AddThis code

Thursday, July 27, 2023

सामाजिक सलोखा आणि संविधान हक्क या विषयावर अन्नपूर्णा परिवार च्या वार्षिक स्नेह मेळाव्यात 3000 उद्योजक महिलांशी संवाद साधण्याची संधी मिळाली

अन्नपूर्णा परिवार च्या वार्षिक स्नेह मेळाव्यात तेथील हजारो महिलांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. 

तिला संधी मिळाली तर ती त्या संधीचे सोने करते...हे यांच्याकडे बघून समजते. 
या माझ्या समोर बसलेल्या पुण्यातील वेगवेगळ्या slum वस्तीतील 3000 उद्योजक महिला आहेत ज्यांनी  उद्योग , व्यवसाय करून स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. कोणी भाजीची गाडी, रिक्षाचालक, फळांची गाडी असे व्यवसाय या महिला करत आहेत.

'सामाजिक सलोखा आणि संविधान हक्क या विषयावर मी त्यांच्याशी संवाद साधला. पूर्वी अन्नपूर्णा परिवार च्या एका कार्यक्रमात बोललो तेवढे चांगले बोलता आले नाही पण यानिमित्त त्यांचे अधिकार , गांधीजींचे स्त्री सबलीकरण तील योगदान आणि आज भूमिका घेण्याची गरज या विषयावर बोललो. 
माझ्या व्याख्यानापूर्वी एक ट्रॉफी आणि सन्मानपत्र असा प्रतीकात्मक पुरस्कार देऊन माझा गौरव करण्यात आला हे माझ्यासाठी अनपेक्षित होते. 
यावेळी मी सर्वांना पंचसुत्री ची शपथ ही दिली. 
यावेळी  मी तेथील महिलांना हेही सांगितले की काही समाजकंटक लोक तुमच्या मुलांना धर्माच्या नावाने भडकवतील दंगली करण्यासाठी , तोडफोड करण्यासाठी त्यांना फितवतील स्वतः च्या मुलाला परदेशात पाठवून तुमच्या मुलांना भडकवतील त्यापासून सावध रहा आणि मुलांना त्यांचे शिक्षण, करीअर, आरोग्य, घर या गोष्टींच्या कडे लक्ष द्यायला लावा. 

अन्नपूर्णा परिवार मला खूप प्रेरणादायी वाटतो. डॉ. मेधाताई पुरव सामंत  जवळपास 11 वर्षे बँकेत नोकरी करत होत्या तेव्हा त्यांच्या लक्षात आले की slum area तील गरीब लोकांना वीणा तारण कर्ज मिळत नाही आणि  बँकेतील किचकट प्रोसेस मुळे तेही तिकडे येत नाहीत आणि सावकार पिळवणूक करतो. त्यांनी 11 वर्षे करत असलेली नोकरी सोडली आणि पुण्यात 8/10 च्या छोट्याश्या ऑफिस मध्ये अन्नपूर्णा परिवार सुरू केला ज्यात सुरुवातीला झोपडपट्टीतील 9 महिलांना 1000 प्रत्येकी असे 9 हजार कर्ज दिले आणि 25 रु रोज प्रमाणे 50 दिवसात परत घेतले यातून सुरुवात झालेला हा अन्नपूर्णा परिवार आज 200 कोटीचा टर्न ओव्हर करणारा परिवार बनला आहे.
 चौकटी बाहेर जाऊन काम करणारी माणसे लोकांना वेडी वाटतात त्यांचे भविष्य सुरक्षित वाटत नाही पण याच वेड्या माणसांनी आत्तापर्यंत  इतिहास घडवला आहे हे पण आपण लक्षात घ्यायला हवे. 
अन्नपूर्णा परिवार चे विश्वस्त कॉ. सुरेश धोपेश्र्वरकर, वृषाली मगदूम, चित्रा खिंवसरा, अंजली पाटील , सुभाष वारे आणि विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. तम्मना इनामदार यांचे मुस्लिम समाजातील समज गैरसमज दूर करणारे मुसलमान हे पुस्तक ही यावेळी प्रकाशित झाले. 

(28 जानेवारी 2023 रोजी हा कार्यक्रम झाला पण इतर गडबडीत याबद्दल लिहणे राहून गेले होते आज लिहून काढले. )
संकेत मुनोत 
8668975178

Comment, Share ,Follow and Subscribe.





















