AddThis code

Monday, December 18, 2023

17 डिसेंबर 2017 च्या गांधी प्रश्नमंजुषेत मिळालेली काही उल्लेखनीय उत्तरे:


अप्रतिम वाचण्यासारखे आणि अनुकरण्यासारखे असे 

काही काही अनुभव वाचतांना तर माझ्या डोळ्यात पाणी आले *'गांधीजींच्या तत्वांचा मी माझ्या प्रत्यक्ष आयुष्यात केलेला उपयोग* 
*How I used Gandhian Principles in my life*

_Experiences_
"मी शाळेत अध्यापनाचे काम करतो. शाळेत शिकवत असताना अनेक मार्गाने आपल्याला ञासाला सामोरे जावेलागते. माझ्या बाबतीत पण तसेच घडले.. आमचे मुख्याध्यापक शाळेत काम नीट करत नसत, वेळेवर येत नसत. मग मी आणि सहकारी मिञांनी त्यांच्याशी उशिरा का येत असे भांडत बसण्यापेक्षा असहकार तत्त्व अवलंबले. त्यांच्याशी काहीच बोलायचो नाहीत. आपले काम करून सरळ वर्गावर जायचे. त्यांच्या लक्षात त्यांची चूक आली. तिथून पुढे ते मिळून मिसळून राहू लागले. त्यामुळे शाळेत छान वातावरण निर्माण झाले. "
-Mayur Dumane

"मी सुरुवातीच्या जीवनात ,तरुणपणी शिक्षक म्हणून नोकरीला होतो. तसेच बोर्डिंग सुपरिटेंडेंट म्हणूनही काम पहात होतो. एकदा गावात जत्रेनिमित्त 'तमाशा ' आलेला होता. बोर्डिंगची मुले अभ्यास सोडून विनापरवानगी गुपचूपपणे तमाशाला गेलीत. हे जेंव्हा मला कळले तेंव्हा मला खूपच राग आला. मुलांनी बेशिस्त वर्तन केले म्हणून जेवण बंद ची शिक्षा करायचे ठरवले. मुले परतलीत. मी शिक्षा सांगितली . मुले हिरमुसली. कोणी काही बोलले नाही. निमूटपणे अभ्यासाला बसली. त्यातील काही मोठी मुले नेहमीप्रमाणे माझ्यासाठी जेवणाचे ताट घेऊन आले. मी शांतपणे नाकारले.मुले जेवणार नाहीत तर मी कसा जेवणार ? मी ही कडक वागलो होतोच. पण उघडपणे काहीच बोललो नाही.रात्र गेली.मुले स्वतःहून जवळ आलीत.म्हणालीत ," चूक झाली." मुले शिस्त पाळू लागली ,अभ्यास करु लागली .त्यांचे माझे सूर जुळले."
- Prabhakar Nikum

"ही बँकींग क्षेत्रातील एक घटना आहे. माझ्या दुकानातील खाते एका राष्ट्रीयीकृत बँकेत होते. एक चेक जमा होण्यासाठी विनाकारण वेळ लागत होता. वारंवार हेलपाटे घालूनही यश येत नव्हते. शेवटी मी हेडअॉफीस ला पत्रव्यवहार केला आणि ही दिरंगाई कळविली. तुरंत याची नोंद घेऊन कार्यवाही करण्यात आली. मात्र त्यांनी मला अजून एक व्यक्तीगत कंप्लेंट सदर अॉफीसर वर करण्यासाठी सांगितले. मी तो पत्रव्यवहार त्याच अॉफीसर ला दाखवत विनंती केली की आपण रास्तपणे कामे केली तर कुणालाही काहीही त्रास होणार नाही. उलटपक्षी तुमच्या बद्दल लोकांना आदर वाटेल. तो मनुष्य खजील होऊन अस्वस्थ झाला. काही वर्षांनी त्याच व्यक्तीने निवृत्ती समारंभात (सेंडअॉफ) वेळी ही घटना त्याच्या आयुष्यात कलाटणी देणार्‍या घटनांपैकी एक असल्याचे सांगितले व हा एक मोठा टरनिंग पॉईंट असल्याचा उल्लेख केला. समोरच्या माणसात नैतिकता जागृत केली की तो एक उत्तम मनुष्य होतो ही महात्मांची शिकवण प्रत्यक्षात आली. "
- Sandeep Pitaliya

"मला माझे मित्र माझ्या शारीरिक व्यंगावर हसत असत पण मी त्याच्यावर किधीही प्रतिसाद दिला नाही त्यामुळे त्यानाच त्यावर वाईट वाटले व ते मला चिडविणे थांबले व मी समाजातील इतर लोकांसाठी मदत करू लागलो."
-Prithviraj Chava

"महात्मा गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला, स्वतःही याच तत्त्वांनुसार जगले आणि इतरांनीही तसे करावे असे सुचवले.आजच्या या युगात गांधीजींच्या विचारांची पुन्हा नितांत गरज आहे. आपल्या भारताला सुजलाम सुफलाम आणि जागतिक महासत्ता बनवण्यासाठी एकच मार्ग आहे तो म्हणजे गांधीजींचे विचार. माझी शाळा तशी दुर्गम. जायला नीट पक्का रस्ताही नाही. निसर्गरम्य अश्या घनदाट जंगलातून नेहमी प्रवास करावा लागतो. असेच एक दिवस शाळेत पोहोचतो न पोहोचतो तोच पाहतो तर काय गावात 10-12 लोक गोळा झाले होते आणि कुणाचा तरी रडन्याचा आवाज येत होता, सहजच माझे पाय त्या दिशेने वळले माणसांची ती सहज प्रव्रुत्ति आहे मना. आणि पाहतो तर काय एका 10-12 वर्षाच्या मुलाला जो की बाहेर गावी शिकत होता त्याला एक मुलगा मारत होता आणि बाकीन्चे बघे मज्जा घेत होते. मी दोघांना थांबवले आणि कारण विचारलं तर कारणही तीतकस मोठ नव्हत. आणि समजावून सांगितल दोघेही समजले. आज आपण पाहतो की अगदी किरकोळ कारणांसाठी लोक हानामारी वर येतात आणि नको ती संकटे आपल्यावर ओढावुन घेतात. जर आपण गांधीजींनी सांगितल्या प्रमाणे सत्य अहिंसेच्या मार्गाने वागलोत तर आपला देश सुजलाम सुफलाम नक्कीच होईल."
-Jitendra Sahala

"आमचे शेजारी आमच्या जाण्या - येण्याच्या रस्त्यावर बरेच वेळा पाणी सोडणे, कचरा फेकणे अशा स्वरूपाच्या अडचणी निर्माण करून आपली मानसिकता बिघडवून मुद्दाम भांडण करण्यासाठी परिस्थिती निर्माण करावयाचे परंतु आम्ही सर्व कुटुंबीय तरीही त्यांच्याशी सलोख्याने वागायचो.एकदा त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती आजारी पडली.त्यांना रक्ताची आवश्यकता होती. मी रक्तदान करून त्यांना मदत केली. त्यांना आश्चर्य वाटले. त्या प्रसंगानंतर त्यांच्या वागण्यात बदल झाला. "
-Ananda Sakate

"एकदा असच मी रस्त्याने चालत असताना मी तो रस्ता ओलांडत होतो . आणि मागून दोन तरुण पल्सर या गाडीवरून वेगात आले होते मी मी हात करत करत रास्ता ओलांडत होतो करण तिथं सिग्नलची सोय नव्हतीच आणि त्या तरुणांना गाडीचा वेग कमी करावा लागला त्यांनी मला अरेरावी करून खूप घाण आणि खालच्या पातळीची शिवी दिली पण मला काहीच वाटलं नाही उलट मला त्यांची कीव आली. मीच उलट त्यांना स्पस्ट आणि मोठ्या आवाजात मी म्हणालो ' भावा मला मनापासून माफ कर ' ही शिवी बरिच दिवसातून ऐकली मला आमच्या लहानपणी ची अक्तहवन झाली आणि उलट माझ्या आठवणींना तू उजाळा दिला .असा मी त्याला तोल लावला होता . त्या मित्राची त्यावेळेसची प्रतिमा पाहण्यासारखी आणि पडलेली आणि अपराधी वाटत होती. "
- Ajay Nemane

_Good_ _Words_

"स्वावलंबन हे तत्व मी महात्मा गांधीजींच्या जीवनातून शिकलो माझी जी काही वैयक्तिक काम आहेत ती स्वतः करण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे कोणत्याही कामाला कमी समजायचं नाही म्हणजे श्रमप्रतिष्ठा हे तत्व मी गांधीजींकडून शिकलो फरशी पुसणे झाडू मारणे स्वछतागृह धुणे यांसारखी कामे करायला मला कसलीही लाज वाटत नाही. सगळयात महत्वाची गोष्ट मी गांधीजी कडून शिकलो ती म्हणजे मी जसे बोलतो तसे आचरण करतो माझ्या उक्ती आणि कृतीत कसलाही फरक नाही. आपण मांडलेल्या विचारांवर ठाम असणं हे मी गांधीजींकडून शिकलो "
- Mayur Dumane

"I am trying to follow social rules. 
cleanliness on roads & public places. 
No casteism at my work place or anywhere. 
Always try to practice Brotherhood & equality. 
I always try to have equality for everybody. 
I always insist on freedom of expression for everyone. 
I always like to fight against social injustice."
- Rajendra Inamdar

"गांधीजी हे या युगातील भारतीयांना लाभलेलं एक निस्सीम रत्न आहे. मी व्यक्ति पूजक नाही तरी सुद्धा गाँधीनी आचरणात आणलेले विचार आधी केले मग लोकांनी स्वतः अंगिकारले हे मानाला खुप भावत आले आहे, गांधीजीसारखं अभ्यासु, स्वछ, सुंदर आणि निर्भय जगणे, सतत मानवतेचा परिभाष्या स्वातन्त्र्य उद्घृत करणारं जगमान्य व्यक्तिमत्व असे आपले महात्मा गांधीजी त्यांच्या हा जगमान्य प्रभाव, माझ्या सारख्या भारतियाल नक्कीच प्रेरणादायी ठरत आल्या आहेत. मला अभिमान आहे की मी गाँधीजींच्या देशात जन्माला आलो. मला खात्री आहे की गाँधीजीचे विचार तरुणाना अधिक स्वावलंबी, राष्ट्रभिमानी व नीतिमान आणि गतिशील बनवतील"
-Arun Yawalikar

