AddThis code

Saturday, June 24, 2023

जोडीदार निवडी बद्दल च्या एका ग्रुप मध्ये झालेली चर्चा आणि त्यात मी मांडलेली मते

जोडीदार निवडी बद्दल च्या एका ग्रुप मध्ये झालेली चर्चा आणि त्यात मी मांडलेली मते कशी वाटतात पहा..
[10/05, 8:10 am] एक सदस्य:
जाती धर्मात लग्न व्हायला हवे कारण लग्नानंतर जी ritual practices असतात त्यामधे काही differences नको यायला. उदा. एखादे कार्य पार पडत असताना तिने/त्याने असे म्हटले की 'आमच्या कडे असं नसतं, तुमच्या कडे जरा वेगळंच आहे, त्यापेक्षा आमच्याकडे चांगल होत ई.' हे differences sort करण्यात वेळ जावू शकतो. म्हणून धर्मातील/समाजातीलच जोडीदार.
हे माझे वैयक्तिक मत आहे.
[10/05, 8:28 am] Sanket Munot : हो ती अडचण आहे . पण मला उलट वाटत की दुसऱ्या धर्मातील जोडीदार असला तर चांगले . एकमेकांच्या वेगळ्या पद्धती समजतात आणि त्या फॉलो करण्यात पण मजा असते.
माझे हिंदू मुस्लिम लग्न झालेले मित्र मैत्रीण ईद- दिवाळी दोन्ही सण छान साजरे करतात
[10/05, 8:52 am] Sanket Munot : शिवाय आपण आपल्याच जाती धर्मात शोधायला गेलो तर पर्याय कमी राहतात. उदाहरणार्थ मी ज्या जाती धर्मात जन्माला आलो त्यात बहुतेक लोक फक्त money minded आहेत. पैशानेच सगळ साध्य होऊ शकते असे त्यातील बहुतेकांना वाटते आणि तेवढेच जग असते. म्हणजे पैसा माझ्यासाठी पण गरजेचा आहे पण फक्त तो म्हणजे काही माझ्या आयुष्याचे ध्येय नाही.
नोकरी व्यवसाय यातून अर्थार्जन करावेच पण स्वतः ला अधिकाधिक उन्नत बनवणे, स्वपरिवर्तन सोबत हळूहळू समाज परिवर्तन पण घडवणे हे माझे ध्येय आहे. पण त्यांना त्याचे महत्व समजत नाही, आणि आपण त्यांना सांगावें तरी कसे?
डॉ अभय बंग यांना भेटलो तेव्हा ते म्हणाले की तुझं काम unsusual असे आहे तर तुषार गांधी सर बोलले की आम्ही जे काम 60 वर्षात नाही करू शकलो ते याने 7 वर्षात करून दाखवले. म्हणजे कौतुकाने हुरळून जायचे नाही पण माझ्या जाती धर्मातील लोक ज्या कुत्सित दृष्टीने बघतात आणि कमी लेखतात ना की असे शब्द आठवून स्वतः ला ऊर्जा द्यावी लागते. विशेष चिंता जी कोणी जोडीदार होईल तिची वाटते की निदान तिला तरी आपल्या कामाची थोडीशी जाण असावी.
तिने याला कमी लेखले तर मानसिक खच्चीकरणच होणार. कारण आमच्या धर्मातील बहुतेक लोकांची वैचारिक बैठकच नसते. Romantic गप्पा वगैरे मारूच पण कधी तरी मी कधीतरी वैचारिक गप्पा पण मारता याव्यात असे वाटते.
मला इतर जाती धर्मातील मुलींच्या बाबत तसे वाटत नाही कारण त्यांना वाढवताना फक्त पैसा-पैसा ही चाकोरी नसते. तर त्यामुळे जेव्हा आपण या जाती धर्माच्या चौकटी बाहेर जाऊन विचार करू तेव्हा आपल्याला पर्याय अधिक वाढतील आणि वैचारिक प्रगल्भता असणारा जोडीदार मिळणे सोप्पे जाईल.
आयुष्यात पैसा महत्वाचा असला तरी तोच सर्वकाही नसतो. आपण छोट्या-छोट्या गोष्टीतून ही आनंद घेऊ शकतो हे माझ्या जातीधर्मातील लोकांना समजावून सांगणे हे महा कठीण काम आहे.
डॉ अभय बंग- राणी बंग यांनी त्यांना परदेशात आणि इकडच्या शहरात मिळत असलेले लाखो रुपये महिन्याचे पॅकेज नाकारले आणि इकडे गावात जाऊन साधे जीवन स्वीकारले आणि एका ध्येयासाठी जीवन समर्पित केले त्यांच्या मुळे फक्त भारतातलाच नव्हे तर जगातला बालमृत्यू दर कमी झाला . कोट्यवधी रुपये दान करून पण ही गोष्ट कुणाला साध्य करता आली नसती ती त्यांनी गांधी विचार चळवळीच्या माध्यमातून साध्य केली. पण डॉ राणी बंग यांना आपला नवरा काय करतोय याची जाणीव होती आणि त्या संघर्षात त्या त्यांच्या सोबत उभ्या पण होत्या आणि पैसे कमी होते म्हणून काही त्यांचे प्रेम कमी झाले नाही. दोघेही नवनवीन गोष्टी शिकत राहिले आणि एकमेकाची वैचारिक, भावनिक आणि बौद्धिक प्रगल्भता वाढवत राहिले. हेच महात्मा जोतिबा फुले यांच्या बाबत त्यांनी जी प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात काम केले त्यामुळे त्याकाळच्या सगळ्या ब्राम्हण मंडळींनी त्यांना तीव्र विरोध केला. एखादी ego वाली मूर्ख पत्नी असती तर जोतिबांना म्हणली असती की काय करायचे हे करून आपण भले आपले घर भले पण तसे झाले नाही. त्यांनी त्यांच्या कामाचे महत्व जाणले. त्या काळात स्त्रिया शिकत नसत पण ज्योतिबा म्हटले म्हणून त्या स्वतः तर शिकल्याच पण तेवढ्या पुरते मर्यादित न राहता त्यांनी संघर्ष करून इतरांना शिकवले. आज आपण मुलींसाठी शिक्षणाचा हक्क मिळालेला पाहतो त्यात त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी जर घरात संघर्ष केला असता की मी अशिक्षित च राहणार आणि तुम्ही काय हे फालतू धंदे करताय तर जोतिबांना किती अवघड गेले असते. कदाचित त्या संघर्षातच त्यांचे जीवन गेले असते पण साथ मिळाल्यामुळे दोघेही घडले आणि आज त्यांना पाहून लाखो लोक घडले.
हेच महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी बद्दल पण वाटते. कस्तुरबा नी पूर्वी typical पत्नी प्रमाणे गांधीजींच्या बऱ्याच सुधारणावादी गोष्टींना विरोध केला पण नंतर त्या गोष्टी फक्त स्वीकारल्याच नाही तर भक्कम साथ गांधीजींना दिली. अजूनही जवळपास अशी बरीच उदाहरणे आहेत.
यांना जोडीदाराची साथ मिळाली म्हणून यांचे काम दुपटीने वाढले. त्यामुळे ती निवड काळजी पूर्वक करायला हवी असे वाटते. दोन चांगल्या व्यक्ती चांगले जोडीदार असतीलच असे नाही. मला तर असे वाटते की आधी चांगली मैत्री करावी मग गोष्टी जुळल्या तर हळूहळू प्रेमात पडतो आपण मग वाटल तर लग्ना साठी पुढे जावे नाहीतर दोघांनी चांगले मित्र राहून नवीन जोडराराचा शोध घ्यावा. यात थोडे तरी साम्य पहावे . जसे की एखादा गायक असेल तर त्याला पत्नी गायक नसली तरी निदान त्याचे गाणे ऐकणारी त्याला दाद देणारी रसिक तरी असावी. लेखक असेल तर जोडीदार लेखक नसला तरी किमान जोडीदाराचे लेख तरी आनंदाने वाचणारा, समजून घेणारा असावा. हेच इतर क्षेत्रांच्या बाबतही. Make for Each other कोणी नसते पण थोडे mould for each other व्हायला. आपल्या जोडीदारासाठी स्वतः त नकारात्मक नव्हे तर सकारात्मक बदल करायला हवेत. माझे जीवनातीलच उदाहरण सांगतो मला पूर्वी प्राणी वगैरे आवडायचे पण मी कधी त्यांना हातात उचलून घेतले वगैरे प्रकार केले नाहीत पण माझ्या एक्स पत्नीला कुत्रा मांजर खूप आवडायचे तर तिच्यासोबत फिरायला गेल्यावर मी आपोआप कुठे मांजर किंवा लहान कुत्रा दिसला तर उचलून घेत असे तिला हातात देत असे, ती जे काही काम करे त्याबद्दल मला आदर होता पण तिला मात्र माझे काम , विचार समजत नव्हते मग गैरसमज वाढत गेले आणि नाते तुटले. मी समजवण्याचा बराच प्रयत्न केला पण नाही वाचवू शकलो ते नाते. आता तिला मनाजोगा जोडीदार मिळाला ती तिच्या जीवनात आनंदी आहे आणि मला ही कधी तरी जोडीदार मिळेलच. पण हे जर लग्नापूर्वी लक्षात आले असते , तेव्हा जास्त वेळ घेतला असता तर हे जुळणे, तुटणे वगैरे त्रास वाचला असता.
आजकाल आई वडिलांचा हस्तक्षेप पण खूप वाढला आहे लग्नात . एखादी चांगली सकारात्मक गोष्ट सांगितली जोडीदाराला तर त्याचे किंवा तिचे आई वडील त्याला किंवा तिला इंटरेस्ट नाही तर तो नाही करणार , तुम्ही तुमचे करा असे म्हणतात त्यातून जोडीदाराची प्रगती खुंटते. उदा - राजेश ला चालणे , व्यायाम करणे बिलकुल आवडत नसे तर त्याची योगा कोच असलेली पत्नी प्रिया त्याला आग्रह करत असे थोडे चाल, व्यायाम कर पण त्याला इंटरेस्ट नव्हता आणि तब्येत दिवसे दिवस अधिक जाड होत चालली होती पण त्याने ऐकले नाही, त्याच्या आई वडीलांनी प्रियालाच तंबी दिली की तुला करायचं तर तू कर योगा पण तो काही करणार नाही. सेम समीर आणि स्नेहा बद्दल . समीर एक अभ्यासू व्यक्ती होता समाजात घडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टीबद्दल त्याची मते घेतली जात पण त्याची पत्नी स्नेहा याबाबत बिलकुल विरुद्ध होती तिला वाचनात बिलकुल रस नव्हता आणि आजूबाजूचे काहीही सामान्य ज्ञान नव्हते . समीर ने तिला जे आवडेल ते वाचण्याचा सल्ला दिला पण तिने नकार दिला शिवाय घरचे उलट म्हणाले की नाही वाचणार ती नसले सामान्य ज्ञान तर काय फरक पडतो. इथे खरतर राजेश च्या सी वडीलांनी प्रियाला आणि स्नेहा च्या आई वडीलांनी स्नेहाला याबद्दल आग्रह करायला हवा होता ते काही वाईट सांगत नव्हते. एक शरीर चांगले करण्यासाठी आवश्यक होते तर एक मेंदू अधिक चांगले करण्यासाठी आवश्यक होते पण दोन्ही कडे त्याचे महत्वच समजत नसल्यामुळे जोडीदाराची दमछाक झाली. आपल्यातल्या चांगल्या गोष्टी तर कोणी स्वीकारेल पण उणीवा कमी करायला लावेल तो खरा जोडीदार...
लग्न मजबूरी म्हणून नव्हे तर मजबुती म्हणून करावे . त्यातून एकमेकांना भक्कम आधार मिळावा. शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक प्रगल्भता वाढावी असे मला वाटते..
संकेत मुनोत