Sunday, July 23, 2023

दरवर्षी प्रमाणे या वर्षीही एक दिवस तरी वारी अनुभवावी उपक्रमात सहभाग

दरवर्षी प्रमाणे या वर्षीही एक दिवस तरी वारी अनुभवावी यात सहभागी झालो. हा एक सुंदर अनुभव होता. कुठलेही शस्त्र हातात नसलेली विठ्ठल रखुमाई ची मूर्ती ही अहिंसा आणि प्रेमाचे प्रतीक आहेत तर सगळे वारकरी हे त्या अहिंसेचे पुजारी.
मला वारीत सगळ्यात जास्त गोष्ट कुठली आवडते ती म्हणजे समता. कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही. आम्ही ह. भ. प. श्यामसुंदर सोन्नार महाराजांच्या पाया पडलो तर तेही माऊली म्हणत आमच्या पायी पडले.
सध्या देशात ठिकठिकाणी जाती धर्मात द्वेष वाढवून दंगली घडवल्या जात आहेत. रोजगार, शिक्षण, आरोग्य, अर्थव्यवस्था हे मूळ प्रश्न बाजूला ठेवून नेत्यांच्या अंधभक्तित गुंग करून ठेवले जात आहे त्यावेळी वारी ही प्रेम आणि संवाद वाढवणारी वाटते.
पूर्वीच्या काळी वैदिक ब्राम्हण च सगळ्या गोष्टी सांगत आणि आपल्याला ते असत्य पण सत्य मानावे लागे आणि ते म्हणावे ते कर्मकांड करावे लागे. संतांनी हा मध्यस्थ नाकारत तुम्ही कुठल्याही जाती धर्मात जन्माला आलेले असाल तरी ईश्वराच्या नामस्मरणाने पुण्यप्राप्ती करू शकता अशी मांडणी केली. पण आज अश्या ठिकाणी पण हे चुकीचे लोक घुसत आहेत त्यांच्या पासून सावध राहायला हवे.
पंढरपूरला निघालेल्या आषाढी वारीमध्ये 'एक दिवस तरी वारी अनुभवावी' या उपक्रमातंर्गत प्रागतिक विचारकार्य करणाऱ्या संस्था संघटनांचे कार्यकर्ते वारकरी रविवारी सहभागी झाले होते. जवळपास पावणे दोनशे वारकरी कार्यकर्ते यात आले होते. गवळ्याची उंडवडी ते बऱ्हाणपूर या मार्गावर 10 किलोमीटर असे आम्ही चाललो. पुणे, मुंबई, सातारा, लातूर, नाशिक, ठाणे, रायगड आदी ठिकाणावरून या वारीत अधिक कार्यकर्ते वारकरी सहभागी होते.
सकाळी 6 वाजता पुण्यातून गवळ्याची उंडवडीला जाण्यासाठी पुण्यातून निघालो. 4 बसची व्यवस्था होती. रस्त्यात थांबून नास्ता, चहा घेतला. उंडवडीला नऊ वाजता पोचलो आणि चालायला सुरुवात केली.
बऱ्हाणपूर येथे मस्त बेसन, भाकरी, चटणी, बुंदी, भाताचे जेवण केले. त्यानंतर गाणी झाली. विशेष सत्कार झाले. पुस्तक प्रकाशन झाले. प्रमुखांची भाषणे झाली. आणि साडेचार वाजता पुण्याला जायला निघालो. साडेसात वाजता पुण्यात पोचलो.
या उपक्रमाचे संयोजन हभप श्यामसुंदर महाराज सोन्नर, हभप ज्ञानेश्वर महाराज बंडगर, शरद कदम, अविनाश पाटील, वर्षा देशपांडे, नागेश जाधव, नितीन वाळके, सरस्वती शिंदे, राजाभाऊ अवसक, संदीप आखाडे, सुनील स्वामी, दत्ता पाकिरे, अनुराधा नारकर, विशाल विमल, साधना शिंदे, सुभाष वारे यांनी केले होते.








