AddThis code

Friday, November 30, 2018

गांधी आजच्या तरुणाईच्या परपेक्षातून- जनमानसाची शिदोरी मासिकात प्रकाशित लेख

परवा मुंबईमध्ये रेल्वे पादचारी पुलावर चेंगराचेंगरी झाली आणि पुन्हा गांधीचे शब्द आठवले "खेड्याकडे चला".दररोज वर्तमानपत्र वाचत असतांना गांधी आठवतच असतात. परंतु अशा घटना घडल्यावर मात्र गांधींच्या विचारांची, तत्त्वांची गरज तीव्रपणे जाणवते.


जगभरात गांधीजींचे चाहते आणि अनुयायी असले तरी भारतात गांधीजींची चेष्टाच जास्त उडवली जाते.
अल्बर्ट आईन्स्टाईन या थोर वैज्ञानिकांने म्हटलेच आहे की ‘’ येणाऱ्या पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत कि असा कोणी हाडा मांसाचा माणूस या पृथ्वीतलावर वावरत होता’’ आणि होय आईन्स्टाईनच्या इतर सिद्धांताप्रमाणे हाही सिद्धांत खरा ठरतो की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती आज आहे.

होय आजही गांधीचे विचार महत्वाचे, अनुकरणीय, आचरणीय , आम्हा भारतीयांना आणि जगाला वाचविणारे आहेत याचा प्रत्यय पावलोपावली येतो. काही दिवसांपूर्वी मराठी सिनेसृष्टीचे बादशहा, नटसम्राट अभिनेता डॉ श्रीराम लागू यांच्याशी गप्पा मारतांना "आज गांधीजी relevant(समकालीन) आहेत का?" हा प्रश्न विचारला होता. ते म्हणाले की गांधीविचार फक्त काल किंवा आज नाही तर सार्वकालिक  relevant आहेत. एका विज्ञानवादी माणसाकडून हे ऐकणे माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का होता.

थोडा विचार केला तरी गांधीचे विचार आजही आचरणीय आहेत हे लक्षात येते. त्यातील काही सहज दिसून येणाऱ्या बाबी पाहू या

अहिंसा –

'कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका'-महात्मा गांधी 

आज आश्चर्य वाटते की या महात्म्याने तेव्हा मोबाईल, इंटरनेट, टीव्ही सारखी कुठलीच माध्यमे नसतांना संपूर्ण देश स्वराज्याच्या एका धाग्याने जोडला होता. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वाटेवर विकास करीत असतांना  जगास त्याचे काही नुकसानही भोगावे लागत आहे. अनेक देश अण्वस्त्र घेऊन एकमेकांविरुद्ध उभे आहेत. शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपण स्वतः बलवान असायला पाहिजे, खूप सैनिकी शक्ती पाहिजे अशा मांडल्या जाणाऱ्या राष्ट्रावादात तथ्य किती याचा शोध घ्यावा लागेल. ज्यांना जगातील सर्वात बलाढ्य महासत्ता किंवा विकसित देश म्हणावं असे देशही दहशतवादी वृत्तींपासून स्वतःला वाचवू शकले नाहीत. तुम्ही एक बॉम्ब टाका आम्ही 2 टाकतो आणि काही क्षणात दोघेही संपून जाऊ असे वातावरण आहे, आणि याच वेळेस Eye for eye will make whole world blind अशा समंजस गांधीविचारांची सर्वाधिक गरज काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्कमध्ये वर्ल्ड ट्रेंड सेंटरवर दहशतवादी हल्ला झाला आणि पूर्ण जग सैरभैर झाले होते. तेव्हा पुढे असे प्रकार होऊ नयेत यासाठी जे शिष्ट मंडळ बनवले गेले त्यात या जगाला आइन्स्टाईनच्या सिद्धांताप्रमाणे गांधीविचारच तारू शकतात असा निर्वाळा अनेक विचारवंतांनी तेथे दिला.

कोलंबियात ‘फार्क‘ नावाची अति-डावी संघटना आहे.(आपल्याकडील नक्षलवाद्यांसारखी . पण आपल्याकडील नक्षलवाद्यांपेक्षा कितीतरी पट अधिक विध्वंसक क्षमता असणारी) तीची स्थापना 1964 ची. तेव्हापासून फार्क ने नंगानाच केला आहे. अपरिमित मनुष्यहानी व संसाधनांची हानी केली आहे. कोलंबियाचे सैनिक इतके वर्षे झाली पण त्यांचा बिमोड करण्यात सपशेल अपयशी ठरली.
सन्टोस यांनी यावर ‘गांधीयन मार्गाने’ उत्तर शोधण्याचा निर्णय घेतला. म्हणजे काय तर त्यांनी फार्क ला हिंसेचा मार्ग सोडून लोकशाही निवडणूक प्रक्रियेत पक्ष म्हणून सहभागी होण्यासाठी राजी केले. मागच्या वर्षी त्याच संदर्भात कोलंबियात सार्वमत घेण्यात आले. त्यावेळी सन्टोस यांनी गांधीजींपासून आपण प्रेरणा घेऊ असे लोकांना आवाहन करत

“We in Colombia have to adopt this culture of non-violence,” असे विधान केले.

अर्थात गांधीयन वाटेवर चालणारे सन्टोस हे काही पहिले नाहीत. कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकेतील मार्टिन ल्युथर किंग, कैक वर्षे तुरुंगात डांबले गेले तरी गोऱ्यांविषयी द्वेषभावना ज्यांच्या मनात राहिली नाही ते दक्षिण आफ्रिकेचे नेल्सन मंडेला, पिस्तुलगच्च देशात आवाज उचळणारी मलाला यांनी, ‘गांधीयन वाटेेवर’ मार्गक्रमण करून आपआपल्या देशात परिवर्तन घडवून आणले. या सर्वांना शांततेचा नोबेल पूरस्कार प्राप्त झाला. हा एक प्रकारे गांधीजींचाच सन्मान आहे.

शुराची अहिंसा-
मी समोरच्यवर हात ही उचलणार नाही , पळून ही जाणार नाही आणि समोरच्या बद्दल वैरभाव ही मनात आणणार नाही. किती मोठी गोष्ट आहे ही.
गांधीजींची अहिंसा ही शुराची अहिंसा होती
एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करा हे गांधीजी इंग्रजांबाबत बोलले नव्हते तर हरीजनांबाबत बोलले होते.दंगल झाल्यावर जेव्हा सवर्णांनी हरीजनांवर अन्याय केला तेव्हा गांधींनी हे उद्गार काढले होते त्यांचे पूर्ण वाक्य असे होते 'एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे केला आणि त्याच्यावर जरी मारले तरी आपण हरीजनांवर जो अत्याचार केला आहे त्या पापाचे परिमार्जन होणार नाही.कश्मीरमध्ये दंगली चालू होत्या पाकिस्तान घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा नेहरूंनी गांधीजींना विचारले होते की आत्ता अहिंसेचे कसे करायचे त्यावर गांधींनी उत्तर दिले होते की मी जर तुमच्या जागी असतो तर सैन्याचा वापर केला असता आणि पाकिस्तानच्या घुसखोरीला चोख प्रत्युत्तर दिले असते.पत्रीसारकारचे मुख्य क्रातीसिंह नाना पाटील जेव्हा महात्मा गांधींना भेटले त्यांना आपल्या ‘पत्रीसरकार’बद्दल सांगितले. त्यावर गांधीजी म्हणाले होते, की ‘नाना पाटील, तुमची चळवळ माझ्या तत्त्वात बसते न बसते यापेक्षा तुम्ही १९४२ ची स्वातंत्र्य चळवळ जिवंत ठेवली, सातार्याने या चळवळीचे नाव राखले हे महत्त्वाचे होय ! नाना, तुम्ही बहादूर आहात. भ्याडाच्या अहिंसेपेक्षा शुराची हिंसा परवडेल असे मानणारा मी आहे.  

