जग किती वाईट आहे किंवा लोक किती वाईट आहेत हे म्हणण्यापेक्षा मी किती चांगला आहे हे आपल्या आचरणातून दाखवून द्या
5-10 % स्वार्थी लोक जगात असतात आणि राहणारच पण त्यामुळे 90% लोक जे चांगले आहेत त्यांनाही वाईट म्हणून तुम्ही स्वतःचे आणि जगाचे नुकसान करून घेता
म्हणजे माझ्या आत्तापर्यतच्या आयुष्यवरून आणि भेटलेल्या लोकांवरून तरी माझे हेच मत बनले आहे
त्यामुळे सरळ झाडे आधी कापली जातात किंवा अतिप्रामाणिक माणसांचा आधी बळी जातो वगैरे सुविचार(कुविचार) मला साफ चुकीचे वाटतात
कबिरांचे शब्द आठवतात
बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय, जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय।
सो जग असे आहे तसे आहे म्हणण्यापेक्षा स्वतःपासून बदलाला सुरवात करा
संकेत मुनोत
Creative Ideas, Myths and Facts, Experiences, interviews of Great People
AddThis code
Thursday, August 30, 2018
जग किती वाईट आहे किंवा लोक किती वाईट आहेत हे म्हणण्यापेक्षा मी किती चांगला आहे हे आपल्या आचरणातून दाखवून द्या

अटलजींना पत्र
आदरणीय अटलजी,
सादर प्रणाम, तुम्ही अश्या वेळी गेलात जेव्हा तुमची सर्वाधिक गरज आहे. तुमच्या सारखा कवी,वक्ता ,एक जननायक, पत्रकार, विरोधकांचा ही सन्मान करणारा संवेदनशील आणि मुत्सद्दी राजकारणी, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असणारा सच्चा माणूस आज हवा आहे.
आज बहुतेक जण देश टिकवण्याऐवजी द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत , तो जाती-जातीतील असो वा धर्मा -धर्मातील असो वा गायीवरुन असो , कुणी काय खावे यावरून लोकांना मारण्याचा असो वा कुणाला देशद्रोही ठरवून पाकिस्तानात जा म्हणण्याचा असो. तुम्ही एवढ्यांदा पंतप्रधान असताना असे कधीच का घडले नाही बरे ?
अश्यावेळी तुम्ही लोकसभेत सादर केलेल्या या कवितेची सर्वाधिक आठवण येते
सरकारें आएंगी, सरकारें जाएंगी, पार्टियां बनेंगी, बिगड़ेंगी, लेकिन देश का लोकतंत्र जिंदा रहना चाहिए। भारत का लोकतंत्र अमर रहना चाहिए
आज जेव्हा काही जण स्वतःच्या कर्तृत्वहीनतेचे श्रेय दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत जसे कि सत्ताधारी म्हणतात 60 वर्ष हे हे झालं नाही . मग आम्ही काय करणार आम्हला अजून थोडा वेळ द्या वगैरे, या उलट तुम्ही म्हणाला होतात कि..
" पिछले साठ सालोंमें हमारे देशने बहुत तरक्की की है! पिछली सरकारोंने कुछ काम नही किया ऐसा कहना इस देश के पुरूषार्थ पर प्रश्नचिन्ह लगाना है!"
मला आठवतय नेहरू हयात असतांना तुम्ही त्यांच्या भारत चीन धोरणावर प्रचंड टीका केली पण त्यांचे निधन झाल्यावर तुमच्याएवढं नेहरूंचे चांगलं वर्णन दुसऱ्या कुणीही केलं नसेल आणि तुमची सत्ता आल्यावर जेव्हा नेहरूंचा फोटो काढून टाकण्याचे कृत्य कुणी तरी केले तेव्हा तुम्ही तो फोटो पुन्हा तेथे लावण्यास सांगितला . संघाच्या मुशीतून आले असले तरी आपण संघाच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याला कधी राजकारणातले मुख्य स्थान दिले नाही पक्ष स्थापन करतानाही त्यात 'गांधीवादी समाजवाद' हे आमचे मुख्य तत्व असल्याचे सांगून राजकारणात नेहरूंचे तत्त्व अंगिकारले आणि नेहरुंनी ही तुम्हाला ते हयात असतानाच ओळखले असावे म्हणूनच तुम्ही विरोधक असतांना ही तुमची ओळख भावी पंतप्रधान म्हणून करून दिलीच शिवाय निवडणुकीची सभा तुमच्या मतदारसंघात घेण्याऐवजी शेजारच्या मतदारसंघात घेऊन ''जनसंघात ही काही चांगले लोक आहेत आणि ते निवडून आले पाहिजेत'' असे सांगून तुमचे वेळोवळी कौतूकही केले
तुमची ही खालील श्रद्धांजली जेवढी नेहरूंवर लागू होते तेवढीच आपल्यावर ही
अध्यक्ष महोदय,
एक सपना था जो अधूरा रह गया, एक गीत था जो गूँगा हो गया, एक लौ थी जो अनन्त में विलीन हो गई। सपना था एक ऐसे संसार का जो भय और भूख से रहित होगा, गीत था एक ऐसे महाकाव्य का जिसमें गीता की गूँज और गुलाब की गंध थी। लौ थी एक ऐसे दीपक की जो रात भर जलता रहा, हर अँधेरे से लड़ता रहा और हमें रास्ता दिखाकर, एक प्रभात में निर्वाण को प्राप्त हो गया।
मृत्यु ध्रुव है, शरीर नश्वर है। कल कंचन की जिस काया को हम चंदन की चिता पर चढ़ा कर आए, उसका नाश निश्चित था। लेकिन क्या यह ज़रूरी था कि मौत इतनी चोरी छिपे आती? जब संगी-साथी सोए पड़े थे, जब पहरेदार बेखबर थे, हमारे जीवन की एक अमूल्य निधि लुट गई। भारत माता आज शोकमग्ना है – उसका सबसे लाड़ला राजकुमार खो गया। मानवता आज खिन्नमना है – उसका पुजारी सो गया। शांति आज अशांत है – उसका रक्षक चला गया। दलितों का सहारा छूट गया। जन जन की आँख का तारा टूट गया। यवनिका पात हो गया। विश्व के रंगमंच का प्रमुख अभिनेता अपना अंतिम अभिनय दिखाकर अन्तर्ध्यान हो गया।
आज जेव्हा लोकशाही आणि स्वातंत्र्य धोक्यात आहे तेव्हा तुमचे 'सत्ता' कवितेतील हे शब्द आठवतात
मासूम बच्चो
बूढी औरतो
जवान मर्द
की लाशों के ढेर पर चढ़ कर
जो सत्ता के सिंहासन तक पहुंचना चाहते है.
उनसे मेरा एक सवाल है
क्या मरने वालो के साथ
उनका कोई रिश्ता न था ?
न सही धर्म का नाता
क्या धरती का भी सम्बन्ध नहीं था ?
आगमे जले बच्चे
वासना की शिकार औरते
राख में बदले घर
न सभ्यता का प्रमाणपत्र है ,
न देश भक्ति का तमगा
वे यदि घोषणा पत्र है तो पशुता का
प्रमाण है ,पतित अवस्था का
ऐसे कपूतो से
मॉ का निपूती रहना ही अच्छा था
निर्दोष रक्त से सनी राजगद्दी
श्मशान की धुल से भी गिरी है
सत्ता की अनियंत्रित भूख
रक्त पिपासा से भी बुरी है
पाँच हजार साल की संस्कृति
गर्व करे या रोये ?
स्वार्थ की दौड़ में
कही आजादी फिर से न खोये। ………
कही आजादी फिर से न खोये। ………
तुमचे कथित वारसदार याच्या अगदी विरूद्ध वागत आहेत!! त्यांना ही तुमचे खरे विचार समजो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
आणि जीवनात आपली ही कविता अंगिकारत आहे
हार नहीं मानूंगा, रार नई ठानूंगा,
काल के कपाल पे लिखता मिटाता हूं,
गीत नया गाता हूं.