Great Bhet with Friend and Interior Designer Ganesh Chondhe


आज घरी आले होते. मनसोक्त गप्पा झाल्या
खूपच अभ्यासू , प्रामाणिक आणि दिलदार माणूस.लहानपणापासून संघर्षात जीवन गेले.शिक्षण करतांना कमवा आणि शिका या योजनेद्वारे स्वतःचे शिक्षण पूर्ण केले.सुरवातीची अनेक वर्षे फेविकॉल आणि अनेक कंपन्यांमध्ये मार्केटिंग, सेल्स अश्या संघर्षाच्या नोकऱ्या करत अनेक रिजनल मॅनेजर पर्यत उत्कर्ष केला, त्यानंतर स्वतःतिल गुणांना वाव देत pesticide चा व्यवसाय सुरु केला हे करताना त्यांनी भारतातील अनेक ऐतिहासिक संग्रहालये आणि इमारतींना वाळवी आणि इतर समस्यांपासून संरक्षित केले, लग्न झाल्यावर पत्नीकडून स्वतःच्या सुप्त कलागुणांना वाव देत इंटिरियर डेकोरेशन शिकले सोबत एवढा पूर्वीचा मोठा अनुभव होताच आणि आज यातूनच एवढा मोठ्ठा टप्पा पार केला.जिथे भल्या भल्या लोकांचे डोक काम करणे थांबते तेथे यांचे सुरु होते.घराचे इंटिरियर करतांना अनेक आकर्षक कल्पना त्यांनी नव्याने आणल्या आहेत आणि तेवढयापुरतेच मर्यादित न राहता त्त्यांनी सामजिक चळवळीत ही मिळेल तसे योगदान दिले आहे knowing Gandhism समूहात त्यांचे महत्वाचे योगदान आहे.पुण्यात ट्रॅफिक चे जे cctv कॅमेरे आहेत ते पोलीस कंट्रोल रूम मध्ये पाहण्यासाठी 16 संगणक ठेवणे गरजेचे होते पण कसे ठेवावे ते समजत नव्हते पण सरांनी आपल्या अवलिया बुद्धीने अशी काही रचना पुणे पोलिसांना करून दिली कि ते 16 संगणक तेथे ठेवून निरीक्षण करणे सोपे झाले.स्वतःला त्या क्षेत्रापुरते मर्यादित न ठेवता सरांनी क्रिकेट आज योगातही चांगले यश मिळवले आहे त्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार ही मिळाले आहेत
मला सर्वात जास्त आवडला तो त्त्यांचा #प्रामाणिकपणा
लिहायचा लवकर श्रीगणेशा करा गणेशजी वाट पाहतोय.
(ओळखीचा संदर्भ- चांगले विचार युवा व्याख्यानमालेत आले होते त्यांनतर समूहाच्या कृतिकार्यक्रमाच्या मिटींगला आले , मग वाई च्या स्नेहसंमेलनात अनेकांना बोलावण्यापासून ते तेथे स्वतःच्या गाडीत घेऊन जाण्यापर्यत अनेक जबाबदाऱ्या त्त्यांनी चोखपणे पार पाडल्या)
#फेसबुकवरीलमैत्री #अवलीयाव्यक्तिमत्व
Comment, Share ,Follow and Subscribe.