यांत्रिकीकरण आणि गांधी –

गांधीजींनी यांत्रिकीकरणाला विरोध केला असा काहीसा गैरसमज पसरवला जातो तर ते असे काहीही नाही. उलट गांधीजीनी  चरखा असो किंवा इतर काहीही त्याच्या आधुनिकीकरणाला त्यांनी प्रोत्साहनच दिले होते. त्यांचा विरोध होता तो यांत्रिकीकरणाच्या अतिरेकामुळे होणाऱ्या बेकारीला, जे हजारो लोकांचे काम एका यंत्राकडे देऊन त्यांना बेरोजगार करू शकते, अतिवापराला जे लोकांची कष्ट करण्याची क्षमता संपवून त्यांना आळशी व आजारी बनवते. गांधीजींनी त्या काळात तेव्हाची अत्याधुनिक समजली जाणारी बहुतेक साधने वापरली होती. त्यांच्या फोनचे बिलच तेव्हाच्या व्हाईसरॉयच्या फोन बिलापेक्षा कितीतरी पटीने जास्त असायचे.

आज कामगारांनी मागण्यांसाठी संप केला की उद्योजक यंत्रमानव उपयोगात आणायचे म्हणतात. काही ठिकाणी अपघात होऊन यंत्रमानवांनीच कामगारांचे जीव घेतले आहेत. हा यांत्रिकीकरणाचा अतिरेक नाही का?

आईनस्टाईन हेच वेगळ्या शब्दात सांगतो 
"I fear the day when the technology overlaps with our humanity. The world will only have a generation of idiots."
जेव्हा तंत्रज्ञान  माणूसकीवर जड होते तेव्हा या जगात फक्त मूर्खांची पिढी राहील.

खेड्यांकडे चला गांधी –

गांधीजींनी जो खेड्याकडे जाण्याचा आणि स्वयंपूर्ण खेडी बनवण्याचा संदेश दिला होता तो आज सर्वाधिक महत्वाचा आहे. खेड्यातील गरज खेड्यातच भागली पाहिजे अशाप्रकारे गावाचे व्यवस्थापन व्हावे. मुंबईसारखी अनेक शहरे आज पर्यावरण व सर्वच दृष्टीने धोक्याची आहेत. पण गावात रोजगार नसल्यामुळे तेथील तरुण शहरांकडे विस्थापित होत आहेत. आपल्याला दररोज लागणारी हत्यारे आणि उपकरणे आपल्याच गावात बनावीत असे स्वयंपूर्ण खेड्याचे चित्र हवे. गांधीजींची स्वदेशीची संकल्पना आपण अंमलात आणली तर चीनी माल भारतात येणारच नाही. आज चीनी मालावर बहिष्कार टाकतांना गांधीजींचा स्वदेशीचा मंत्र सोयीस्करपणे विसरला जातो.वारणासारखी अनेक स्वयंपूर्ण खेडी याची उदाहरणे आहेत ज्यांनी तेथील लोकांना तेथेच रोजगार मिळवून देऊन गांधीजींच्या स्वयंपूर्ण खेड्याची संकल्पना अमलात आणली आहे. 

गांधीजी -जात आणि धर्म
गांधीजींनी कोणत्याही जातिचे वा धर्माचे अतिरेकी समर्थन केले नाही म्हणून सर्व जातीतील कट्टरवादी लोक त्यांचा द्वेष करतात  

एका जातीतील कट्टर लोकांना  पुणे करारामुळे गांधीजी ब्राम्हणधार्जिणे आणि दलितद्वेष्टे (मनुवादी) वाटतात

कट्टर उच्चवर्णीयांना गांधी ब्राम्हणद्वेष्टे दलित धार्जिणे वाटतात कारण जिथे एका जातीचे वर्चस्व होते अशी सर्व ठिकाणे राजकारण, समाजकारण व इतर अनेक  गांधीजींनी अस्पृश्यता निवारण चळवळीद्वारे  सर्व जातीसाठी खुली केली जिथे त्यापूर्वी फक्त उच्चवर्णीयांचे वर्चस्व होते.

पाकिस्तानमधील काही कट्टर मुस्लिमांनाही आम्हाला छोटा पाकिस्तान दिला,काश्मीर दिला नाही वगैरे कारणावरून  गांधी मुस्लिमद्वेष्टे व हिंदुधार्जिणे वाटतात

त्यामुळे गांधीजींच्या मागे त्यांचा उदो उदो वा देव करणारी कोणताही जातसमूह नाही. जेवढी टिंगल गांधीजींची उडवली जाते त्याच्या एक टक्का जरी इतर कोणत्या महापुरुषांची झाली असती तर दंगली झाल्या असत्या, पण हेच गांधीजींचे वैशिष्ट्य आहे कुठल्याही जातीचा , धर्माचा, पंथाचा आधार न घेता ते जगभर पोहचले या उलट इतर जातींच्या महापुरुषांना त्यांच्याच जातीच्या लोकांनी स्वतःपुरते संकुचित करून ठेवले.
कुठल्याही महापुरुषाचे गुणगान करताना किंवा चरित्र लिहितांना गांधीजींना कमी लेखावेच लागते त्याशिवाय यांचा महापुरुष मोठा होत नाही.याउलट गांधीजीनी स्वतःच्या चरित्रात इतर कुणाही महापुरुषाला कमी लेखण्यापेक्षा स्वतःलाच कमी लेखले आहे 

समाजस्वास्थ्य –

ती जागतिक पातळी असो व देश पातळी व ग्रामीण भाग जात, धर्म, प्रांत, वर्ग अश्या अनेक भेदांत समाज विभागला जात असून प्रत्येक ठिकाणी लोकांचा एकमेकांप्रती द्वेष, इर्षा आणि हेवेदावे वाढत आहेत. व्यक्तिगत पातळीवरील धार्मिक स्वातंत्र्याचा आदर गांधीजींना अपेक्षित होता. एक हिंदू म्हणून त्यांना वर्णव्यवस्था ही श्रमविभागणी करणारी समाजव्यवस्था म्हणून पूर्वायुष्यात त्यांना मान्य होती. परंतु ही व्यवस्था श्रमांचीच विभागणी न करता श्रमिकांची सुद्धा विभागणी करते हे आंबेडकरांचे म्हणणे त्यांना पटल्यावर त्यांनी उत्तरायुष्यात ही चातुर्वर्ण्य व्यवस्था अमान्य करीत तिचे उच्चाटन करण्यासाठी त्यांनी आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिले. धर्म, जाती, लिंग, प्रदेश, वर्ण यापलीकडे जाऊन प्रेम, बंधुभाव आणि समतेची तत्त्वे आचरणात आणावीत हा गांधीजींचा संदेश अमलात आणला तर अनेक गोष्टी सोप्या होऊ शकतात. समाजातील तंटे बखेडे, कोर्टातील कज्जे वाद कमी होऊ शकतात. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी वाया जाणारे मनुष्यबळ, वेळ आणि पैसा वाचू शकतो. हेच मनुष्यबळ, वेळ, पैसा मानवाच्या सुखासाठी विधायक कामे करण्यात वापरता येतील.

पर्यावरण –

Be The Change , you wish to see in the World"

"जो बदल तुम्हाला जगात पहायचा आहे तो बदल आधी स्वतः मध्ये घडवा" हे गांधीजींच्या सर्व शिकवणीतले सार आहे. यांत्रिकीकरणामुळे आपल्या जीवनात सोयी आणि सुखे आलीही असतील आणि आलीही आहेत. परंतु आपण निसर्गापासून दूर जाणारे हे कृत्रिम जीवन जगत आहोत ज्यात आपण निसर्ग ओरबाडून घेत आहोत. त्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडून मानवासमोर स्वतःच्या अस्तित्वाच्याच समस्या उभ्या राहिल्या आहेत. 

There is enough on Earth for everybody's need, but not enough for everybody's greed.- M.K.Gandhi

पृथ्वीकडे सर्वांची गरज भागवण्याएवढे आहे पण सर्वांची हाव भागवू शकेल एवढे नाही.

