AddThis code

Sunday, January 20, 2019

आर्थिक नियोजन नक्की कसे करावे?

*आर्थिक नियोजन नक्की कसे करावे?*/How to do Financial Planning ⏰💰🚗🏘🏥🏤🎬🎲
आर्थिक नियोजनाची सुरुवात केव्हा करावी?
2019 वर्ष सुरू झाले तेव्हा अनेकांना ठरवले असेल यावर्षी तरी आपण अशी अशी सेविंग करूया पण गेले काही दिवस नियोजन करून परत बे एके बे होऊ शकते
मित्रांनो आपण *शैक्षणिक साक्षर* होतो परंतु *आर्थिक साक्षर* होत नाही. *गणिताची आकडेमोड* येणे म्हणजे *आर्थिक साक्षरता* नक्कीच नाही. आर्थिक साक्षरतेचं पहिलं पाऊल म्हणजे *बचतीची सवय*.

बचती बरोबर पहिली कमाई सुयोग्य रित्या कशी वापरावी इथून आर्थिक नियोजनाची यशस्वीतां सुरु होते.

तर आपले  वय कितीही असुदे या क्षणा पासून या नियोजनाला सुरुवात करा. 
सर्व हिशोब लिहून ठेवा ,एका सध्या वहिवर वा कॉम्प्युटर वर एक्सेल मध्ये ही तुम्ही हे करू शकता हे खूप महत्वाचे आहे.

*सुयोग्य आर्थिक नियोजन* (Perfect Financial planning) कसे करावे?

१. आर्थिक नियोजनाचा पहिला टप्पा म्हणजे आपल्या *मासिक उत्पन्नाची योग्य विभागणी.*

आपल्या महिन्याच्या एकूण कमाई पैकी जास्तीजास्त ३०%च रक्कम ही घरखर्चासाठी वापरली गेली पाहिजे. यामध्ये किराणा सामान, गॅस सिलेंडर, विजेचे बिल, फोनचे बिल, दुधाचे बिल, रोजच्या भाजीचे खर्च इत्यादी बाबी येतील.

३०% रक्कम ही बँक कर्ज, देणी ईत्यादि साठी वापरावीत. मुळात उत्पन्नाच्या ३०% रक्कम एवढाच हप्ता येईल एवढेच ज्यास्तीत ज्यास्त कर्ज घ्यावे यापेक्षा ज्यास्त कधीच घेऊ नये. कर्ज हे अत्यंत गरज असल्यास घ्यावे. सणवार, यात्रा, जत्रा साजरे करण्यासाठी, खोटा मोठेपणा मिरवण्यासाठी कधीच कर्ज घेऊ नये. आपले नुकसान झाल्यास समाजातील कोणीही व्यक्ती भरून देऊ शकत नाही. 

३०% रक्कम ही भविष्य नियोजनासाठी बचत केली पाहिजे. आर्थिक नियोजनाचा अतिशय महत्वाचा भाग. थेंबे थेंबे तळे साचे आपण लहान वयापासून ऐकत आलो आहोत. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी फक्त बचत महत्वाची नसते तर केलेल्या बचतीचा उपयोग आर्थिक साधना मध्ये रूपांतरित करून त्या पासून पैश्यांनी पैसे कमावणे हे तंत्र आत्मसात करावयास हवे. आजारपण आणि मृत्यू हा कधीही सांगून न येणारा आणि टाळता न येणारा योग. या दोन्ही गोष्टींसाठी कायमस्वरूपी खात्रीशीर आर्थिक नियोजन करणारा व्यक्तीच आयुष्याचा मनसोक्त आनंद उपभोगू शकतो. 

उरलेले फक्त १०% रक्कम ही आपल्या मनोरंजनासाठी वापरली जायला हवी. आयुष्य कामास जुंपलेल्या बैलासारखे कधीच नसावे. हौस मौज आणि मनोरंजन हे अत्यंत आवश्यक आहे. परंतु यासाठी कितीही पैसे खर्च करणे महागात पडते. नियोजित रक्कमेतच मनोरंजनाची सवय आयुष्य समृद्ध करण्यास मदत करते. 