आजोबा आणि चिमुकला







राजगुरुनगर एस टी स्टँड वर पुणे जाण्यासाठी एक तास थांबलो पण एस टी महा मंडळाची लाल, पांढरी गाडी आणि शिवशाही अश्या ८ गाड्या गेल्या पण सगळ्या फूल . लोक उभे राहून जात होते शेवटी या गाडीत चढलो आणि उभे राहूनच प्रवास सुरू केला...
यात आजोबा एका सीटवर विनंती करून कसे तरी बाजूला बसलेले दिसले . इकडे हा चिमुकला आणि त्याची आई मागे उभे होते. हा चिमुकला बसमध्ये इकडे तिकडे करताना आजोबांना स्पर्श करतो. आजोबा त्याला बसायला जवळ घेऊ लागतात.
चिमुकल्याची आई म्हणते "अहो तुम्हालाच जागा नाही त्याला कुठे बसवणार? " त्या चिमुकल्याला सांगते की "त्यांना त्रास देऊ नको." आजोबा स्वतः एवढ्याश्या जागेत बसलेले असताना त्याला जवळ घेऊन बसतात . तो चिमुकला त्यांच्या काठीशी खेळतो , ती खालीही पाडतो. ते पुन्हा उचलतात पुन्हा खाली पाडतो. आई रागावते पण आजोबा आणि चिमुकला दोघे एकमेकांच्या कडे बघून हसतात आणि खेळतात..
मागे बसलेला एक प्रवासी उठतो आणि त्याच्या आईला ताई तुम्ही बसा म्हणतो. चिमुकल्याची आई ती जागा आजोबांना देते अणि उभी राहते.
पुढे जाऊन थोड्या वेळाने अजून काही प्रवासी उतरतात आणि सर्वांना जागा मिळते.
फोटोत आजोबा आणि चिमुकल्याच्या चेहऱ्यावरची smile बघा.....😊
तर असा मस्त प्रवास....
कुठे तरी वाचले होते एस टी चा प्रवास मनोरंजन हमखास...
ते प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले...
संकेत मुनोत
8668975178
(टिप - हे लिहल्यावर चिमुकल्याच्या आईला दाखवले , त्यांना ते आवडले मग त्यांच्या परवानगीनेच पोस्ट केले)
Comment, Share ,Follow and Subscribe.

जेष्ठ #गांधीवादी श्री वसंतरावजी बोंबटकर


संत आचार्य विनोबा भावे के शिष्य, जयप्रकाश नारायण के संपूर्ण क्रांति आंदोलन के योद्धा,भूदान, ग्रामदान ,गोभक्त, कृषि विज्ञान के शोधकर्ता, जैविक सजीव खेती के ऋषि,नैडेप कंपोस्ट खाद,झटपट खाद के समर्पित प्रचारक,लेखक,चिंतक, सर्वोदय समाज के संयोजक श्री वसंतरावजी बोंबटकर इनका 31मई 2022 को देहांत हो गया| उनकी अंत्ययात्रा आज 01जून 2022 को उनके वर्धा के घर से निकलेगी। सुबह 10 बजे मोक्षधाम , वर्धा यहा पे होगा|
अभी दिसंबर 2021 में ही उन्हे पहली बार मिला था और करीबन 1-2 घंटे बातचीत हुई | उनका ममता वाला स्पर्श और आशीर्वाद आज भी याद है| वे कैसे इन विचारो के तरफ मुड़े और उन्होंने क्या-क्या किया? ये जानना बहुत ही प्रेरणादाई अनुभव था| उनके जमाई तथा मुझपे सदा स्नेह बरसाने वाले खेतीतज्ञ मनोहर खके काका Manohar Khake ने मुझे उनसे मुझे मिलवाया| वह बीमार होने के कारण बेड से उठ नही सकते थे फिर भी उन्होंने मैं जो कार्य रहा हु उसे जाना और सही मार्ग पे चल रहे हो कहकर शुभकामनाएं भी दी|
दोस्तो पैसे तो कोई भी कमा लेता है पर सच्चाई के राहपे चलके लोगोके आंसु पोंछकर ,गलत बातों के विरुद्ध भूमिका लेना, संघर्ष करना और रचनात्मक काम करना बड़ा मुश्किल होता है पर राष्ट्रपिता महात्मा गांधी ऐसे थे कि उन्होंने लोगो को वह राह दिखाई और दुनिया में बड़ा बदलाव लाया
उनकी यांद में बापुका ये गीत याद आता है
जब जब तेरा बिगुल बजा जवान चल पड़े|मजदूर चल पड़े थे और किसान चल पड़े| हिंदू और मुसलमान,सिख, पठान चल पड़े|कदमों में तेरी कोटी कोटी प्राण चल पड़े|फूलों की सेज छोड़कर दौड़े जवाहरलाल|साबरमती के संत तूने कर दिया कमाल ।
सरदार पटेल S.Vallabhbhai Patel जो अपनी बैरिस्टर की प्रैक्टिस में बहुत अच्छा पैसा कमा कर ऐशोराम की जिंदगी जी रहे थे वो हो या नेहरू, Dr. Rajendraprasad , Lal Bahadur Shastriji और देश के लाखो लोग हो वो बापू की प्रेरणा से इस संघर्ष और रचनात्मक कार्य की राह पर चल पड़े और उस वजह से देश भी आजाद हुआ और 75 वर्ष से ज्यादा साल एकजुट भी रहा
वसंतरावजी ने खेती विषय पे अनेक पुस्तिकाएं लिखी | ठाकुरदास बंग की पहला जीवन चरित्र उन्होंने लिखा| और कई किताबे लिखी, अनुवादित की
तो ऐसे वसंतराव जी बोंबटकर जी को मेरे भाव भरा अभिवादन
यहां मैं आपको वचन देता हु की आप जिस तरह #सत्य और #प्यार की राह पर चलते रहे उसी राह पे हम आगे बढ़ते रहेंगे
जय जगत
संकेत मुनोत
Jaihind People's Movement
Comment, Share ,Follow and Subscribe.