गांधीजींच्या कुटीवर एकदा एक तरुण कार्यकर्ता येऊन बसला. त्याने कुटीबाहेर ठेवलेल्या माठातून पेलाभर पाणी घेतले आणि अर्धा पेला पाणी पिऊन उरलेले पाणी तेथील एका रोपावर ओतले. जेव्हा त्याची भेटीची वेळ आली तेव्हा गांधींनी त्याला त्याचे वय विचारले. त्याचे वय खूपच कमी होते म्हणून त्याला कदाचित गांधीजी हरकत घेतील असे त्याला वाटले म्हणून तो म्हटला की माझे वय कमी आहे तरी मी कार्यकर्ता म्हणून चांगले काम करू शकेन. गांधी म्हटले, नाही, फक्त वय सांगा. त्यांनी २०-२२ असे काही तरी सांगितले. गांधी म्हणाले तुम्ही २० वर्षे पाणी पीत आहात तरी तुम्हाला एका वेळी गरज किती पाणी लागते याचा अंदाज आला नाही.

*आरोग्य*

नागरी जीवन विकसित होण्याअगोदरच माणूस अन्नावर प्रक्रिया करायला शिकला होता. इतर प्राणी निसर्गात त्यांचे अन्न ज्या स्वरुपात उपलब्ध असेल त्याच स्वरुपात ग्रहण करतात. मात्र माणूस हाच एकमात्र असा प्राणी आहे की जो अन्नावर अनेक प्रक्रिया करून खातो. त्यामुळे त्याची जीभ भ्रष्ट होते. कोणत्याही प्राण्यास भूक नसतांना, अजीर्ण झाले असता, स्वस्थ नसतांना अशा अवस्थांत अन्न ग्रहण करण्याची इच्छा होत नाही. परंतु जीभ भ्रष्ट झाल्यामुळेच माणूस मात्र अशा अवस्थांतही अन्न ग्रहण करतो. जास्तीत जास्त चविष्ट बनविण्यासाठी अन्नावर जास्तीत जास्त प्रक्रिया केल्या जातात. ते टाळण्यासाठी त्यांनी नियम केला की भोजन बनवितांना तेल, मीठ, मिरची आदि पाच पेक्षा अधिक पदार्थ वापरायचे नाहीत. नैसर्गिक आहाराने व योग्य विहाराने गमावलेले आरोग्य प्राप्त करता यावे यासाठी त्यांनी पुण्याजवळील उरुळी कांचन येथे निसर्गोपचार केंद्र सुरु केले.

गेल्या काही दशकात जागतिक खाद्य संस्कृती खूपच बदलली असल्याचे दिसते. त्यामुळे एकीकडे अन्न वाया जाते तर दुसरीकडे मोठी लोकसंख्या भूकबळी आणि कुपोषणाची बळी ठरते. गांधीजींनी आहारप्रणालीबाबत मांडलेली मते जरी प्राथमिक स्वरुपाची असली तरी त्यावरच पुढे बरेच संशोधन होऊन योग्य प्रणालीने स्वास्थ्य टिकवता तर येतेच परंतु कन्सर सारख्या अनेक व्याधी सुद्धा बऱ्या होऊ शकतात असे सिद्ध झाले आहे.

स्त्रियांचे सक्षमीकरण

जीवनाच्या ज्या ज्या क्षेत्रात पुरुष कार्य करतात त्या त्या क्षेत्रात स्त्रिया कार्य करू शकतात; स्त्रियांना कार्य करता आले पाहिजे आणि स्त्रियांनी कार्य केले पाहिजे हा गांधीजींचा आग्रह होता. त्यामुळेच त्यांनी स्त्रियांसाठी खास असे काही कार्यक्रम राबवले नसले तरी त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांची योजनाच अशी असायची की त्यात स्त्रियांचा सहभाग आवश्यक असे. एकदा बिहारमध्ये त्यांना एका कार्यक्रमासाठी निमंत्रित केले असता त्यांनी अट घातली की कार्यक्रमात स्त्रिया आणि पुरुषांची संख्या बरोबरीने असली पाहिजे. स्त्रियांच्या सहभागाशिवाय, त्यांच्या विकासाशिवाय समाजाचा विकास अपूर्ण आहे असे गांधीजींचे मत होते.

शिक्षण- 
आजकाल सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या वाढतच चालली आहे.वाचनासोबतच कौशल्यपूर्ण शिक्षणाच्या अभावामुळे हे घडते आहे.गांधीजींच्या नयी तालीम या शिक्षण पद्धतीत शिकलेले विद्यार्थी शिक्षण आणि कौशल्य दोन्ही दृष्टीने परिपूर्ण असत.

सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, स्वदेशी, सहिष्णुता, सर्वधर्मसमभाव आणि अशी अनेक मूल्ये सनातन असून ती परस्परसंबंधी आहेत व प्राचीन काळापासून ऋषीमुनींनी प्रतिपादित केली आहेत. याच मूल्यांनी समाजाची धारणा आणि व्यक्ती विकास होऊ शकतो. आणि गांधीजी हे असे अर्वाचीन काळातील महात्मा आहेत ज्यांनी व्यक्तिच्या व सामाजिक जीवनात या मूल्यांची प्रतिष्ठापना करण्याचा प्रयत्न केला.  या मूल्यांची प्रतिष्ठापना झाली तर माणूस बदलेल. माणूस बदलला तर समाज बदलू शकतो. माणूस बदलण्यावर गांधीजींचा विश्वास होता.

गांधींजीबद्दलच्या अफवा- 
५५ कोटी, फाळणी, भगतसिंगची फाशी अश्या अनेक गोष्टींना गांधींना जबाबदार धरले जाते पण ते सत्य नाही.शब्दमर्यादेमुळे ते येथे मांडत नाही तरुणांनी स्वतः याचा अभ्यास करून मग यावर मत बनवायला हवे

शेवटी बाबा आमटेंच्या मुक्तछंदातील हे शब्द सांगून विराम घेतो
त्याने प्रथम एका मिठाच्या पुडीला हात घातला आणि मग एक साम्राज्य 
मिठाच्या सात समुद्र पलीकडे फेकून दिले.त्याने सुतातून सुरुवात केली
आणि अखेर स्वराज्याचा स्वर्ग गाठून दाखवला. याच साध्या सुताने त्याने एक पिढीच्या पिढी आणि एक देशच्या देश बांधून दाखवला.
पण एक देशच्या देश आणि एक पिढीच्या पिढी पकडण्यासाठी 
नुसतीच हिकमत पुरी पडत नाही
त्यासाठी ताकदही लागते
भारी वजनाचा एक क्रूस वाहण्याची ताकद!"
"ज्याला तो क्रूस वागवता येतो 
त्याच्या सोबत बारा अनुयायी असले 
तरी त्याचे प्रेषितत्व घाबरत नाही.
पण खांद्यावर क्रूस नसता कुणी बारा लाख बाजारबुणगे घेवून निघाला 
तरी त्याचा महंत होतो.
आणि महंत फक्त गादी चालवू शकतात.
मन्वंतरे घडवून आणू शकत नाहीत

तर गांधी विचार आज , उद्या आणि सदा सर्वकाळ Relevant आहेत.

संकेत मुनोत
८०८७४४६३४६
Knowing Gandhism Global Friends
changalevichar1@gmail.com

गांधींविचारांची आज तीव्र गरज- राष्ट्र सेवादल पत्रिका ऑक्टोबर 2018 मध्ये प्रकाशित लेख

काही लाख इंग्रज कोट्यवधी भारतीयांवर राज्य करू शकले त्याची अनेक कारणे आहेत त्यातील सर्वात मुख्य कारण म्हणजे जात-पात , धर्म-वर्ग यात विभागलेला समाज 

काही लोक लढायचे पण त्याला म्हणावा तितका पाठिंबा मिळत नसे शिवाय सामान्यांना व पददलित वर्गाला तर त्याने काही फरकच पडत नसे त्यांच्यवर इंग्रजांनी राज्य केले काय मोगलांनी केले वा पेशव्यांनी केले त्यांचे तर सगळीकडे हालच होत

पण जेव्हा महात्मा गांधी आले तेव्हा त्यांनी काय केले तर  जात ,धर्म, पंथ, वर्ग, लिंग आदी सर्व भेद विसरून देशासाठी लढण्यासाठी एकत्र केले त्यांच्यात सुराज्य मिळवण्याचा आत्मविश्वास निर्माण केला जो त्यापूर्वी कोणी निर्माण केला नव्हता.
आज पुन्हा जेव्हा जाती जातीचे मोर्चे पाहतो तेव्हा गांधीविचारांची तीव्रतेने गरज जाणवते