जय जवान, जय किसान, जय विज्ञान
आपलाच
संकेत मुनोत
#अटलबिहारी_वाजपेयी

बकरी ईद निमित्त रक्तदान
आज पहिल्यांदा रक्तदान केले.
बकरी ईद निमित्त सामान्यतः बकऱ्यांची कुर्बानी दिली जाते. बांधवांनी या प्रथेमध्ये बदल करत बकरी ईद निमित्त रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
मुस्लिम सत्यशोधक मंडळ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नोइंग गांधीजम ग्लोबल फ्रेंड्स आणि राष्ट्र सेवा दल यांच्या वतीने आज नाथ पै हॉल , साने गुरुजी स्मारक, पुणे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ५० बाटल्या रक्त संकलित झाले.
धर्माने सांगितलेल्या मानवी मूल्यांमध्ये *“त्याग”* हे महत्वाचे मूल्य आहे. ईस्लाम धर्मात ही उच्च ध्येय सिध्द करण्यासाठी *“कुर्बानी”* किंवा सर्वस्वाचा त्याग करण्याची शिकवण आहे. या त्याग आणि बलिदानाचे प्रतीक म्हणून *'ईद-उल-अजहा' (बकरी ईद)* चा सण इस्लाम धर्मियांमध्ये साजरा केला जातो. या निमित्ताने बकरे अथवा इतर प्राण्यांची कुर्बानी देण्याची प्रथाही पाळली जाते.
आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता, सर्व धर्मियांनी धार्मिक सण हे अधिका अधिक समाजाभिमुख व मानवतावादी करणे हे धर्माचेच उन्नयन आहे. हाच विचार समोर ठेवून “बकरी ईद” निमित्त पशूची कुर्बानी देण्याच्या प्रथेमध्ये कालानुरूप बदल व्हावा व या प्रथेला पर्याय म्हणून *दि.२२ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट २०१८* *“राज्यव्यापी रक्तदान सप्ताह”* अभियान राबविले आहे.
‘बकरी ईद निमित्त पशूची कुर्बानी देण्याच्या प्रथेमध्ये कालानुरूप बदल करून मनुष्याला आवश्यक असणाऱ्या रक्ताचे दान केले पाहिजे. भविष्यात भारतातील प्रत्येक जिल्ह्यात असे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येईल.’, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
व्यसपीठावर प्रा मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमसुद्दीन तांबोळी, माजी न्यायाधीश शहापूरकर , अंनिस चे डॉ श्रीपाल ललवाणी, नोइंग गांधीजम ग्लोबल फ्रेंड्सचे संकेत मुनोत, जेष्ठ कायदेतज्ज्ञ प्रवीण मोतीवाला उपस्थित होते.
सर्व समविचारी मित्रांनी व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हे शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले त्या सर्वांचे आभार

द्वेषपूर्ण भडक भाषण देऊन समाजात फूट पाडणारे, राजकारण करणारेे संत नसतात
द्वेषपूर्ण भडक भाषण देऊन समाजात फूट पाडणारे, राजकारण करणारेे #संत नसतात
पण आजकाल असल्या भडक लोकांनाच जास्त भाव दिला जातोय,अपवाद वगळता प्रत्येक समाजात असली द्वेषपूर्ण भडक मंडळी आली आहेत आणि राजकीय लोकांकडून या लोकांना जास्त भाव मिळत असल्यामुळे कट्टर अंधभक्तांसोबतच कट्टरताही वाढत चालली आहे
साधुची लक्षणे संत तुकारांमनी सांगितली आहेत ती अशी
जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपले ।। १।।
तोची साधू ओळखावा ।। देव तेथे चि जाणावा ।।धृ.।।
#मृदू_सबाह_नवनीत । तैसे सज्जनाचे चित्त ।। २।।
ज्यासि अंपगिता नाही । त्यासि घरी जो हृदयी ।। ३।।
दया करणे जे पुत्रासी । ते चि दासा आणि दासी ।। ४।।
तुका म्हणे सांगू किती । तो चि भगवंताची मूर्ती ।। ५।।
संत कबिरांनीही म्हटले आहे
पोथी पढ़ि पढ़ि जग मुआ, पंडित भया न कोय,
ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडित होय।
साधु ऐसा चाहिए, जैसा सूप सुभाय,
सार-सार को गहि रहै, थोथा देई उड़ाय।
वरील सर्व गुण नाही पण याच्या जवळपास आचरण करणारी संत मंडळी प्रत्येक समाजात आजही बऱ्याच प्रमाणात आहेत भडक विचारांच्या लोकांना media, राजकीय लोक व इतर ठिकाणाहून ही जास्त प्रोत्साहन मिळत असल्यामुळे ह चांगले लोक दुर्लक्षित राहतात पण अजूनही बहुतेक ठिकाणी अश्या कट्टर द्वेषपूर्ण भाषण करणाऱ्यांना लोकांनी स्वीकारलेले नाहीये पण या कट्टर व्यक्तींचा त्या दृष्टीने प्रवास सुरु आहे आणि पूर्ण समाजाचे नेतृत्व जर असल्या भडक लोकांकडे गेले तर त्या त्या समाजची कट्टरतेकडे वाटचाल होइल जे देशासाठी विघातक आहे
त्यामुळे यातील चांगल्या संतांना जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे काहींना भेटलो अनेकांची भेट बाकी आहे पण प्रयत्न सुरु आहेत आपल्यालाही असे काही संत माहित असतील तर नक्की कळवावे आमची टीम त्त्यांची भेट घेईल

आरोग्यविमा - आवश्यक कि अनावश्यक ?
आरोग्यविमा - आवश्यक कि अनावश्यक ?
आजच्या धावपळीच्या युगात आरोग्याचे प्रश्न दिवसेंदिवस वाढतच आहेत. ,वाढते प्रदूषण , प्रक्रिया केलेले अन्नधान्य, बदललेली आहारशैली, कसरतीचा अभाव , मानसिक ताण, व्यसने अशी अनेक कारणे याला आहेत.कधी कधी काही आजार अचानक उद्भवतात.
त्यासाठी रोज एक तास तरी व्यायाम करायलाच हवा तो शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचा. मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचें कारण असे उगिच का म्हटल आहे.
ही मुख्य कारणे असली तरी काही आजार किंवा अपघात सांगून होत नाहीत जसे आपण आसपास पाहतो कि एवढी चांगली व्यक्ती जिला तंबाखूचे किंवा कोणतेही व्यसन नाही त्याला cancer किंवा इतर काही आजार उद्भवतात आणि असे काही झाले तर पूर्ण कुटुंब त्या व्यक्तीच्या चिंतेत बुडते. आजारपणाचे दुख तर असतेच शिवाय आर्थिक अडचणींचा ही सामना करावा लागतो. अश्यावेळी त्या व्यक्तीला आपली सर्वाधिक गरज असते पण आर्थिक अडचण असेल तर आपण ते कसे जमा करता येतील या विवंचनेत गुंतून जातो आपली सगळी जमा केलेली बचत काढणे किंवा टी नसेल तर परिचित मित्र आदींना आर्थिक सहाय्यातेसाठी विंनती करणे
आणि ते शक्य नाही झाले तर सध्यात साधा दवाखाना पाहणे किंवा तसेच आजारपण काढणे. आणि अश्यावेळेस आठवतो तो मेडिक्लेम विमा सल्लागार. पण वेळ गेलेली असते.त्यामुळे पूर्वीच एखाद्या चांगल्या कंपनीची मेडिक्लेम पोलिसी काढायला हवी. रक्कम वर्षाला थोडीच भरावी लागते पण लाखोंचा खर्च cover होतो.
