आणतो तो त्याला जोडले होऊन त्यातून दशक, शतक, सहस्त्र...वगैरे बनवतो...


..
आजही या शून्याचा स्वार्थी लोकांना त्रास होतो.  मग तो संपवता येत नाही म्हणून ते त्या शून्याला बदनाम करतात जेणेकरून लोकांनी शून्याला जोडलेच जाऊ नये...
भारतपूरते त्यांचे प्रयत्न काही भागात यशस्वीही होतात पण परदेशात गेल्यावर त्यांनाही  स्वतःला शून्याचा अनुयायीच सांगावे लागते...
.आपणच ठरवायचे त्या शून्याला जोडून आपले दशक, शतक, सहस्त्र..वगैरे  करायचे की की चुकीच्या गोष्टी ऐकून त्याला  भागून स्वतःचे नुकसान करायचे...

संकेत मुनोत 
( फोटो - शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांच्या घरातला त्यांच्या घरात दोनच फोटो होते एक गांधीजींचा आणि दुसरा...)

Comment, Share ,Follow and Subscribe.

Monday, September 11, 2023

खासदार कुमार केतकर, अभिनेते अमोल पालेकर, जेष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांच्या सोबत व्यासपीठ शेयर करायला मिळणे माझ्यासाठी मोठी संधी होती

परवा 'भारत जोडो यात्रा' या एस. ए. जोशी लिखित पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी  विचार मांडण्याची संधी मिळाली. 
खासदार कुमार केतकर, अभिनेते अमोल पालेकर, मुलाखतकार राजू परुळेकर, नेहरुवियन प्रतिक पाटील , प्रकाशक तांदळे मॅम यांच्या सोबत व्यासपीठ शेयर करायला मिळणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. सन्मित्र भाऊसाहेब अजबे यांनी सूत्रसंचालन केले तर न्यू एरा चे आशिष शिंदे  आणि अजून काही मान्यवरांनी पण मनोगते मांडली.

 काही दिवस सामजिक क्षेत्रातून ब्रेक घेतला होता,  खासदार कुमार केतकर सरांचा १ महिन्यापूर्वीच फोन आल्यामुळे या कार्यक्रमाला आलो. पण कार्यक्रमाने नवीन ऊर्जा मिळाली.
 काही दिवसांपासून वैयक्तिक अडचणीमुळे थोडा मानसिक ताणातून जात होतो पण कार्यक्रमाला आल्यावर जेव्हा विविध तरुण येऊन भेटले आणि सेल्फी काढताना बोलले की तुमचे काम आवडते, आम्हाला त्यात जॉईन करायचे आहे वगैरे तर त्याने ताण कमी होऊन आत्मविश्वास वाढला.
सध्या देश, राज्य, गाव, घर यात द्वेष, हिंसा वाढत असताना #प्रेम वाढवण्याची सर्वाधिक गरज आहे. 
द्वेष करणे सोप्पे असते पण #प्रेम करणे healthy असते.

प्रेमाचा संदेश पसरवत राहूया ❤️❤️❤️

संकेत मुनोत
8668975178
#NewEraPublication #BharatJodoYatra

Comment, Share ,Follow and Subscribe.
