ज्यांचे धडे शाळेच्या पाठ्यपुस्तकात वाचले त्या दिग्गजांनी गाजवलेल्या वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावर बोलण्याची संधी



ज्यांचे धडे शाळेच्या पाठ्यपुस्तकात वाचले त्या दिग्गजांनी गाजवलेल्या वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावर बोलण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट होती
आत्तापर्यंत *डॉ. ॲनी बेझंट,कर्मवीर भाऊराव पाटील,प्रबोधनकार ठाकरे, एस.एम. जोशी, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, हमीद दलवाई, डॉ. बाबा आढाव, पन्नालाल सुराणा, मृणाल गोरे, नानासाहेब गोरे, विठ्ठलराव गाडगीळ, डॉ. नरेंद्र दाभोळकर,डॉ. अनिल अवचट, रँग्लर परांजपे, बॅरिस्टर नरिमन, जमनादास मेहता, भालाकार भोपटकर, ग.प्र.प्रधान, गोदावरी परुळेकर, वि.स. पागे, कुमार सप्तर्षी, सिंधुताई सपकाळ आणि अश्या अनेक मान्यवरांनी या व्याख्यानमालेत आपले विचार मांडले
त्या वाई च्या वसंत व्याख्यानमालेत मी 'अमृत महोत्सवी स्वातंत्र्य जपायचे कसे?' या विषयावर मी माझे विचार मांडले
गांधी , बोस , भगतसिंग आणि त्यांच्या अनुयायांनी खूप कष्टांनी बलिदान देऊन, लाठ्या झेलून स्वातंत्र्य मिळवले. 500 पेक्षा जास्त संस्थानात विभागलेला हा देश गांधी, पटेल आणि नेहरू यांनी एकत्र केला.
पण सध्या देशात जात, धर्म, पंथ , वर्ग यावरून द्वेष पेटवला जात असून त्यातून देश आता पुन्हा तुटण्याच्या मार्गावर आहे. त्यावेळी "हे स्वातंत्र्य जपायचे कसे, समाजात प्रेम आणि सुसंवाद वाढवायचा कसा?" त्यावर मी विचार मांडले.
प्रेम ❤️ ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे ती जेव्हा आपण बाहेर वाटतो तेव्हा आपले हृदय पण प्रेमळ होऊन जाते..
महावीर, बुध्द, कबीर, तुकाराम, फुले, आंबेडकर यांचे प्रेम वाढवण्यासंदर्भात विचार ही या अनुषंगाने मांडले
आर्याबागकर मित्र डॉ. शंतनु अभ्यंकर आणि मा. लक्ष्मीकांत रांजणे यांच्या मुळे मला ही संधी मिळाली त्यांचे खूप आभार..
तर प्रेम वाटत राहूया...❤️❤️
(हे व्याख्यान मागच्या वर्षी झाले पण घरातील इतर कामांच्या व्यापात त्याबद्दल लिहू-लिहू म्हणत वर्ष निघून गेले अणि विसरून गेलो. आज गुगल फोटो मेमरीत फोटो सापडला आणि लिहून काढले...)
संकेत मुनोत
Comment, Share ,Follow and Subscribe.

उन्हाळ्यातही गारवा अनुभवायचा असेल तर वाई बेस्ट












उन्हाळ्यातही गारवा अनुभवायचा असेल तर वाई बेस्ट आहे.
तिथे माझे व्याख्यान ऐकायला सन्मित्र कृष्णा काजळे चे मित्र भावेश इंगळे आले होते जे आता माझेही मित्र आहेत. व्याख्यानाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी मला वाई मधील प्रेक्षणीय स्थळे दाखवली..
कृष्णा नदीच्या काठावर दक्षिण काशी म्हणून वाई हे विख्यात धार्मिक क्षेत्र आहे. कृष्णा नदीवर अनेक घाट व प्राचीन मंदिरे आहेत. सरदार रास्ते यांनी वर्ष 1672 मध्ये एकाच दगडातून घडविलेली ढोल्या गणपतीची भव्य मूर्ती, सिध्देश्वर मंदिर, त्यातील सिध्दनाथची संजीवन समाधी, गंगा रामेश्वर, काशी विश्वनाथ, लक्ष्मी नारायण अशी अनेक मंदिरे आहेत.
मराठी विश्वकोशाचे प्रकाशन वाई येथूनच होते.
गणपती आळीच्या घाटावर कृष्णा तीरी ढोल्या गणपती हे वाईतील सर्वात मोठे व भव्य मंदिर पेशव्यांचे सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी बांधले. गाभाऱ्यात गणपतीची पाषाणाची 6 फूट उंच व लांबी 7 फूट अशी बैठी मूर्ती आहे. मंदिराच्या भव्य सभागृहाला तीन्ही बाजूंनी कमानी आहेत.
कृष्णा नदी काठी असलेले मेणवली गावात पेशवाईतील एक मुत्सद्दी व राजकारणी नाना फडणवीस यांचा गढीचा वाडा आहे. कृष्णा नदीच्या काठावरील केदार घाट व मंदिर प्रेक्षणिय आहेत.
सिंगम या चित्रपटाचे शूटिंग इथेच झाले...
इथून जवळच महाबळेश्वर, पांचगणी आणि अनेक गोष्टी आहेत...
Comment, Share ,Follow and Subscribe.

एवढे क्रूर आणि हिंसक का बनत चाललेत लोक?

मुंबईत मनोज साने (56) याने आपली प्रेयसी सरस्वती वैद्य (32) हिच्या चरित्रावर संशय घेऊन तिचा खून केला. मग तिच्या शरीराचे तुकडे करून तो मिक्सर मध्ये बारीक करून कुकर मध्ये शिजवायचा आणि कुत्र्यांना खाण्यास द्यायचा. मला तर हे वाचताना आणि ऐकताना ही कसे तरी वाटते पण त्याने हे प्रत्यक्षात केले आहे.
काही धर्मांध लोक हे ठराविक एका धर्माच्या माथी मारायचा प्रयत्न करतात पण सगळी उदाहरणे बघितली तर यात धर्म, जात, पंथ , वर्ग, लिंग यांचा काही संबंध नाही.
मनात द्वेषपूर्ण आणि हिंसक विचार वाढत आहेत त्याला कारण
म्हणजे वातावरण . सतत हिंसेच्या आवश्यकतेवर भाषण करणारे नेते, त्याच प्रकार चे भडक चित्रपट, व्हॉट्सॲप साहित्य, लेख... ई
हे कमी करायचे तर आपसात प्रेम आणि संवाद कसा वाढेल. राग अहिंसक पद्धतीने कसा व्यक्त करता येईल इ. बद्दल चित्रपट, नाटक, व्याख्यान, निबंध स्पर्धा, सोशल मीडिया वरील साहित्य आणि वेगवेगळ्या मार्गाने प्रबोधन कसे होईल याचे प्रयत्न करायला हवेत.
संकेत मुनोत
Comment, Share ,Follow and Subscribe.

