AddThis code

Tuesday, May 31, 2022

जेष्ठ गांधीवादी वसंतरावजी बोंबटकर नहीं रहे उनका अल्प परिचय


जेष्ठ #गांधीवादी श्री वसंतरावजी बोंबटकर नहीं रहे।

संत आचार्य विनोबा भावे के शिष्य, जयप्रकाश नारायण के संपूर्ण क्रांति आंदोलन के योद्धा,भूदान, ग्रामदान ,गोभक्त, कृषि विज्ञान के शोधकर्ता, जैविक सजीव खेती के ऋषि,नैडेप कंपोस्ट खाद,झटपट खाद के समर्पित प्रचारक,लेखक,चिंतक, सर्वोदय समाज के संयोजक श्री वसंतरावजी बोंबटकर इनका 31मई 2022 को देहांत हो गया| उनकी अंत्ययात्रा आज 01जून 2022 को उनके वर्धा के घर से निकलेगी। सुबह 10 बजे मोक्षधाम , वर्धा यहा पे होगा|

अभी दिसंबर 2021 में ही उन्हे पहली बार मिला था और करीबन 1-2 घंटे बातचीत हुई | उनका ममता वाला स्पर्श और आशीर्वाद आज भी याद है| वे कैसे इन विचारो के तरफ मुड़े और उन्होंने क्या-क्या किया? ये जानना बहुत ही प्रेरणादाई अनुभव था|  उनके जमाई तथा मुझपे सदा स्नेह बरसाने वाले खेतीतज्ञ मनोहर  खके काका Manohar Khake ने मुझे उनसे मुझे मिलवाया| वसंतरावजी को भी मेरा काम जानकर बहुत खुशी हुई और उन्होंने मुझे प्रोत्साहन भी दिया| 
दोस्तो पैसे तो कोई भी कमा लेता है पर सच्चाई के राहपे चलके लोगोके आंसु पोंछकर ,गलत बातों के विरुद्ध भूमिका लेना, संघर्ष और रचनात्मक काम करना बड़ा मुश्किल होता है पर राष्ट्रपिता महात्मा गांधी ऐसे थे कि उन्होंने लोगो को वह राह दिखाई और दुनिया में बड़ा बदलाव लाया

उनकी यांद में बापुका ये गीत याद आता है
जब जब तेरा बिगुल बजा जवान चल पड़े|मजदूर चल पड़े थे और  किसान चल पड़े| हिंदू और मुसलमान,सिख, पठान चल पड़े|कदमों में तेरी कोटी कोटी प्राण चल पड़े|फूलों की सेज छोड़कर दौड़े जवाहरलाल|साबरमती के संत तूने कर दिया कमाल ।

सरदार पटेल S.Vallabhbhai Patel  जो अपनी बैरिस्टर की प्रैक्टिस में बहुत अच्छा पैसा कमा कर ऐशोराम की जिंदगी जी रहे थे वो हो या नेहरू, Dr. Rajendraprasad ,  Lal Bahadur Shastriji और देश के लाखो लोग हो वो बापू की प्रेरणा से इस संघर्ष और रचनात्मक कार्य की राह पर चल पड़े और उस वजह से देश भी आजाद हुआ और 75 वर्ष से ज्यादा साल एकजुट भी रहा
वसंतरावजी ने खेती विषय पे अनेक पुस्तिकाएं लिखी | ठाकुरदास बंग की पहला जीवन चरित्र उन्होंने लिखी| 
तो ऐसे वसंतराव जी बोंबटकर जी को मेरे भाव भरा अभिवादन
यहां मैं आपको वचन देता हु की आप जिस तरह सत्य और प्यार की राह पर चलते रहे उसी राह पे हम आगे बढ़ते रहेंगे
जय जगत 
संकेत मुनोत
Knowing Gandhi Global Friends  
Jaihind People's Movement
Comment, Share ,Follow and Subscribe.