गांधीजी -जात आणि धर्म
गांधीजींनी कोणत्याही जातिचे वा धर्माचे अतिरेकी समर्थन केले नाही म्हणून सर्व जातीतील कट्टरवादी लोक त्यांचा द्वेष करतात .
एका जातीतील कट्टर लोकांना  पुणे करारामुळे गांधीजी ब्राम्हणधार्जिणे आणि दलितद्वेष्टे (मनुवादी) वाटतात.
कट्टर उच्चवर्णीयांना गांधी ब्राम्हणद्वेष्टे दलित धार्जिणे वाटतात कारण जिथे एका जातीचे वर्चस्व होते अशी सर्व ठिकाणे राजकारण, समाजकारण व इतर अनेक  गांधीजींनी अस्पृश्यता निवारण चळवळीद्वारे  सर्व जातीसाठी खुली केली जिथे त्यापूर्वी फक्त उच्चवर्णीयांचे वर्चस्व होते.
पाकिस्तानमधील काही कट्टर मुस्लिमांनाही आम्हाला छोटा पाकिस्तान दिला,काश्मीर दिला नाही वगैरे कारणावरून  गांधी मुस्लिमद्वेष्टे व हिंदुधार्जिणे वाटतात.
त्यामुळे गांधीजींच्या मागे त्यांचा उदो उदो वा देव करणारी कोणताही जातसमूह नाही. जेवढी टिंगल गांधीजींची उडवली जाते त्याच्या एक टक्का जरी इतर कोणत्या महापुरुषांची झाली असती तर दंगली झाल्या असत्या, पण हेच गांधीजींचे वैशिष्ट्य आहे कुठल्याही जातीचा , धर्माचा, पंथाचा आधार न घेता ते जगभर पोहचले या उलट इतर जातींच्या महापुरुषांना त्यांच्याच जातीच्या लोकांनी स्वतःपुरते संकुचित करून ठेवले.
कुठल्याही महापुरुषाचे गुणगान करताना किंवा चरित्र लिहितांना गांधीजींना कमी लेखावेच लागते त्याशिवाय यांचा महापुरुष मोठा होत नाही.याउलट गांधीजीनी स्वतःच्या चरित्रात इतर कुणाही महापुरुषाला कमी लेखण्यापेक्षा स्वतःलाच कमी लेखले आहे.

गांधीजी आणि जागतिक प्रभाव
त्यांचा भारतावरच नाही तर पूर्ण जगावर प्रभाव आहे हे आपणास माहीतच नसते 
जगभर २ आॅक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्मदिवस ‘जागतिक अहिंसा दिन’ म्हणून साजरा केला जातो 130पेक्षा जास्त देशांनी गांधीजीवर अभ्यास करण्यासाठी विद्यापिठ सुरु केली आहेत

,शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन म्हणतो, गांधी नावाचा हाडा मांसाचा महान माणूस या पृथ्वीवर होऊन गेला यावर पुढील पिढ्या विश्वास पण ठेवणार नाहीत ( आईनस्टाईन हा मानवी इतिहासातील सर्वात बुध्दीमान माणसांपैकी एक आहे ),

ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यावर त्यांनी आपल्या पहिल्याच भाषणात म्हटले की जर गांधीविचार नसते तर मी आज इथे नसतो? मार्टिन ल्युथर किंग, बीटल्सचा उद्गाता जाॅन लेनन, रोमेन रोलंड, रीचर्ड अॅटनबरो, अलीकडचे स्टीव्ह जाॅब्ज, दलाई लामा, आॅंग साॅन स्यु की , हेन्री फोर्ड, मलाला, सत्यार्थी, अभय बंग, सुधा-नारायनमूर्ती,प्रकाश आमटे इ. अनेक माणसे गांधींपासून प्रेरणा घेऊन मोठी झाली आणि त्यांनी जगाचा इतिहास बदलला आणि आजही बदलत आहेत.

गांधीजी व समकालीन महापुरुष

स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पाहताना एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी.
सर्व महापुरुषांना एकमेकांविषयी प्रचंड आदर होता त्यांचे मार्ग जरी वेगळे असले तरी ध्येय एकच होते.

आझाद हिंद सेना स्थापन केल्यावर नेताजींनी त्यात ज्या  तुकड्या बनवल्या त्यांची नावे गांधी टुकडी व नेहरू टुकडी होते. आकाशवाणीवरून गांधीजीना राष्ट्रपिता म्हणणारे नेताजी सुभाषचंद्र बोसच होते तर सुभाषचंद्र बोस ना प्रथम नेताजी म्हणणारे गांधीच होते
शहीदे आजम भगतसिंहनी आपल्या 'नये नेताओंके अलग अलग विचार' या पुस्तकात नेताजी बोसना emotional Bengali, a devotee of the ancient culture of India तर नेहरुंना  internationalist and revolutionary असे म्हटले आहे.

-गांधीजी राष्ट्रपिता

‘ गांधींचे राष्ट्रपितापण हे कुणाच्या मानण्या न मानण्यावर अवलंबून नाही आणि कुणाच्या मेहेरबानीने ते महात्माजींना मिळालेले नव्हते. शतकानुशतके अन्याय आणि शोषणामुळे अवनत झालेल्या करोडो भारतीयांच्या उत्थानाचा आशय गांधींनी स्वातंत्र्य आंदोलनाशी जोडला. अस्पृश्य, दलित, शेतकरी, कष्टकरी, महिला अशा सर्वानीच आपले उत्थान भारतीय स्वातंत्र्यलढय़ात पाहिले. सर्वाच्या दु:खांवर गांधींनी आपल्या करुणेची केवळ फुंकरच घातली नाही, तर त्यांच्यातील स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम जागृत करून समतेवर आधारलेला राष्ट्रवाद गांधींनी उभा केला. गांधीजींनी कृश आणि दुबळ्या हाताने मूठभर मीठ उचलले आणि एका बलाढय़, गौरवशाली साम्राज्याचा पाया खचून गेला. कारण कोटी कोटी भारतीय जनतेच्या तन-मन-धनाची प्रेरणा त्या कृश आणि दुबळ्या हातांत एकवटली होती. गांधींनी राष्ट्रही जागविले आणि नवा राष्ट्रवादही जागविला. म्हणूनच सर्वच बाबतीत विभिन्नता असलेल्या देशात सर्वाना राजकीय, सामाजिक आणि आíथक समतेच्या संधी देणाऱ्या एका सेक्युलर संविधानाची, एका आधुनिक नव्या राष्ट्राची निर्मिती शक्य झाली. त्यामुळे गांधी राष्ट्रपिता ठरतात.

गांधीजी खूप अध्यात्मिक वा धार्मिक होते त्यामुळे ते मनुवादी होते असा काही मंडळींचा आरोप असतो

 सत्य -गांधीजी हे धार्मिक व आध्यात्मिक असले तरी धर्मांध व दुसऱ्या धर्माचा द्वेष करणारे नव्हते
गांधीजींचे अध्यात्म हे धार्मिक अथवा साक्षात्कारी नव्हते. त्याला सामाजिक परिमाणे होती. समाजाची सेवा, निसर्गाचे रक्षण, जलसंवर्धन, सार्वजनिक आरोग्याची काळजी हे त्यांना अभिप्रेत होते. व्यक्तिगत त्याग व व्यक्तिगत विकास यातून समाजाच्या हिताचा व्यापक विचार त्यांनी मांडला होता. एकाही डोळ्यातून एकही अश्रू निघू नये, गरिबी, अन्याय, विषमता यांचे उच्चाटन व्हावे, हीच त्यांची जीवनदृष्टी होती, हेच त्यांचे अध्यात्म होते आणि हाच त्यांचा परमार्थ होता. स्वातंत्र्याचा उल्लेख करणाऱ्यांनी स्वातंत्र्याकडे कसे पाहावे, याची दृष्टी गांधीजींच्या आचरणातून मिळते..