डॉ. Shripal Sabnis यांचा सन्मान करण्याची संधी मिळाली

अरिहंत जागृती मंच च्या 2023 च्या निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याचे मुख्य वक्ते डॉ. Shripal Sabnis यांचा सन्मान करण्याची संधी मला मिळाली. अनेक वर्षापासून सरांच्या बद्दल ऐकत होतो एकदा मेसेज वर भेटण्या संदर्भात बोलणे पण झाले होते पण प्रत्यक्ष भेट राहून गेली होती ती आज झाली आणि जेवतांना छान गप्पा पण झाल्या.
सामाजिक कार्यातून हळूहळू ब्रेक घेण्याबद्दल मागे लिहले होते पण मग नुसते बसून करणार काय आपली energy कुठे तरी utilize करायला हवी ना? सामजिक नाही तर धार्मिक कार्यात सहभाग घेतला. जैन धर्माचे भारतीय संस्कृतीत योगदान या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती ज्यात मुख्य भाषण श्रीपाल सबनीस यांचे झाले जे अप्रतिम होते. कुठल्याही विषयावर सरांचा अभ्यास आणि मांडणी ऐकणे हा अप्रतिम अनुभव असतो. आत्तापर्यंत 391 पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना दिली आहे.
संकेत मुनोत




Comment, Share ,Follow and Subscribe.

सदाशिव पेठेत हल्लेखोरापासून मुलीला वाचवणाऱ्या योद्धा #लेशपाल शी भेट

सदाशिव पेठेत हल्लेखोरापासून मुलीला वाचवणाऱ्या योद्धा #लेशपाल याच्याशी आज भेट आणि गप्पा झाल्या. एका खऱ्या धैर्यशील योद्ध्या ला 'एक धैर्यशील योद्धा - गांधी' पुस्तक भेट दिल्याचे समाधान मिळाले.
सदाशिव पेठ मध्ये जेव्हा प्रेमात #नकार मिळालेला युवक कोयता घेऊन युवतीच्या मागे पळत होता तेव्हा ती जिवाच्या आकांताने इकडे तिकडे पळत होती तेव्हा आसपास चे बहुतेक जण बघ्याची भूमिका घेत दुर्लक्ष करत होते तर काही जण तिने वाचण्यासाठी दुकानात घुसू नये म्हणून आपल्या दुकानाची शटर लावून घेत होते .पण लेशपाल आला आणि त्याने त्याच्या हातातून कोयता ओढून घेत तिचा जीव वाचवला. त्यात त्याच्या हाताला कोयता ही लागला पण त्याने निर्भयतेने हे काम केले. संवेदनशीलतेशिवाय हे शक्य नाही.
त्याचे सगळीकडे कौतुक होत आहे. "मी त्या ताईवर उपकार नाहीत केले, मी माझं कर्तव्य पार पाडलं. आता सगळे सत्काराला बोलवत आहेत, पण ती घटना घडली, तेव्हा रुमवर गेल्यावर मी एक-दीड तास रडत होतो. थोडा उशीर झाला असता तर तिचा मृत्यू कसा झाला, हे मला लोकांना सांगावं लागलं असतं. मी फक्त माझं कर्तव्य बजावलं. हात जोडतो, पण मला सत्काराला बोलावू नका", अशी प्रतिक्रिया लेशपाल याने काही दिवसांच्या पूर्वी न्यूज चॅनेल वर दिली होती.
महात्मा गांधी बद्दल प्रश्न विचारला असता त्यांचे विचार आणि जीवन प्रेरणादायी वाटत असल्याचे त्याने सांगितले. सध्या तू फक्त राज्याचाच नव्हे तर देशाचा हिरो बनला आहेस. पण सध्या देश वेगळ्याच संकटातून जात आहे. जात धर्म वर्ग लिंग यातील तेढ आणि त्यातून द्वेष, हिंसा आणि दंगली प्रचंड वाढल्या आहेत. Proud to be Hindu, proud to be jain, proud to be Muslim ,....etc म्हणत आमचाच धर्म सर्वश्रेष्ठ आणि इतर कनिष्ठ म्हणणाऱ्या कट्टर लोकांची संख्या वाढत आहे proud to be human म्हणण्याची आज गरज आहे.
त्यामुळे द्वेष आणि हिंसा कमी करण्यासाठी गांधीविचार कसे महत्वाचे आहेत याबद्दलही तू मांडणी करावी अशी विनंती यानिमित्ताने मी त्याला केली अणि त्याने ती मान्यही केली.
महात्मा गांधींनी म्हटले आहे की "तुमच्या समोर कुठल्या स्त्रीवर अन्याय होत असेल तर शांत बसू नका अहिंसेने प्रतिकार करा , अहिंसा झेपत नसेल तर हिंसेचा अवलंब करा पण भीतीने घरात बसू नका" हे पुस्तकातील वाक्य त्याला दाखवले.
Jaihind People's Movement - जयहिंद लोकचळवळ आणि knowing Gandhi चळवळीची ही यानिमित्ताने माहिती दिली .

