ग्रेट भेट विथ कलिंदीताई
एवढी प्रेरणादायी व्यक्ती आपल्या जवळपास आहे आणि आपल्याला त्यांच्याबद्दल काहीच माहित नाही किती आश्चर्य नव्हे?
खूप आश्चर्य वाटले जेव्हा मी कलिंदीताई बद्दल google वर शोधले पण एवढया महान व्यक्तीबद्दल मला जास्त काहीच सापडले नाही
वर्तमानपत्रात रोज भलत्याच लोकांची नाव वाचायला मिळतात आणि ही निस्वार्थपणे कार्य करणारी समाजोपयोगी विद्वान माणसं मात्र अनोळखीच राहतात !!!
Women are not equal to men; they are superior in many ways, and in most ways that will count in the future. It is not just a matter of culture or upbringing. It is a matter of chromosomes, genes, hormones, and nerve circuits.
अस एका biology प्रोफेसरने लिहून ठेवलय ते खोटं नव्हे अस त्यांना भेटल्यावर पुन्हा एकदा सिद्ध झाले असे वाटले
बरीच चौकशी केल्यावर मग सुगन बरंठ काकांना फोन लावला आणि माहिती घेतली तेव्हा कलिंदीताई नावाचे ते विशाल व्यक्तिमत्व माझ्यासमोर उभे राहिले
इंदौर ला तुम्ही गेलात तर तेथे सरवटे बस स्टँड अतिशय प्रसिद्ध आहे. ते कालिंदी ताई च्या वडिलांच्या नावाने उभारण्यात आले आहे. त्यांचे वडील व्ही. व्ही. सरवटे हे स्वातंत्र्य सेनानी, शिक्षण क्षेत्रातील क्रांतिकारक, गांधीजींचे अनन्य सैनिक होते. इंदौर ला बालग्राम नावाची संस्था त्यांनी स्थापन केली ,जी आजही चालु आहे. त्यांना तात्या म्हणूनच सगळे ओळखतात .
त्यामुळे कालिंदी ताईंना लहानपणा पासूनच तुकडोजी महाराजांच्या शब्दात
सांगायचे तर 'राष्ट्र धर्माचे बाळकडू' मिळालेले आहे. त्यांचे वडील मध्य भारत सरकार मध्ये मंत्री होते.
कालिंदी ताई सरवटे या एम. एस .डब्ल्यू. आहेत, 1960 मध्ये त्या विनोबाजीं कड़े आल्या . वय 85 वर्षे आहे. ही त्यांची भौतिक ओळख झाली.
कार्यकर्ता म्हणून ओळख म्हणायची तर त्या विनोबा सोबत भूदान यात्रेत 10 वर्षे राहिल्यात.
भूदान पदयात्रेतच 1964 ते 1996 पर्यन्त विनोबांच्या भाषणाचे संकलन ही त्यांनी केले, जे आज आपणास मिळते तें खरे तर कुसुमताई देशपांडे आणि कालिंदी ताई यांचीच कृपा होय. कारण बाबा तर फक्त बोलत.
1969 साली बाबांनी क्षेत्र संन्यास घेतल्या पासून त्या ब्रह्म विद्या मंदीर, पवनार येथेच राहिल्या.
भगिनींना ही ब्रह्म विद्येची उपासना करता यावी हा
खरा वेद विचार, बाबांनी
ब्रह्म विद्या मंदीर रूपाने प्रत्यक्षात उतरविला.
त्या भगिनी मिळून जे अप्रतिम वैचारिक मासिक चालवितात त्याचे नांव 'मैत्री'.हे मासिक म्हणजे गांधी विचारांचे नवनीत होय. कालिंदी ताई त्या मैत्री मासिकाच्या 32 वर्षे संपादक होत्या.
विनोबा विचारमृत जे आज आपणास उपलब्ध आहे, 20 खंडात त्याच्या ही त्या एक
संपादक राहिल्या. विनोबांच्या संकलित विचार धनातूनच त्यांनी खलील पुस्तके लिहिली
1.अहिंसा की तलाश.
2. इस्लाम का पैगाम.
3. ज्ञानोबा माऊली.
4. तुका आकाशा एव्हढा.
ही पुस्तके विनोबांच्या नावानेच आहेत.
त्यांनी बाबांच्या विचारातून स्वताच्या शैलीत खालील पुस्तके लिहलीत .
1. ऐसी जीवनाची कळा
2. अभंग जीवन व्रत
3. गीतेतील परीसाच्या संगतीत.
या वरुण तुमच्या लक्षात येईल की त्या अतिशय उत्तम वाचक, उत्तम ग्रहण
शक्ती असलेल्या, चिंतक आणी लेखक ही आहेत.
विनोबा गेल्यावर ही
त्यांनी आम्हा सारख्या अनेक लोकांना विचार संस्कारांनी सिंचीत केले आहे.
भूदान यात्रेतीलकाम हे तर जमिनी वर (ग्रास रूट वर्क) काम झाले. म्हणजे त्यांनी फक्त ज्ञानदानाचे आणी संस्कारांचेच काम केले असे नव्हे तर कार्यकर्त्याचे काम ही तब्बल 10 वर्षे केलेलं आहे.
विनोबा सारख्या युगदृष्टा ऋषींचे वचन संकलन करणे हे
काम विद्वानाचे नव्हे तर तत्वज्ञानी माणसाचे आहे.
या करिता विनोबा ही
समजणे जरूरी आहे.
संतांचे वाङमय हेही ताईंचे खास चिंतन, मननाचा विषय. ही ताईंची बाह्य रुपे असली तरी त्या
अतिशय विनम्र, मितभाषी, मृदु भाषी, निरपेक्ष, निर्भय, निर्वैर आणी निरासक्त आहेत. हे मी जवळून अनुभवले आहे.
***
संकेत मुनोत
8087446346
फेसबुक लिंक- https://m.facebook.com/story.php?story_fbid=1375184292532618&id=100001231821936
संदर्भ- सुगन बरंठ काका आणि समता मुथ्था
याच सुश्री . कालिंदी ताई बरोबर एक परिसंवाद आयोजित केला आहे
विचार समजून घेण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करु या.
मित्रांसह आपले स्वागत आहे।
तारीख - 22 /01/17
वेळ - दुपारी 5 ते 7
स्थान- रावसाहेब पटवर्धन स्कूल, साने गुरुजी स्मारक सिंहगड रोड, पुणे
आपल्या आयुष्या साठी उपयोगी मार्गदर्शन आपल्याला या प्रबोधनातुन मिळणार आहे..
event ची फेसबुक लिंक-https://www.facebook.com/events/1817495821826168/?ti=cl
संपर्क - समता मुथ्था
9766051446
- निलेश
976634975
- उमेश ठाकुर
9049042048
-सतीश लोखंडे
9096725056