AddThis code

Saturday, June 24, 2023

ज्यांचे धडे शाळेच्या पाठ्यपुस्तकात वाचले त्या दिग्गजांनी गाजवलेल्या वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावर बोलण्याची संधी



ज्यांचे धडे शाळेच्या पाठ्यपुस्तकात वाचले त्या दिग्गजांनी गाजवलेल्या वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावर बोलण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट होती
आत्तापर्यंत *डॉ. ॲनी बेझंट,कर्मवीर भाऊराव पाटील,प्रबोधनकार ठाकरे, एस.एम. जोशी, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, हमीद दलवाई, डॉ. बाबा आढाव, पन्नालाल सुराणा, मृणाल गोरे, नानासाहेब गोरे, विठ्ठलराव गाडगीळ, डॉ. नरेंद्र दाभोळकर,डॉ. अनिल अवचट, रँग्लर परांजपे, बॅरिस्टर नरिमन, जमनादास मेहता, भालाकार भोपटकर, ग.प्र.प्रधान, गोदावरी परुळेकर, वि.स. पागे, कुमार सप्तर्षी, सिंधुताई सपकाळ आणि अश्या अनेक मान्यवरांनी या व्याख्यानमालेत आपले विचार मांडले
त्या वाई च्या वसंत व्याख्यानमालेत मी 'अमृत महोत्सवी स्वातंत्र्य जपायचे कसे?' या विषयावर मी माझे विचार मांडले
गांधी , बोस , भगतसिंग आणि त्यांच्या अनुयायांनी खूप कष्टांनी बलिदान देऊन, लाठ्या झेलून स्वातंत्र्य मिळवले. 500 पेक्षा जास्त संस्थानात विभागलेला हा देश गांधी, पटेल आणि नेहरू यांनी एकत्र केला.
पण सध्या देशात जात, धर्म, पंथ , वर्ग यावरून द्वेष पेटवला जात असून त्यातून देश आता पुन्हा तुटण्याच्या मार्गावर आहे. त्यावेळी "हे स्वातंत्र्य जपायचे कसे, समाजात प्रेम आणि सुसंवाद वाढवायचा कसा?" त्यावर मी विचार मांडले.
प्रेम ❤️ ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे ती जेव्हा आपण बाहेर वाटतो तेव्हा आपले हृदय पण प्रेमळ होऊन जाते..
महावीर, बुध्द, कबीर, तुकाराम, फुले, आंबेडकर यांचे प्रेम वाढवण्यासंदर्भात विचार ही या अनुषंगाने मांडले
आर्याबागकर मित्र डॉ. शंतनु अभ्यंकर आणि मा. लक्ष्मीकांत रांजणे यांच्या मुळे मला ही संधी मिळाली त्यांचे खूप आभार..
तर प्रेम वाटत राहूया...❤️❤️
(हे व्याख्यान मागच्या वर्षी झाले पण घरातील इतर कामांच्या व्यापात त्याबद्दल लिहू-लिहू म्हणत वर्ष निघून गेले अणि विसरून गेलो. आज गुगल फोटो मेमरीत फोटो सापडला आणि लिहून काढले...)
संकेत मुनोत
Comment, Share ,Follow and Subscribe.

No comments:

Post a Comment