आपण आपल्या स्वतःसाठी किंवा आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आरोग्य वीमा घेऊ शकतो. उदा.-पुण्यात राहणाऱ्या ०-३५ वयोगटाच्या कुटुंबाला Star Health ची रु ५ लाख ची (FHO) आरोग्य विमा पोलिसी काढण्यासाठी वर्षाला जवळपास फक्त रु. १० हजार लागतात.पण या दहा ह्जारांमुळे त्या कुटुंबाचा लाखोंचा खर्च वाचतो आणि बहुतेक चंगल्या हॉस्पिटल्स मध्ये हे कॅशलेस हॉस्पिटलायझेशन ( म्हणजे एकही पैसा ना भरता भरती आणि उपचार ) होते.सर्वात आधी गुंतवणूक ही आपल्या आरोग्यावर करा. आणि हो मेडिक्लेम काढताना त्यातील अटी वगैरे ही जाणून घ्या. कोणतेही आजारपण लपवून ठेऊ नका शिवाय जाहिरातीला भुलून जाऊन किंवा कुणी नातेवाईक किंवा मित्र आहे म्हणून आठव किमत कमी आहे म्हणून अंधपणे policy काढू नका. आपल्या पॉलिसीत कोणत्या गोष्टी कव्हर केल्या आहेत आणि कोणत्या नाहीत हेही जाणून घ्या.
आपल्या आयुष्यात कोणताही अडथळा न येता आपले आयुष्य सुरळीत राहो हा सकारात्मक दृष्टिकोन असतो पण दुरदृष्टी ठेऊन केलेल्या या नियोजनामुळे आपण भविष्यातील नकारात्मक शक्यतांना काही प्रमाणात मात करु शकतो. म्हणूनच आपला व आपल्या कुटुंबियांचा वीमा करुनच घ्यावा.
काहीजण कारणे देतात
१.मी कधी जास्त आजारीच पडलो नाही -
उत्तर - आजारपण किंवा अपघात सांगून येत नाही.
२. माझ्या ऑफिसने काढलाय आमचा मेडिक्लेम -
उत्तर - रक्कम किती आहे बहुतेक ठिकाणी २-३ लाखाच्या वर cover नसतो शिवाय जेव्हा तुम्ही एका ठिकाणी राजीनामा देऊन दुसरीकडे पाहायला जाता त्या दरम्यान आजारी पडलात तर काय?त्यामुळे पर्सनल policy ही हवीच.
सर सलामत तो पगड़ी पचास
आपलाच
©संकेत मुनोत
आरोग्य विमा सल्लागार
8087446346, 8446259159

नाव बदललेल्या पोस्ट्स
नाव बदललेल्या पोस्ट्स
आपलाच लेख आपल्याला कुणा तरी दुसर्याकडून आला तर वेगळाच आनंद होतो, कधी कधी मेसेज च्या शेवटी आपले नाव काढून दुसऱ्या कुणाचे नाव टाकलेले पाहिले तर थोडेसे वाटते कि बाबा याने असे का केले असावे? पण त्यापेक्षा आंनद या गोष्टीचा अधिक होतो कि आपल्याला त्यातून जो संदेश पोहोचवायचा आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचतोय ना? आणि यासाठीच तर आपण तो लिहीला होता त्यामुळे त्याचा आंनद त्यापेक्षा मोठा असतो.
आत्तापर्यँत गांधींविचार , मला मोदी का आवडतात?ट्रॅफिक पोलिसांच्या व्यथा, पर्यावरण सारख्या अनेक लेखांचे असे अनुभव आले कि हे लेख अजूनही कुणाच्या ना कुणाच्या नावाने फिरत आहेत ज्याचा आंनद च होतो.
पण काल जेव्हा 'आरोग्य विमा आवश्यक कि अनावश्यक" ही पोस्ट लिहली ती ही अनेक विमा एजंट नी स्वतःचे नाव टाकून ठिकठिकाणी फॉरवर्ड केली.
तर सांगायचे एवढेच होते कि माझ्या कुठल्याही पोस्टला कुठलेही कॉपी राईट्स नाहीत तुम्ही जी वाटेल ती पोस्ट बिनधास्त फॉरवर्ड करू शकता तुमच्या नावाने पोस्ट करू शकता. कारण माझी तळमळ एकच असते कि ते सत्य किंवा तो संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचवून शक्य तेवढे समाज प्रबोधन करणे.
शेवटी मीही निमित्तमात्र आहे
तुकोबांनी म्हटलेच आहे ना ..
फोडिलें भांडार धन्याचा हा माल । मी तंव हामाल भारवाही ॥
संकेत मुनोत

गांधीजीची अहिंसा पूर्वी बावळटपणा वाटे पण - डॉ अनिल अवचट
तुम्हालाही असा काही अनुभव आलाय का?4 वर्षापूर्वी वाचलेला डॉ #अनिल_अवचट यांचा हा #प्रेरणादायी लेख, हा लेख जेवढ्यांदा वाचू प्रत्येक वेळी नवीन काहीतरी समजते वास्तव आणि सत्य असूनही एकाच वेळी अंगावर शहारे, आश्चर्याचे धक्के व अनेक गोष्टी या लेखातून अनुभवायला मिळतात.
अठ्ठेचाळीस साली मी चार वर्षांचा होतो. गांधीवधानंतर उसळलेल्या दंगलीची थोडीफार आठवण आहे. ब्राह्मण मंडळी गांधीहत्येला ‘गांधीवध’ असे संबोधत असत. गावात नव्वद टक्के मराठे. माझे वडील त्यांचेच डॉक्टर. पण जमावाने आमचा दवाखाना फोडून उद्ध्वस्त केला. सकाळी मी घाबरत जरा जवळ गेलो, तर रस्त्याभर केसपेपर्स. रस्ता पांढराच दिसला. त्या काळात आम्ही कोणी घराबाहेर पडत नव्हतो. घरात सर्व घाबरलेले वातावरण. कुणी कुणाशी बोलत नव्हतं. तो भीतीदायक सुन्नपणा मला अजूनही आठवतोय. नंतर जरा वाढत्या वयात कळले, की वडिलांना ठार मारायला लोक त्यांना शोधत होते. राजाराम पाटील आणि भगवंता पाटील या वडिलांच्या मित्रांनी त्यांना लपवले, म्हणून ते वाचले. नाहीतर आमचे-माझे-काय झाले असते, कोण जाणे. पुढं वातावरण निवळलं. नंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीत हा भेद बाजूला पडून गाव ढवळलं गेलं.
सावरकरांची ‘माझी जन्मठेप’ वाचलं. मेडिकल कॉलेजमध्ये मी मॅगेझिनचा संपादक होतो. पानभर सावरकरांचा फोटो छापून ते मॅगेझिन त्यांना अर्पण केलं होतं. गांधीजी दूरचे वाटत. त्यांची अहिंसा बावळटपणा वाटे. क्रांतिकारकांची चरित्रे वाचल्यावर तर हे मत पक्कं होत होतं. खेड्यातनं शहरात आल्यावर ब्राह्माण असण्याचं एकाकीपण संपलं होतं. सर्व थरांतल्या पोरांच्या दोस्त्या होत होत्या.
या सगळ्यात कुठं तरी गांधीजी भेटले असावेत. मेडिकलला आम्ही अभ्यास मंडळ काढायचं ठरवलं. लाजिरवाण्या परिस्थितीतल्या आपल्या देशाला जगात ताठ मानेनं कसं जगता येईल, यावर तावातावाने विचार करायचो. देश म्हणजे नुसता नकाशा किंवा जमिनीचा तुकडा नव्हे; तर तिथं राहणारा समाज, तिथली गरीब माणसं… या समीकरणापर्यंत आलो, म्हणून बचावलो. नाही तर आम्ही ‘जाज्वल्य राष्ट्रप्रेमी’ झालो असतो. आणि समाज बघायचा राहिलाच असता, आणि गरिबांचं खरंखुरं जीवन, त्यांचे प्रश्न तर या जन्मात दिसले नसते.
****
आमचं वर्ध्याला शिबीर होतं.