"Gandhi was one of those few individuals I came across, who are fearless and polite at the same time. Earlier I used to be arrogant while fighting anyone. And the fight used to lead to hatred. When I started controlling my anger but kept fighting with politeness instead of the option not to fight, I found my opponent is becoming my friend and he joins me in our fight together against the evil things. Evil things in me as well as him and in the society too. Sometimes I used to be coward  and glorified my silence as my politeness. Gandhi taught me how to be politely fearless. And fight to finish the badness in the people not to finish bad people."
- Vikas Shashwate

"मी सत्याची बाजू उचलून धरतो. मी माझे जीवन नैतिकतेने व्यतीत करण्याचा प्रयत्न करतो. मी माझा परिसर स्वच्छ ठेवतो. मी नेहमी कमजोर माणसाचा मागे उभा राहतो. मी नेहमी न्यायाची बाजू उचलून धरतो. मी नेहमी गोष्टीची सामाजिक सलोखा ठेवतो. मी माझा गरजा नियंत्रित ठेवतो. मी सादगीने जगतो."
-Parag Tamhankar

"अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे पण अहिंसक पद्धतीने पाठपुरावा करून हे तत्व कायम पाळत आलोय. विविध अडचणींमध्ये मी कायम ध्यान आणि माझी सद्सद्विवेक बुद्धी यावर भरवसा ठेऊन मार्ग काढत आलोय. रागावर नियंत्रण ठेवणे ही सर्वात कठीण गोष्ट करायला शिकलो ती गांधीजींच्या विचारसरणीचा माझ्यावर असलेल्या प्रभावामुळेच. बाकी साधी राहणी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. कुणाला न दुखावण्याचा कसोशीने प्रयास असतोच. महात्म्याला स्मरून इतकेच बोलेन की या मार्गावरून कधीही स्वतःला ढळलेले बघू शकणार नाही. धन्यवाद."
- Sudhan Kulkarni

"गांधीजींच्या तत्वांचा - सत्य , अहिंसा , सर्वधर्मसमभाव व स्वच्छता यांचा मी माझ्या जीवनात प्रत्यक्ष उपयोग करण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. मला स्वच्छता ही अतिशय महत्वाची वाटते त्यानुसार मी नेहमी माझं घर, परीसर, मी ज्या ठिकाणी वावरतो ते ठिकाण नेहमी स्वच्छ ठेवतो . माझ्या पर्यावरणाची काळजी घेतो व वाढदिवसाला झाडे लावतो. मित्रांमधील भांडण शांततेत सोडवतो. स्त्रीपुरूष समानता व श्रमप्रतिष्ठा या तत्वांद्वारे स्त्रियांशी आदराने वागतो व कोणतेही काम कमी मानत नाही . प्रत्येक काम मन लावून करण्याचा प्रयत्न करतो. दैनंदिन कामात निर्माण होणार्या कचर्यातून खत, टिकाउ वस्तु तयार करतो. प्रत्येक वस्तूचा पुरेपूर वापर करतो जेणेकरून पैशाचा, नैसर्गिक संसाधनांचा अपव्यय होणार नाही."
-Vikram Rathod

"I am not practicing religious person but I respect all the religions (Sarva Dharma Samantva) unless religions are not following divisive way and untouchability (Sparshbhavana). In my personal life, I am happened to be a vegetarian (Non-Violence) but I do not enforce anyone to practice my beliefs and principles. I always stand by truth even if it is against me (Satya). I believe that all humans are equal irrespective of their religion, cast, color, gender, culture, state and country. In day to day life, whether I am working for Tribals, raising voice for human rights, fighting for Dalit issues or having my opinion on Feminism, I found Gandhi as a relevant and ideal person."
-Rohan Mutha

"Hate the Sin but not the siner. जेव्हा जेव्हा मला कुठल्याही व्यक्तीचा राग येतो तेव्हा तेव्हा या वाक्याचा मी नेहमी विचार करतो. त्यामुळे माझे मन शांत होऊन त्या व्यक्ती बद्दल माझ्या मनात कुठलेही​ वाईट विचार येत नाही. मी शिक्षक असल्यामुळे मला गांधीजी चे शिक्षणाबद्दल चे विचार नेहमीच मार्गदर्शन करीत असतात."
- Umesh Bhoyar

"गांधीजींचे महत्वाचे तत्व म्हणजे सत्य।या तत्वा नुसार मी नेहमी वाग्न्याचा प्रयत्न करतो जेव्हा मी सत्यवर असतो तेव्हा गांधीजींप्रमाने काशालाही घाबरत नही आपल्या माताची सख्ती करत नाही दुसर्याच्या मताचा सन्मान करतो पण मी गांधींप्रमाने हट्टी नाही सर्व धर्मांचा आदर करतो मी आस्तिक आहे ईश्वरच अस्तित्व मान्य करतो"
-Aslam Shah

"लौकिक जीवनातील यश किंवा अपयशाकडे निर्विकार दृष्टीने पाहतो. इतरांच्या धर्म व कर्मकांडासंबंधीच्या विचारांकडे उदार दृष्टिकोन बाळगतो. स्वतःच्या सुख दुःखा प्रमाणे इतरांचेही सुख दुःख महत्त्वाचे मानतो. स्थानिक वस्तू निर्मिती व वस्तू विनिमयाचा प्राधान्य देतो. शेतीमधील सेंद्रिय प्रयोग व खादीला महत्त्व देऊन वापरण्याचा प्रयत्न करतो. व्यवहारात यांत्रिकीकरणाला फारसे महत्व देत नाही. राष्ट्र म्हणजे भौगोलिक सीमा मानत नाही. त्या ऐवजी लोक त्यांचे सहजीवन त्यांचे प्रश्न महत्त्वाचे मानतो. भौतिक गरजा कमी करण्याचा प्रयत्न करतो. "
-Pramod Munghate

"गांधीजी समजून घेत असताना मी कोणत्याही धर्माचा द्वेष करणे सोडून दिले.माझ्या स्वभावात रागीटपणा होता.गांधी वाचत गेलो आणि त्यांच्या आयुष्यातील काही प्रसंगी खरे तर त्यांना प्रचंड राग आला पाहिजे.परंतु त्यांनी अगदी हसण्यावर नेले.नथुराम गोडसे ने चप्पल भेट म्हणून दिल्या.तो प्रसंग मला मुळापासून हादरून गेला.अतिशय प्रतिकूल परीस्थितीमध्ये विचलित न होता त्याला धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती मला गांधीं कडून मिळते.अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करत असताना महात्मा गांधी यांच्या विचाराने काम करत गेलो.माझी व माझ्या पत्नीचे मिळून मासिक वेतन एक लाख पंधरा हजार आहे.परंतु गांधींच्या प्रभावामुळे आयुष्यातील गरजा मर्यादित ठेऊन अनेक सामाजिक संस्था ,संघटना यांना तसेच माझे विद्यार्थी यांना आर्थिक मदत करत असतो."
-Surendrakumar Ghadge

"1.सर्वप्रथम गांधीजींनी जे जे प्रयोग केले ते का व कोणत्या प्रसंगी केले ते समजून घेतले व त्याचा अंतिम उद्देश Welfare of All सर्वोदय होता हे समजून घेतले त्यामुळे माझ्या सर्व लिखाणाचा आणि व्यख्यानांचा अतींम सार हा सर्वोदय हाच राहिला. याचा खूप मोठा उपयोग मला तरुण वर्गाचा भरभरून प्रतिसाद मिळण्यात झाला. 
2.स्वतःच्या हाताने तयार केलेले खादीचे कपडे परिधान करण्यात जो स्वाभिमान मिळतो व जो आनंद मिळतो तो मला गांधीजींच्या खादीच्या स्वदेशी मंत्रामुळे मिळाला.
3.स्वतःच्या गरजा कमी करून त्यात आनंदी जीवन जगण्याचा मार्ग गांधी विचारातूनच मिळाला."
- Bhujang Bobade
#GandhiForever

तुम्हाला ही असे अनुभव येतच असतील पुढच्यावेळी तुम्ही पण सहभागी व्हा किंवा इथे कंमेन्ट मध्ये add करा 

संकेत मुनोत
गणेश भंडारी
Comment, Share ,Follow and Subscribe.

Saturday, December 16, 2023

ग्रेट भेट विथ उपेंद्र टण्णू सर


अनेक वर्षांपासून ओळखत होतो पण  काल अधिक परिचय घेता आला .सर चळवळीत काम करणाऱ्या विविध लोकांच्या बद्दल  फेसबुकवर नियमित लिहीत असतात.
 आपल्या जवळपास विविध प्रेरणादायी लोक असतात पण आपण त्यांच्याबद्दल माहिती प्रसारित न केल्याने भिडे सारखे विकृत लोक सामान्य लोकांसाठी आदर्श बनतात. कारण त्यांच्या बद्दल 90 बैठका, 100 जोर, PHD in automatic science इ सारखे अतिरंजीत  खोटे लेख नियमित  फॉरवर्ड होत असतात तर चवळीतील लोक एकमेकांवर टीका करतात पण चांगले लिहीत नाहीत  .
तर उपेंद्र सरांच्या बद्दल जाणून घेऊया 
 उपेंद्र सरांचे आई वडील राष्ट्र सेवा दलाच्या विचारांचे कार्यकर्ते होते. त्यामुळे लहानपणापासूनच ते त्याच्याशी जोडले गेले आणि शिबिरातून घडत गेले.सरांचे वडील यांनी बीए शिक्षण घेतले आणि शिक्षक झाले. त्यानंतर वकिलीचे शिक्षण घेऊन वकील झाले आणि काही वर्ष वकिली करून न्यायाधीशाची परीक्षा देऊन न्यायाधीश झाले. सरांच्या आई सुरुवातीला  शिक्षिका होत्या पण पती न्यायाधीश झाल्यावर दर काही वर्षांनी बदली होत असल्याने त्यांनी शिक्षिकेची नोकरी सोडली. 