अन्नपूर्णा मासिकाच्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेले माझे भाषण.. धर्म, धार्मिकता आणि धर्मांधता






अन्नपूर्णा संस्थेचे काम पाहून मला खूप आनंद झाला. मुख्य आनंद या गोष्टीचा कि गांधीजींच्या प्रत्त्येक आंदोलनात आणि रचनात्मक कामात दिसायची तशी महिलांची मोठी संख्या इथे दिसते आहे.शिवाय अन्नपूर्णा ही संस्था ही रचनात्मक कामाचे आदर्श उदाहरण आहे.
आजचा विषय मला दिला तो म्हणजे धर्म, धार्मिकता, धर्मांधता आणि गांधीविचार माणसाला माणसाशी जोडतो तो धर्म तर माणसापासून माणसाला तोडते ती धर्मांधता .
आज धर्मांध लोकांचा आवाज मोठा झाल्याने सगळीकडे धर्माची चुकीची प्रतिमा उभी राहिली आहे. आज बहुतेक धर्मामध्ये त्या धर्माचे चांगले तत्वज्ञान सोडून कर्मकांड जास्त वाढले आहे.कर्मकांड हे धर्मच्या १०% च असायला हवे पण आज कर्मकांड ९०% आणि १० % तत्वज्ञान असे सुरु आहे.यासोबतच आज moral values पेक्षा identification values ला जास्त महत्व दिले जाते . टिकली , कुंकू, टिळा , टोपी यांच्या सारख्या identification values वर जास्त भर दिला जात आहे तर धर्मात असलेले बंधुभाव , प्रेम सारख्या moral values ला महत्व दिले जाते नाही .आपल्या देशात अनेक महामानव आणि सुधारक झाले ज्यांनी सत्य आणि परखड विचार मांडले पण बहुसंख्यांक लोकांचा पाठिंबा न मिळाल्याने त्यांचे विचार मोठ्या प्रमाणात अमलात येऊ शकले नाही . पण महात्मा गांधींना जनतेचा मोठा पाठिंबा मिळाल्याने ते मोठा बदल घडवू शकले. म्हणजे महात्मा गांधींच्या मागे जेवढे हिंदू, मुस्लिम आणि अन्य धार्मिक लोक होते त्याच्या १० % सुद्धा त्या काळात स्वतःला धर्मरक्षक म्हणवणाऱ्या हिंदू महासभा , राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , मुस्लिम लीग सारख्या धर्मांध संघटनांच्या मागे नव्हते. विशेष म्हणजे महात्मा गांधींना आदर्श मानणारे त्यांच्या विचारांवर चालणारे अनेक मोठे साधू , धर्मगुरू वगैरे तेव्हा मोठ्या प्रमाणात होते जे त्यांच्या अनुयायांना पण उदारमतवादी निर्भय भूमिका घ्यायला सांगत. आचार्य विनोबा भावे मौलाना आझाद , स्वामी रामानंद तीर्थ , राष्ट्रसंत गाडगे बाबा , जैन साध्वी उज्वलकवरजी, राष्ट्रसंत गाडगे बाबा अशी असंख्य नावे आपणास यासंदर्भात दिसतील.
पण आज याच्या उलटे घडत आहे बहुतेक धर्मामध्ये मूर्ख संकुचित लोकांनी स्वतःला त्या धर्माचा साधू म्हणवत द्वेष पसरवणे सुरु केल्याने त्या धर्माचे , समाजाचे आणि देशाचे मोठे नुकसान होत आहे. कालीचरण , सूर्यसागर आणि वेगवेगळ्या धर्मातील अश्याच प्रकारचे ढोंगी साधू साध्वी धमाच्या नावावर समाजात फूट पाडत आहेत. पण याला उत्तर म्हणजे ते चुकीचे म्हणजे धर्मच चुकीचा आणि ते पाळणारे सगळे लोक मूर्ख असा काढता कामा नये .उलट धर्मची उदारमतवादी बाजू समोर आणणे अश्यावेळी जास्त महत्वाचे आहे.
महात्मा गांधींमुळे धर्मात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या आणि लोक बदलले. राजकारण , समाजकारण, धर्मकारण यामध्ये पूर्वी फक्त उच्चभ्रू आणि उच्चवर्णीयांचे वर्चस्व होते.गांधींनी ते बदलून सर्व जाती जमातींना यात नेतृत्व दिले विशेष म्हणजे जे उच्चवर्णीय होते तेही मोठ्या प्रमाणात गांधीजींच्या सोबत होते आणि स्वतःचे अधिकार सोडून ते ज्या कामाला ही दर्जाचे काम तेव्हा म्हटले जाई असे गांधींमुळे करु लागले यामुळे गोडसे सारखे काही ठराविक लोक भडकले ज्यांना त्यांचे जातिय वर्चस्व कायम ठेवायचे होते आणि त्यांनी गांधींच्या हत्येचे प्रयत्न सुरु केले. २५ जून १९३४ मध्ये पुणे येथे गांधींवर पहिला हल्ला झाला जेव्हा त्यांच्या कारवर बॉम्ब फेकण्यात आला पण नेमकी गांधीजी मागच्या गाडीत बसलेले असल्याने पुढे बसलेला ब्रिटिश अधिकारी जखमी झाला . त्यानंतर १९४२,१९४४ मध्ये दहशतवादी गोडसेने त्यांच्यावर ४ हल्ले केले या ५ ही हल्ल्याच्या वेळेस फाळणी , ५५ कोटी वगैरे काहीही प्रश्न नव्हते तर हल्ल्याचे एकमेव कारण होते ते गांधींनी चालवलेल्या धर्मसुधारणा आणि त्यांना मिळणारा मोठा जन प्रतिसादआता कोण कोणते बदल घडले ते पाहू. पहिला बदल म्हणजे महिला- या काळात महिला वर्गावर घुंगट, पडदा आणि अनेक परंपरा लादून त्यांना चूल आणि मूल एवढ्यापुरतेच मर्यादित ठेवले जायचे. गांधींनी त्यांना निर्भयपणे रस्त्यावर उतरून आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यायला लावला शिवाय चरख्यातून हजारो महिलांना रोजगारही दिला .याबद्दलचा सुरुवातीचा प्रसंग प्रेरणादायी आहे . गांधीजींची बिहार मध्ये सभा होती तेव्हा तिथे सम प्रमाणात महिला असतील तरच मी येईल असे गांधी म्हणाले आणि विशेष म्हणजे तिथे ते घडले पुढे आपल्या देशात महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला तो याचीच परिणीती होती. आपल्या पूर्वीही स्वातंत्र्य मिळालेल्या आणि लोकशाही आलेल्या अनेक देशांना मतदानाचा अधिकार नव्हता त्यासाठी त्यांना मोठा लढा द्यावा लागला.
गांधीजींनी केलेल्या लोक चळवळीमुळे तो आपल्याला स्वातंत्र्यासोबतच मिळाला. आता धर्म आणि जातीत कसे बदल घडले ते पाहू. साधे पगडीचे उदाहरण घ्या . ज्याची जेवढ्या जास्त पिळाची पगडी तेवढी त्याची जात मोठी आणि त्यावरून त्याला येता जाता नमस्कार केला जाई. महात्मा गांधींनी सगळ्यांना सामान खादी टोपी देऊन ही जात ओळखण्याची पद्धतच मिटवली. हरिजन सहभोजन उपक्रम सुरु केले . हजारो मंदिरे ज्यात आपल्याच लोकांना अस्पृश्य समजून प्रवेश नाकारला जात असे ती गांधीजींच्या आंदोलनामुळे खुली झाली . जिथे उंबरा ओलांडण्याची परवानगी नव्हती पाणी बाहेर वरतून दिले जायचे तिथे गांधींनी सांगितल्यामुळे भारतभर लोक त्यांना घरात घेऊन सोबत जेवू लागले, मी फक्त आंतरजातीय विवाहातच उपस्थित राहणार या त्यांच्या विचारामुळे हजारो आंतरजातीय विवाह लागले . गांधीजींनी स्वतःच्या मुलाचाही वाई येथे आंतरजातीय विवाह लावला होता तेव्हा ही पुण्यातील सनातनी चिडले होते आणि त्यांनी या गांधीचा काही तरी बंदोबस्त केला पाहिजे असे म्हटले होते .
पण हे सगळे करताना हे लक्षात घ्यावे लागेल कि गांधीजींनि हे बदल हळूहळू हृदयपरिवर्तनातून केले होते. आपल्यापैकी बरेच लोक जेव्हा धर्मावर टोकाची टीका करतात तेव्हा त्या धार्मिक व्यक्ती ही आपल्यापासून दूर जातात. गांधीजी आणि इतरांमध्ये फरक हा कि . इतर लोक ५ पाऊले पुढे जाऊन मागच्या माणसाला फरफटत त्यांच्या सोबत नेण्याचा प्रयत्न करतात ज्यामुळे ती माणसे हात सोडून दुसऱ्या दिशेने जातात तेच गांधीजी त्या लोकांना सोबत घेऊन एक एक पाऊल टाकतात त्यामुळे जास्त लोक त्यात सहभागी होतात. गांधीजींनी जी धार्मिक स्पेस घेतली होती ती आज आपण गमावली आहे त्यामुळे आज राम गांधीजींचा नसून तो अडवाणींचा राम बनला आहे.
आपल्या देशाचे हिंदू राष्ट्र झाले तर फक्त मुस्लिम आणि ख्रिश्चन यांना दुय्यम स्थान नाही मिळणार तर जैन, बौद्ध , शीख आणि सामान्य हिंदूंची आणि महिलांची अवस्था बिकट होईल . कारण द्वेष करणार्यांना काही तरी लक्ष्य लागते आज ते मुस्लिमाचा द्वेष करतात उद्या ते संपल्यावर ख्रिश्चन मग जैन , बौद्ध , सामान्य हिंदू आणि महिलांचा क्रमांक लागेल यापासून वाचायचे असेल तर भारताचे हिंदुराष्ट्र , मुस्लिम राष्ट्र किंवा अन्य कुठल्याही धर्मचे राष्ट्र न बनता हा महात्मा गांधींनी घडवलेले सर्वांचे राष्ट्र कसे अबाधित राहील यासाठी आग्रही राहायला हवे.आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात तर याची खूप गरज आहे कारण आज जाती , धर्म , वर्ग आणि अनेक भेदांच्या मध्ये देश तोडला जायचा प्रयत्न होत आहे.
तर चला आपापसात प्रेम आणि संवाद वाढवूया , बदलाची सुरुवात स्वतःपासून करूया
संकेत मुनोत 8668975178
email - changalevichar1@gmail.com