महा अनिस तर्फे प्रेम आणि हिंसा या विषयावर चर्चासत्र ठेवले होते ज्यात विविध मान्यवरांनी अभ्यासपूर्ण भाषणे केली. त्यात लेशपाल ने ही आपली मनोगत व्यक्त केले.

संकेत मुनोत 

Comment, Share ,Follow and Subscribe.

प्रेम आणि हिंसा या महाअनिस ने आयोजित उपक्रमात मी मांडलेले विचार

प्रेम आणि हिंसा याबद्दल सुंदर उपक्रम महाअनिस ने आयोजित केला होता
ऍड. रमा सरोदे, डॉ अनिल डोंगरे, आरती नाईक, लेशपाल जवळगे, माधव बावगे, संजय बनसोडे, सुनील रेडेकर यांनी यात अभ्यासपूर्ण आणि सुंदर मांडणी केली.
यात उपस्थित युवांना ही बोलण्यास सांगितले तेव्हा मी खालील मुद्दे मांडले
आपल्या समाजात तीव्र प्रतिक्रिया देण्याची प्रथा आहे. दर्शना पवार चा खून झाल्यानंतर त्या खुन्याला "जाळून टाका, तुकडे करा, चौकात फाशी द्या" वगैरे प्रतिक्रिया काही लोक देत होते. आता खून करताना स्वतः ला शिक्षा होणार हे त्या युवकाला माहित नसेल का? माहीतच होते पण मनात होता तो राग आणि रागातून झालेली जीव घेण्याची किंवा देण्याची तीव्र हिंसक इच्छा. त्याला त्याबद्दल कडक शिक्षा व्हावीच त्याबद्दल दुमत नाही. पण फक्त कडक शिक्षेने हे प्रकार थांबणार नाहीत. मूळ कारणांवर काम करायला हवे. ते मुळ कारण म्हणजे तीव्र राग आणि त्यातून हिंसा...
राग कसा व्यक्त करायचा? हे शिकायला हवे. टोकाचा राग आल्यावर तो व्यक्त करताना अनेक जण हिंसेवर उतरतात त्यात एकतर समोरच्याचा जीव घेतात किंवा स्वतः चा जीव देतात.
पण त्या रागावर तात्पुरता ताबा कसा मिळवता येईल, दुसरीकडे कसे लक्ष केंद्रित करता येईल? याकडे लक्ष द्यायला हवे. शाळा ,कॉलेज आणि इतर ठिकाणी बालपणापासून याबद्दल प्रशिक्षण द्यायला हवे.
गांधींना आफ्रिकेत स्वतः जवळ first-class चे तिकीट असताना आणि ते एवढे मोठे बॅरिस्टर असताना ट्रेन मधून बाहेर फेकले गेले तेवढ्यावरच न थांबता ते आपल्या कामाच्या ठिकाणी जात असताना त्यांना टांगे वाल्याने शिव्या देत चाबकाने खूप मारले, एकदा तर गोऱ्या लोकांनी एवढे मारले की ते मृत्यूच्या दारात जाऊन ते परत आले. असे अनेक जीवघेणे हल्ले गांधीजींवर तेथे वर्णभेदातून झाले. अश्या वेळी ते तडकाफडकी तेथील लोकांना एकत्र करून ते जाळपोळ करू शकले असते, ज्यांनी त्यांच्या सोबत हे केले त्या व्यक्तींचा खून करू शकले असते किंवा अपमान झाला म्हणून एखादी मोठी चिठ्ठी लिहून स्वतः आत्महत्या करू शकले असते पण असली कुठलीही हिंसक कृती न करता त्यांनी स्वतः च्या रागावर ताबा मिळवून मुळ कारणांचा शोध घेतला आणि अहिंसक लोकचळवळ उभारून वर्णभेदावर मात केली. ज्यातून नंतरही मंडेला, मार्टिन ल्युथर किंग आणि वेगवेगळ्या लोकांनी प्रेरणा घेऊन मोठे काम केले आणि आजही अनेक जण करत आहेत.
तर अहिंसक , विवेकशील समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहूया. आपापसात प्रेम आणि संवाद वाढवूया ❤️❤️
संकेत मुनोत
8668975178

