AddThis code

Monday, June 6, 2022

हरिद्वार मध्ये असलेले अध्यात्मिक आणि नैसर्गीक सौंदर्य

आत्ता #हरिद्वार हून #देहरादून आणि तेथून #मसुरी ला चाललो..
हरिद्वार मध्य एका आश्रमात राहण्यास होतो. इथल्या काही % साधू आणि इतर साधुंमध्ये फरक हा वाटला की हे धर्मांध नाहीत आणि पर्यावरणाबद्दल ही जागरूक आहेत.
त्यांच्याशी संवाद केल्यावर अनेक गोष्टी समजल्या त्या अश्या...
येथील पर्यावरणाचा जो सर्वनाश चालवला

आहे त्याविरुद्ध येथील काही साधू ठाम भूमिका घेतात आणि उपोषण करून जनतेला एकत्र करून त्याला विरोध ही करतात आणि त्यामुळे काही अंशी फरक ही पडला आहे. पण येथे अडचणी ही खूप आहेत. जो मनुष्य इथे अवैध कार्य करत होता आणि नगरसेवक म्हणून ही निवडून आला नसता तो त्याच्या केंद्र सरकार मधील connection मुळे आज येथे मुख्यमंत्री आहे. त्यामुळे जे अवैध काम करत आहेत त्यांना आता रान मोकळे झाले आहे. 
हरिद्वार मध्ये तुम्ही पाहिले तर सगळीकडे नुसते आश्रम च आश्रम दिसतील...त्यात एका मोठ्या आर्थिक उलाढाल असणाऱ्या आश्रमात त्याचे मुख्य साधू आयुष्याच्या शेवटच्या स्टेज ला होते तेव्हा  संघाचे लोक तेथे आले आणि अनेक महिने त्यांना भेटून त्यांची प्रशंसा करणे , सतत सेवेचा आव आणणे अश्या गोष्टी करू लागले. त्या साधूच्या निधनानंतर त्यांच्यासोबतचे फोटो दाखवून त्यांनी हा आश्रम आम्हाला चालवायला सांगितले असे सांगून त्या आश्रमात त्यांनी स्वतःचा एक दुसरा राज्यातील व्यक्ती महाराजाच्या वेशात इथे आणला आणि आता तोच आश्रम चालवतो आणि त्यांची सगळी कामे सोप्पी करतो. त्याला अध्यात्म, शस्त्र याबद्दल काहीही अभ्यास नसताना तो आश्रमाचा प्रमुख झाला आहे.
विश्व धर्म संसद मध्ये चाललेल्या चुकीच्या गोष्टींवर विचारल्यावर ते म्हणाले की मुस्लिमांना शिव्या देणे, गांधींबद्दल अपशब्द बोलणे हे साधू लोकांमध्ये जे संघाचे लोक घुसले आहेत त्यांच्याकडून केले जाते.जेणेकरून लोकांनी महागाई, रोजगार, अर्थव्यवस्था, पर्यावरण याबद्दल सरकार ला प्रश्न च विचारू नयेत आणि कुठल्या तरी चुकीच्या मुद्द्याला चिकटून रहावे.
नवरा बायको ची भांडणे झाली आणि त्यात जोडीदाराचा राग जसा मुलांवर काढून काही लोक मोकळे होतात तसाच बेरोजगारी, वाढती महागाई, घटती अर्थव्यवस्था या गोष्टींचा राग सरकार ऐवजी मुस्लिम आणि अन्य गोष्टींवर काढला जातो..
असो इथे वातावरण खूप छान आहे. काल इथल्या माताजी, गुरुदेव आणि अन्य अनेकांशी खूप छान गप्पा झाल्या. काही परदेशी नागरिक ही आश्रमात आले होते त्यांच्याशी भेट झाली.त्या माताजीनी तर म्हणाल्या की after observing you I feel that you are very near to spirituality, stay for more days here.when many people from your generation are busy in drinking , smoking and other materialistic things you doing this is showing that you have some special purpose in life.. नोकरी आहे असे सांगून मी उद्या लगेच निघणार असल्याचे त्यांना सांगितले.
असो गंगेत आंघोळ करणे, बेल चा ज्यूस पिणे आणि इतर सर्वच खूप सुंदर अनुभव होते नक्की भेट द्या...
माझे अश्या ठिकाणी जाण्याचे २ हेतू असतात एक तर संवाद साधून त्यांच्या गोष्टी समजावून घेऊन सामजिक चळवळ, प्रेम, संवाद वाढवावा आणि दुसरे तिथल्या निसर्गाचा आनंद घेणे...

चूकभूल क्षमस्व
संकेत मुनोत
(फोटो - सकाळी मोर दिसले तेव्हाचा)
Comment, Share ,Follow and Subscribe.

No comments:

Post a Comment