1984 साली राष्ट्र सेवा दलाने छात्र भारती ही विद्यार्थी संघटना सुरू केली. त्यात उपेंद्र सर सक्रिय सहभागी झाले आणि महाराष्ट्राचा संघटक म्हणूनही त्यांनी काम केले.
 
बीएससीची परीक्षा दिल्यावर  त्यांनी वडील आणि भावाच्या इच्छेनुसार सहज म्हणून मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह च्या नोकरीसाठी मुलाखत दिली. ज्यात  त्यांचे सिलेक्शन झाले  आणि तीन वर्ष त्यांनी  मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कार्य केले.

1989 मध्ये राष्ट्रसेवा दलाच्या क्षीरसागर कुटुंबातील पुष्पाशी त्यांनी ठरवून आंतरजातीय विवाह केला. त्यांची विवाहाची कथा सुद्धा प्रेरणादायी आहे. छात्र भारतीचे  कार्यकर्ते पंढरपूरला गेले तेव्हा पुष्पाताईंचे वडील सेवा दलाचे कार्यकर्ते असल्याने त्यांच्या घरी उतरले होते. त्यानंतर टीम पुढच्या गावी गेल्यावर पुष्पा ताईंनी "हा मुलगा कोण होता?"  त्याची चौकशी केली आणि  त्यांच्या घरातून यदुनाथ थत्तेजींना याबाबत विचारणा झाली. त्यानंतर संजय पवार हे पन्नालाल सुराणा यांच्याशी बोलले आणि सुराणा यांनी  उपेंद्र सरांच्या विवाहाबद्दल पत्र क्षीरसागर  कुटुंबासाठी लिहिले. हे लग्न घडविण्यात पुष्पाताईंचा भाऊ व उपेंद्र सरांचा मित्र सुनील क्षीरसागर यांचा मोठा वाटा होता.
त्यानंतर पुण्यात साने गुरुजी स्मारक येथे त्यांचे नोंदणी पद्धतीने लग्न झाले. लग्नानंतर कुटुंबाच्या अर्थार्जनाची संपूर्ण जबाबदारी पुष्पाताईंनी घेतली, ज्या त्या आजही सार्थपणे निभवत आहेत. 

1993 मध्ये लातूर उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या प्रलयंकारी भूकंपानंतर मदत कार्यात सहभागी होण्यासाठी छात्र भारतीच्या सहकाऱ्यांसह किल्लारी येथे गेले. त्याच दरम्यान  मानवलोक संस्थेच्या डॉ. द्वारकादासजी लोहिया यांनी उमरगा तालुक्यातील सालेगाव येथे कायमस्वरूपी भूकंप पुनर्वसनासाठी उपकेंद्र सुरू केले. त्यांनी उपेंद्र सरांना "यासाठी निदान 5 वर्षे देणार का?" असे विचारले? ज्याला होकार दिल्यावर लोहियांनी त्यांना उपकेंद्राच्या प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली. या कामात पुष्पाताईंनी सुद्धा मोठा सहभाग घेतला.
 शेतकरी केंद्रस्थानी मानून त्यांच्यासाठी उसनवार खत बियाणे, विहिरींच्या गाळ काढणे, नवीन सामुदायिक विहिरी खोदणे, पाणलोट क्षेत्र विकास  त्याचसोबत  महिलांचे संघटन, आरोग्य असे अनेक उपक्रम  त्यात होते. पाच वर्षानंतर लोहियांनी संस्थेच्या विकेंद्रीकरणाची संकल्पना मांडली. ज्याला प्रतिसाद देत उपेंद्र सरांनी छात्र भारतीच्या साथींसह  1999 साली विकास भारती पुणे ही संस्था काळनिबाळा येथे सुरू केली. याच दरम्यान पुष्पाताई कलदेव निबाळा येथे शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होत्या. उपेंद्र सर आणि पुष्पाताई दोघेही येथे बचत गट, आरोग्य, शेतीपूरक व्यवसाय प्रशिक्षण त्यात रेशीम उद्योग, आळंबी उत्पादन अशा विविध  विषयांवर काम  केले.
 पुढे 2008 मध्ये मुलीच्या शिक्षणासाठी सोलापूर येथे शिफ्ट झाले. पुष्पाताई सोलापूर वरून काळनिंबाळ येथे शाळेसाठी ये जा करत होत्या.
 यानंतर सोलापूर येथून एक वर्ष साप्ताहिक प्रजापत्राचे कार्यकारी संपादक म्हणून कार्य केले आणि त्यानंतर राष्ट्रसेवा दलाच्या कामात पुन्हा सक्रिय झाले. 
मुलीची १० वी झाल्यावर तिने पुढील शिक्षण पुणे येथे घ्यायची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार तिच्यासह उपेंद्र सर पुण्यास शिफ्ट झाले.
 दरम्यान राष्ट्रसेवा दलाचे महामंत्री म्हणून त्यांनी दोन वर्षे काम केले.
 2021 पासून उपेंद्र सर एस एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशन मध्ये सहसचिव म्हणून कार्य करत आहेत.
 "जीवनसाथी पुष्पाची आश्वासक व समर्थ साथ असल्यामुळेच मी सातत्याने काम करू शकतो" असे उपेंद्र सर सांगतात. विशेष म्हणजे सरांची मुलगी सानिया ही पण आता इंजिनियर म्हणून स्वतःच्या पायावर उभी आहे. तिचे नावही  सानिया पुष्पा उपेंद्र असे असून तिने आडनाव लावलेले नाही. मागच्याच वर्षी पासपोर्ट घेताना पोलिसांनी तिला "असे कसे नाव? आणि  आडनाव कुठे आह?" हे विचारले  तेव्हा तिने पोलिसांना चांगल्या प्रकारे समजावून सांगितले की आडनाव लावणे हे कसे पुरुषसत्ताक व्यवस्थेचे लक्षण आहे ज्याला पोलिस सुद्धा सहमत झाले.
 एखादी व्यक्ती गेली की आपण त्या व्यक्तीबद्दल भरभरून लिहितो आणि हळहळ व्यक्त करतो. पण जिवंतपणीच त्या व्यक्तींचे काम जाणून घेऊन  त्यातून प्रेरणा घेणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे या गोष्टी व्हायला हव्यात  म्हणून हा लेख प्रपंच.
(विशेष म्हणजे आर्थिक नियोजन करण्याच्या निमित्ताने आमची भेट झाली. ज्यात आर्थिक नियोजना बद्दल अनेक गोष्टी सरांनी माझ्या कडून समजून घेतल्या पण आर्थिक नियोजन सल्लागार सोबत मी एक सामाजिक कार्यकर्ताही असल्याने मला हे लिहणे ही महत्वाचे वाटले..)

 संकेत मुनोत
 16 डिसेंबर 2023

Comment, Share ,Follow and Subscribe.

हिंगणघाट मधील गांधींविचारी मंडळींची जाम येथे भेट


चंद्रपूरला असतानाच अभिजित सरांचा फोन आला की जाम या गावी भेटूया 

 हिंगणघाटहुन जाम या गावी हे सर्व भेटण्यास आले होते , अशोका हॉटेल, जाम येथे गप्पा एवढ्या रंगल्या की ते सर्वोदय आश्रम वर्धा पर्यत सोडण्यास आले आणि पुन्हा आश्रमात बसूनही बराच वेळ खूप छान विचारमंथन झाले
अभिजित डाखोरे सरांशी पूर्वी बऱ्याचदा फोनवर बोलणे व्हायचे पण प्रत्यक्ष भेट पहिलीच होती 
डावीकडून राजकुमार झोटिंग( सामजिक कार्यकर्ते),श्रीकृष्ण बोढे( प्राध्यापक, अर्थशास्त्र), अभिजित डाखोरे( प्राध्यापक), संकेत मुनोत, डॉ. शिवचरण ठाकूर( सर्वोदयी, नयी तालीम), रमेश झाडे( अध्यक्ष,  वर्धा जिल्हा सर्वोदय)

त्यातील काहींचा अल्प परिचय पाहूया

राजकुमार झोटिंग यांच्या मुलाचा अवघ्या 18व्या वर्षी मृत्यू झाला तेव्हा त्यांनी स्वतः  अश्या बिकट मानसिक अवस्थेत असतानाही त्याचे अवयवदान केले, त्यानंतर त्याच्या प्रित्यर्थ ambulance ही दिली आणि मोठे सामजिक कार्य त्यांच्याकडून सुरू आहे.

अभिजित डाखोरे यांनी 10 वीत असताना लोकमत मध्ये  'बापू हमे माफ करना'  लेख लिहला, जो खूप गाजला. सुरेश द्वादशीवार पासून अनेक जणांना वाटले कि कोणी तरी जेष्ठ विचारवंत असावा पण 10 वी तला विद्यार्थी पाहून ते थक्क झाले होते,  त्यांनी खूप छान कविता ऐकवल्या

रमेश झाडे हे शेतकरी पण वाचनामुळे गांधींविचारांकडे वळाले त्यांनतर पांढरे गुरुजींच्या एका व्याख्यानात ते एवढे प्रभावित झाले की त्यांनी तेव्हापासून इतर वस्त्रांचा त्याग करून फक्त खादीच घालण्याचा संकल्प केला जो आजवर सुरू आहे त्यांनी गांधी विनोबांच्या अनेक भावपूर्ण गोष्टी सांगितल्या.जसे की तुरुंगात गांधी पटेल नेहरू आणि इतर सर्वांना च खूप त्रास दिला जायचा पण त्यांनी त्याचे रसभरीत वर्णन केले नाही उलट तुरुंगाला मंदिर म्हटले...ज्यामुळे कैदी एवढे झाले कि इंग्रजांना तुरुंग कमी पडू लागले.
सृष्टीकडे सगळ्यांची गरज भागवण्याएव्हढे आहे पण एकाचा हव्यास भागवण्याएव्हढे नाही हे गांधीजींचे वाक्य सांगून गांधीविचार आजही कसे अनुकरणीय आहेत हे झाडे काकांनी पटवून दिले..
डॉ शिवचरण ठाकूर, श्रेकृष्ण बोढे यांच्याबद्दल पुन्हा कधी तरी लिहतो

तर पहा गांधी हयात नसतानाही विचारांनी कसे अनेक ठिकाणी जिवंत आहेत आणि तो विविध क्षेत्रात सकारात्मक बदल घडवत आहेत

देशातील वाढता द्वेष कमी करण्यासाठी या सर्व लोकांना जोडत या विचारांचा प्रसार अधिक वाढवण्याची गरज आहे

संकेत मुनोत 
16-12-2021

Comment, Share ,Follow and Subscribe.