Comment, Share ,Follow and Subscribe.

महाराष्ट्र राज्य गांधी फोरम च्या वतीने पत्रमहर्षी स्व. रंगा अण्णा जोशी ( संचारकार) यांच्या स्मरणार्थ मला पुरस्कार

पुरस्काराबद्दल खूप खूप धन्यवाद
देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमारजी शिंदे ,जेष्ठ नेते मा. उल्हासदादा पवार आणि अनेक मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाला..
खालील 4 मान्यवरांसोबत पुरस्कार स्वीकारायला मिळणे ही सुद्धा माझ्यासाठी मोठ्या भाग्याची गोष्ट होती.
1.गेली अनेक दशके नर्मदा बचाओ, नयी तालीम चे कार्य करणारे डॉ. Sugan K Baranth
2.मा. प्रा. एम. एन. नवले (सोलापूर) - सिंहगड इन्स्टिट्यूट सारख्या मोठ्या संस्थेचे संस्थापक ७० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान बनले आहेत.
3.प्रा. डॉ. उमाकांत चनशेट्टी - भाभा अनुसंधान केंद्र, मुंबई येथे शास्त्रज्ञ म्हणून काम पाहिले. बोरामणी येथे म. गांधीजींच्या 'नई तालीम' संकल्पनेनुसार ग्लोबल व्हिलेज पब्लीक स्कूल व कॉलेजची स्थापना.
4.मा. सम्राट फडणीस- गेल्या ३ दशकापासून प्रसार माध्यमात असून सध्या ते सकाळ मिडीया ग्रुपमध्ये संपादक पदाची जबाबदारी पहात आहेत.
5. संकेत मुनोत - एक साधा मनुष्य
महाराष्ट्र राज्य गांधी फोरम च्या वतीने पत्रमहर्षी स्व. रंगा अण्णा जोशी ( संचारकार) यांच्या स्मरणार्थ देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमारजी शिंदे ,जेष्ठ नेते मा. उल्हासदादा पवार ,आमदार मा. प्रणितीताई शिंदे, माजी प्राचार्य, विचारवंत, माझे मार्गदर्शक मा. Naresh Badnore , महाराष्ट्र गांधी फोरम चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. पुरुषोत्तम बलदावा, राज्य अध्यक्ष मा. उपेंद्र ठकार यांच्या प्रमुख उपस्थितीत 13 जुलै 2023 रोजी फडकुले सभागृह, सोलापूर येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते .
आपला आशीर्वाद आणि साथ अशीच नेहमी सोबत राहू द्यावी..😊
गांधी विचारांच्या द्वारे समाजात #प्रेम आणि बंधूभाव पसरवत राहूया...❤️❤️



