इथं काही गांधीवादी लोकांची ओळख झाली. त्यातले एक आठवताहेत, ते अण्णासाहेब सहसबुद्धे. हिरवट घारे डोळे, टक्कल, सरळ नाक. शेती हा त्यांचा खास विषय. आम्ही त्यांच्याशी वाद घालत होतो, ‘सशस्त्र क्रांती झाली पाहिजे, त्याशिवाय हे प्रश्ान् सुटणार नाहीत.’ ते चिडून निघून जातील असं वाटलं होतं. उलट हसून ते म्हणाले, ‘बरोबर आहे. आपण सशस्त्र क्रांती करायला माझी काही हरकत नाही. किती लोक त्याच्यासाठी तयार आहेत? किती लोक तुमच्या मागे येतील? सरकार उलथवायचे झाले, तर सैन्याचा मुकाबला कसा करणार? असं समजू की तेही आपण करू शकलो, तरी भारतातल्या लाखो गावांमध्ये जाऊन शेतीसुधारणा, जातिभेद निर्मूलन, अंधश्ाद्धा निर्मूलन हे करायला किती कार्यकर्ते लागतील? ते कोण तयार करणार. समजा तेही झालं आणि शेतकरी या बदलांना तयार नाही झाले, तर काय? की त्यांनाही गोळ्या घालायच्या? असे किती लोकांना गोळ्या घालणार? या सगळ्यांनी आपल्याविरुद्ध उठाव केला तर?…’
बाप रे… आम्ही हा विचारच केला नव्हता. सर्व प्रश्ानंची उत्तरं सशस्त्र क्रांतीतून मिळतील, असं समजत होतो; पण अण्णासाहेबांनी तो विचार फक्त शेवटपर्यंत नेऊन दाखवला आणि माझे डोळेच उघडले. मग त्यांचं म्हणणं मी लक्ष देऊन ऐकू लागलो.
वर्धा शिबिराच्या निमित्ताने पवनारला विनोबांच्या आश्रमाला आम्ही पाचएकशे तरुणांनी भेट दिली. विनोबांविषयीही मनात अढी. कधी थट्टाही करायचो. आम्ही आश्रमात गेलो तेव्हा कळले की, ‘ते मौनात आहेत. तुम्ही प्रश्ान् विचारा, ते पाटीवर लिहून उत्तरे देतील.’ काय बोअर प्रकार हा, असं म्हणत एका मंडपात रांग करून बसलो. हिरवी कानटोपी, पुढे थोडे हूड असलेली घालून ते आले आणि आमच्या प्रश्ानेत्तराच्या सुरुवातीलाच त्यांनी मौन सोडून उत्तरं द्यायला सुरुवात केली. तासभर ते बोलले. मला सगळ्यात आवडली, ती त्यांची प्रसन्न सुंदर भाषा! असं सहज आणि सुंदर मराठी त्यापूर्वी ऐकलं नव्हतं. त्यांचे युक्तिवादही त्या वेळी स्फुरलेले, चपखल होते. शहरं खेड्यांचं कसं शोषण करतात, हे सांगताना म्हणाले, ‘शहरट लोक असतात ना, त्यांना सगळीकडचं उत्तम ते हवं असतं. तसे ते हावरटच,’ असं म्हणून छान, लहान मुलासारखे हसले. पुढे म्हणाले, ‘कृष्ण गवळणींना उगाच अडवीत होता का?’ मी चक्रावलोच.
‘ या शहरट लोकांना खेड्यातलं सगळं हवं असतं. दूध होतं खेड्यात, पण खेड्यातल्या लोकांना प्यायला मिळत नाही. म्हणून कृष्णानं शहराकडे दूध विकायला निघालेल्या गौळणींना अडवलं…’
ही त्यांची संगती अजब होती, पण हळूहळू पटतही होती! नंतर ‘ती’ गांधीजींची झोपडी बघायला गेलो. मला ती बाहेरूनपेक्षा आतूनच आठवतेय. कुडाच्या भिंती मातीनं सारवलेल्या. जमिनी शेणात सारवलेल्या. त्यांच्या बसायच्या खोलीत अंधार-प्रकाशाचा छान मेळ होता. म्हटलं तर अंधार, पण अप्रत्यक्ष प्रकाशही. या माणसाला या बाबतीतली एवढी प्रगल्भ दृष्टी होती?
पुढे काही वर्षांनी लॉरी बेकरविषयी पुस्तक वाचलं. हा सैनिक. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रह्मादेशच्या लढाईवरून घरी इंग्लंडला परत चालला होता. त्यानं पेपरमध्ये गांधींविषयी खूप वाचलं होतं. ‘हा कोण माणूस, बघून तरी जाऊ या’ असं म्हणून गांधीजींना भेटायला गेला. गांधीजींनी त्याला विचारलं, ‘इंग्लंडला जाऊन काय करणार?’
‘ मी आर्किर्टेक्ट आहे. तो व्यवसाय करीन.’
गांधीजी म्हणाले, ‘मी खरा आर्किर्टेक्ट कोणाला म्हणतो, माहीत आहे? जो 25 मैलाच्या परिघातून बांधकाम साहित्य मिळवतो तो.’
लॉरी बेकर चक्रावलाच. तो इंग्लंडला गेला. प्रॉपर्टी विकून भारतात परत आला. केरळमध्ये स्थायिक झाला आणि गांधीजींच्या व्याख्येप्रमाणे विटांचा जास्तीत जास्त वापर करून हवेशीर, सुंदर घरं बांधली. त्याला ‘ब्रिक मॅन ऑफ इंडिया’ असं संबोधतात.
गांधीजींच्या एकेका वाक्याने अनेकांनी त्यांची त्यांची आधीची जीवनं फेकून देऊन पूर्णपणं वेगळा रस्ता धरला आहे. कसा होत असेल हा बदल? त्यांच्या करिष्म्यामुळे का? मला वाटतं, त्यांच्या अल्पाक्षरी, पण जगावेगळ्या दृष्टिकोनामुळं असेल.
अभय बंग एक मोतीलाल नेहरूंची गोष्ट सांगतो. ते बडे वकील, अमीर. गांधीजींनी जाहीर केलेला दांडीचा मिठाचा सत्याग्रह त्यांना हास्यास्पद वाटला. एवढं मोठं ब्रिटिश साम्राज्य. या मूठभर मीठ करण्यानं त्यांच्यात काय फरक पडणार? त्यांनी गांधीजींना या व्यर्थपणाविषयी लांबलचक पत्र लिहिलं. गांधीजींची तार आली, ‘करके देखो.’
त्या दिवशी अलाहाबादमध्ये या सत्याग्रहाला पाठिंबा देणारी सभा होती. ‘म्हातारा म्हणतोय तर जाऊ सभेला.’ तसं जाहीर होताच सभेला जाण्यापूवीर्च त्यांना अटक करण्यात आली. त्यांनी पोलिसांना विनंती करून गांधीजींना तार केली. ‘करनेसे पहलेही देख लिया.’ जवाहरलाल, वल्लभभाई आणि कितीक गांधीजींच्या एका भेटीत पूर्ण बदलून गेल्याची उदाहरणं आहेत. काय होतं त्यांच्यात? काटकुळा, उघडा कृश देह, पडक्या दातांचं हास्य.
पडके दात वार्धक्यामुळे पडले नव्हते, तर दक्षिण आफ्रिकेत गोऱ्यांविरुद्ध लढा उभारला असताना एका गोऱ्या आणि एका पठाण तरुणाकडून बेदम मारहाणीत पाडले गेले होते. नंतर हे दृश्य पाहणाऱ्या एका गोऱ्या महिलेनं त्यांना हॉस्पिटलात दाखल केलं. तिथे हिंदी समाजाचे लोक जमले. त्या तरुणांवर पोलिस कंप्लेट करूयात, त्यांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे, असं लोक म्हणू लागताच त्याही अवस्थेत गांधीजी म्हणाले, ‘चळवळ करताना वैयक्तिक त्रास होतो. त्याबद्दल मी तक्रार करणार नाही. चळवळीत सर्वांवर होणाऱ्या अत्याचाराची आपण जरूर दाद मागू’ म्हणून पोलिस तक्रार केली नाही. नाहीतर त्या मुलांना नक्कीच शिक्षा होऊ शकली असती. गांधीजींचं हे वेगळेपण. नंतर त्या मुलांनी येऊन गांधीजींकडे क्षमायाचना केली.