महात्मा गांधी आणि गोसेवा- महात्मा गांधी गोसेवक होते पण गोरक्षणाच्या नावाखाली माणसाला मारायला व माणसा-माणसात भेद पडायला त्यांनी कडाडून विरोध केला होता.
 25 जुलै 1947 सालच्या सर्वधर्म प्रार्थनेच्या वेळी गांधींजीनी गोहत्याबंदीसाठी करत असलेल्या उपोषणकर्त्या मित्राला आपल्या भाषणातून खडसावले होते "भारतात गोहत्या बंदीचा कायदा होऊ शकत नाही. गोसेवेचं व्रत मी अनेक वर्षांपासून स्वीकारलं आहे, पण माझा धर्म सर्व भारतीयांचा कसा असू शकेल? ही तर हिंदू नसलेल्या भारतीयांवर बळजबरी होईल.जोपर्यंत एखादा माणूस गोहत्या न करण्यास प्रवृत्त होत नाही, तोवर मी त्याला बळजबरी कशी करू? भारतात फक्त हिंदूच नाहीत तर मुस्लीम, पारसी, ख्रिश्चन आणि इतर धर्मांचे लोकही राहतात. आता भारत हा फक्त हिंदूंची भूमी आहे, हे हिंदूंचे गृहितक चुकीचे आहे. इथे जे राहतात, भारत त्या सर्वांचा आहे."

गांधीजी आणि अहिंसा- 

एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करा हे गांधीजी काही इंग्रजांबाबत बोलले नव्हते तर हरीजनांबाबत बोलले होते.दंगल झाल्यावर जेव्हा सवर्णांनी हरीजनांवर अन्याय केला तेव्हा गांधींनी हे उद्गार काढले होते त्यांचे पूर्ण वाक्य असे होते 'एका गालावर मारले आणि  दुसरा गाल पुढे केला आणि त्याच्यावर जरी मारले तरी आपण हरीजनांवर जो अत्याचार केला आहे त्याचे परिमार्जन होणार नाही. काश्मीरमध्ये  दंगली चालू होत्या पाकिस्तान घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा नेहरूंनी गांधीजींना विचारले होते की आत्ता अहिंसेचे कसे करायचे त्यावर गांधींनी उत्तर दिले होते की मी जर तुमच्या जागी असतो तर सैन्याचा वापर केला असता आणि पाकिस्तानच्या घुसखोरीला चोख प्रत्युत्तर दिले असते.पत्रीसारकारचे मुख्य क्रातीसिंह नाना पाटील जेव्हा महात्मा गांधींना भेटले त्यांना आपल्या ‘पत्रीसरकार’बद्दल सांगितले. त्यावर गांधीजी म्हणाले होते, की ‘नाना पाटील, तुमची चळवळ माझ्या तत्त्वात बसते न बसते यापेक्षा तुम्ही १९४२ ची स्वातंत्र्य चळवळ जिवंत ठेवली, सातार्याने या चळवळीचे नाव राखले हे महत्त्वाचे होय ! नाना, तुम्ही बहादूर आहात. भ्याडाच्या अहिंसेपेक्षा शुराची हिंसा परवडेल असे मानणारा मी आहे.  

संघ आणि गांधी

संघातील मंडळी अश्या बाता मारतात कि गांधीजीनी संघाचे कौतुक केले होते म्हणून पण गोळवलकर गुरुजींच्या भेटीनंतर महात्मा गांधीजींनी गोळवलकर गुरुजी व रा. स्व. संघ याबद्दलचे त्यांचे मत नेहरूंकडे व्यक्त केले होते. नेहरूंनी सरदार पटेलांना लिहिलेल्या एका पत्रात ते उदधृत केले आहे. नेहरू लिहितात : "बापूंनी श्री. गोळवलकरांच्या पहिल्या भेटीनंतर सांगितल्याचे स्मरते की त्यांनी (गोळवलकरांनी) काहीशी छाप टाकली हे खरे; पण मी त्यांच्यावर विश्वास टाकायला तयार नाही. त्यांच्याशी झालेल्या दुसर्या व तिसर्या भेटीनंतर मात्र प्रतिकूल मत व्यक्त करून बापू म्हणाले, यांचा काही भरवसा देता येत नाही. ही मंडळी बोलताना समजूतदार, वाजवी भासतात. पण नंतर बोलल्याच्या नेमके उलट वागण्यात त्यांना कसलाही खंत, खेद वाटत नाही. माझंही मत तसंच झालं आहे."

(सिलेक्ट कॉरस्पॉन्डन्स ऑफ सरदार पटेल-१९४५-५० भाग २ सं. व्ही. शंकर, नवजीवन, अहमदाबाद)

कस आहे भगतसिंह-राजगुरु फ़ासावर चढत होते .
कोट्यावधी सर्वसामान्य भारतीय माणसे प्रांत , प्रदेश ,संस्थान ह्या सगळ्या सीमा पार करून गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय म्हणून एक होऊन इंग्रजांशी लढत होते.
सुभाषबाबु आझाद हिंद सेनेतुन सशस्त्र लढा देण्याचा प्रयत्न करत होते, बाबासाहेब दलित स्वातंत्र्यासाठी झगडत होते .......,खुदीराम बोस, चंद्रशेखर आझाद इथिपासुन तिथपर्यंत लोक येन केन प्रकारे देशासाठी सर्वस्व अर्पण करत होते तेव्हा हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा मुस्लिम लीग अस नाव लावणार्या आणि स्वतःला सामाजिक संघटना म्हणवणाऱ्या या संघटना , संघटना म्हणून ह्या लढाईत आपल काय योगदान देत होत्या ?

मग ज्या लढाईत आपण भाग घेतलाच नाही त्या लढाईत पुढे असणाऱ्या नेत्यांचे असणारे मतभेद ( जे वैचारिक असतील , मार्गाबद्दल असतील पण ध्येयाबद्दल कधीच नव्हते ) चव्हाट्यावर आणून चघळत बसण्याचा नैतिक हक्क ह्या संघटनांना कसा मिळतो ?
आपल्याच मनाला आपण प्रश्न विचारले तर उत्तर सापडतील पण कबूल करण्याची हिंमत असायला पाहिजे. 
देशाच्या सरहद्दीवर हजारो सैनिक भगव्या किंवा हिरव्यासाठी लढत नाहीत तर तिरंग्यासाठी लढत आहेत देशाचे ऐक्य तुटेल असे काही करु नका
शेवटी बाबा आमटेंच्या मुक्तछंदातील हे शब्द सांगून विराम घेतो

त्याने प्रथम एका मिठाच्या पुडीला हात घातला आणि मग एक साम्राज्य 
मिठाच्या सात समुद्र पलीकडे फेकून दिले.त्याने सुतातून सुरुवात केली
आणि अखेर स्वराज्याचा स्वर्ग गाठून दाखवला. याच साध्या सुताने त्याने एक पिढीच्या पिढी आणि एक देशच्या देश बांधून दाखवला.
पण एक देशच्या देश आणि एक पिढीच्या पिढी पकडण्यासाठी 
नुसतीच हिकमत पुरी पडत नाही
त्यासाठी ताकदही लागते
भारी वजनाचा एक क्रूस वाहण्याची ताकद!"
"ज्याला तो क्रूस वागवता येतो 
त्याच्या सोबत बारा अनुयायी असले 
तरी त्याचे प्रेषितत्व घाबरत नाही.
पण खांद्यावर क्रूस नसता कुणी बारा लाख बाजारबुणगे घेवून निघाला 
तरी त्याचा महंत होतो.
आणि महंत फक्त गादी चालवू शकतात.
मन्वंतरे घडवून आणू शकत नाहीत

संकेत मुनोत
८०८७४४६३४६
Knowing Gandhism Global Friends
changalevichar1@gmail.com

जगाला अहिंसेचा संदेश देणारा अवलिया- जैन जागृती मध्ये प्रकाशित लेख

दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल

सध्या गांधी जन्मशताब्दीचे १५० वे वर्ष सुरु आहे फक्त भारतातच नव्हे तर जगभर त्याबद्दल अनेक उपक्रम सुरु आहेत.

भ. महावीर आणि बुद्ध जाऊन हजारो वर्षे झाली नंतर हळूहळू एक काळ असा आला कि लोकांचा अहिंसा या शब्दावरून विश्वास उडत चालला होता, काहींना तर अहिंसा हा बावळटपणा वाटे, जैन आणि बौद्धांच्या अहिंसेच्या अतिरेकाने भारत मागे राहिला असा खोटा प्रचार देखील काही विचारवंतांनी पसरवायला सुरु केला. पण याच वेळी गांधी नावाच्या या अवलिया व्यक्तीने फक्त भारतातच नव्हे तर जगभर अहिंसेचे महत्व पटवून दिले. आपल्यातील बहुतेक जैन लोकांनी अहिंसा आपल्यापुरतीच किंवा शाकाहारापुरतीच मर्यादित करून ठेवली पण या अवलियाने ती जगभर पोहचवली.