Wednesday, November 29, 2023

Investment चे जागतिक तज्ञ चार्ली मंगर माहित आहेत का?

जगातील गुंतवणूक क्षेत्रातील गुरू मानले जाणारे चार्ली मंगर यांचे आज वयाच्या 99 व्या वर्षी निधन झाले
काय-काय संकटे एका माणसावर यावीत?घटस्फोट झाला ज्यात सगळे गमावले. 3 मुलांची जबाबदारी आली त्यातील एका मुलाला कॅन्सर झाला,त्यात  health insurance नसल्याने त्याच्या कॅन्सर चा खर्च करता-करता सगळे पैसे तर संपलेच पण त्यासाठी कर्ज काढून कर्जबाजारी झाले .त्या मुलाचा मृत्यू झाला. वडील गेले , त्यात आयुष्यात अजून काही संकटे आली स्वतःचा एक डोळा गेला, पण ते खचले नाहीत लढत राहिले.
आपल्या देशातील  सध्याच्या काही अतिश्रीमंत लोकांच्या कडे पाहून आपल्याला वाटते कि लबाडी केली कि यश पटकन मिळते पण ते जागतिक सत्य नाही 
एवढ्या सगळ्या संकटात चार्ली यांना मदत करणारा एकच मित्र होता तो म्हणजे वाचन. 
"We both (Charlie Munger and Warren Buffett) insist on a lot of time being available almost every day to just sit and think. That is very uncommon in American business. We read and think."
Spend each day trying to be a little wiser than you were when you woke up. Day by day, and at the end of the day-if you live long enough-like most people, you will get out of life what you deserve.- - Charlie Munger

 वॉरन बफे यांना मदत करण्यासाठी चार्ली मंगर यांनी वकिली सोडली. Warren Buffett यांच्या Berkshire या जगविख्यात कंपनी च्या उभारण्यात चार्ली यांचा  सिंहाचा वाटा होता.बर्कशायरमध्ये त्यांची गुंतवणूक सुमारे २.२ अब्ज डॉलर इतकी होती. वॉरन बफे यांच्या प्रमाणेच चार्ली मंगर हा गुंतवणूक क्षेत्रातील अखेरचा शब्द होता. बर्कशायरच्या २००२ सालच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बफे यांनी मंगर यांचं तोंडभरून कौतुक केलं होतं. 'तुम्ही चुकत आहात हे तोंडावर सांगणारा सहकारी मिळणं खूप कठीण असतं. अनेक सीईओ चापलूस लोकांच्या गराड्यात वावरत असतात. त्यांच्या मताला आव्हान देणारा व्यक्ती त्यांना नको असतो. आम्ही त्या बाबतीत नशीबवान आहोत, असं बफे म्हणाले होते. त्यावरून मंगर यांच्या स्पष्टवक्तेपणाची कल्पना येते. 
एका annual meeting मध्ये त्यांनी Warren Buffett यांना महात्मा गांधी यांचे fatter version असे म्हटले होते. त्यातच ते हेही सांगतात कि " a lot of other people are trying to be brilliant , and we are just trying to stay rattional. 
"Money management requires people to pretend they can do something that they can't, and like it when they really don't. I think that's a terrible way to spend your life, but it's very well paid."

 शो ऑफ ला त्यांचा विरोध होता. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते सामान्य माणसाचे प्रतिनिधी म्हणून वावरायचे. बिटकॉइन हे एक प्रकारचं विष आहे, असं त्यांचं मत होतं.

अनेक तज्ज्ञ यात गुंतवा त्यात गुंतवा म्हणतात तिथे चार्ली स्वतःला घडवण्यासाठी गुंतवायला सांगतात. 
*आपले आर्थिक नियोजन व्यवस्थित करणे हीच  चार्ली यांना खरी श्रद्धांजली ठरेल

संकेत मुनोत

Comment, Share ,Follow and Subscribe.

Thursday, November 23, 2023

आजारी पडल्यावर कुठे admit व्हावे?



तुमचा Health Insurance ( Mediclaim) कुठल्याही कंपनीचा असला तरी admit होताना शक्यतो नेटवर्क हॉस्पिटल्सला प्राथमिकता द्या. कारण नेटवर्क हॉस्पिटल मध्ये तुम्हाला कुठलीही मोठी प्रोसेस करावी लागत नाही. फक्त पॉलिसी नंबर दिला की पुढची प्रक्रिया हॉस्पिटल आणि इन्शुरन्स कंपनी पाहून घेते. 
बहुतेक हॉस्पिटल्स मध्ये इन्शुरन्स डिपार्टमेंट असते ते insurance  कंपनीसोबत बोलतात आणि पुढची प्रक्रिया करून घेतात.
होय अगदीच emergency असेल किंवा नेटवर्क हॉस्पिटल मध्ये बेड्स च उपलब्ध नसतील तर त्यावेळी नॉन नेटवर्क हॉस्पिटल मध्ये admit होण्यास हरकत नाही. 
कॅशलेस सुविधा असल्याने आपल्याला हॉस्पिटल मध्ये  पैसे भरण्याची गरज पडत नाही.  
उदाहरणातूनच सांगतो-  मागच्याच आठवड्यात माझ्या एका क्लाएंट ला admit केले होते त्यांना 2,20,000 खर्च आला होता त्यातील 2,17,000 रुपये हॉस्पिटल ला  कंपनीने दिले. फक्त 3 हजार रुपये केस पेपर वगैरे चे लावले. आम्ही तेही हॉस्पिटल कडून discount करून घेतले. 
यात एक यादी Wellness Providers Hospitals ची पण असते ज्यात  आपण admit झालो तर कंपनीचं आपल्याला  रोज 1000-1500 रु किंवा अधिक पैसे देते.(Hospital Cash Benifit). यात कारण आपण admit झालो तर आपले काम बुडते आणि त्यादिवशी चा रोजगार बुडतो त्याबद्दल काही रक्कम ते आपल्या account मध्ये टाकतात . मागे एका मित्राला अश्या wellness provider Hospital मध्ये admit झाल्यामुळे 7 दिवसांचे 7 हजार रुपये मिळाले शिवाय हॉस्पिटलचे  बिलही जे १३ लाख होते ते  त्याला भरावे लागले नाही.
केस पेपर, Hand gloves आणि इतर काही गोष्टी ज्या पूर्वी non consumables पकडुन कव्हर होत नव्हत्या त्याही आज काही पॉलिसी मध्ये कव्हर होतात. शिवाय OPD  वगैरे cover होत नव्हते तेही काही पॉलिसी मध्ये cover होते. 

आरोग्य विमा ( Health Insurance) ही अन्न-वस्त्र-निवारा यांच्या एवढीच अत्यावश्यक गोष्ट आहे आणि जर तो नसेल तर आपले दिवाळे निघू शकते आणि पूर्ण कुटुंबाची आणि आपल्या सगळ्स्वया स्वप्नांची वाताहात होऊ शकते.

पण अनेक जण हे घेताना काळजीपूर्वक निवड करत नाहीत उगीच घ्यायचा म्हणून online जाहिरातीला बळी पडून किंवा कुणा मित्रा नातेवाईकांच्या pressure ला बळी पडून   घ्यायचा म्हणून घेतात पण तो घेताना सर्व गोष्टी व्यवस्थित समजून घ्यायला हव्यात. आणि तोही गुगल किंवा youtube वर नव्हे. 
ज्या गोष्टीत सेवेची गरज असते त्या कधीही online sites वरून घेऊ नयेत. उदाहरण सांगतो मध्यंतरी मला डाव्या ओठाच्या किनार्यावर ulcer झाला होता. मी काय झाले म्हणून google वर serach केले तर ते पार  cancer etc सांगू लागले . मग डॉक्टर मित्राला call केला तर त्याने लगेच उपाय केला . हेच तुम्ही online policy  घेतना होऊ शकते   त्यामुळे याबद्दल कॉल किंवा मेसेज करा आणि वेळ घेऊन सगळ्या गोष्टी व्यवस्थित जाणून घ्या . 

म्हणजे मी  तर policy  देण्यापूर्वी आणि दिल्यानंतरही एक-दीड तास त्यातील महत्वाच्या गोष्टी समजवण्याचे सेशन घेतो शिवाय ज्यांना गरज नाही त्यांना नाही सुद्धा सांगतो.म्हणजे  4 वर्षापूर्वीची गोष्ट माझे एक डॉक्टर मित्र त्यांच्या वडिलांचा आरोग्य विमा माझ्याकडुन घेणार होते वय 72 असल्याने premium पण मोठा म्हणजे  75 हजार वगैरे येत होता चांगल्या पॉलिसी साठी . तेच मला एक धार्मिक स्कीम कमी खर्चात होती ती माहित होती याबाबत मी त्यांना माझ्याकडुन आरोग्य विमा न घेता तिथून घ्यायला सांगितले. काही जण म्हणाले की clients असे सोडायचे नाहीत  वगैरे पण मी सांगितले की मी कुठल्याही ग्राहकाला काही देताना स्वतःला त्यांच्या जागी ठेवून पाहतो  माझ्या वडिलांसाठी जे करेन तेच त्यांच्यासाठी. आज 4 वर्षानंतर त्या मित्राने मला त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक नियोजन करण्याची सेवेची संधी दिली ज्यात त्यांनी दोघांचा  Retirement and Pension चे  palnning करून घेतले.  
तर यानिमित्त  सांगायचे हेच होते की यात प्रामाणिकता खूप महत्वाची. 