गांधीजींकडं हे शहाणपण, वेगळेपण उपजत होतं का? की कुठला तरी साक्षात्काराचा क्षण होता? त्यांना सत्याग्रह हे तंत्र कधी सापडलं?
गांधीजींचं तंत्र घडलं ते दक्षिण आफ्रिकेत. माझी समजूत ते तिथं दोन/चार वर्षं असतील एकूण. पण तिथं ते 21 वर्षं होते. तिथं ज्या खटल्यात त्यांना तिथल्या वकिलाच्या मदतीला पाठवलं होतं, तिथं दुसऱ्या पाटीर्ला भेटून त्यांनी कोर्टाबाहेर तडजोड घडवून आणली. जी बाजू सत्य असेल, त्यांचेच वकीलपत्र घेत. त्यामुळे कमाई कमी. म्हणून गरजा कमी केल्या. जाती-धर्मांमध्ये विखुरलेल्या हिंदी समाजाला एकत्र आणून लढा उभारला.
पण असं त्यांना करावंसं नेमकं कधी वाटलं?
दोन घटना फार हृद्य आहेत.
नाताळला तिकीट असतानाही गोऱ्यांनी त्यांना र्फस्ट क्लासमधून प्लॅटफॉर्मवर सामानासहित फेकून दिलं. ही घटना खूप आधीपासून माहीत होती; पण पुढचं वाचलं तेव्हा निराळा बोध झाला. रात्रीच्या वेळी, कडाक्याच्या थंडीत तिथल्या वेटिंग रूममध्ये गांधीजी रात्रभर बसून राहिले. जवळचं सामान उघडून स्वेटर, शाल, पांघरूण काढता येणं शक्य होतं; पण तसं केलं नाही. रात्रभर काय विचार केला असेल त्यांनी? कदाचित इथे अन्यायाचा प्रतिकार करण्याचा निश्चय झाला असेल. कदाचित सत्याग्रह ही कल्पनाही सुचली असेल; पण त्या रात्रीनंतर ते आमूलाग्र बदलले, हे साऱ्यांच्याच लक्षात आलं.
दुसरी घटना त्यानंतरची.
घोडागाडीत-व्हिक्टोरियात बसले असताना गोरा सोजिर आला. त्यानं, मला आत बसू दे, तू घोडागाडी चालवणाऱ्या कोचमनच्या शेजारी बस, असं सांगितलं. ते गांधींनी मान्य केलं. तसं पुढं जाऊन बसलेही. काही वेळानं गोऱ्याला कोचमनशेजारी बसून सिगरेट पिण्याची लहर आली. तो परत गांधींना उठायला सांगू लागला. गांधींनी त्याला नकार दिला. त्यानं आणि कोचमननं गांधीजींना बडव बडव बडवलं. गांधीजींनी बाजूची पितळी दांडी घट्ट धरून ठेवली, ती सोडली नाही. शेवटी त्या दोघांनी तो नाद सोडून दिला.
ती पकडलेली दांडी, हा सत्याग्रहाचा जन्म असावा. मी प्रतिकार करणार नाही, पण दांडीही सोडणार नाही. सविनय कायदेभंगाच्या या तंत्रापुढं नंतर ब्रिटिश साम्राज्यही डळमळलं, एवढी या साध्या सोप्या तंत्रात ताकद होती. हे तंत्र गांधीजींनी ‘थोरो’कडून घेतलं का? थोरो हा एक पिढी आधीचा. थोरोच्या मृत्यूनंतर गांधीजींचा जन्म झालाय. अमेरिकेतला तत्त्वज्ञ हेन्री डेविड थोरो याचं वॉल्डन (मराठीत दुर्गा भागवतांनी भाषांतर केलेलं ‘वॉल्डनकाठी विचार विहार’) हे पुस्तक वाचल्यावर मी कॉलेजात असताना झपाटून गेलो होतो. शहरातील कृत्रिमतेला कंटाळून तो वॉल्डन तळ्याकाठी राहू लागला. स्वत:च्या हातानं झोपडी बनवली. तो लिहितो, ‘आपण आपलं घर बनवायचा आनंद सुताराला का देतो, हे कळत नाही.’ (खरं तर त्यालाही तो मिळत नाही) आसपासच्या जमिनीत धान्य उधळून, खतपाणी, मशागत न करता येईल त्या धान्यावर, फळांवर गुजराण करू लागला. त्याचे निबंध वाचण्यासारखे आहेत. ‘रविवार’, ‘फिरणे’ यातच सिव्हिल डिसओबिडियन्स हाही आहे. म्हणजेच सविनय कायदेभंग. या अन्यायी सरकारला कर भरणं, म्हणजेही त्या अन्यायात सहभागी होणं; म्हणून कर भरणार नाही, अशी भूमिका घेतली आणि त्यासाठी शिक्षा भोगायला तयार आहे, असंही म्हटलं. सरकारने त्याला अल्पकाळ तुरुंगातही टाकलं. जॉन रस्किनच्या ‘अनटू दि लास्ट’ या पुस्तकाप्रमाणंच थोरोविषयी त्यांनी वाचलं होतं का? माहीत नाही; पण शक्य आहे.
गांधीजींच्या साध्या राहणीची सुरुवात आफ्रिकेत झाली. ती पुढं त्यांनी आणखीनच साधी केली. ओरिसात एक दरिदी स्त्री पाहिली. तिच्यापाशी एकच पातळ विरलेलं वस्त्र होतं. त्यामुळं ती परत परत तेच घालत असे. हे पाहून गांधीजींचे मन कळवळले. त्यांनी टोपी आणि अंगरख्याचा त्याग केला आणि पंचावर राहू लागले. मग ते कुठेही असोत; कोणाला, अगदी व्हॉइसरॉयला भेटायला जायचे असो. ते नुसते गांधी नव्हते, तर भारतातल्या गरीब माणसाचं प्रतीक होते. ते सतत काही शोधत होते. या देशाला परवडेल अशा जीवनपद्धतीचा शोध घेत होते. ती आधी स्वत: जगून पाहत होते.
आज ‘साधी राहणी’च्या बरोबर उलट्या दिशेने आपण चाललो आहोत. त्यातनं काय निष्पन्न होतंय? निसर्गाची भयानक लूट आणि त्यातून होणारं कायमचं नुकसान, प्रचंड कचरानिमिर्ती आणि त्यातून जीवसृष्टीला होणारा धोका, पृथ्वीचं वाढतं तापमान आणि त्यातून विरघळणारे ध्रुव आणि त्यातून पाण्याखाली जाणारी बेटं आणि बंदरं… त्यापेक्षा गांधी काय सांगत होते, ते ऐकले असते तर? खेड्यातलं अन्न, कापूस, दूध खेड्यातच वापरा. काही गरजा शेजारच्या खेड्याकडून भागवा. गाव स्वच्छ ठेवा. मैल्यातून, शेणातून खत निर्माण करा. गायी, बैल जोपासून गोधन वाढवा. सृष्टी, प्राणी यासहित चांगले जीवन जगा… यात थट्टा करण्याजोगं काय होतं? आज कोल्हापूर भागातलं दूध टँकरमधून मुंबईला पाठवण्यात सृष्टीवर किती ताण देतोय आपण? बहुसंख्य प्रश्न शहरांच्या बेसुमार वाढीमुळंच निर्माण झाले आहेत. खेडी भकास झाली. तिथले कारागीर डुबले आणि शहरात येऊन काय मिळालं? तर झोपडपट्टी, प्रदूषित जीवन. आता तर कामगारांची गरज नसलेल्या कारखान्यांमुळं बेकारीही. परत परत गांधीजी आता अधिक बरोबर ठरताहेत.
गांधीजींकडून आणखी एक गोष्ट मला नेहमी शिकावीशी वाटते. गांधी सिनेमात एक दृश्य आहे (आणि ते अनेकांनी लिहूनही ठेवले आहे.) नेहरू, पटेल आदी मंडळींची महत्त्वाच्या विषयावर बैठक चालू असते. गांधीजी एकदम उठतात. सगळे आश्चर्यानं पाहू लागतात. ते म्हणतात, ‘माझ्या बकरीला चारा घालायची वेळ झाली.’ सगळ्यांच्या चेहेऱ्यावर वैताग, काय हे खूळ असा भाव. मला हा प्रसंग फार ठसला. देशाचा कारभार करणं हा जसा जीवनाचा भाग आहे, तसा बकरीला चारा घालणं हाही.