*गांधीजी, जात आणि धर्म:*
गांधीजींनी कोणत्याही जातिचे वा धर्माचे अतिरेकी समर्थन केले नाही म्हणून सर्व जातीतील कट्टरवादी लोक त्यांचा द्वेष करतात 

एका जातीतील कट्टर लोकांना  पुणे करारामुळे गांधीजी ब्राम्हणधार्जिणे आणि दलितद्वेष्टे (मनुवादी) वाटतात. कट्टर उच्चवर्णीयांना गांधी ब्राम्हणद्वेष्टे दलित धार्जिणे वाटतात कारण जिथे एका जातीचे वर्चस्व होते अशी सर्व ठिकाणे राजकारण, समाजकारण व इतर अनेक  गांधीजींनी अस्पृश्यता निवारण चळवळीद्वारे सर्व जातीसाठी खुली केली जिथे त्यापूर्वी फक्त उच्चवर्णीयांचे वर्चस्व होते. पाकिस्तानमधील काही कट्टर मुस्लिमांनाही आम्हाला छोटा पाकिस्तान दिला,कश्मीर दिला नाही वगैरे कारणावरून  गांधी मुस्लिमद्वेष्टे व हिंदुधार्जिणे वाटतात.

त्यामुळे गांधीजींच्या मागे त्यांचा उदो उदो करणारा वा त्यांचा देव बनवणारा कोणताही जातसमूह नाही. जेवढी टिंगल गांधीजींची उडवली जाते त्याच्या एक टक्का जरी इतर कोणत्या महापुरुषांची झाली असती तर दंगली झाल्या असत्या, पण हेच गांधीजींचे वैशिष्ट्य आहे कुठल्याही जातीचा , धर्माचा, पंथाचा आधार न घेता ते जगभर पोहचले.

*जागतिक प्रभाव:*
जगभर २ आॅक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्मदिवस ‘जागतिक अहिंसा दिन’ म्हणून साजरा केला जातो 130 पेक्षा जास्त देशांनी गांधीजीवर अभ्यास करण्यासाठी विद्यापीठ सुरु केली आहेत जगात सर्वात जास्त रस्त्यांना त्यांची नावे आहेत, शिवाय जगात सर्वात जास्त वाचले जाणारे चरित्र असणारे आणि सर्व भाषांमध्ये ज्यांचे साहित्य उपलब्ध आहे अशी एकमेव व्यक्ती म्हणजे महात्मा गांधीच.

शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांचे गांधीजींविषयीचे उद्गार आपणा सर्वांना माहीतच आहेत. केवळ तेच नव्हे, तर नेल्सन मंडेला, बराक ओबामा यांच्यासारख्या जागतिक नेत्यांनी या महात्म्याची महती व त्यांचे त्यांच्या आयुष्यातील स्थान निसंदिग्ध भाषेत सांगितले आहे.
शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन म्हणतो, गांधी नावाचा हाडा मांसाचा महान माणूस या पृथ्वीवर होऊन गेला यावर पुढील पिढ्या विश्वास पण ठेवणार नाहीत.
एकदा ब्रिटिश नौसेना प्रमुखाची मुलगी जागतिक कीर्तीचे लेखक रोमा रोलाँ यांना भेटायला गेल्यावर तिने युध्दमय पार्श्वभूमीवर जगाचे काय होईल असे विचारले, तेव्हा ते म्हणाले की येशू ख्रिस्त तर आता नाहीत, पण या काळात भारतातल्या गांधी नावाच्या माणसाचे विचार या जगाला तारून जातील, , नेल्सन मंडेलांनी २२ वर्ष लढा देऊन स्वातंत्र्य मिळवले आणि  राष्ट्राध्यक्ष  झाल्यावर म्हणाले, मला पहिलं पाऊल गांधीजीच्या भूमीत ठेवायचे आहे आणि ते भारतात आले. ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यावर त्यांनी आपल्या पहिल्याच भाषणात म्हटले आहे की जर गांधीविचार नसते तर मी आज इथे नसतो?
मार्टिन ल्युथर किंग, बीटल्सचा उद्गाता जाॅन लेनन, रोमेन रोलंड, रीचर्ड अॅटनबरो, अँपलचा जनक स्टीव्ह जाॅब्ज, जागतिक बौद्ध धर्मगुरु दलाई लामा , हेन्री फोर्ड, मलाला, सत्यार्थी,डॉ अभय बंग, सुधामूर्ती-नारायणमूर्ती, बाबा आमटे इ. अनेक माणसे गांधींपासून प्रेरणा घेऊन मोठी झाली आणि त्यांनी जगाचा इतिहास बदलला.नोबेल समितीने ११२ वर्षात पहिल्यांदा एका गोष्टीची माफी मागितली ती म्हणजे महात्मा गांधींना नोबेल न देण्याची चूक केल्याची माफी!

*जैन धर्माशी संपर्क:*
गांधीजी स्वतः जैन नसले तरी जैन समाजातील अनेक व्यक्तींचा त्यांच्यावर प्रभाव होता, ते लहान असताना त्यांच्या घरी वडिलांशी चर्चा करण्यासाठी जैन साधू येत असत,गांधीजीना विदेशात पाठवण्यापूर्वी त्यांच्या आईने जैन साधू बेचरजी स्वामी यांच्याकडून मद्य, मांस आणि परस्त्री यांच्यापासून दूर राहण्याची शपथ घेतली जी त्यांनी शेवटपर्यंत पाळली,जैन श्रावक श्रीमद राजचंद्रजी यांचाही त्यांच्यावर खूप प्रभाव होता.सत्य, अहिंसा, अपरिग्रह, अस्तेय , अस्वाद आणि ब्रह्मचर्य ही तत्वे त्यांनी वयाच्या ३७ व्या वर्षपासून आचरणात आणली होती

*अनेकांतवाद:*
पूर्वग्रहदूषित मत
आपल्यातील अनेक जण एखाद्या व्यक्तीबद्दल, महापुरुषाबद्दल, संस्थेबद्दल, संघटनेबद्दल, विचाराबद्दल किंवा कशाहीबद्दल पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेऊन जगत असतात.

म्हणजे माझ्या एखाद्या जवळच्याने सांगितलंय किंवा याने सांगितलंय ,परंपरेत आलंय या, या पुस्तकात आलय, घरातील कुणी सांगितलंय म्हणजे हे असेच असेल ती जवळपास वावरणारी व्यक्ती किंवा तो महापुरुष वा ते जे काही असेल ते असे असे चुकीचेच आहेत किंवा असे असे बरोबरच आहेत अस मानून आपण मोकळे होतो.