२. *टर्म इन्शुरन्स - आपल्यानंतर कुटुंबाचा मोठा आधार. *

टर्म इन्शुरन्स हे एकमेव आर्थिक साधन तुमच्या कुटुंबाला मोठे आर्थिक संरक्षण देते. टर्म इन्शुरन्स चा हप्ता कमी असतो आणि तो कुटुंबास आपल्या मृत्यू पश्चात मोठी रक्कम देतो. तुलनेने इतर कोणताही इन्शुरन्स प्लॅन टर्म इन्शुरन्स पेक्षा मोठी रक्कम मृत्यू पश्चात देत नाही.त्यामुळे टर्म इन्शुरन्स काढावाच तोही चांगल्या कंपनीचा.
साधारण आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या अंदाजे दहा पट कव्हर असावा. म्हणजे समजा ३० वर्ष वयाची व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न ३ लाख आहे तर जीवन विमा ३० लाखाचा असावा. त्यासाठी त्याला वार्षिक फक्त ६ हजार रुपयांचा कायम स्वरूपी प्रीमियम भरावा लागतो.
जीवन विमा घेताना कमी वयात असताना घेतला गेला पाहिजे जेणे करून वार्षिक प्रीमियम कमी भरावा लागतो. ज्या कंपनीचा विमा घेताय त्याचा क्‍लेम सेटलमेंट Ratio जास्त असेल असाच बघून घ्यावा. दारू किंवा सिगारेट घेत असाल/ नसाल तर खरी माहिती दिली पाहिजे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे योजनेसाठी वारसदार (Nominee) ठरवलेला असला पाहिजे. विमा कितीही रकमेचा घेता येतो. ह्या संदर्भातील माहिती ऑनलाइन उपलब्ध आहे.

३. *मेडीक्लेम - अचानक उद्भवणाऱ्या मेडिकल आपत्तीचा साथी.*

मेडिकल आपत्ती म्हणजेच अपघात,साथीचे रोग डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, तसेच इतर गंभीर आजार सांगून येत नाहीत. या आजारांमध्ये हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होणे हे ठरलेलेच. कमीत कमी ५००० रुपये ते लाखो रुपयां पर्यंतचा खर्च अशावेळी होतोच. आपण कितीही तंदुरुस्त असलो तरी अपघात आणि आजार न होण्याची खात्री देता येत नाही. त्याचबरोबर कुटुंबामध्ये कोनावरही हि वेळ येऊ शकते. अशाप्रसंगी मोठ्या कष्टाने केलेल्या बचतीचे पैसे वापरने, कमी पडल्यास कर्जाऊ घेणे, सोनंनाणं मोडणे, जमीन विकणे, प्रसंगी राहते घर विकणे या पेक्षा मेडीक्लेम घेणे कधीही फायद्याचे असते.तो कसा निवडावा याबाबत पूर्वीचा लेख वाचावा.

४. *कमीतकमी पुढील ६ महिन्यांचा घर-ऑफिस खर्चाची तरतूद* अगोदरच असायला हवी, जेणेकरून नोकरी गेली, किंवा व्यवसायात मंदि आली तरी ही त्यावर ६ महिने पुढील सोय होईतो पर्यंत  आपले खर्च चालतील.

५. *सेकंड होम* ही गुंतवणूक नाही, सर्व्हे असे दर्शवतो को सेकंड होम हे एकूण व्याज आणि खर्च, आणि वाढती महागाई वगळून जास्तीजास्त ५% फायदा करून देऊ शकते.

६. *४५ वयानंतर कुठली ही देणी, कर्जे आपल्या अंगावर असू नयेत*. मुलांचे उच्चशिक्षण, लग्न ही या काळात होतात त्याची प्लॅनिंग आपल्या ३० वयापासूनच व्हायला हवेत.(लग्न साध्या पद्धतीने करावीत)

७. *कुठलेही गुंतवणुकीचे चे निर्णय हे भावनिक दृष्टिकोनातून घेऊ नये.* फसव्या ज्यास्त परतावा देणाऱ्या गुंतवणुकीच्या योजनांपासून दूर रहावे. एका रात्रीत कोणीही करोडपती होऊ शकत नाही. १०,००० रुपये कमावणारा व्यक्ती योग्य आर्थिक नियोजन करून त्याचे तंतोतंत पालन करून मात्र सहज करोडपती होऊ शकतो.
    गुंतवणूक करताना सर्वप्रथम योजनेची संपूर्ण माहिती घ्यावी. संभाव्य धोके किती आहेत हे पाहावे.  उगाच नातेवाईक, मित्र यांनी सांगितले म्हणून कोणत्याही ठिकाणी पैसे गुंतवू नका.