दुसरा प्रसंग. मी एका डॉक्युमेंटरीत पाहिलेला. गांधीजी दिल्लीतल्या व्हॉइसरॉय हाऊसवर बोलणी करायला गेलेले. बोलणी संपवून रात्री उशिरा घरी परत निघतात. ते ‘हरिजन वस्ती’मध्ये उतरलेले. व्हॉइसरॉयनी दिलेली गाडी नाकारून शांतपणं मोकळा रस्ता चालताना दिसतात. इकडे त्या बोलण्यातून काय निष्पन्न झाले, याविषयी त्यांचे सहकारी, पत्रकार थांबलेले; पण गांधीजी काही मैल एकटे चालत गेले. ते त्या चळवळीच्या गतीच्या वावटळीत. कधी भिरभिरले नाहीत, कधी उडून गेले नाहीत. ते आपल्या गतीनं चालत राहिले. ते असामान्य असले तरी त्यांनी आपल्यातलं सामान्यत्व जपलं. म्हणून सामान्य माणसांना ते आपले वाटले असले पाहिजेत.
गांधीजींच्या चळवळीत खूप माणसे घडली. काही स्वातंत्र्य चळवळीत होती, काही विधायक, तर काही दोन्हीतही. गांधीजींनी कुणाला गोशाळा काढायला सांगितलं, तर कुणाला निसगोर्पचार आश्रम; कुणाला शौचालयावर संशोधन, तर आणखी कुणाला आणखी काही आणि ही माणसं बिनतक्रार आयुष्यभर त्या कामात राहिली. त्या माणसांचीही आपापली वैशिष्ट्ये सांभाळून. कुडाळचे अप्पा पटवर्धन हे असेच विलक्षण व्यक्तित्व. त्यांचं ‘माझी जीवनयात्रा’ हे आत्मचरित्र वाचलं आणि चकित झालो. तुरुंगात त्यांनी भंगीकाम पाहिलं. स्वत: करायची तयारी दाखवली; पण तुरुंगाधिकाऱ्यानं परवानगी दिली नाही. कुडाळमध्ये परत आल्यावर बादली- खराटा घेऊन सक्काळी भंग्यांमध्ये (आता आपण त्यांना मेहतर म्हणतो) मिसळले. पुढं त्यांनी अनेक प्रयोग केले. चराचे संडास, सोपा संडास… इ. आज बिंदेश्वरी पाठकांनी भारतभर बांधलेली सुलभ शौचालये हा अप्पांचा सोपा संडासचीच जवळची आवृत्ती. नाशिकजवळ गंगापूरला भाऊ नावरेकरांनी हेच काम पुढं चालू ठेवलं. आता त्यांची मुलं काम करीत आहेत. त्यांनी बायोगॅसचा सुटसुटीत प्लँट तयार केला आहे आणि जागोजाग जाऊन तो ते करून देतात. तोडणकर गुरुजीही असेच संडास या समस्येला वाहिलेले. संडास ही काय प्रतिष्ठितपणं उच्चारायची गोष्ट झाली? त्याकडं डोळेझाक करीतच आपण ती समस्या आणखी वाढवून ठेवली आहे. खेड्यापाड्यात स्त्रियांनी पहाटे किंवा रात्री उशिरा गटानं जाऊन बाहेर रस्त्याकडेला बसावं आणि गाडीचा प्रकाश पडला की उभं रहावं… किती लाजिरवाणी अवस्था. शेतं गावाला खेटायला आली आणि अशा जागा नष्ट झाल्या. शहरात त्यापेक्षा वाईट अवस्था. मागे पंचगंगा या कोल्हापूरच्या नदीची पाहणी केली होती. गावातलं बहुतेक सर्व ड्रेनेज कुठल्याही प्रक्रियेशिवाय पंचगंगेत सोडलेलं. पुढची गावं तेच पाणी पितात. आज बहुतेक सगळ्या नद्यांची गटारं करून टाकलीत आम्ही. मैला हे उत्तम खत देतं, स्वयंपाकाला इंधन देतं. ते न घेता त्याची महाभयानक समस्या करून बसलोय. गांधींची थट्टा करू शकता; पण मग या समस्याही सोडवून दाखवाव्यात.
मी ‘साधना’ साप्ताहिकात काम करताना अनेक गांधी परंपरेतल्या लोकांशी संबंध आला. आचार्य भागवत यायचे. ते गेल्यावर मी त्यांच्यावर विशेषांक काढला होता. दादा धर्माधिकारींशीही स्नेह जमला. त्यांचे व्यवस्थित, पूर्वग्रहविरहित विचार मला फार आवडायचे. ‘स्त्री-मुक्ती’वरचे त्या वृद्धाचे विचार इतके पुढचे, की आम्हालाही न झेपणारे. बाबा आमट्यांच्या ‘ज्वाला आणि फुले’, ‘वर्कर्स युनिव्हसिर्टी’ या पुस्तकांनी असेच भारलेले. सोमनाथ शिबिरात एका सवोर्दयी वृद्धानं मला वळकटी बांधायला शिकवलं होतं. त्यांची पांढरट जाड सतरंजी गुंडाळलेली ती खास सवोर्दयी गठडी होती. कुणी माणसं शिक्षणक्षेत्रात होती. ‘नई तालीम’ ही र्वध्याची शाळा म्हणजे मुक्त शिक्षणाची आद्य शाळाच.
गांधी परंपरेतला फसलेला प्रयोग म्हणजे भूदान, असं मी समजायचो. विनोबांची यात्रा पुढं गेली की, दान केलेली जमीन मालक परत घ्यायचे… वगैरे. पुण्याला धनंजयराव गाडगीळांचे भाषण होते. ते मार्क्स प्रवाहातले अर्थशास्त्रज्ञ समजले जात. ते केंद सरकारत प्लॅनिंग कमिशनचे अध्यक्षही होते. ते म्हणाले, ‘भारतातल्या समस्या सोडवण्यासाठी आपण जगाकडं पाहतो. साम्यवाद, समाजवाद असे काही मार्ग आहेत. भारतीय परिस्थितीवर भारतातून निघालेले एकमेव उत्तर म्हणजे भूदान चळवळ होय. ती भले अशयस्वी ठरेना का; पण जगाला आथिर्क प्रश्ानवरचा भारतातून पुढं अलेला हा एकमेव उपाय आहे.’ तेव्हा मी चमकलोच होतो.
मी साधनेचा संपादक असताना स्वातंत्र्य मिळून 25 वर्षं पूर्ण झाली होती. सगळीकडे 25 वर्षांत आम्ही काय मिळवलं, तर भाक्रानान्गलसारखी धरणं, भिलाई वगैरे कारखाने असे फोटो येत. गांधीजींचं एक वाक्य मी वाचलं होतं, ‘देशाच्या प्रगतीचा निकष एकच, की ती प्रगती शेवटच्या माणसापर्यंत पोहोचली आहे की नाही, हा!’ त्याला ते अंत्योदय म्हणत. म्हणून मी तो विशेषांक दलितांनीच लिहावा, त्यांना या देशाविषयी काय वाटतं हे त्यांनी निर्भयपणं लिहावं, असं आवाहन करून तो अंक छापला; पण ते कटू सत्य कित्येकांना पचलं नाही आणि गदारोळ झाला. अंकाचं दहन झालं. माझी आणि यदुनाथजींची प्रेतयात्रा काढून त्याचंही दहन झालं. (माझ्या प्रेतयात्रेबरोबर मीही चालत होतो!) आज वरच्या वर्गाची, उच्च मध्यमवर्गाची स्थिती सुधारतेय. त्यांच्या आकर्षक कॉलनीज्, त्यांच्यासाठी उत्तम शाळा, भव्य हॉटेल-रेस्टारंट्स उभी रहात आहेत. त्याला आम्ही प्रगती समजतोय; पण खाली गाडली गेलेली, चेपली गेलेली माणसं? कर्जबाजारी शेतकऱ्यांचे गळफास! आपण खालच्या माणसापासून सुरुवात केली असती, तर एवढी झकपक नसती दिसली; पण माणसं चार घास सुखानं खाऊ शकली असती. गांधीजींचा आधुनिकतेला विरोध नव्हता; पण माणसांना सुखी करणारा समाज महत्त्वाचा. त्याला अनुरूप आधुनिकता त्यांना मान्य होती. आजची कामगारविरहित कारखानदारी त्यांनी कधीच मान्य केली नसती. शूमाखरचं ‘स्मॉल इज ब्यूटिफूल’ इथं आठवलं. गांधीजींचा अवाढव्यतेला विरोध होता; कारण त्याखाली सर्वसामान्य माणसं चिरडून जातात म्हणून.