Comment, Share ,Follow and Subscribe.

सुप्रिया व अनिस यांचा प्रेरणादायी आंतरधर्मीय विवाह



सध्या ज्या प्रकारे जाती धर्म यात द्वेष वाढवला जात आहे त्या वातावरणात असा आंतरजातीय आंतरधर्मीय अश्या प्रकारचे तेही Arranged Marriege होणे ही प्रेरणादायी बाब आहे.
काही दिवसांच्या पूर्वी प्रतिभाताई गवळी यांच्या कडून त्यांच्या मुलगी सुप्रिया च्या या लग्नाबाबत निमंत्रण मिळाले.
हे लग्न सत्यशोधक पद्धती ने झाले. ही विवाह पद्धत नवरी मुलीला मानसन्मान देणारी विवाह पद्धत आहे.
वैदिक लग्नात विवाह लावणारा व्यक्ती ब्राह्मणच असावा आणि तोही पुरुषच असावा अट अशी बहुतेक ठिकाणी असते, त्याला कारण म्हणजे ब्राम्हण कुळात जन्म झाला म्हणून तो पवित्र आणि श्रेष्ठ आणि इतर कनिष्ठ असे मानले जाते. महात्मा फुले यांनी याला नकार दिला आणि सत्यशोधक लग्नाची सुरुवात केली. ज्यात विवाह लावणारा व्यक्ती कुठल्याही जातीचा आणि लिंगाचा असू शकतो.
याच प्रकार ची पद्धत गांधी विवाहात पण आहे ज्यात ब्राम्हण नसतो आणि कर्मवीर भाऊराव पाटील आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांनी अशी अनेक गांधी पद्धतीची लग्ने लावली. स्त्री पुरुष समानता हा मुख्य धागा या लग्नांच्या मध्ये असतो. म्हणजे ज्या शपथ या मध्ये दिल्या जातात त्या समतेबद्दल असतात. कन्यादान वगैरे विधी नसतो कारण दान करायला मुलगी काही वस्तू नाही.
या विवाह पद्धतीच्या मंगल अष्टका महात्मा फुलेंनी लिहलेल्या मराठीमध्ये आणि सर्वांना समजतील अश्या आहेत.
आपल्या कडील बहुतेक लग्नांच्या मध्ये लोकांचा खूप मान पान ठेवावा लागतो आणि एवढे करूनही कोणी ना कोणी रुसतेच...ज्याचे टेन्शन मुलीच्या आणि मुलाच्या आई वडीलांना असते पण इथे तो प्रकार नसल्यामुळे रुसवा फुगवा नसतो.
बाकी लग्न हा 2 कुटुंब एकत्र येण्याचा आनंदोत्सव असतो , enjoyment असते ती इथेही असते. गाणी आणि इतर सर्व गोष्टी पण असतात. मी स्वतः चे लग्न करताना असे काही किंवा ते नाही पटले तर जैन लग्न सुचवून पाहणार. ती जी कोणी असेल तिला आवडले तर ठीक आहे नाही पटले तर ते ज्या पद्धतीने करतील त्यात एन्जॉय करणार...
महामानवांच्या प्रतिमा स्टेज वर ठेऊन त्यांना अभिवादन करून सुप्रिया व अनिस यांनी एकमेकांशी सत्य वर्तन करण्याची शप्पथ घेतली. ही शपथ पण त्यांना तेथील 2 महिलांनी दिली. धान्याच्या अक्षदा ऐवजी फुलांच्या अक्षदाचा वापर केला होता.
दोघांना सहजीवनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
संकेत मुनोत
Comment, Share ,Follow and Subscribe.

