AddThis code

Saturday, June 24, 2023

एवढे क्रूर आणि हिंसक का बनत चाललेत लोक?

मुंबईत मनोज साने (56) याने आपली प्रेयसी सरस्वती वैद्य (32) हिच्या चरित्रावर संशय घेऊन तिचा खून केला. मग तिच्या शरीराचे तुकडे करून तो मिक्सर मध्ये बारीक करून कुकर मध्ये शिजवायचा आणि कुत्र्यांना खाण्यास द्यायचा. मला तर हे वाचताना आणि ऐकताना ही कसे तरी वाटते पण त्याने हे प्रत्यक्षात केले आहे.
काही धर्मांध लोक हे ठराविक एका धर्माच्या माथी मारायचा प्रयत्न करतात पण सगळी उदाहरणे बघितली तर यात धर्म, जात, पंथ , वर्ग, लिंग यांचा काही संबंध नाही.
मनात द्वेषपूर्ण आणि हिंसक विचार वाढत आहेत त्याला कारण
म्हणजे वातावरण . सतत हिंसेच्या आवश्यकतेवर भाषण करणारे नेते, त्याच प्रकार चे भडक चित्रपट, व्हॉट्सॲप साहित्य, लेख... ई
हे कमी करायचे तर आपसात प्रेम आणि संवाद कसा वाढेल. राग अहिंसक पद्धतीने कसा व्यक्त करता येईल इ. बद्दल चित्रपट, नाटक, व्याख्यान, निबंध स्पर्धा, सोशल मीडिया वरील साहित्य आणि वेगवेगळ्या मार्गाने प्रबोधन कसे होईल याचे प्रयत्न करायला हवेत.
संकेत मुनोत
Comment, Share ,Follow and Subscribe.

No comments:

Post a Comment