Thursday, September 7, 2023

75 वर्षाचे तरुण मित्र मकबूल तांबोळी सर ग्रेट भेट

आपल्या जवळपास अनेक प्रेरणादायी लोक असतात पण आपल्याला माहीत नसतात त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे माझे 75 वर्षाचे तरुण मित्र मकबूल तांबोळी सर .
काल त्यांचा 75 वा वाढदिवस साजरा झाला त्यानिमित्त हा लेख.
तरुण यासाठी की ते गप्पा मारताना त्यांच्या अनुभवा बद्दल बोलतातच पण आत्ता आमच्या पिढी समोर असलेल्या चॅलेंजेसचाही ते विचार करतात . आम्ही महिन्यातून एकदा एक तास सहज बोलतो..
ते माझे health insurance Client पण आहेत. त्यांची
स्वतःची आणि त्यांच्या जीवनसाथी शकीला मॅम यांची पॉलिसी त्यांनी माझ्याकडून काढलीच पण त्यांचा मुलगा असीम आणि मुलगी आस्मा यांनांही माझ्या कडून पॉलिसी घेण्यास सुचवले. सोबत त्यांचे एक मित्र नार्वेकर (ex Joint commissioner, Sales tax) त्यांनाही सुचवले. त्यामुळे नार्वेकर सर आणि नार्वेकर यांचे मित्र डॉ पाटील यांच्याशीही माझी छान मैत्री झाली. अर्थात नार्वेकर सरांनी आणि पाटील सरांनी पूर्वी पूर्ण गोष्टी जाणून घेतल्या , त्यानंतरही कोणी तरी त्यांना जास्त डिस्काउंट देऊ केला पण तिथे न जाता माझ्याकडुनच policy घेतली. तर मला यानिमित्त हे सांगायचे होते गांधी जसे फक्त बोलत नव्हते तर खादी आणि अन्य माध्यमातून रोजगार देऊन सक्षम ही बनवत होते ते सरांनी प्रत्यक्षात अमलात आणले .
तर यानिमित्त सरांचा परिचय पाहूया
सरांचा जन्म पुण्यात मराठमोळ्या मुस्लिम गरीब कुटुंबात, फुलवाला चौक येथे 06 Sep 1948 रोजी गणेश चतुर्थी ला झाला .आणि काल 06 sep 2023 रोजी कृष्ण जन्माष्टमी ला 75 वर्षे पूर्तता झाली. बालपणात आसपास जैन मारवाडी, गुजराती, ख्रिश्चन, मराठी , मुस्लिम, सिंधी, तेलगू, सिंधी , शीख , कानडी असा संमिश्र जाती धर्माच्या वस्तीचा भाग होता.
त्यांनी Telco मध्ये 35 वर्षे नोकरी केली आहे.
ते देवभक्त होते, तळ्यातल्या गणपतीला ते रोज जात असत त्यामुळे एक मुस्लिम मुलगा जातोय त्याचे विशेष कौतुक होत असे. 1965 पासून काही वर्ष गणेश मंडळाचे अध्यक्षही होते. त्यांच्या मनात मात्र वेगवेगळे विचार घोळवत असत. त्यांनी सावरकरांचा मानवाचा देव आणि विश्वाचा देव हा लेख वाचला आणि ते नास्तिक झाले.
मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे ते 5-6 लोकांपैकी एक असे संस्थापक सदस्य होते आणि त्यात ते कार्यरत होते. त्यामुळे त्यांचा भाई वैद्य, निळू फुले, बाबा आढाव यांच्याशी ही जवळचा संबंध आला होता.
अभिनेते निळू फुले यांच्याशी त्यांचा 1970 पासून चांगली मैत्री होती आणि निळू भाऊ यांनी मकबूल सरांचा त्यांच्या बालमित्रांमध्ये समवेश केला होता.2003 ते 2009 या कालावधी मध्ये ते निळू भाऊंच्या सोबत संबंध महाराष्ट्रभर दौऱ्यात असत. महाराष्ट्र आणि देशभर च्या दौऱ्या मध्ये भाई वैद्य यांच्या सोबत ही असत. सुधाताई वर्दे आणि खासदार संभाजीराव काकडे यांच्याशीही त्यांचे खूप जवळचे संबंध होते.मकबूल सर राष्ट्र सेवा दल चे ट्रस्टी Treasurar होते त्याच बरोबर साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक आणि हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्युट याचेही ट्रस्टी होते.
अगदी वयाच्या 6 व्या -7 व्या वर्षापासून वाचनाची गोडी लागल्यामुळे विविध विषयांवरील त्यांचे वाचन अफाट आहे. त्यांचे विचार हे सुस्पष्ट आणि balanced आहेत.
आमची ओळख फेसबुकवरच झाली. सर माझे बहुतेक लेख वाचत आणि त्यावर प्रतिक्रिया देत असत. गांधी विचारातून समाजात प्रेम आणि संवाद वाढवणे हा आम्हाला जोडणारा दुवा.
2021 मध्ये एकदा स्वतः साठी आणि कॉलनी तील लोकांच्या साठी जांभळे विकत घेण्याच्या निमित्ताने त्यांनी मला त्यांच्या पाषाण येथील घरी बोलवले तेव्हा त्यांच्याशी पहिली प्रत्यक्ष भेट झाली. (Lock down मध्ये 2 महिने बहिणीने काही काळ जांभळाचा व्यवसाय सुरू केला होता त्याबद्दल मकबूल सरांनी फेसबुक वर वाचले आणि मला बोलवले). नंतर Wednesday कट्टा निम्मित गुडलक कॅफे, FC Road येथे भेटी होत असत.
काल त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मान्यवरांशी भेट झाली ज्यात डॉ. बाबा आढाव, डॉ कुमार सप्तर्षी ,अन्वर राजन, रत्नाकर महाजन ,प्रशांत कोठडीया , मुक्ता पुणतांबेकर, संग्राम खोपडे , सुरेश खोपडे , यशोदा वाकणकर , संदीप बर्वे , मनीषा पाटील, संतोष म्हस्के, विकास देशपांडे, चंद्रकांत शेडगे, माणिक जोगदंड, संतोष पवार, पराग गायकवाड, सुकेश पासलकर आणि अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
आपणही त्यांना फोन किंवा मेसेज करून सदिच्छा नक्की द्या.
त्यांचा संपर्क Makbul Tamboli - 7020509654
हा लेख लिहिण्याचा एक हेतू हाही आहे कि चांगल्या लोकांचे असे चरित्र पुढे न आल्याने लोकांच्या समोर चुकीचे दंगली घडवणारे लोक आदर्श म्हणून उभे केले जातात .
संकेत मुनोत
8668975178

2