'लुका छुप्पी' - मस्त रोमँटिक , कॉमेडी movie


'लुका छुप्पी' - मस्त रोमँटिक , कॉमेडी movie आज पाहिला..
रोहन शंकर यांनी लिहिलेली लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेली ही छान रोमँटिक कॉमेडी फिल्म काल पहिली..चित्रपट शेवटपर्यंत खूप हसवतो आणि शेवटी एक सामाजिक संदेश पण देऊन जातो.
कोका कोला तू, तू लौंग मैं इलाची, दुनिया अशी छान गाणी आहे
कार्तिक आर्यन, क्रिती सॅनन हे मुख्य भूमिकेत असून अपारशक्ती खुराना , पंकज त्रिपाठी , विनय पाठक आणि अलका अमीन यांच्याही भूमिका छान आहेत.
मथुरा आणि ग्वालियार मधील सुंदर परिसर यात छान चित्रित केला आहे. विष्णू त्रिवेदी (विनय पाठक) हा मथुरा शहरातील एक अयशस्वी राजकारणी असून संस्कृती रक्षक पार्टी चा अध्यक्ष आहे. निवडणूक जवळ आली की एखादा जातीय धार्मिक मुद्दा उचलायचा आणि लोकांना धर्मावरून भडकवून द्वेष निर्माण करून मते गोळा करणे हे त्याचे काम.
संस्कृती रक्षणाच्या नावाखाली युवांनी एकमेकांवर प्रेम करू नये वगैरे गोष्टी यांचा पक्ष करत असतो. नाजिम खान हे एक सिने अभिनेता म्हणून fictional character घेतले आहे. ज्याचे लिव्ह इन मध्ये राहणे याला मुख्य निवडणुकीचा मुद्दा बनवून त्या विरूद्ध कारवाया करून यांची संस्कृती रक्षक पार्टी स्वतः ची दहशत निर्माण करते.
पण त्याची स्वतः ची मुलगी क्रिती सॅनन सुशिक्षित झाल्याने तिची मते आणि आचरण याहून अगदी विरूद्ध असते. तिचे आणि कार्तिक चे लग्न आणि त्याला सुरवातीला दोन्ही कुटुंबाकडून मिळालेला नकारात्मक , सकारात्मक प्रतिसाद या गोष्टी भरपूर हसवतात.
यात वेगवेगळ्या साधू , ग्रामीण वृध्द महिला यांची लिव्ह इन बद्दल मते घेतली जातात जी shocking आहेत.
शेवट अगदी गोड आहे..
सतत moral पोलिसिंग करणारा संस्कृती रक्षक पार्टीचा अध्यक्ष त्रिवेदी आपली मुलगी, जावई यांनाही या नादात मारायला कमी करणार नसतो पण त्याचा जावई कार्तिक आर्यन आणि मुलगी क्रिती त्याला सांगतात की युवकांचे मुख्य प्रश्न जाती धर्म नसून चांगले शिक्षण, चांगला रोजगार मिळणे , आणि मनासारखे जगता येणे हे आहेत. ज्याला तो सहमत होतो आणि स्वतः च्या पत्नीचा चेहरा झाकणारा घूंघट ( साडीचा पदर,) काढून आणि ज्यांचा त्याने विरोध केला त्याच नजीम खान ला त्याचा प्रचार करण्यासाठी बोलवून स्वतः त सुधारणा करतो...
हे गाणे मस्त गुणगुणत आहे...
बुलावे तुझे यार अज्ज मेरी गलियां
बसाऊं तेरे संग मैं अलग दुनिया
ना आयें कभी दोनों में ज़रा भी फासले
बस एक तू हो, एक मैं हूँ और कोई ना
खरतर बहुतेक जणांनी पाहिलाच असेल पण पाहिला नसल्यास नक्की पहा...
संकेत मुनोत

Comment, Share ,Follow and Subscribe.

छोटीसी बात' - मस्त Romantic आणि Comedy चित्रपट


छोटीसी बात' नावाची फिल्म काल रात्री यूट्यूब वर पहिली. मस्त Romantic आणि Comedy चित्रपट आहे.
अभिनेते अमोल पालेकर यांच्याशी 7-8 वर्षापूर्वी एका फिल्म फेस्टिवल मध्ये एकदा धावती भेट झाली होती पण जास्त माहित नव्हते
सामजिक चळवळीत असताना त्यांचे नावही काही वेळा ऐकले होते. कदाचित मी पाहिलेली ही त्यांची पहिलीच फिल्म असेल.
या फिल्म चे वैशिष्ट्य हे वाटले की कुठेही हिरो ला शुरवीर, angry man वगैरे दाखवले नाही. अमोल पालेकर एक साधा सुधा नोकरदार मनुष्य रोज ज्या बस स्टॉप वर बस साठी थांबतो तेथेच प्रभा म्हणजे विद्या सिन्हा ही थांबत असते. मग तिथे आणि बस मध्ये चढताना एकमेकांशी संपर्क करण्याचा त्याने केलेला प्रयत्न आणि आलेले यश अपयश हे प्रसंग छान रंगवले आहेत. त्यात विद्या चे डोळे आणि smile अप्रतिम आहे. प्रत्यक्ष आयुष्यात अश्या साध्या सरळ आणि प्रामाणिक मनुष्याला एवढी सुंदर मुलगी स्वतः हून बोलेल असे वाटत नाही पण चित्रपटात तसे पाहून थोडे आश्चर्य वाटते.त्यात अभिनेता अशोक कुमार जो निवृत्त कर्नल च्या रोल मध्ये आहे तो स्वतः स्वतः च्या प्रेम मिळवू शकत नाही पण अरुण , प्रभा यांना प्रेम मिळवून द्यायला मदत करतो त्यांचाही रोल छान आहे.
हे त्यातील evergreen गाणे...
जानेमन-जानेमन तेरे दो नयन
चोरी-चोरी ले के गए देखो मेरा मन
जानेमन-जानेमन-जानेमन
मेरे दो नयन चोर नहीं सजन
तुम से ही खोया होगा कहीं तुम्हारा मन
जानेमन-जानेमन-जानेमन
नक्की पहा..
संकेत मुनोत ❤️❤️
Comment, Share ,Follow and Subscribe.