काही वेळा चर्चा सुरू होते, की ‘स्वातंत्र्य कोणी मिळवलं?’ मला वाटतं, अनेकांनी. 1857च्या लढ्यापासून तो गांधीप्रणीत चळवळीपर्यंत. पण भारतातल्या सर्वसामान्य माणसांपर्यंत स्वातंत्र्याची इच्छा कोणी निर्माण केली, या प्रश्ानला मात्र एकच उत्तर मी देईन, गांधीजी. भारतव्यापी, सर्व थरांमध्ये प्रभाव टाकलेली ही एकच व्यक्ती. बाकीच्यांची वर्तुळं लहान आहेत.
गांधीजींचा प्रभाव जगावर होता, हे 2000 साली ‘मिलिनियम’वर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीची निवड सुरू झाल्यावर कळलं. लेखक, नेते, शास्त्रज्ञ, कलावंत सगळी नावं मागं पडली, आणि दोन उरली. एक आइनस्टाईन आणि दुसरे गांधीजी. त्यात आइनस्टाईनला जास्त मतं पडली आणि ते सर्वात प्रभाव पाडणारी व्यक्ती ठरले. पण गांधीहत्या झाल्यावर आइनस्टाईन काय म्हणाला होता, माहीत आहे? तो म्हणाला की, ‘गांधींसारखी महान व्यक्ती कधी काळी जन्मली होती आणि या भूतलावर चालली होती, हे पुढच्या पिढ्यांना खरं वाटणार नाही.’ (लॉर्ड माऊंटबॅटन हे शेवटचे व्हाइसरॉय आणि ब्रिटिश राजघराण्यातील. त्यांनी म्हटलं आहे, ‘इतिहासाच्या पानावर गांधीजींचं नाव ख्रिस्त आणि बुद्ध यांच्या बरोबरीनं लिहिलं जाईल.)
माटिर्न ल्यूथर किंग या कृष्णवणिर्यांच्या नेत्याचं चरित्र वाचताना त्यानं गांधीजींविषयी जागोजाग कृतज्ञता व्यक्त केल्याचं दिसलं. पुस्तकाच्या फोटो विभागात त्याच्या खोलीत त्याच्या मागे गांधीजींचा फोटो लावलेला होता. अमेरिकेसारख्या पिस्तुलगच्च देशात, त्यातही कृष्णवणीर्य समाजात अहिंसक चळवळ रुजवण्याचं काम तो करू शकला, हे गांधी-विचाराचं यश. कॅलिफोनिर्यामध्ये असलेल्या मेक्सिकन मजुरांचा नेता सीझर शॅवेझ असाच. अहिंसक चळवळी तर करायचाच; पण प्रश्ान् तडीला लावण्यासाठी गांधीजींसारखी वीस-वीस दिवसांची उपोषणे करायचा. त्याच्याही खोलीत गांधीजींचा फोटो. माटिर्न ल्यूथर किंग आणि सीझर शॅवेझ यांचा प्रभाव इतर हिंसक चळवळींपेक्षा जास्त टिकून राहिलाय आणि त्यांनी मनं जोडण्याचं अपूर्व काम केलंय.
मधू लिमयांबरोबर उत्तर प्रदेशात प्रवास करताना त्यांच्याशी खूप गप्पा व्हायच्या. गांधीहत्या झाली, तेव्हा ते दूर युरोपातल्या कुठल्या छोट्या देशात होते. रेडिओवर ही बातमी ऐकून विमनस्क होऊन रस्तोरस्ती भटकत होते. एका प्रौढ माणसानं त्यांना थांबवलं. विचारलं, ‘तुम्ही भारतीय का?’ हे ‘हो’ म्हणताच त्या गृहस्थांनी यांचे खांदे गदा गदा हवलत म्हटलं, ‘व्हाय डिड यू किल् गांधी? तुम्ही काय समजता, गांधी काय फक्त तुमचेच होते?’
हे ऐकून मी शहारलोच. त्या जगाच्या पाठीवरच्या कुठल्या देशातल्या माणसाला गांधीजी ‘त्याचे’ वाटावेत आणि आम्ही त्यांना ओळखू नये?
आणखी एका गोष्टीचं मला प्रचंड आश्चर्य वाटतं. इतक्या वर्षांच्या अविश्रांत लढ्यानंतर, अनेकदा भोगलेल्या तुरुंगवासानंतर स्वराज्य मिळालं. अशा कार्यक्रमाचे नायक कोण असायला हवे होते? तर गांधीजी; पण त्यांना नोआखालीत उसळलेल्या दंगली शांत करण्याचं काम महत्त्वाचं वाटलं आणि या सोनेरी क्षणाकडं त्यांनी पाठ फिरवली. आज काहीजण फाळणीला गांधीजींना जबाबदार धरतात. हेही जगातलं महान आश्चर्यच मानायला हवं. त्यांनी फाळणी होऊ नये, म्हणून जिवाचं रान केलं; पण शेवटी त्यांच्या शिष्यांनी- पंडित नेहरू आणि लोहपुरुष वल्लभभाई पटेलांनी- गांधीजींना बाजूला सारून फाळणी मान्य केली.
पंचावन्न कोटींबाबतही तसेच. त्या करारात भारताने ते द्यायचे मान्य केले होते. तर ते वचन आहे, आणि ते पाळा, असे गांधींनी म्हटले; तर ते फाळणीचे गुन्हेगार ठरतात! दंगलीचे डोंब उसळलेले असताना, सर्वत्र लाल कारंजी उडत असताना गांधीजी एकटेच असे की जे तिथे जाऊ शकले आणि त्यांचे आतले बळही असे, की त्यांच्या अस्तित्वाने दोन-तीन दिवसांत दंगल शांत झाली. ज्यावेळी त्यांचे शिष्य स्वराज्यातले पहिले झेंडावंदन करीत होते, त्यावेळी गांधीजी सामान्यांचे अश्रू पुसत होते. त्यांना स्वराज्यापेक्षाही माणुसकीचा धर्म मोठा वाटत होता.
माझ्यावर गांधीजींचे वेगळेच उपकार आहेत.