पण बहुतेक वेळा सत्य ते नसते सत्य त्यापलीकडे असते
अनेकांतवाद-अंत म्हणजे शेवट . एकान्त म्हणजे एकच शेवट . अनेकांतवाद म्हणजे अनेक शेवट . म्हणजेच कुठल्याही गोष्टीबाबत एकाच  बाजूचे मत न बनविणे.यासाठी हत्ती आणि सात आंधळ्यांची कथा उदाहरण म्हणुन फिट्ट बसते. सात आंधळे हत्तीजवळ जातात. त्यांनी हत्ती आधी  कधीच पाहिलेला नाही .  हत्तीच्या  शेपटीला हात लावून एका आंधळा म्हणतो हत्ती दोरिसारखा आहे . हत्तीच्या  पायाला हात लावणारा ओरडतो - हत्ती खांबासारखा आहे . हस्तिदंताला स्पर्श करणारा आंधळा पुटपुटतो -  हत्ती भाल्यासारखा टोकदार आहे. कानाला स्पर्श करणारा आंधळा पुटपुटतो -  हत्ती सुपासारखा आहे. सगळ्या आंधळ्यांचे मत वेगवेगळे बनते .
प्रत्यक्षात हत्ती हा दोरी , खांब , भाला, सुप इत्यादी सर्वासारखा असतो आणि कुणासारखाच तंतोतंत नसतो . सत्याकडे पाहण्याचे अनेक मार्ग असतात. एकाचवेळी ते सर्व योग्य आणि अयोग्यही असतात . एकाचवेळी निश्चित आणि  अनिश्चितहि असतात.सत्याचे मानवी आकलन विभिन्न असते. सत्याचे मानवी आकलन अपुर्ण असते.   त्यामुळे स्वत:च्या मताबद्दल कट्टरता किंवा दुसर्याच्या मताचा द्वेष चुक  आहे. अनेकांतवाद कट्टर पणाचा  मुडदा अहिंसक मार्गांनी  पाडतो !अहिंसेचा जन्म असा मनात आहे .  प्रथम तो माझ्या मनात होणार आहे त्यानंतर तुझ्या मनात होणार आहे . तो ज्ञानातून होणार आहे.  हे स्पष्ट दिसणारे  वौज्ञानिक सत्य स्वीकारायला शौर्य लागते . स्वत:च्या डोळ्यावरची झापडे काढणे हे येरागबाळ्याचे काम नाही.
आपले आधीचे मत चुकीचे होते हे स्वीकारायलाही खूप धैर्य लागते ज्यांनी हे स्वीकारले ते परिवर्तन घडवत पुढे जातात.
हे गांधीजीबद्दल तर झालेच पण हयात असलेल्या व्यक्तीबद्दल ही आपण असे पूर्वग्रहदूषित मत बनवून चालतो त्याच्याशी कधी प्रत्यक्ष संवाद साधत नाही आणि गैरसमज वाढत जातात.

या मार्गाने आपण नातेसंबंध, समाज , देश आणि जग अधिक जवळ आणि चांगले करू शकतो

*सत्य:*
सत्य आचरणात आणून सर्व करता येते हे त्यांनी स्वतःच्या जीवनातून सिद्ध केले ते राजकारण असो वा समाजकारण व आयुष्य प्रत्येक  ठिकाणी त्यांनी सत्याचाच मार्ग पत्करला.

*अस्तेय:*
फक्त चोरीचीच नव्हे तर गरज नसलेली कोणतीही वस्तू जवळ ठेवू नये हे ते तत्व त्यांनी आचरणात आणले.

*अपरिग्रह:*
गांधीजी जेव्हा जग सोडून गेले तेव्हा या जागतिक नेत्याच्या नावावर काहीच नव्हते. जेवढी गरज आहे तेवढाच संचय ते करत त्यांचा आहारही अगदी मर्यादित असे.

खरे तर गांधीजींनी सांगितलेली अस्तेय, अपरिग्रह ही तत्वे आपल्या जैन तत्त्वज्ञानातील पाच महाव्रतांपैकीच आहेत. पण आपण सत्य, अहिंसा या तत्वांना जेवढे महत्व दिले, त्यामानाने अस्तेय आणि अपरिग्रह आपल्याकडून काहीसे दुर्लक्षितच राहिले. आपण एवढा कट्टरतेने शाकाहार पाळतो, अगदी कांदा-लसूनही आपल्याला वर्ज्य! आपण जर एवढ्याच कट्टरतेने अस्तेय व अपरिग्रह या तत्वांचे पालन केले, तर आपले जीवन काही वेगळेच दिसेल. आपण लोक किती पैसे पैसे करतो. आपल्या संपत्तीत भर घालण्यासाठी जीवाचा आटापिटा करतो; पण आपण पैशामागे न धावता जर आपल्या गरजेपुरतीच संपत्ती मिळवण्याचे व जवळ ठेवण्याचे तत्व पाळले, तर आपले जीवन किती शांततामय होईल याचा विचार करून बघा! एकदा का आपण संपत्तीच्या मागे धावू लागलो, की मग त्या नादात अस्तेय या तत्वाला कधी तिलांजली दिली जाते, हे कळतही नाही. वाटेल त्या मार्गाने आपण पैसे मिळवू पाहतो. व्यवसाय-धंद्यातील नीतिमत्ता येथे लोप पावते. आपण जर अपरिग्रह हे तत्व कसोशीने पाळू, तर अस्तेय हे तत्वही आपोआपच पाळले जाईल.

अस्वाद-
गांधीजींच्या सर्व तत्वांत मला सर्वात जास्त आवडलेले तत्व म्हणजे अस्वाद. अस्वाद म्हणजे कोणत्याही गोष्टीचा-अन्न, कपडे व इतर गोष्टी- केवळ इंद्रियसुखांसाठी रसास्वाद न घेणे, तर त्या केवळ शरीराचे भरणपोषण व संरक्षण करण्याच्या दृष्टीने वापरणे. आपल्या जैन धर्मानेही उपभोगावर मर्यादा घालण्याचा संदेश दिला आहे. पण प्रत्यक्षात चित्र काय दिसते? आपल्या समाजातील साध्या एखाद्या विवाह समारंभाचेच उदाहरण घ्या. अन्न आणि इतर साधनांच्या उपभोगाचा किती अतिरेक तेथे होतो हे आपण पाहतोच. आपल्या दैनंदिन जीवनातही आपण जिभेचे चोचले पुरवण्यासाठी, कपड्यालत्याची हौस भागवण्यासाठी जीवाचा किती आटापिटा करतो आपण! थोडासुद्धा संयम आपल्याला पाळता येत नाही.

चुका आणि क्षमा- आपल्याकडून होणाऱ्या चुका मान्य करा असे गांधीजी नेहमी सांगायचे. चुका नुसत्या मान्यच करू नका तर आपली चूक मोहरी(राई)एव्हढी असली तरी तिला डोंगराएव्हढी फुगवून समाजासमोर मांडा असे ते म्हणत. पण चुका मान्य करण्यात आपला अहंकार आडवा येतो. एखादा आपल्या चुका मान्य करीत असेल तर आपण त्याला प्रोत्साहन देण्याऐवजी एकतर त्याला वेड्यात काढतो, गुन्हेगार ठरवतो किंवा मग त्याच्या सदीच्छेचा आपल्या स्वार्थासाठी कसा उपयोग करून घेता येईल या विवंचनेत असतो!क्षमा मागणे, क्षमा करणे ही वीराची लक्षणे आहेत भ्याडाची नव्हे.

सकारात्मक दृष्टिकोन-
काहीजण प्रत्येक गोष्टीकडे नकारात्मक आणि पूर्वग्रहदूषित दृष्टीने बघतात गांधीजींच्या ही आयुष्यात असे अनेक प्रसंग आले, जेव्हा गांधीजी एखादा सामाजिक सुधारणेचा निर्णय घेत, घोषणा करत, हरीजन सप्ताहात लेख लिहित , एखादी मोहीम सुरु करत तर काही लोक त्याचा उलटा अर्थ काढत कि गांधींजींनी संबधित व्यक्तीला किंवा समूहाला हिणवण्यासाठीच ते केले आहे पण गांधीजी अश्या नकारात्मक व्यक्तींमुळे थांबले नाहीत.प्रत्येकाकडून जे चांगले घेता येईल ते घेत जगाला भरभरुन देत ते पुढे जात राहिले.

अहिंसा-
काही जैन मित्रच जेव्हा अहिंसेची चेष्टा करतात तेव्हा आश्चर्य वाटते. मित्रांनो अहिंसा भ्याडपणाचे नव्हे तर शूरपणाचे लक्षण आहे. समोरचा माझ्यावर हल्ला करत असताना मी समोरच्यवर प्रतिहल्ला ही करणार नाही, पळूनही जाणार नाही, समोरच्या बद्दल वैरभावही मनात आणणार नाही  आणि अन्यायही सहन करणार नाही . किती मोठी गोष्ट आहे ही!
एक गोष्ट लक्षात घ्या की अहिंसा म्हणजे केवळ दुसऱ्याची हिंसा करणे नव्हे, तर तिला यापेक्षाही अनेक विविधार्थी पदर आहेत. मी स्वतः शाकाहारी आहे. तसेच इतर प्राण्यांना कोणत्याही कारणाने मारण्याआधी किंवा इजा पोचवण्याआधी अनेकदा विचार करतो. पण ही अहिंसेची ढोबळ व्याख्या झाली. सुक्ष्मार्थाने अहिंसेचे पालन करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे दुसऱ्यांना केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक पीडा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. माझ्या बोलण्यातून किंवा कृतींतून इतरांना काही त्रास होत असेल तर त्याची जाणीव होणे आणि मनाला वेदनाही होणे हे आपण योग्य मार्गावर असल्याचे लक्षण आहे असे मी मानतो. आपण शक्यतो दुसऱ्यांविषयी काही निर्णय घेताना किंवा दुसर्याशी बोलताना-वागताना त्यांच्या जागेवर स्वतःला ठेऊन पाहिले पाहिजे. त्यामुळे आपल्या हातून दुसऱ्यांना दुखावण्याची शक्यता कमी होते.