८. *क्रेडिट कार्ड वापरताना सावध रहा, त्याचे पैसे वेळच्या वेळी भरा नाही भरले तर व्याज अधिक द्यावे लागते, शिवाय ज्यांचे सॅलरी अकाउंट असते त्यांच्यासाठी काही बँका करंट अकाउंट ही देतात ज्यातुन अधिक रक्कम आपणास काढता येते पण त्याचा मेसेज येत नाही शिवाय त्या रकमेला व्याज ही पडते त्यामुळे तिथे ही लक्ष द्या

९. *एकाच वेळी एकाच ठिकाणी मोठी गुंतवणूक कधीही करू नका*. टप्याटप्याने वेगवेगळ्या ठिकाणी केलेली गुंतवणूक कधीही उत्तम. एस आय पी हा छान गुंतवणुकीचा पर्याय आहे, परंतु तेथे देखील संपूर्ण माहिती घेण्याची काळजी निश्चित घ्या.

१०.पैश्यावरून कुणाला कमी लेखू नका, पैसा आज आहे उद्या नसेल ही पण चांगली माणसे जोडून ठेवा

११. कधीही *एकाच उत्पन्नाच्या मार्गावर अवलंबून* राहू नये. उत्पन्नास सुरुवात केल्यानंतर बचतीचा वापर उत्पन्नाचे मार्ग वाढवण्यात करावा. आपण प्रत्यक्ष मेहनत न करता गुंतवणुकीचा लाभ खात्रीने कमी ज्यास्त प्रमाणात मिळेल असे उत्पन्नाचे मार्ग निवडावेत. हेच मार्ग रिटायर्ड आयुष्य जगताना मोठा आधार देतात तसेच आपल्या मुलांना शून्यातून सुरुवात करावी लागत नाही.

१२. *सर्व आर्थिक व्यवहार कायदेशीर चेक, ए टी एम ट्रान्सफर, डी डी, अकाउंट ट्रान्सफर याच मार्गाने करावेत.रोखीने व्यवहार करणे शक्यतो टाळावे.*

१३. *मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी आणि आपल्या रिटायरमेंट साठी खात्रीशीर रिटर्न असणाऱ्या तरतुदीवरच भर द्या.* 

१४. *जर बँकेत चोरी, किंवा आग लागल्यास आपल्या बँकेतील लॉकर वर फक्त १ लाख रुपये पर्यन्त रक्कम बँक रिटर्न म्हणून देऊ शकते, उरलेले नुकसान आपले असते.*

१५. तुम्ही *टॅक्स रिटर्न* फाईल करणे टाळू नाही शकत, पण योग्य गुंतवणूक करून टॅक्स कमी करू शकता, तुमचे इनकम जास्त असो वा कमी असो, टॅक्स फाईल केल्यास भविष्यात खूप फायदे होतात, सर्वात मोठा फायदा म्हणजे कर्ज, हेंच तुम्हाला व्यवसायात पुढे नेऊ शकते.

१६. *सर्व आर्थिक कागदपत्रे ही व्यवस्थित ठेवा, याची माहिती आपल्या कुटुंबाला देऊन ठेवा. जेणेकरून तुमच्या अनुपस्थितीत किंवा तुमच्या संकटात तुमचे कुटुंब ते योग्यप्रकारे वापरु शकतील.

१७. आपला *प्रोग्रेस ग्राफ* दर सहा महिन्यांनी चेक करा. कारण त्या ग्राफ प्रमाणे आपली गुंतवणूक, आणि व्यवसायांतील निर्णय बदलता येतात.

