AddThis code

Monday, November 28, 2022

महात्मा फुले आणि महात्मा गांधी दोघांचा काळ वेगळा, लढा वेगवेगळा.पण तरीही दोघे जवळचे का वाटतात ?

मला महात्मा फुले आणि महात्मा गांधी हे दोन्ही खूप जवळचे वाटतात.खरतर या दोघांचा काळ वेगळा, लढा वेगवेगळा.पण तरीही दोघे जवळचे का वाटतात काय माहित..?
मला त्यांची करुणा, संवेदनशीलता, भूमिका घेणे वगैरे जास्त भावते.
दोघांचेही ह्रदय सामान्य माणसासाठी , पीडितासाठी भरून येत होते.
दोघांना जनतेने महात्मा म्हटले..
ज्योतिबा सावित्री
मोहनदास कस्तुरबा
दोघांनाही जोडीदाराची साथ चांगली मिळाली
दोघांनी साधा वेष परिधान केला
शेतकरी हा दोघांसाठी ही प्रिय
सनातन्यांच्या रडार वर दोघे ही होते...
महात्मा फुलेंची चळवळ वेगळ्या प्रकारे गांधींनी पुनः पुढे नेली..
महात्मा फुलेंवर जसे हल्ले झाले तसे गांधींवर ही झाले आणि त्यात त्यातील अनेक हल्लेखोरांचे अनुयायी झाले हेही साम्य
त्यात उशीरा का होईना एकाचा खून करण्यात यशस्वी झाले सनातनी..
महात्मा गांधींनी किंवा महात्मा फुलेंनी विपुल लिखाण केले पण दोघांची कृती लिखाणापेक्षा जास्त मोठी होती...
दोघांचे आणि त्यातल्या त्यात सावित्रीबाई फुले यांचे लिखाण काढले तर ते संदर्भाशिवाय मांडले तर त्यात चुका काढता येतात किंवा उणिवा काढता येतात कारण दोघेही इतरांसारखे खूप बुद्धिप्रामाण्यवादी किंवा बोलके सुधारक नव्हे तर कर्ते सुधारक होते..
याबाबत प्रबोधनकार ठाकरे यांनीही छान मांडणी केली आहे ती आणि इतर काहींचे साहित्य कंमेंट मध्ये मांडतो..
संकेत मुनोत

Comment, Share ,Follow and Subscribe.


No comments:

Post a Comment