गांधीजींची अहिंसा ही शुराची अहिंसा होती
सशस्त्र आंदोलनात (सशस्त्र व गुप्त क्रांतीकारी मार्ग) थोड्या लोकांकडून संपूर्ण त्यागाची अपेक्षा होती आणि त्याचा परिणाम आणि पाठिंबाही मर्यादित होता. याउलट अहिंसक आंदोलनात सर्वांकडून थोड्या त्यागाची अपेक्षा होती त्याचा परिणाम म्हणून तळागाळातील प्रत्येकामध्ये, शेतकऱ्यांपासून सफाई कर्मचाऱ्यापर्यंत, उद्योगपतींपासून कामगारापर्यंत आणि स्त्रियांपासून बालकांपर्यंत सर्व लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि देशाच्या स्वातंत्र्याबद्दल प्रेरणा निर्माण झाली, जी तोपर्यंत नव्हती.
कोसबाडच्या टेकडीवरून’ या अनुताई वाघ यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकावर पु. ल. देशपांडे यांनी खूप सुंदर प्रतिक्रिया लिहिली आहे. गांधीजींची महानता यावरूनच समजण्यास मदत होते. “अन्यायाविरुद्ध आपण पेटू शकतो, असे तळागाळातल्या लोकांना त्यांनी वाटायला लावले, हे आवश्यकच होते.” हिंसक आंदोलनाविषयी ते म्हणतात, “भक्कन पेटणाऱ्या भडक्यासारखे. भडका उडतो तसाच विझतोही चटकन.”

समाज बदलायचा असल्यास त्यासाठी विधायक प्रवृत्तीची, शांतपणाने, न कंटाळता शोषितांच्या लहानसहान अडचणी सोडवत त्यांच्यात जाऊन राहणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज लागते. गांधीजींनी अशी फार मोठी फौज निर्माण केली होती. गांधीजींची अहिंसा टोकाची होती असे एक असत्य पसरवले जाते. गांधीजींची अहिंसा टोकाची कधीच नव्हती . पाकिस्तानने काश्मीरमध्ये घुसखोरी केल्यावर तेथे भारतीय सैन्य पाठवण्यास सांगणारे गांधीच होते.

एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करा हे गांधीजी काही इंग्रजांबाबत बोलले नव्हते तर हरीजनांबाबत बोलले होते.दंगल झाल्यावर जेव्हा सवर्णांनी हरीजनांवर अन्याय केला तेव्हा गांधींनी हे उद्गार काढले होते त्यांचे पूर्ण वाक्य असे होते 'एका गालावर मारले आणि  दुसरा गाल पुढे केला आणि त्याच्यावर जरी मारले तरी आपण हरीजनांवर जो अत्याचार केला आहे त्याचे परिमार्जन होणार नाही.

पत्रीसरकारचे मुख्य क्रातीसिंह नाना पाटील जेव्हा महात्मा गांधींना भेटले त्यांना आपल्या ‘पत्रीसरकार’बद्दल सांगितले. त्यावर गांधीजी म्हणाले होते, की ‘नाना पाटील, तुमची चळवळ माझ्या तत्त्वात बसते न बसते यापेक्षा तुम्ही १९४२ ची स्वातंत्र्य चळवळ जिवंत ठेवली, सातार्याने या चळवळीचे नाव राखले हे महत्त्वाचे होय! नाना, तुम्ही बहादूर आहात. भ्याडाच्या अहिंसेपेक्षा शुराची हिंसा परवडेल असे मानणारा मी आहे.'

तत्त्ववेत्ते म्हणत असत, ‘दुष्ट प्रवृत्तीला तसंच प्रत्युत्तर देऊ नका, तुम्हाला एक मैल चालायला सांगितलं तर दोन मैल चाला’. गांधींनी असं कधीच म्हटलं नसतं. उलट विचारलं असतं, ‘का चालू? अगदी पहिला मैलभर चालण्यासाठीही पुरेसं कारण असलं पाहिजे.’ जगात न्यायाची स्थापना करण्यासाठी लढण्याचं अहिंसा हे हत्यार आहे अस ते म्हणत

गांधी हत्या-
गांधीहत्येबद्दल 55 कोटी, फाळणी आदी काही खोटी कारणे सांगितली जातात पण हे सत्य नाही.फाळणीला शेवटपर्यत विरोध करणारे एकमेव गांधीजींच होते तर त्यांचे उपोषण हे 55 कोटींसाठी नसून दंगली थांबाव्यात यासाठी होते.
गांधीहत्येचे मुख्य कारण होते त्यांचे सर्वसमावेशक धोरण. जे कार्य हजारो वर्षांपूर्वी भ महावीर व म. बुद्धांनी केले तेच काम गांधीजींनी आत्ता केले ते म्हणजे धर्म, राजकारण , शिक्षण, अर्थकारण , समाजकारण आदी सगळीकडे एका वर्गाची मक्तेदारी मोडून काढून ते सर्वांसाठी खुले करणे. गांधीजींच्या उदयापूर्वी राजकारण धर्मकारण आदी ठिकाणी मुख्यतः उच्चवर्णीय लोकांची मक्तेदारी असे गांधीजींनी ती सर्व जाती व वर्गासाठी खुली केली ज्यामुळे त्यांची हत्या झाली. गांधीजींवर पहिला हल्ला पुण्यात जून1934 मध्ये ते अस्पृश्यता निवारण चळवळीचे कार्य करत असतांना झाला जेव्हा 55 कोटी, फाळणी इ गोष्टी ही अस्तित्वात नव्हत्या.

*सप्त पातके:*
गांधीजींनी सात पातके सांगितली आहेत 
१.चारित्र्यविना  शिक्षण 
२.नितीमत्ताविरहित व्यवहार 
३. मानवतेविना विज्ञान 
४. त्यागारहित भक्ती 
५. विवेकहीन सुखोपभोग 
६.कष्टाविना संपत्ती 
७. तत्वहीन राजकारण

*समारोप:*
शेवटी बाबा आमटेंच्या मुक्तछंदातील हे शब्द सांगून विराम घेतो

त्याने प्रथम एका मिठाच्या पुडीला हात घातला आणि मग एक साम्राज्य 
मिठाच्या सात समुद्र पलीकडे फेकून दिले.त्याने सुतातून सुरुवात केली
आणि अखेर स्वराज्याचा स्वर्ग गाठून दाखवला. याच साध्या सुताने त्याने एक पिढीच्या पिढी आणि एक देशच्या देश बांधून दाखवला.
पण एक देशच्या देश आणि एक पिढीच्या पिढी पकडण्यासाठी 
नुसतीच हिकमत पुरी पडत नाही
त्यासाठी ताकदही लागते
भारी वजनाचा एक क्रूस वाहण्याची ताकद!"
"ज्याला तो क्रूस वागवता येतो 
त्याच्या सोबत बारा अनुयायी असले 
तरी त्याचे प्रेषितत्व घाबरत नाही.
पण खांद्यावर क्रूस नसता कुणी बारा लाख बाजारबुणगे घेवून निघाला 
तरी त्याचा महंत होतो.
आणि महंत फक्त गादी चालवू शकतात.
मन्वंतरे घडवून आणू शकत नाहीत

शेवटी एवढेच म्हणेन कि जो बदल आपल्याला जगात घडवायचा आहे त्याची सुरवात स्वतः पासून करूया

लेख लिहताना काही चुकले असल्यास क्षमस्व

संकेत मुनोत
8087446346
Changalevichar1@gmail.com