१८. आपला अकौंटंट फक्त वर्षाची टॅक्स फाईल करणारा असल्यापेक्षा योग्य कन्सल्टंट असेल याची खात्री करा नाहीतर लगेच बदला, कारण योग्य गुंतवणुकीचा मार्ग हा योग्य सल्लागारच सुचवितो.

१९. *बचतीचे तंत्र* जाणून घ्या. प्रत्येक गोष्टींमध्ये बचतीस महत्व द्या. याचा अर्थ कंजूषपणा करा असा नाही.मात्र एखाद्या गोष्टीची आपणास खरेच गरज आहे काय यास महत्व द्या. श्यक्यतो खर्च वाढवणाऱ्या गोष्टी गरज असेल तरच खरेदी कराव्यात.

२०. *कुटुंबातील सर्व सदस्यांना आर्थिक साक्षर करा.* सर्व सदस्य आर्थिक साक्षर झाल्यास आपला फायदा कित्येक पटींनी वाढवता येईल.

२१.  *सोने/चांदी यांतील गुंतवणूक* एकूण गुंतवणुकीच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही, असे पहावे.

२२. *आपले मृत्युपत्र* करून ठेवावे. यामुळे आपल्या पश्चात संपतीवरून होणारे वादविवाद टाळले जाऊ शकतात.

23. नवीन कौशल्ये
स्वतःला सतत डेव्हलप करत राहा नवीन ज्ञान आणि कौशल्य घेत रहा त्यासाठी पैसा खर्च करायला मागेपुढे पाहू नका

24.सामजिक बांधिलकी व बंधुता जपण्यासाठी ही थोडा खर्च करा, कारण देश टिकला तर तुम्ही टिकाल, तेथे जर अस्वस्थता, असहिष्णुता असली तर त्याचा परिणाम रोजगार व सर्वच बाबीवर होतो

25.समाधानी रहा
अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांच्याकडे खूप कमी आर्थिक क्षमता असतांना ते सुखी आहेत जसे कि धीरेन सोनेजी, अभय बंग आणि बरीच मंडळी यांची चरित्रे वाचा विडिओ पहा प्रेरणा मिळेल.

26.मानसिक आणि शारीरिक आरोग्य
मिळणाऱ्या पैश्यासोबतच स्वतःचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपा ते खूप महत्वाचे आहे रोज थोडा वेळ शारीरिक व्यायाम आणि ध्यान इ साठी द्या

27.कुणाला कमी लेखण्यासाठी वा शत्रूता दाखवण्यासाठी पैसा खर्च करू नका तोच पैसा स्वतःला अधिक प्रगत करण्यासाठी वापरा
कधी कधी आयुष्यात असे प्रसंग येतात की समोरचा व्यक्ती आपल्याकडे कुत्सित नजरेने बघू लागतो आपला अपमान करतो तेव्हा आपण दुखावले जाऊन स्वत्व सिद्ध करण्यासाठी इतर काही गोष्टी करू लागतो पण त्यापेक्षा अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून स्वतःला अधिक समृद्ध करा.
लक्षात ठेवा तुमच्या स्वतःच्या इच्छेशिवाय तुम्हाला कोणीच दुखवू शकत नाही
याबाबत रतन टाटांचा आदर्श घेण्यासारखा आहे

लिहताना काही चुकले असल्यास क्षमस्व
अजून खुप काही लिहण्यासारखे आहे पण तूर्तास एवढे पुरे

सदर लेख कुठल्याही प्रकारचे मार्केटिंग करण्यासाठी नसून आपणास आर्थिक बाबतीत साक्षर करण्यासाठी आहे.महापुरुष व तत्सम गैरसमज आदीबद्दल महत्व सांगणारे व गौरसमज दूर करणारे माझे लेख आपण वाचलेच असतील पण आर्थिक घडी मजबूत असणे ही महत्वाचे म्हणून हा लेख.

साभार -
1.Money Mayuka सुरुवात सुख आणि समृद्धीची
2.आर्थिक नियोजन संदर्भातील लेख व पुस्तके
3.आरोग्य विमा कसा काढावा यासंदर्भातील माझा लेख.

*संकेत मुनोत*
८०८७४४६३४६, ८४४६२५९१५९
sanket.insurance@gmail. com

No comments:

Post a Comment