सोलापूर

सोलापूर छान शहर आहे. 5-10 मिनिटात एका ठिकाण हुन दुसरी कडे जाता येते. पुण्यात त्यालाच 10 मिनिटे ते 2 तास लागतात.
इथे धार्मिक स्थळे भरपूर आहेत. रिक्षा वाल्याला सांगताना बऱ्याचदा तश्याच खुना सांगाव्या लागतात. उदा एक मावशी राहते मल्लिकार्जुन मंदिराजवळ , एक मावस बहीण राहते रूपा भवानी मंदिर जवळ , पुरस्कार सोहळा जिथे होता तो निर्मलकुमार फडकुले हॉल होता सिद्धेश्वर मंदिराच्या जवळ, उतरण्याची जिथे व्यवस्था होती ते डाक घर म्हणजे Guest House सात रस्त्यावर होते. जिथून सात रस्ते फुटतात.
इथे म्हणे 2 च ऋतू असतात उन्हाळा आणि कडक उन्हाळा..त्यामुळे सोलापूरकर पुण्याला घरी आले की त्यांच्या सवयीप्रमाणे 4-5 वर फॅन लावतात आणि आम्हाला थंडी वाजते...
इथे मिरवणुका पण खूप असतात म्हणजे वर्षातील 365 पैकी 282 दिवस कुठली ना कुठली जयंती वा पुण्यतिथी त्यामुळे त्याच्या भव्य मिरवणुकीमुळे काही रस्ते बंद असतात.
सोलापूर मध्ये लोक पटकन आक्रमक होतात आणि "काय बे, तुला ...." असे एक जण दुसऱ्याला म्हणत असल्याचा अनेक ठिकाणी अनुभव आला..
पूनम भोज येथे थाळी छान होती पण service च लवकर देत नव्हते. मी याबद्दल नरेश बदनोरे काकांना बोललो तर ते म्हणाले की इथे पुण्यासारखे नाही , "थांबता येत नाही का?" असे म्हणतील ते.
पार्क जवळ भेळ खाल्ली पण एवढी खास नाही वाटली.
इथली शेंगदाणा पोळी , खवा पोळी मला खूप आवडली. मी तर मावशीला तेच म्हटले की मला जेवण नको पण शेंगदाणा पोळी च गरम करून दे.
इकडे चांगली वैचारिक बैठक असलेले बुध्दी प्रामाण्यवादी असे विद्वान जैन धर्मीयही भेटले. पुण्यात असे वैचारिक बैठक पक्की असलेले कोणी दिसत नाही जैन धर्मियांत.
पुरस्कार सोहळ्यात आणि अन्य एका ठिकाणी माझा मोठा हार देऊन सत्कार झाला. मला कसे तरी वाटले की हा एवढा मोठा हार आणि एवढी फुले हे सगळे एका दिवसातच वाया जाणार. पण सोलापूर चे मासाजी ( मावशी चे मिस्टर) म्हटले की "मोठा हार देणे ही तुमच्या बद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे सोलापूरमध्ये , तुमचा मान असतो तो जेवढा मोठा हार तेवढा जास्त सन्मान". मग मी पुढे मिळणाऱ्या हारांचा हसत स्वीकार केला.
फोटो सिद्धेश्र्वर मंदिरातील...

Comment, Share ,Follow and Subscribe.

शिवाजी हायस्कूल, सोलापूर येथे दि 14 जुलै २०२३ रोजी व्याख्यान

शिवाजी हायस्कूल, सोलापूर येथे दि 14 जुलै शुक्रवार रोजी दुपारी 1 ते 3 अनिस सोलापूर शहर शाखा आयोजित *महात्मा गांधी जागतिक प्रभाव: समज गैरसमज* या विषयावर मालेगावचे ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत *डॉ सुगनचंद बरंठ* आणि पुणे येथील गांधीवादी विचारवंत *संकेत मुनोत* यांचे व्याख्यान झाले.
यात त्यांनी साध्या सोप्या भाषेत गांधी विचार सांगून मुलांना खादीचे महत्वही सांगितले. व्याख्यनानंतर संकेत मुनोत यांनी गांधींबद्दल काही प्रश्न विचारून उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना गांधींचे पुस्तक पारितोषिक म्हणून दिले. डॉ अस्मिता बालगावकर यांनी "आम्ही प्रकाशबीजे, रुजवित चाललो" या गीताने कार्यक्रमाची सुरूवात करून अंधश्रद्धा निर्मुलन समितीची मुलांना ओळख करून दिली. सोलापुरातील जेष्ठ गांधीवादी नरेश बद्नोरे सर हि सदर कार्यक्रमास उपस्थित होते.
DrAsmita Balgaonkar







Comment, Share ,Follow and Subscribe.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेच्या साप्ताहिक बैठकीत मालेगावचे ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ सुगनचंद बरंठ व तरूण गांधीवादी विचारवंत संकेत मुनोत