इन्शुरन्स बाबत एक गोष्ट कायम लक्षात ठेवा . हे फ्रिज, वॉशिंग मशीन, मोबाईल यांच्या सारखे नाही की आज नाही उद्या घेईल पुढच्या महिन्यात घेईल. जेव्हा लक्षात येईल तेव्हा लगेच हे घ्यायला हवे. आपण 1.5 लाख चा I phone घेतला तर त्याला स्क्रीनगार्ड लावताना पुढच्या महिन्यात वगैरे म्हणतो का? नाही ना कारण आपल्याला माहीत असते की फुटला तर लाखो खर्च येईल तर हे शरीर तर कोट्यवधी रुपयांचे आहे. कोरोना मध्ये लंग transplant चेच 55 लाख रुपये घेत होते इतर अवयवांचे किती त्याचा विचार करा. त्यामुळे हे अवयव चांगले असतानाच आपण health insurance काढायला हवा. 

आत्तापर्यंत सामाजिक विषयांवर लिहित होतो पण आर्थिक नियोजन यावर आता अधिक लिहिणार आहे कारण एखाद्याचे आर्थिक नियोजन करून देणे हेही अधिक सामजिक कार्यच आहे .आणि यात प्रामाणिक सल्लागाराची मोठी कमतरता आहे. 

अधिक माहिती साठी कॉल करा, सल्ला विनामुल्य आहे. 
आपली याबाबत भारतभर  सेवा देत आहोत. 

संकेत मुनोत
Financial planner and Insurance Advisor
Honest Advise best service 
8668975178

Comment, Share ,Follow and Subscribe.

Thursday, November 16, 2023

दीपावली स्नेहभेट सोहळ्यासाठी पिंपरी चिंचवड मधून प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण

दीपावली स्नेहभेट सोहळ्यासाठी काल पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण मिळाले. दिवाळी फराळ, नाश्ता आणि त्यानंतर 2 प्रमुख अतिथी चे मार्गदर्शन असा कार्यक्रम होता.
निवृत्त न्यायाधीश बी जी कोळसे पाटील यांना बऱ्याच दिवसापासून भेटायची इच्छा होती पण असे सोबत व्यासपीठ शेयर करता येईल असे वाटले नव्हते.

आशिया खंडातील सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका असे PCMC ( Pimpri chinchwad Municipal corporation ) बद्दल ऐकून आहे. इकडचे रस्ते आणि इतर अनेक गोष्टी अनुकरण करण्यासारख्या आहेत. 
पिंपरी चिंचवड शहराशी माझे जवळचे नाते आहे. तसे माझं बालपण वगैरे सगळे पुण्यात गेले असले तरी माझे बी फार्मसी इथे निगडीत झाले त्यानंतर  तळवडे IT park आणि pune IT park मध्ये जी नोकरी केली तेही याच हद्दीत येतात आणि माझ्या LIC चे हेड ऑफिस पण PCMC मध्येच येते. सध्या PF वरील name correction निमित्त ज्या PF office मध्ये हेलपाटे मारावे लागले तेही आकुर्डी म्हणजे PCMC मध्येच होते. यापूर्वी बी आर माडगूळकर काकांनी मोरवाडी जेष्ठ नागरिक संघातर्फे  2021 आणि 2022 मध्ये 2 व्याख्याने घेतली आणि हे तिसरे.
कामगार नेते आणि पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष कैलास कदम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मा. नरेंद्र बनसोडे यांच्यामुळे हे शक्य झाले. पुण्यातील Knowing Gandhi Global Friends च्या बहुतेक सर्व उपक्रमांना ते वेळोवेळी उपस्थित राहून चांगले योगदान देत असतात. 

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सुरू करण्यात आलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी सर्वांशी छान संवाद झाला. 
यात एक गोष्ट मोठी ही झाली की प्रेक्षकांच्या मध्ये सन्मित्र चैतन्य सावळे पण बसले होते. ते पूर्वी कट्टर भक्त , गांधीविरोधक आणि हिंसेचे समर्थक होते. पण माझा लोकमत मधील लेख वाचून ते बदलले आणि आज ते खूप चांगल्या प्रकारे facts मांडत असतात मी तर म्हणेल ते माझ्या पेक्षाही ते अधिक सक्रिय असतात. 
गांधी, बोस आणि भगतसिंग यांचे मार्ग जरी वेगवेगळे असले तरी ध्येय एकच होते स्वातंत्र्य आणि तेही सर्व समावेशक स्वातंत्र्य. तिघांनी हिंदुराष्ट्र, इस्लामिक राष्ट्र किंवा अश्या प्रकारच्या धर्मावर आधारित कल्पनेला तीव्र विरोध केला. आज देश जात, धर्म, वर्ग यात वाटला जात असताना गांधी विचारच आहे जो सर्वांना भेद विसरून एकत्र आणू शकतो.

माझ्या व्याख्यानाच्या शेवटी नेहमीप्रमाणे इथेही सर्वांकडून पंचसूत्रीचा संकल्प घेतला. 
1. कुठले व्यसन करणार नाही
2. कुणाला नात्यात फसवणार नाही
3.जात, धर्म, वर्ग,रंग , लिंग, उंची यावरून भेदभाव करणार नाही.
4.हिंसक दंगलीत सहभागी होणार नाही 
5.सत्यता पडताळल्या शिवाय कुठलाही मेसेज पुढे सांगणार नाही फॉरवर्ड करणार नाही अशी शपथ शेवटी सर्वांना दिली. 

यात शेवटी हे पण सांगितले की फक्त छान छान म्हणून चालत नाही तर आपण एकमेकांना नोकरी, व्यवसाय ई. मध्ये मदत ही केली पाहिजे. कारण चळवळीत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला पण कुटुंब असते आणि आपण त्याला व्यवसाय नोकरी याबाबत मदत केली तर तो किंवा ती ते काम अधिक जोमाने करू शकेल. याबाबत संघाकडून गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. माझा मित्र निलेश शिंगे याचा एक मित्र सॉफ्टवेअर इंजिनीयर होता त्याने मध्यंतरी ब्रेक घेऊन 3 वर्षे संघ प्रचारक झाला तर त्याच्या अर्थार्जनाची पूर्ण जबाबदारी संघाने घेतलीच शिवाय जेव्हा त्याला 3 वर्षानंतर पुन्हा स्वतःचे फील्ड जॉईन करायचे होते तर ओळखीतून IT कंपनीत चांगल्या पदावर नोकरी ही लावून दिली. अजून एक उदाहरण व्यवसायाचे. आमच्या एका समविचारी संघटने च्या मीटिंग ला 2 तरुण मित्र यायचे जे घरातील वस्तू repair करण्याचे काम करायचे. त्यांना तिथे व्यवसाय मिळू शकला नाही पण काही महिन्यांनी तिकडे जॉईन झाले आणि त्यांना तिथे महिन्याला किमान 15-20 घरातील कार्य मिळाले. गांधींनी पण मुख्य गोष्ट हीच केली होती खादी आणि वेगवेगळे ग्रामोद्योग यातून त्यांनी देशातील लाखो लोकांच्या रोजगाराची सोय केली होती. तर आपण पूर्ण वेळ जरी यात येऊ शकला नाहीत तरी चालेल पण जे यात पुढे होऊन कार्य करत आहेत त्यांना या प्रकारे सेवेची संधी द्या. लोक पूर्वी ब्रिटिशांच्या कडून कापड घ्यायचे ते बंद करून ते आपल्या स्वातंत्र्य सैनिकांकडून खादी घेऊ लागले त्यामुळे ते अधिक जोमाने काम करू शकले. आज खादी नसली तरी इतर सेवा आहेत त्यात त्यांना प्राथमिकता द्या. उदाहरणार्थ आपल्या पैकी कुणाला स्टेशनरी ची गरज तर *** या कार्यकर्त्याला प्राथमिकता द्या. आपले किंवा आपल्या मित्र परिवारातील कोणाचेही आर्थिक नियोजन करण्यासाठी , पॉलिसी काढण्यासाठी मला सेवेची संधी द्या आपली सेवा देशभर आहे. Child education plan, जीवनसाथी प्लॅन, कन्यादान, पेन्शन किंवा retirement plan, health insurance, life insurance, term insurance याबाबत कुठलेही कार्य असल्यास मला आपल्या सेवेची संधी द्या. आपले नाव माझ्या client च्या यादीत add होणे ही माझ्यासाठी मोठी संधी असेल. प्रामाणिक सल्ला आणि उत्तम सेवा हे आपले मुख्य वैशिष्ट्य आहे. 

यावेळी डॉ. Mukhtar Mulla सर खास भेटण्यास आले होते .सन्मित्र दाहर मुजावर आणि मुख्तार सरांशी बराच वेळ छान गप्पा झाल्या. 
याप्रसंगी माजी महापौर कविचंद भाट, जेष्ठ महिला नेत्या श्यामला सोनवणे, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, भरत वाल्हेकर, उपाध्यक्ष सोमनाथ शेळके, छायावती देसले, अर्चना राऊत, अबुबकर लांडगे, काँग्रेस सेवा दलाचे शहराध्यक्ष वीरेंद्र गायकवाड, चिंचवड ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष माऊली मलशेट्टी, भोसरी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष स्वप्निल बनसोडे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर मनीषा गरुड, कौशल्य विकास विभागाचे अध्यक्ष रवी नांगरे, स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष विशाल सरोदे, सुप्रिया पोहरे, ग्राहक विभागाचे अध्यक्ष जेवियर अँथनी, इस्माईल संगम, भास्कर नारखेडे, उमेश बनसोडे, योगेश बहिरट, सुधीर गायकवाड, रवी कांबळे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 
मित्रांनो द्वेष करणे सोप्पे असले तरी प्रेम करणे healthy आहे त्यामुळे प्रेम पसरवत राहूया. 
माना की अंधेरा घना है पर दिया जलाना कहा मना है?

 संकेत मुनोत
8668975178

Comment, Share ,Follow and Subscribe.
