सन्मित्र अमोल सराफ, Great Bhet

अकोला येथील भेटी गाठी
सन्मित्र अमोल सराफ अनेक वर्षापासून बोलवत होते फायनली आज जाणे झाले.त्यांच्या घरी मुक्कामास होतो. त्यांच्याकडे जेवण एवढे आग्रह करून देत होते की माझे 5 किलो वजन नक्की वाढले असणार...
अमोल सरांच्या घरी त्यांच्या मातोश्री , वहिनी आणि 2 मुले संचित आणि मोक्षित यांच्याशी छान गप्पा झाल्या.
सरांचे वडील रिसोड येथे टेलर काम करत असत. 22 वर्षापूर्वी काकूंनी शेजारच्या मुलाला डॉक्टर चे prescription देऊन त्यात eye drop की काहीतरी आणायला पाठवले. मेडिकल वाल्याने चुकून drop च्या जागी D वाचून तो eye drop दिला. 2000 या वर्षी दिवाळी च्या दिवशी काम जास्त होते म्हणून काकूंनी तो ड्रॉप आणल्यावर स्वतःच डोळ्यात टाकला आणि त्यांच्या डोळ्यातील retina खराब झाला आणि त्यांची दृष्टी कायमची गेली. त्यानंतर ते त्या फार्मसिस्ट विरुद्ध लढले. तर मित्रांनो औषध घेताना काळजी घ्या आणि मेडिकल वाल्यांना नीट विचारून घ्या.
यात विशेष गोष्ट ही की माझी आणि अमोल जैन यांची ही पहिलीच भेट. अमोल सरांवर सावरकरांचा पूर्वी प्रचंड प्रभाव होता. त्यांनी त्यांच्या सुरवातीच्या शाळेत शिक्षक असताना सावरकरांचा मोठा फोटो भेट दिला होता जो आजही त्या शाळेत आहे. पण नंतर व्हॉट्सॲप वर कुठल्या तरी ग्रुप वर माझा सावरकर संदर्भातील लेख वाचला आणि फोन केला, सोबत चर्चा केल्यावर आणि Knowing Gandhism Global Friends चळवळीत आल्यावर सर बदलले आणि आता ठामपणे गांधीविचार आणि सत्य मांडतात. महत्वाची गोष्ट म्हणजे हे प्रबोधन त्यांनी स्वतः पुरते मर्यादित ठेवले नाही तर त्यांचे बंधू सचिन आणि अनेकांपर्यंत पोहचवून त्यांच्यात ही बदल घडवला. त्यांचे बंधू सचिन सर ही माझे चांगले मित्र आहेत.
हा वहिनींच्या कड्यावर बसलेला मोक्षीत बघा ...खूपच cute आणि dambish आहे.

Comment, Share ,Follow and Subscribe.

Amit Sarode , यवतमाळ - Great Bhet

आज सन्मित्र Amit Sarode , यवतमाळ यांचा वाढदिवस


जेष्ठ गांधीवादी बाळासाहेब सरोदे यांचा मुलगा आणि adv Asim Sarode यांचे ते लहान भाऊ.
सॉफ्टवेअर इंजिनिअर शिक्षण झाल्यावर भारतात आणि परदेशात नोकरी केली मग पुन्हा गांधी विचारांच्या ओढी मुळे भारतात परत आले. इथे शेती आणि शिक्षणातील विविध प्रयोग त्यांचे सुरू असतात.
माझी आणि त्यांची ओळख पण interesting आहे. 8-10 वर्षापूर्वी बालगंधर्व हॉल मध्ये कुठल्या तरी कार्यक्रमाला गेलो होतो तेथून बाहेर पडत होतो तेव्हा पार्किंग मध्ये Sandip Barve की कोणी तरी असीम सरोदे यांच्याशी ओळख करून दिली. तेव्हा असीम सरांनी अमित सरांचा संपर्क देऊन ते चूनिभाई वैद्य यांचे ' सूर्यसमोर काजवा हे पुस्तक सर्वांना pdf करून पाठवत असल्याचे सांगितले.
थोड्याच दिवसांनी मैत्री अजून घट्ट झाली ती चक्क adv असीम सरोदे यांच्या विरूद्ध एक भूमिका घेतल्यावर. नथुराम गोडसे या गांधीजींची बदनामी करणाऱ्या नाटक/ चित्रपट वर कोणी तरी पाटील म्हणून गृहस्थांनी बंदी आणन्याबद्दल वृत्त आले होते. असीम सरोदे आणि त्यांच्या सोबत काही वकिलांनी या बंदीला विरोध करत अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणत त्याला आवाहन देणार असल्याचे म्हटले. गांधीजी बद्दल खोटे विष पेरणारे , लोकांची माथी भडकवणारे नाटक बंद च असले पाहिजे असे माझे मत होते ज्याला Knowing Gandhi Global Friends मधील मित्रांनी साथ दिली. विशेष म्हणजे अमित सरोदे आणि सरांचे वडील बाळासाहेब सरोदे यांनी पण मला पाठिंबा दिला. त्यावेळी कोण योग्य कोण अयोग्य तो मुद्दा वेगळा पण ते आमच्यातील फक्त मतभेद होते मनभेद नाही. उलट सरांचे अनेकदा मार्गदर्शन मिळते बऱ्याच गोष्टीत. सोबतचा फोटो असीम सर युनो च्या बैठकीला गेल्यावर त्यांना जो heart attack चा त्रास झाला तेव्हा भेटण्यास गेल्याचा. तेव्हा स्वर्गीय बाळासाहेब सरोदे सरांशी पण जवळपास 1 तास गप्पा झाल्या.
असो अमित सरोदे आज software engineer म्हणून नोकरी करतात सोबतच सामजिक काम पण मोठ्या प्रमाणात करतात. खादी घालतात आणि मला विदर्भात (नागपूर)व्याख्यानासाठी जायची पहिली संधी त्यांच्यामुळेच मिळाली म्हणजे यवतमाळ येथेही माझे व्याख्यान झाले पण नागपूर मध्ये राष्ट्रीय युवा संघटन मधून जे मित्र मैत्रीण मिळाले अणि जे शिकायला मिळाले ते अमूल्य आहे.
आपल्या गरजा मर्यादीत करून आपण कसे आनंदी जीवन जगू शकतो याचे अमित सर एक आदर्श उदाहरण आहेत.
संकेत मुनोत
Comment, Share ,Follow and Subscribe.