Tuesday, May 24, 2022

सर्वधर्म परिषदेत संकेत मुनोत यांनी केलेली जैन धर्माबद्दल ची मांडणी- जैन जगृती मे २०२२ मध्ये प्रकाशित लेख

जैन धर्म म्हणजे नेमकी काय? हिंदू किंवा मुस्लिम धर्मातून तुटून जैन धर्म तयार झाला का?स्वतंत्र विचार न ठेवता पैसे आणि व्यापार वाढवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊन एकांतवादाने एखाद्याची अंधभक्ती करणे म्हणजे जैन धर्म की भूमिका घेणे म्हणजे जैन धर्म ?मारवाडी गुजराती म्हणजेच जैन का? भारताचे नाव भारत कशावरून पडले आणि असे बरेच काही...






Comment, Share ,Follow and Subscribe.

Friday, May 20, 2022

*देशाचे अतोनात #नुकसान करणारे #पंतप्रधान राजीवजी*

मला ते न आवडण्याचे कारण म्हणजे त्यांनी केलेली #विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांती.

इंदिराजींच्या निधनानंतर अत्यंत विपरीत स्थितीत पंतप्रधान पदाची सूत्रे हाती येताच, #राजीव_गांधी यांनी सरकारचा पैसा जाहिराती करण्यासाठी द्यायचा सोडून तो देशाच्या पायाभूत सुविधांच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी व त्यांच्या आधुनिकीकरणासाठी  वळवला
पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेर होणारा विरोध नाकारुन त्यांनी भारतात *संगणक आणि टेलिकॉम युग* आणले खरतर इंटरनेटचा शोध हा भारताने महाभारताच्या काळातच लावला हे त्त्यांनी त्यावेळी सांगायला हवे होते पण विज्ञानाची दुर्बुद्धी...
या क्रांतीमुळे आज भारतातील लाखो तरुण भारतात आणि भारताबाहेर आय टी क्षेत्रात कार्य करतात ज्यामुळे ते अमीत शाहजी म्हणतात तसे हे तरुण भजी विकण्याचा मोठा व्यवसाय किंवा त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणतात तसे पान टपरी अथवा गोमूत्र विक्रीचा व्यवसाय करण्यापासून मुकले आणि आपण चविष्ट खाद्यपासून मुकलो.

त्यांच्याच काळात 1985-1997 या कालखंडात *देशाचे औद्योगिक उत्पादन 125 टक्के वाढल्यामुळे* सोबतच लोकांना रोजगार ही मिळाल्यामुळे घरी बसणारी तरुणाई कमी होऊन  देशाचे अतोनात नुकसान झाले.

दुसरे मोठे नुकसान म्हणजे *मतदानाचा हक्क वय २१ वर्षे वयावरून १८ वर्षे करणे* ज्यामुळे या युवांना मतदानाचा हक्क मिळाला .

*ग्रामीण भागातील मुलांना मोफत शिक्षण मिळण्यासाठी नवोदय विद्यालय, गावांसाठी पंचायत राज , C-DOT, Operation Blackboard, Indira Gandhi National Open University (IGNOU), परदेशात भारताचे स्थान अधिक उंचीवर नेणे* अशी अनेक चुकीची कामे त्यांनी केली

असो राजीवजींना थोडी तरी दूर दृष्टी असती तर त्यांनी *जागोजागी आपले फ्लेक्स लावले असते*, वैमानिक होऊन विमान चालवण्याऐवजी पुष्पक विमानाचा शोध भारताने कसा लावलाय याचे समर्थन केले असते,
परदेशात जाऊन सॅम पित्रोदा सारख्या शास्त्रज्ञांना भारतात परत आणून टेलिकॉम क्रांती करण्याऐवजी आसाराम बापू आदींचे सत्संग केले असते

तिकडे जाऊन भारताचे आतंरराष्ट्रीय संबंध मजबूत करण्याऐवजी सारखे सारखे जाऊन त्यांच्या पंतप्रधनांना जादूकी झप्पी देत देशात मोठं-मोठी भाषणे झाडली असती
लोकांचे मुळ प्रश्न अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार, शिक्षण, व्यापार वृध्दी, आरोग्यव्यवस्था हे सोडून गावांची नावे बदलणे, देशात महागाई करत टॅक्स भरमसाठ वाढवून सामान्य माणसांचे जगणे अवघड करणे इ गोष्टी केल्या असत्या