Saturday, September 30, 2023

डॉ. Prasannakumar Bamb आणि त्यांचा मुलगा Oshin Bamb , आर्वी , वर्धा यांची घरी सदिच्छा भेट

काल सन्मित्र डॉ. Prasannakumar Bamb आणि त्यांचा मुलगा Oshin Bamb , आर्वी , वर्धा यांनी घरी सदिच्छा भेट दिली. Oshin ने माझे कुठले तरी व्याख्यान ऑनलाईन ऐकले तेव्हा त्याच्याशी ओळख झाली त्यानंतर त्याने त्याच्या वडिलांना पण त्यात जोडले 
 2 वर्षापूर्वी मला नागपूर आणि यवतमाळ येथून व्याख्यान देण्यास निमंत्रण मिळाले तेव्हा डॉ. प्रसन्नकुमार मला खास त्यांच्या घरी घेऊन गेले आणि त्यांनी आर्वी, कोंढणपुर , पवनार आश्रम आणि विविध गोष्टी दाखवल्या. मागच्या वर्षी सुद्धा पुन्हा आर्वी येथे व्याख्यानास गेलो तर तेव्हा ही आयोजक दुसरे असले तरी ते आग्रहाने त्यांच्या घरी घेऊन गेले. आणि त्यांच्या घरी खूप छान पाहुणचार केला. 

डॉ. प्रसन्नकुमार हे पशू वैद्यकीय चिकित्सक अधिकारी होते. त्यांनी सरकारी नोकरी असूनही Retirement च्या 5 वर्षापूर्वीच VRS घेतली. ते गांधी विनोबा या दोन्ही वर कार्य करत आहेत. "याला जीवन ऐसे नाव", "मनाचिये द्वारी उभा क्षणभरी", "गौलाऊ विदर्भाचे गौरव" अशी त्यांची 3 पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

विविध विषयांवर त्यांनी लेख लिहले असून विदर्भात विविध ठिकाणी त्यांची संत साहित्य आणि समाजप्रबोधनपर व्याख्याने आयोजित झाली आहेत. 

ग्रामीण भागातील महिलांच्यासाठी त्यांनी 20 पेक्षा जास्त बचत गट काढले आहेत. अनेक गोशाला आणि पांजरपोळ मध्ये ते मोफत सेवा देतात.
त्यांचे वडील हे पहूर दाभा , यवतमाळ येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फॉरवर्ड ब्लॉक पार्टी चे काम करायचे आणि जवळपास 10 वर्षे सरपंच होते. जांबुवंतराव धोटे सारख्या नेत्यांशी त्यांचे मैत्रीचे नाते होते.
ओशिन डेक्कन कॉलेज , पुणे येथे archeology मध्ये PHD करत आहे.Oshin पण अनेक सामजिक चळवळीत सक्रिय असून पुणे विद्यापीठ , फर्ग्युसन कॉलेज मध्ये visiting faculty आहे. तो आत्तापर्यंत बहुतेक सर्व परीक्षांत मेरिट मध्ये आला असून CET NET qualified आहे. 
डॉ. प्रसन्न कुमार बंब माझे Financial plannning चे client ही आहेत.
त्यांना माझे काम आवडते आणि फोन केल्यावर पण दरवेळी आपको टाईम है ना? माफ किजिये मैने आपका इतना समय लिया वगैरे ते खूप विनम्रतेने म्हणतात हे त्यांचे मोठेपण आहे. 
Oshin ने भेटीत एक महत्वाची गोष्ट सांगितली. सम्राट अशोकाचे एवढ्या मोठ्या राष्ट्राचा सम्राट  आणि बौद्ध धर्माचा अनुयायी आणि प्रसारक असूनही त्याने कधी हे राष्ट्र बौद्ध राष्ट्र व्हावे वगैरे म्हटले नाही. उलट त्याने शिलालेखात सर्वांचा आदर करण्यात यावा असे लिहले आहे.
असो अशी प्रेमळ माणसे भेटली की हृदयातील प्रेम अधिक वृध्दींगत होते.❤️ प्रेम पसरवत राहूया
संकेत मुनोत


Comment, Share ,Follow and Subscribe.

Actor , Director शार्दुल सराफ ग्रेट भेट

लेखक, दिग्दर्शक , अभिनेते असलेले मित्र शार्दुल सराफ यांच्याशी परवा भेट झाली.खर तर ते स्पेशल भेटण्यास आले त्याबद्दल त्यांचे आभार.  आमची ही पहिलीच भेट होती ज्यात जवळपास 4-5 तास मस्त चर्चा झाली. 

 खर भेटण्यापुर्वी ते एवढे काही करतात हे माहीत नव्हते. समविचारी मित्र आहेत एवढेच माहीत होते. एकमेकांचे लेख वाचणे वगैरे गोष्टी होत्याच पण यात अजून विशेष म्हणजे 2 वर्षापूर्वी ते माझ्यासाठी लग्नाचे स्थळ सुद्धा शोधत होते...😊

असो त्यानिमित्त त्यांचा थोडक्यात परिचय पाहूया

प्रायोगिक पातळीवर रात्रंदिन आम्हां, जनक ह्या पारितोषिक विजेत्या नाटकांचे ते लेखक - दिग्दर्शक आहेत

वळू, गाभरीचा पाऊस, सलाम, होम स्वीट होम ह्या चित्रपटांचे प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केलं आहे

कमला, दुर्वा, पसंत आहे मुलगी, लव्ह लग्न लोच्या, अंजली, जीव माझा गुंतला, शाब्बास सूनबाई अशा मालिकांचे लेखक आहेत

तर आमिर खान ह्यांच्या पाणी फाऊंडेशन च्या ' तुफान आलंया ' ह्या कार्यक्रमाचे ते लेखक - दिग्दर्शक आहेत. 

आमची ओळख गांधी विचारांच्या मुळे... शार्दुल पण पूर्वी गांधीजींची चेष्टा उडवायचे पण गांधीजींची आत्मकथा वाचली आणि त्यातून नवीन दृष्टी त्याला मिळाली असे ते म्हणाले...

 गांधीविचार अजून प्रभावी पद्धतीने लोकांच्या पर्यंत कसे पोहोचवता येतील याबाबत थोडे नियोजन ही या भेटीत केले.

 शार्दुल ने आरे तुरे बोलायला सांगितले ते पण अजून बोलू शकलो नाही पण प्रयत्न  सुरू आहेत.

संकेत मुनोत


Comment, Share ,Follow and Subscribe.

Sunday, September 24, 2023

गांधी जन्मले तेव्हा शून्य होते आणि गेले तेव्हाही शून्य होते..

आत्ता कोणी तरी गणितात महापुरुषांच्या बद्दल बोलत होते त्यावरून  सहज सुचले...
महात्मा गांधी हे जन्मले तेव्हा #शून्य होते ... ...आणि गेले तेव्हा आणि त्यापूर्वी अनेक दशके शून्यच होते...कुठले मंत्रीपद नाही, कुठली संपत्ती नाही की इतर काही नाही ...

पण ज्याला ते जुळले गेले त्यांचे त्यांनी त्या-त्या व्यक्तीच्या क्षमतेनुसार त्यातून  दशक, , शतक, सहस्त्र आणि बरेच काही घडवले...

अगदी तो चांगला विरोधक असला तर त्याचेही त्यांनी शतक केले ..( स्वतःच्या निवडून आलेल्या लोकांना राजीनामे द्यायला लावून त्यांनी विरोधकातील लोकांना ते पद द्यायला लागले)

ते मौलाना आझाद असो, सरदार पटेल असो , विनोबा असो किंवा या देशातील लाखो सत्याग्रही असो ..सर्वच या शून्याशी जुळून त्यांच्यातून शतक, सहस्त्र, लक्ष झाले...  

पण ज्यांना लोकांना एककात ठेवून फक्त स्वतःलाच दशक, शतक करायचे होते, त्या विषमतावादी लोकांचे गांधीजीमुळे धाबे दणाणले..इतर सगळेच दशक , शतक झाले तर आम्ही कोणाला गुलाम करणार ?..मग असे लोक गांधींना पराभूत करण्यासाठी त्यांना  विभागण्याचे प्रयत्न करू लागले पण या शुन्याला भागच जात नाही म्हणून निराश झाले..
मग शेवटी त्यांनी या शून्यालाच संपवले पण ते हे विसरले की तोपर्यंत हा शून्य विचारांतून , कृतीतून हजारो ठिकाणी पोहोचला होता...त्याला जोडण्यासाठी लोकांना आता फक्त त्याच्या देहाची गरज नव्हती ...

त्या शून्याशी कधी आफ्रिकेत मंडेलानी स्वतः ला जोडून घेऊन वर्णभेदाचा लढा दिला. अमेरिकेत मार्टिन ल्युथर किंग ते बराक ओबामा ने घेतला तर पाकिस्तानात मलाला आणि असंख्य जणांनी या शुन्याशी जोडून घेऊन  त्यांचे दशक, लक्ष केले...
त्यामुळेच आईनस्टाईन सारखा शास्त्रज्ञ अश्याच शून्याने जगाचे भले होणार असल्याचे गणित मांडतो 

तर जो या शून्याचा नीट अभ्यास करतो, समजून घेतो, आचरणात आणतो तो त्याला जोडले होऊन त्यातून दशक, शतक, सहस्त्र...वगैरे बनवतो...


..
आजही या शून्याचा स्वार्थी लोकांना त्रास होतो.  मग तो संपवता येत नाही म्हणून ते त्या शून्याला बदनाम करतात जेणेकरून लोकांनी शून्याला जोडलेच जाऊ नये...
भारतपूरते त्यांचे प्रयत्न काही भागात यशस्वीही होतात पण परदेशात गेल्यावर त्यांनाही  स्वतःला शून्याचा अनुयायीच सांगावे लागते...
.आपणच ठरवायचे त्या शून्याला जोडून आपले दशक, शतक, सहस्त्र..वगैरे  करायचे की की चुकीच्या गोष्टी ऐकून त्याला  भागून स्वतःचे नुकसान करायचे...

संकेत मुनोत 
( फोटो - शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांच्या घरातला त्यांच्या घरात दोनच फोटो होते एक गांधीजींचा आणि दुसरा...)

Comment, Share ,Follow and Subscribe.

