*#राष्ट्रसंत #तुकडोजी महाराज* आणि अनेक महामानवांनी जेथे मोठे काम केले होते त्या विदर्भातील *#आर्वी, वर्धा* येथे *'#महात्मा #गांधी यांची प्रासंगिकता'* या विषयावर *प्रमुख वक्ता*🎙️ म्हणून विचार मांडण्याची मला संधी मिळाली.
यात आश्चर्याची बाब ही वाटली की माझ्या व्याख्यानानंतर सूत्रसंचालक म्हणाले की *"वक्ते पुण्याचे असून पुणेरी भाषेत न बोलता विदर्भाच्या भाषेत बोलले
."😊* मी काही तसे ठरवून विदर्भाकडील भाषेत बोललो नाही पण तिकडचे लोक जास्त परिचयाचे झाल्यामुळे किंवा कुठल्या तरी कारणामुळे माझी भाषा थोडीशी विदर्भातील झालीं असावी. कारण पुण्यात ही मला एकाने *"तुम्ही विदर्भातील का?"* असे विचारले😅
."😊* मी काही तसे ठरवून विदर्भाकडील भाषेत बोललो नाही पण तिकडचे लोक जास्त परिचयाचे झाल्यामुळे किंवा कुठल्या तरी कारणामुळे माझी भाषा थोडीशी विदर्भातील झालीं असावी. कारण पुण्यात ही मला एकाने *"तुम्ही विदर्भातील का?"* असे विचारले😅
ज्या विदर्भाने देशाला *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज , राष्ट्रसंत गाडगे बाबा* सारखे संत दिले तिथेच आज *कालीचरण महाराज* सारखे *देशभर द्वेष पसरविणारे गुंड निर्माण होत आहेत*😡 त्यामुळे तेथेही आता या प्रबोधनाची खूप गरज आहे.
असो व्याख्यानानंतर घेतलेल्या *श्रोत्यांच्या प्रतिक्रिया* ऊर्जा देणाऱ्या होत्या. एक शिक्षक म्हणाले की *"मी आत्ता पर्यंत गांधींना अहिंसेला चुकीचे समजत होतो आणि त्याबद्दल काहीही वाचणे टाळत होतो. पण आपल्या व्याख्यानातून त्यांच्याबद्दल चे गैरसमज दूर झाले. आता गांधी नव्याने वाचणार आहे."* विशेष म्हणजे त्यांचे एक विद्यार्थीही तेथे उपस्थित होते त्यांनीही हेच सांगितले . ज्यांचा निबंध स्पर्धेत क्रमांक आला त्या शोभाजींनी *"मी स्वतः गांधी विचार आचरणात आणनार असून माझ्या 8 वर्षाच्या मुलाला ही त्या मार्गावर नेणार आहे "* असे सांगितले. अजूनही बऱ्याच प्रतिक्रिया आल्या.
*खरतर गांधीजींना जाऊन 75 वर्ष झाले पण तरी आजही त्यांची बदनामी करणारे विविध चित्रपट काढले जातात 📺🎥आणि त्यांच्या विरुद्ध खोटे भडक साहित्य📰📲 प्रसारित केले जाते ते यासाठी की लोकांनी त्या बदनामीला भुलून जाऊन गांधीना #मजबूरी समजून वाचुच नये.*
*लोकांनी गांधी वाचले तर ते पुन्हा जागे होऊन जाती धर्माच्या कट्ट्ररतेच्या बाहेर येतील आणि प्रश्न विचारतील, खऱ्या हक्कांसाठी आंदोलने करतील. मजबुती का नाम गांधी समजून स्वतः ही मजबूत होतील.* ❤️❤️
👹👺 *विवेक बिंद्रा, गुंड #कालीचरण, कंगना राणावत, वामन मेश्राम, पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ आणि यांच्या सारख्या अनेक व्यक्ती आपापल्या क्षेत्रात गांधीजींबद्दल सतत काही ना काही खोटे साहित्य तयार करून नियमित प्रसारित करत असतात त्याचे कारणही हेच.*
महात्मा गांधी यांची हत्या त्याच सनातन्यांनी केली *ज्यांनी ज्ञानेश्वर, तुकाराम, महात्मा फुले यांना त्रास दिला.* गांधी हत्येचे कारण होते *त्यांनी समतेसाठी केलेले कार्य*. पूर्वी राजकारणात *ठराविक वर्गाचे वर्चस्व होते ते गांधीजींनी संपवले आणि सामान्य माणसाला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात स्थान दिले.त्यामुळे ज्यांचे जातीय वर्चस्व गांधींनी संपवले त्या वर्गातील प्रतिनिधी गोडसे याने गांधींची हत्या केली*
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर विद्यापीठ व गोंडवाना विद्यापीठ मराठी परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉक्टर गणेश मोहोड होते. माजी आमदार अमर काळे, विदर्भ मतदार चे संपादक राजू गोरडे, प्रहार सोशल फोरमचे संस्थापक बाळा जगताप हे प्रमुख अतिथी होते.
याप्रसंगी वैष्णव जन तो... या सुमधुर गीताने कवी व संगीतकार हरीश तांबोळी यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक प्रा. संजय वानखडे सरांनी केले. माझा तेथे परिचय आदरणीय डॉक्टर प्रसन्नकुमार बंब सरांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. दर्शन चामभारे यांनी केले तर आभार प्रा. राजेश सोळंकी यांनी मानले.
*सर्वांचे खूप खूप आभार*
*#प्रेम प्रसार करत राहूया ❤️❤️❤️*
संकेत मुनोत