पाकिस्तान सरकारची नाराजी झुगारून बलुचिस्तानात जाऊन सरहद्द गांधी खान अब्दूल गफारखान यांची भेट घेण्याऐवजी शत्रू राष्ट्राला शिव्या देत त्यांच्या राष्ट्रात जाऊन अचानक केक कापून बिर्याणी खाल्ली असती,
जो कोणी त्यांच्यावर टीका करेल प्रश्न विचारेल त्याला देशद्रोही, गद्दार ठरवण्यासाठी ट्रोल ची टीम तयार केली असती

*पण नसते एखाद्याला #दूरदृष्टी*

जाऊ द्या आज त्यांनीच आणलेल्या #तंत्रज्ञान युगात त्याच संगणकाद्वारे त्यांच्याविषयी खोटे-नाटे पसरवून आपण त्यांना चांगलाच धडा शिकवत आहोत

संकेत मुनोत
२२ मे २०१८



#RajivGandhi #RememberingRajivGandhi

Comment, Share ,Follow and Subscribe.

Saturday, May 14, 2022

प्रत्यक्ष मॅच पाहणे - छान अनुभव

तुम्हाला आश्चर्य वाटेल मला क्रिकेट मॅच पाहायला आवडत नाही. लहानपणी अपार्टमेंट च्या जवळ खूप क्रिकेट खेळायचो...गल्ली क्रिकेट मध्ये त्यावेळी कधी कधी कमेंट्री पण केली...सध्या अनेक वर्षापासून क्रिकेट खेळले नाही आणि आता रस ही नाही..

बॅडमिंटन, खोखो, फुटबॉल, कबड्डी किंवा इतर गेम क्रिकेट पेक्षा जास्त आवडतात..
मला अजूनही क्रिकेटच्या बहुतेक players ची नावे ही माहीत नाही.

सचिन, विराट, द्रविड, जडेजा, वसीम अक्रम, हरबजन सिंग, इरफान पठाण, झहीर खान आणि अजून असे १०-२० काही निवडक माहित आहेत..यातही भारत पाकिस्तान आणि वर्ल्ड कप सामनेच  मी मुख्यतः पाहिले...
बाकी आयपीएल वगैरे कधी जास्त पाहिले नाही घरात कधी कधी मावस भावंडे किंवा कोणी आले तर ते स्कोर विचारतात मला तो माहीतच नसतो..त्यांच्या घरी गेल्यावर ही ते क्रिकेट पाहत बसतात तेव्हा मी पेपर वाचतो किंवा मोबाईल मध्ये काही तरी करत बसतो...

आधी मी एकटाच असा आहे का असे वाटायचे पण सामजिक क्षेत्रात पडल्यामुळे असे अनेक लोक माहित पडले यात मोठ मोठे मान्यवर उद्योगपती, पत्रकार, लेखक, कवी, सामजिक कार्यकर्ते, शास्त्रज्ञ, डॉक्टर, विद्यार्थी आहेत ज्यांना हे पाहण तेवढं आवडत नाही..
असो कोणी पाहत असेल तर त्यालाही माझा आक्षेप नाही ...

 आत्ता मुंबईत गेलो होतो आणि वेळ होता तर प्रत्यक्ष मॅच पाहू म्हटल आणि गेलो मॅच पहायला..
प्रत्यक्ष मॅच पाहणे हा सुंदर अनुभव असतो...
यात जेव्हा सिक्स किंवा फोर जाते किंवा एखादा player out होतो तेव्हा ची excitement भारी असते...

आवडो अथवा नावडो एखाद्या गोष्टीत गेलो की त्या गोष्टीचा पुरेपूर आनंद घ्यायचा असा माझा स्वभाव असल्यामुळे मॅच फूल एन्जॉय केली...






Comment, Share ,Follow and Subscribe.