Monday, September 11, 2023

खासदार कुमार केतकर, अभिनेते अमोल पालेकर, जेष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांच्या सोबत व्यासपीठ शेयर करायला मिळणे माझ्यासाठी मोठी संधी होती

परवा 'भारत जोडो यात्रा' या एस. ए. जोशी लिखित पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी  विचार मांडण्याची संधी मिळाली. 
खासदार कुमार केतकर, अभिनेते अमोल पालेकर, मुलाखतकार राजू परुळेकर, नेहरुवियन प्रतिक पाटील , प्रकाशक तांदळे मॅम यांच्या सोबत व्यासपीठ शेयर करायला मिळणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. सन्मित्र भाऊसाहेब अजबे यांनी सूत्रसंचालन केले तर न्यू एरा चे आशिष शिंदे  आणि अजून काही मान्यवरांनी पण मनोगते मांडली.

 काही दिवस सामजिक क्षेत्रातून ब्रेक घेतला होता,  खासदार कुमार केतकर सरांचा १ महिन्यापूर्वीच फोन आल्यामुळे या कार्यक्रमाला आलो. पण कार्यक्रमाने नवीन ऊर्जा मिळाली.
 काही दिवसांपासून वैयक्तिक अडचणीमुळे थोडा मानसिक ताणातून जात होतो पण कार्यक्रमाला आल्यावर जेव्हा विविध तरुण येऊन भेटले आणि सेल्फी काढताना बोलले की तुमचे काम आवडते, आम्हाला त्यात जॉईन करायचे आहे वगैरे तर त्याने ताण कमी होऊन आत्मविश्वास वाढला.
सध्या देश, राज्य, गाव, घर यात द्वेष, हिंसा वाढत असताना #प्रेम वाढवण्याची सर्वाधिक गरज आहे. 
द्वेष करणे सोप्पे असते पण #प्रेम करणे healthy असते.

प्रेमाचा संदेश पसरवत राहूया ❤️❤️❤️

संकेत मुनोत
8668975178
#NewEraPublication #BharatJodoYatra

Comment, Share ,Follow and Subscribe.
















Thursday, September 7, 2023

75 वर्षाचे तरुण मित्र मकबूल तांबोळी सर ग्रेट भेट

आपल्या जवळपास अनेक प्रेरणादायी लोक असतात पण आपल्याला माहीत नसतात त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे माझे 75 वर्षाचे तरुण मित्र मकबूल तांबोळी सर .
काल त्यांचा 75 वा वाढदिवस साजरा झाला त्यानिमित्त हा लेख.
तरुण यासाठी की ते गप्पा मारताना त्यांच्या अनुभवा बद्दल बोलतातच पण आत्ता आमच्या पिढी समोर असलेल्या चॅलेंजेसचाही ते विचार करतात . आम्ही महिन्यातून एकदा एक तास सहज बोलतो..
ते माझे health insurance Client पण आहेत. त्यांची
स्वतःची आणि त्यांच्या जीवनसाथी शकीला मॅम यांची पॉलिसी त्यांनी माझ्याकडून काढलीच पण त्यांचा मुलगा असीम आणि मुलगी आस्मा यांनांही माझ्या कडून पॉलिसी घेण्यास सुचवले. सोबत त्यांचे एक मित्र नार्वेकर (ex Joint commissioner, Sales tax) त्यांनाही सुचवले. त्यामुळे नार्वेकर सर आणि नार्वेकर यांचे मित्र डॉ पाटील यांच्याशीही माझी छान मैत्री झाली. अर्थात नार्वेकर सरांनी आणि पाटील सरांनी पूर्वी पूर्ण गोष्टी जाणून घेतल्या , त्यानंतरही कोणी तरी त्यांना जास्त डिस्काउंट देऊ केला पण तिथे न जाता माझ्याकडुनच policy घेतली. तर मला यानिमित्त हे सांगायचे होते गांधी जसे फक्त बोलत नव्हते तर खादी आणि अन्य माध्यमातून रोजगार देऊन सक्षम ही बनवत होते ते सरांनी प्रत्यक्षात अमलात आणले .
तर यानिमित्त सरांचा परिचय पाहूया
सरांचा जन्म पुण्यात मराठमोळ्या मुस्लिम गरीब कुटुंबात, फुलवाला चौक येथे 06 Sep 1948 रोजी गणेश चतुर्थी ला झाला .आणि काल 06 sep 2023 रोजी कृष्ण जन्माष्टमी ला 75 वर्षे पूर्तता झाली. बालपणात आसपास जैन मारवाडी, गुजराती, ख्रिश्चन, मराठी , मुस्लिम, सिंधी, तेलगू, सिंधी , शीख , कानडी असा संमिश्र जाती धर्माच्या वस्तीचा भाग होता.
त्यांनी Telco मध्ये 35 वर्षे नोकरी केली आहे.
ते देवभक्त होते, तळ्यातल्या गणपतीला ते रोज जात असत त्यामुळे एक मुस्लिम मुलगा जातोय त्याचे विशेष कौतुक होत असे. 1965 पासून काही वर्ष गणेश मंडळाचे अध्यक्षही होते. त्यांच्या मनात मात्र वेगवेगळे विचार घोळवत असत. त्यांनी सावरकरांचा मानवाचा देव आणि विश्वाचा देव हा लेख वाचला आणि ते नास्तिक झाले.
मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे ते 5-6 लोकांपैकी एक असे संस्थापक सदस्य होते आणि त्यात ते कार्यरत होते. त्यामुळे त्यांचा भाई वैद्य, निळू फुले, बाबा आढाव यांच्याशी ही जवळचा संबंध आला होता.
अभिनेते निळू फुले यांच्याशी त्यांचा 1970 पासून चांगली मैत्री होती आणि निळू भाऊ यांनी मकबूल सरांचा त्यांच्या बालमित्रांमध्ये समवेश केला होता.2003 ते 2009 या कालावधी मध्ये ते निळू भाऊंच्या सोबत संबंध महाराष्ट्रभर दौऱ्यात असत. महाराष्ट्र आणि देशभर च्या दौऱ्या मध्ये भाई वैद्य यांच्या सोबत ही असत. सुधाताई वर्दे आणि खासदार संभाजीराव काकडे यांच्याशीही त्यांचे खूप जवळचे संबंध होते.मकबूल सर राष्ट्र सेवा दल चे ट्रस्टी Treasurar होते त्याच बरोबर साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक आणि हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्युट याचेही ट्रस्टी होते.
अगदी वयाच्या 6 व्या -7 व्या वर्षापासून वाचनाची गोडी लागल्यामुळे विविध विषयांवरील त्यांचे वाचन अफाट आहे. त्यांचे विचार हे सुस्पष्ट आणि balanced आहेत.
आमची ओळख फेसबुकवरच झाली. सर माझे बहुतेक लेख वाचत आणि त्यावर प्रतिक्रिया देत असत. गांधी विचारातून समाजात प्रेम आणि संवाद वाढवणे हा आम्हाला जोडणारा दुवा.
2021 मध्ये एकदा स्वतः साठी आणि कॉलनी तील लोकांच्या साठी जांभळे विकत घेण्याच्या निमित्ताने त्यांनी मला त्यांच्या पाषाण येथील घरी बोलवले तेव्हा त्यांच्याशी पहिली प्रत्यक्ष भेट झाली. (Lock down मध्ये 2 महिने बहिणीने काही काळ जांभळाचा व्यवसाय सुरू केला होता त्याबद्दल मकबूल सरांनी फेसबुक वर वाचले आणि मला बोलवले). नंतर Wednesday कट्टा निम्मित गुडलक कॅफे, FC Road येथे भेटी होत असत.
काल त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मान्यवरांशी भेट झाली ज्यात डॉ. बाबा आढाव, डॉ कुमार सप्तर्षी ,अन्वर राजन, रत्नाकर महाजन ,प्रशांत कोठडीया , मुक्ता पुणतांबेकर, संग्राम खोपडे , सुरेश खोपडे , यशोदा वाकणकर , संदीप बर्वे , मनीषा पाटील, संतोष म्हस्के, विकास देशपांडे, चंद्रकांत शेडगे, माणिक जोगदंड, संतोष पवार, पराग गायकवाड, सुकेश पासलकर आणि अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
आपणही त्यांना फोन किंवा मेसेज करून सदिच्छा नक्की द्या.
त्यांचा संपर्क Makbul Tamboli - 7020509654
हा लेख लिहिण्याचा एक हेतू हाही आहे कि चांगल्या लोकांचे असे चरित्र पुढे न आल्याने लोकांच्या समोर चुकीचे दंगली घडवणारे लोक आदर्श म्हणून उभे केले जातात .
संकेत मुनोत
8668975178

2






Friday, August 25, 2023

बॅरिस्टर वीरचंद गांधी यांनि विश्वधर्म परिषदेत सांगितलेला अकबर बद्दलचा प्रेरणादायी प्रसंग