एक धैर्यशील योद्धा: महात्मा गांधी*
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेची साप्ताहिक बैठक निर्मलकुमार फडकुले सभागृह प्रांगणात 13.7.23 रोजी संपन्न झाली. सदर बैठकीत मालेगावचे ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ सुगनचंद बरंठ व तरूण गांधीवादी विचारवंत संकेत मुनोत यांची प्रमुख उपस्थिती होती.
*डॉ सुगनचंद बरंठ* यांनी सद्य परिस्थितीत गांधीजीच्या विचारधनाची आवश्यकता, खादीचे सद्य स्थितीतही असणारे महत्त्व इ गोष्टींवर मौलिक मार्गदर्शन केले. त्यांनी डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या सोबत कार्य करतानाचे अनेक अनुभवही सांगीतले.
*संकेत मुनोत* यांनी गांधींनी धर्म, राजकारण, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, शेती, महिला हकक इ. अनेक आयामांवर मूलभूत चिंतन आणि कार्य कसे केले होते या बाबत सविस्तर माहिती दिली.
मान्यवरांचे स्वागत जेष्ठ साथी रवींद्र मोकाशी, डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, श्री व्ही डी गायकवाड यांनी पुष्प आणि अनिसचे पुस्तक देवून केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अस्मिता बालगावकर यांनी केले. सदर बैठकीस ज्येष्ठ कार्यकर्त्या उषा शहा, मधुरा सलवारू, उषा धडके, संजीवनी देशपांडे, कुंडलिक मोरे, आर डी गायकवाड, डॉ निलेश गुरव, धनाजी राउत, विजय जाधव, मकरंद माने, गोरख गडसिंग, यशवंत फडतरे, नितीन जावळे, रजनीकांत इंगळे उपस्थित होते. नूतन अध्यक्ष प्रा शंकर खलसोडे यांनीही मनोगतात गांधी विचारांचे महत्त्व सांगीतले. शेवटी सचिव ब्रम्हानंद धडके यांनी मान्यवर व उपस्थितांचे आभार मानले. अशा प्रकारे बैठक उत्तम प्रकारे पार पडली.
DrAsmita Balgaonkar







Comment, Share ,Follow and Subscribe.

चंद्रकांतजी लोढा भेट

2 वर्षापूर्वी मी आणि माझे मित्र यांनी एक मोहीम सुरू केली होती. की एक एक परिसर पकडायचा आणि त्या परिसरात चातुर्मास करणाऱ्या धर्मगुरूंचे दर्शन घ्यायचे. त्यांच्या कडून त्यांच्या बद्दल , धर्मा बद्दल जाणून घ्यायचे आणि सध्याची देशाची परिस्थिती, गांधी विचार ई. बद्दल ही चर्चा करत त्यांची मते जाणून घ्यायची. आपला गांधी विरोधक ते गांधी प्रेमी बद्दल चा प्रवास त्यांना सांगायचा. बहुतेक ठिकाणी खूप विष पसरलेले होते त्यामुळे संवादाची संधीही मिळाली. पण काही ठिकाणी अभ्यासू साधू साध्वी सुद्धा भेटले.
तर यात साधू साध्वी भेटले तसे श्रावक श्राविका पण भेटले त्यात येरवडा येथील जैन स्थानक जवळ चंद्रकांतजी लोढा यांची भेट झाली. आम्ही जवळपास च विश्रांतवाडी आणि अन्य परिसरातील धर्मगुरूंना भेटून आलो तोपर्यंत सूर्यास्त झाला आणि येरवडा येथील तेव्हा चातुर्मास करत असलेल्या साधुंना भेटता आले नाही. पण तेथील स्थानक चे अध्यक्ष चंद्रकांतजी लोढा यांची भेट झाली. ते उद्योजक असून त्यांचा चांगला व्यवसाय आहेच पण सोबत वैचारिक बैठक सुद्धा आहे हे पाहून आनंद वाटला. ही भेट 03 नोव्हेंबर 2021 मध्ये झाली पण त्यापूर्वी डिसेंबर 2019 मध्ये माझ्या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्ती चे जे प्रकाशन आचार्य शिवमुनीजी महाराज साब यांच्या हस्ते झाले त्यातही ते उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले. नंतर ही वेगवेगळ्या कार्यक्रमात गाठी भेटी होत राहिल्या. आज गुगल फोटोज् मध्ये हा फोटो सापडला म्हटल पोस्ट करू...


Comment, Share ,Follow and Subscribe.