त्यांची ‘आत्मकथा’ वाचताना लहानपणी त्यांनी सोन्याच्या कड्याचा तुकडा चोरून विकला होता. बाहेर मांसाहारही केला होता. मीही लहानपणी घरातल्या कपाटाल्या काही नाण्यांच्या चोऱ्या केल्या आहेत. त्याची खंत अजूनही वाटत असते. त्यातून सिगारेट ओढायला शिकलो. पुढं ते सगळं वाहून गेलं, म्हणून योगायोगाने वाचलो. गांधीजींना चोरी केल्याचा पश्चाताप झाला आणि स्वत: होऊन वडलांपाशी जाऊन गुन्हा कबूल केला तो यांच्या आणि वडलांच्या अश्रूत वाहून गेला. हे वाचून मी शहारलो. गांधी आपल्यासारखेच चुका करणारे होते; पण मग ते ‘गांधीजी’ कसे झाले? तर स्वत:मधल्या चुकांकडे स्वत:च परखडपणे पाहाणं, आणि दुरुस्त करायचा प्रयत्न करणं, ही स्वत:स सतत शुद्ध ठेवण्याची प्रक्रिया त्यांनी लहानपणापासून चालू ठेवली. म्हणून ते विश्वव्यापी झाले. आपण तसे करू या का? त्या काळात मी धामिर्क मार्गात होतो. ध्यान करायचो. निविर्चार होण्याची वाट पाहण्यापेक्षा मी दिवस समोर आणू लागलो. मला काही गांधीजी व्हायचे नव्हते. फक्त कालच्यापेक्षा आज चांगला माणूस व्हायचं होतं. हे जेव्हा सुरू केलं, तेव्हा लक्षात आलं, की आपण दिवसाकाठी बऱ्याच चुका करतोय. माझ्यामधल्या अहंकाराचं तर कधी कावेबाजपणाचं, कधी उथळपणाचं, तर कधी इतरांवर इंप्रेशन मारणाऱ्या स्वभावाचं दर्शन होऊ लागलं. ज्या व्यक्तींना माझ्याकडनं त्रास झाला असेल, तर नंतर त्याच्याकडे जाऊन कधी माफी मागू लागलो, तर कधी खंत व्यक्त करू लागलो. काही चुका परत परत होताना दिसत. त्या मी ओलांडू शकत नसे; पण त्या चुका आहेत, एवढं तरी मनाला जाणवू लागलं. या प्रक्रियेत अध्यात्म सुटलंच. काय करायचाय मोक्ष आणि जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सुटका? त्यापेक्षा चांगला माणूस किंवा चांगला होऊ इच्छिणारा माणूस म्हणून जगूयात की.
मग हा अनुभव मी इतरांना सांगू लागलो. यासाठी ज्ञानाची, शिक्षणाची, साधनेची काही गरज नाही. प्रत्येक माणूस हे करू शकतो. कधी ना कधी चांगल्या माणसांचा समाज निर्माण होईलही. हे गांधीजींचं माझ्यावरचं ऋण.
या वर्षातच मला र्वध्याला जाण्याचा योग आला. तिथल्या विभा गुप्ताने ‘ग्रामीण तंत्रज्ञान परिषद’ आयोजित केली होती. तिथे जुने गांधीवादी भेटले, तसेच आज खेड्यापाड्यात काम करणारे तरुणही. कोणी बांबू हा विषय घेतलाय, तर कोणी संडास; कोणी शेतीमधले प्रयोग करतंय, तर कोणी तलम खादी काढायचा ध्यास घेतलाय. कुणी जुन्याचं उत्खनन करतोय, तर कोणी जुन्या नव्याचा मेळ घालत बसलाय… असा सगळा पागलखाना.
दांडीयात्रेच्या समाप्तीचा तो दिवस. म्हणून आम्हाला सेवाग्राममधल्या ‘बापू कुटी’ला सक्काळीच नेणार होते. त्यामुळे मी आनंदून गेलो होतो. किती वर्षांनी परत बघणार ती कुटी. माझं इंप्रेशन तसंच रहावं, निदान कमी तरी होऊ नये, असं वाटत होतं. पण त्या परिसरात पाऊल टाकल्यावर मन प्रसन्न झालं, ते अखेरपर्यंत. झाडं-झाडं बरीच आणि मधे मधे बरीच कौलारू, मातीची टुमदार घरं. वर नळीची कौलं. सारवलेल्या मातीचा छान, डोळ्यांना त्रास न देणारा रंग. बाहेर व्हरांडे. त्याला जे खांब उभे केले, ते कुठेही न आकार दिलेले वासे. लाकूड कामास तेलाचा काळा रंग; मातीच्या रंगाला किंचित उठाव देणारा. मोकळ्या परिसरात आम्हा सगळ्यांना बसवलं. आश्रमातल्या लोकांमागोमाग आम्ही ‘आश्रम भजनावली’तल्या प्रार्थना म्हटल्या. तो काळ हळूहळू अंगावर चढू लागला. काय असेल त्यावेळी इथं वातारण. नेहरू, पटेल, आजाद, गफारखान… अशी माणसं इथं कितीदा आली असतील आणि अशीच इथं वावरली असतील. प्रार्थनेलाही बसली असतील. इथल्या प्रत्येक सामान्य माणसामध्ये एका ध्येयामुळं असामान्यत्व संचारलं असेल. चढाओढ असलीच तर ती त्यागाची. समर्पणाला सीमाच नसेल आणि या सगळ्यामागं एक जादूभरलं व्यक्तित्व असेल, गांधीजी.
प्रार्थना संपल्यावर सगळे पांगले.
मी बापू-कुटीकडे निघालो. यावेळी आणखी वैशिष्ट्यं जाणवली. आपल्या भिंती कुडाच्या, मातीने सावरलेल्या होत्या आणि त्या वरून मोकळ्या ठेवल्या होत्या. त्यामुळं सगळं घर वरून एकमेकांशी जोडलं गेलेलं. खालीही तसंच. कुठे सहसा दारं नाहीत. होते ते फक्त आडोसे. अप्रत्यक्ष प्रकाश सर्वत्र झिरपत होता.
गांधीजी बसत, तिथं पुढं डेस्क आणि मागे टेकायला जरा उभा उंच पाट होता. मला खरं तर अशा गोष्टीचं फार अगत्य नाही. परदेशप्रवासात पूवीर्च्या मोठ्या लेखकांची, नेत्यांची घरं दाखवत. ते कुठं बसत, कुठं झोपत, कुठं लिहीत… असं दाखवायचे. वाटायचं, असतील; पण ते नाहीत, तर त्या वस्तूंचं काय एवढं? बाहेर व्हरांड्यात आलो. एका खांबाला टेकून बसलो. बाकीचे माझे मित्र त्या परिसरात हिंडत होते. याही कुटीत कुणी मधूनच येऊन जात होतं. मी बसलो त्या आडोशाआडच गांधीजींची ती बसायची जागा होती.
पिशवीतून कार्ड काढलं, आणि त्यावर पेन्सिलनं कसलं तरी चित्र काढू लागलो. मनातलं झाड हळूहळू वर येत होतं. भोवतीचा विसर पडला. एकदम समोर लक्ष गेलं. गांधीजींची जागा दिसली. भास झाला, की गांधीजी तिथं बसले आहेत आणि हसून मला येण्याची खूण करत आहेत. मला गंमत वाटली. या भासाला मी आपण होऊन चालना दिली. काय होईल पुढं? गांधीजी माझं चित्र पाहतील आणि हसतील छान.
ते पडक्या दातांचं निर्मल हासू…
-अनिल अवचट
सौजन्य – महाराष्ट्र टाइम्स आणि लेखसंग्रह
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1228610630523319&id=100001231821936
डॉ. अनिल अवचट हे केवळ लेखक, पत्रकार व सामाजिक कार्यकर्तेच नसून ते एक कलाकारही आहेत. त्यांची चित्रे, लाकडातील शिल्पे, छायाचित्रे,ओरिगामी, बासरी वादन यांतून त्यांच्या अंगभूत गुणांची ओळख पटते.
लेख वाचल्याबद्दल धन्यवाद.
पण शक्य असल्यास एवढया पुरते च मर्यादित राहू नये तुम्हाला जसे समजले तसे इतरांनाही सत्य समजावे म्हणून तुम्ही हा लेख त्त्यांच्या किंवा गांधीजींच्या किंवा तुम्हाला वाटेल त्या फोटोसह तुमच्या timeline वर स्वतंत्रपणे पोस्ट करावा ही विंनंती जेणेकरून
जास्त जण वाचतील
सोबतच अधिक जाणून घ्यायची इच्छा असल्यास-
गांधीविचारांच्या प्रसारसोबतच कृती कार्यक्रम करणारा knowing Gandhism Global Friends नावाचा समुह फेसबुक आणि whatsapp वर active आहे
Whatsapp वरील तो समुह जॉईन करण्यासाठी comment मध्ये दिलेल्या लिंकला क्लीक करावे तेथे तुमचा परिचय झाल्यावर तुमची सत्यता तपासून तुम्हाला मुख्य समूहात add केले जाईल
संकेत मुनोत
8087446346
आवडल्यास Share करा