पोर्तुगिजांनी एकदा मुस्लिमांचे एक जहाज लुटले. जहाजावरच्या सर्वांना कैद केले. जहाजावर कुराणाच्याही प्रती होत्या त्या जप्त केल्या. किना-याला लागल्यावर पोर्तुगिजांनी कुराणाच्या प्रती कुत्र्यांच्या गळ्यात बांधून त्यांना पिटाळले. नंतर पोर्तुगीजांचे जहाज अकबर च्या सैन्याने पकडले. अकबरापर्यंत ही वार्ता गेली. त्याची आई संतापली. ती अकबराला म्हणाली. "तू बायबलची अशीच विटंबना कर!"
अकबर म्हणाला, "आई, कुराण श्रेष्ठच आहे. पण बायबलही त्याच्या जागेवर तेवढेच श्रेष्ठ आहे. बायबलची विटंबना करून मी त्या पोर्तुगिजांच्या अधम पातळीवर उतरू शकत नाही."
ही सम्राट अकबराबद्दल ची घटना *वीरचंद गांधीं* यांनी विश्व धर्म संसदेत सांगितली होती.
मागच्या वर्षी बॅरिस्टर वीरचंद गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने *इतिहास संशोधक संजय सोनवणी* सरांची मुलाखत घेतली त्यात त्यांनी सांगितलेली ही कथा आज पुन्हा आठवली.
(मुलाखतीची लिंक कमेंट मध्ये)
शिकागोला १८९३ साली ज्या धर्मपरिषदेत स्वामी विवेकानंद गेले होते त्याच धर्मपरिषदेत जैन धर्माचे तत्वज्ञान सांगायला जे अधिकृत रित्या उपस्थित होते, स्वामी विवेकानंदांच्या भाषणाप्रमाणेच ज्या गाजलेल्या भाषणामुळे अमेरिकेत अनेक व्यक्ती जैन धर्मात प्रविष्ट झाल्या, ज्यांचे अनेक भाषांवर प्रभुत्व होते, जे जागतीक धर्मांवर अधिकृतपने सातत्याने लिहित व भाषणे देत राहिले ते वीरचंद गांधी.
शिकागो परिषद आपल्याला स्वामी विवेकानंदांमुळेच माहित आहे. त्यांची जेवढी प्रसिद्धी भारतात केली गेली तेवढी वीरचंद गांधीं यांची केली गेली नाही. खेदाची गोष्ट म्हणजे बहुतेक जैन लोकांना ही ते माहीत नाहीत. वीरचंद गांधी यांच्या भाषणाने अमेरिकन तत्वज्ञांना प्रचंड प्रभावित केले होते हे आपल्याला माहित असले पाहिजे.
त्यांना अजून दोन वर्ष अमेरिकेतच थांबवून ठेवले गेले व त्यांच्या भाषणांवर केवळ लेख नव्हेत तर पुस्तकेही लिहिली गेली. त्यांची स्मारके ही अमेरिकन लोकांनी बांधली आहेत.
अमेरिकेतील त्यांच्या अन्यत्र झालेल्या व्याख्यानांमुळे अनेक अमेरिकन जैन धर्माच्या अभ्यासाकडे वळाले. भगवान महावीरांचा अहिंसावाद आजच्या जगाच्या शांततामय सौहार्दासाठी कसा उपयुक्त आहे हे त्यांनी अमेरिकेत दिलेल्या ५३५ व्याख्यानांतून सांगितले. त्यांचे चाहते हर्बर्ट वॉरेन यांनी जैन धर्म तर स्विकारलाच पण वीरचंद गांधींच्या भाषणांचे संकलन करून त्याचे पुस्तकही प्रकाशित केले.
वीरचंद गांधीं यांनी केवळ जैन धर्माची माहिती सांगितली नाही तर स्वामी विवेकानंद यांच्या भाषणावर आणि वैदिक धर्मावर जी टीका झाली ती खोडून काढली.
वीरचंदजींचे कार्य केवळ धर्म-तत्वज्ञानापुरते मर्यादित नव्हते. स्त्रीयांबद्दलचा त्यांचा दृष्टीकोण उदार होता. त्यांना आधुनिक शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी सोसायटी फॉर द एज्युकेशन ऑफ वुमेन इन इंडिया ही संस्थाही स्थापन केली आणि देशभर स्त्री-शिक्षणासाठी प्रयत्न केले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतही ते उतरले.
वीरचंद जसे स्वामी विवेकानंदचे मित्र होते, तसेच महात्मा गांधी यांनीही वीरचंद गांधींना ‘भावासारखे मित्र’ अशी उपमा दिली होती. अशा या भारतपुत्राचे 07 ऑगस्ट 1901 रोजी वयाच्या अवघ्या 37व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
आज देशात द्वेष प्रचंड वाढत आहे
दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश यांच्यासारख्या सामजिक कार्यकर्ता, पत्रकार, न्यायाधीश, विचारवंतांच्या हत्या करून "मेली काही कुत्री तर फरक काय पडतो"* असे अनेक समाजकंटक सामजिक माध्यमावर उघडपणे बोलत आहेत. महिलांवर अमानुष अत्याचार करणाऱ्या लोकांना सोडून देऊन मिठाई वाटली जात आहे*
कुठेही कोणी काही प्रश्न उपस्थित केला रे केला कि सरळ त्याला देशद्रोही ठरवत जा पाकिस्तान ला , जा अफगाणिस्तान ला, वगैरे म्हणत अन्न, वस्त्र, रोजगार, शिक्षण या मूळ गोष्टींकडे दुर्लक्ष केले जात आहे.
चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, बादशाह अकबर सारखे उत्तम प्रशासक याच देशात जन्मले का ? याची आज आठवण होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांकडे जेव्हा सामान्य रयत कोणाची अन्यायाबद्दल ची तक्रार घेऊन जात तेव्हा ते असे तर म्हणत नव्हते ना अरे त्या औरंगजेब किंवा इतर लोकांच्या राजांपेक्षा तर इथे बर आहे ना? नाही, ते किंवा वरील इतर राजे अस कधीच बोलत नव्हते ते वेळोवेळी शासन करत होते, रयतेच्या हिताची कामे करत होते.
सध्या जो धार्मिक, जातीय, वर्गीय द्वेष वाढतोय तो असाच वाढत राहिला तर देश राहणार नाही. त्यामुळे वीरचंद गांधी यांचे तत्वज्ञान अभ्यासण्याची आणि ते आचरणात आणण्याची आज खूप गरज आहे.
तर चला त्यांच्या जयंती निमित्त जगाकडे मैत्रीभावाने बघूया, द्वेष कमी करूया, प्रेम वाढवूया
संकेत मुनोत
२५ ऑगस्ट २०२१
चित्र- प्रतिकात्मक
Comment, Share ,Follow and Subscribe.


Tuesday, August 22, 2023

अजमेर , राजस्थान के राष्ट्रीय गांधीवादी स्नेहसंमेलन में संकेत मुनोत का वक्तव्य

फरवरी में अजमेर के 3 दिवसीय राष्ट्रीय गांधीवादी सम्मेलन का निमंत्रण संजय सिंह, सर, दिल्ली इन्होंने दोस्त श्रीनिवास के साथ भेजा था। देशभर से करीबन 150-200 गांधी विचार पे काम करने वाले लोग यहां आए हुए थे।
राजस्थान सरकारने गांधी विचार प्रचार प्रसार के लिए खास अहिंसा आणि शांती मंत्रालय शुरू किया है । गांधी विचार पहुंचाने के लिए बहुत अच्छे प्रोग्राम्स इसमें लिए जाते है. हर महीने में अलग- अलग जिल्हों में इस बारे मे विशेष प्रोग्राम्स लिए जाते है।
बाकी सभी राज्यों ने भी इसका अनुसरण करना चाहिए ये बहुत बढ़िया प्रोग्राम है।
जब अलग अलग लोगों ने अपने वक्तव्य रखे तब मैने भी वक्तव्य रखा , मुझे लगा नही था की लोगो को वो इतना पसंद आएगा पर कई लोगो ने मुझे मिलकर उस बारे में सराहा और नंबर लिया । तो उसके कुछ मुद्दे भी यहां रख रहा हु।
Link - https://youtu.be/daOxROKXCJY?si=iGIyYEi_-We5DUHC
1. निर्भय बनना- ज्यादा से ज्यादा क्या करेंगे वो? क्यों डरना?
2. नये तरीके अपना के गांधी विचार फैलाना जैसे की memes,short videos, reels..etc
3. सोशल मीडिया को whatsapp University, whatsapp University बोलके नाम रखने के बदले तुम इसमें से प्यार फैलाओ , वे नफरत फैला रहे है तो तुम्हे प्यार फैलाने से किसने रोका है
4. मैने ग्रुप छोड़ दिया मत बोलो उसमे भले कुछ लिखो मत पर रहो जब तुम वो छोड़ दोगे तो उन्हे तो झूठ फैलाने के लिए खुला आंगन मिल जाएगा
5. युवाओं के प्रश्न और चुनौतिया रोजगार -
आपके विरोधी लोग बाकी लोगो को भले बेरोजगार करे उनके मुख्य मुख्य लोगो को तो रोजगार देते है और वो भी अच्छा रोजगार देते है
वो नौकरी हो तो अच्छी जगह reference देते है और व्यवसाय हो तो उसको अपने लोगोसे clients देते है हम अगर ये करेंगे नही तो युवा इस में रहेगा कैसे,? मैं खुद जानता हु की मेरी नौकरी/ व्यवसाय manage करके मैं किस तरह इस में आ पा रहा हु , मन में बहुत निष्ठा है इसलिए आ पा रहा हु लेकिन और कितने साल आ पाऊंगा? और मेरे कितने युवा दोस्त इस वजह से आज movement में नही है।
6. युवाओं का और एक बड़ा प्रश्न शादी -
आज के जमाने में शादी के लिए like minded जीवनसाथी मिलना बहुत बड़ी चुनौती है।
महात्मा गांधी के पीछे कोई जाति या धर्म ना होने से बड़ी दिक्कत ये भी आती है की वो घर या कही बताए नही जाते और बहुत से लोगों की उम्र 40/50 cross हो जाती है तब कहा उन्हे महात्मा गांधी समझ आते है। मेरे अन्य दोस्तो को ये दिक्कत नही आती क्योंकि कोई सावरकर का अभ्यासक या प्रचारक होगा तो उसे उनकी जाति में से जीवनसाथी मिलने के लिए दिक्कत नही आएगी क्योंकि भले उसे उनके बारे में अभ्यास न हो पर आदर अवश्य होगा यही बात अन्य नेताओ के बारे में है। गांधी इसमें exception है तो इसके लिए हमे खुद से प्रयास करने होंगे हमे ऐसे like minded युवक युवतीयो के वधूवर परिचय संमेलन लेने चाहिए, उनका मैट्रिमोनी app बनाना चाहिए ।
7.आपको daily memes, videos , short articles चाहिए हो तो आप भी हमारे knowing Gandhi Memes, Knowing Gandhi Videos , Knowing Gandhi Small articles या अलग अलग ग्रुप से जुड़े
8. रचनात्मक कार्य करने के लिए आप हमारे Jaihind People's Movement से जुड़े और अपने अपने गांव में काम शुरू करे
9. गांधीजी बताते वक्त कभी बहुत गंभीर चेहरा ना रखे गांधीजी की तरह ही चेहरे पे सदैव मुस्कान (smile ) रखे
कार्यक्रम के उपरांत आदरणीय मंत्री सी पी जोशी जी इनके द्वारा मेरा सत्कार किया गया।
बहुत अच्छा अनुभव रहा । मैं पहली बार ही राजस्थान गया था।
देरी से लिखने के लिए माफी चाहता हु
19 अगस्त 2023
संकेत मुनोत
8668975178








Comment, Share ,Follow and Subscribe.