AddThis code

Friday, December 30, 2022

आर्वी , वर्धा येथील व्याख्यान आणि त्याला आलेल्या प्रतिक्रिया

*#राष्ट्रसंत #तुकडोजी महाराज* आणि अनेक महामानवांनी जेथे मोठे काम केले होते त्या विदर्भातील *#आर्वी, वर्धा* येथे *'#महात्मा #गांधी यांची प्रासंगिकता'* या विषयावर *प्रमुख वक्ता*🎙️ म्हणून विचार मांडण्याची मला संधी मिळाली. 
यात आश्चर्याची बाब ही वाटली की माझ्या व्याख्यानानंतर सूत्रसंचालक म्हणाले की *"वक्ते पुण्याचे असून पुणेरी भाषेत न बोलता विदर्भाच्या भाषेत बोलले





."😊* मी काही तसे ठरवून विदर्भाकडील भाषेत बोललो नाही पण तिकडचे लोक जास्त परिचयाचे झाल्यामुळे किंवा कुठल्या तरी कारणामुळे माझी भाषा थोडीशी विदर्भातील झालीं असावी. कारण पुण्यात ही मला एकाने *"तुम्ही विदर्भातील का?"* असे विचारले😅

ज्या विदर्भाने देशाला *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज , राष्ट्रसंत गाडगे बाबा* सारखे संत दिले तिथेच आज *कालीचरण महाराज* सारखे *देशभर द्वेष पसरविणारे गुंड निर्माण होत आहेत*😡  त्यामुळे तेथेही आता या प्रबोधनाची खूप गरज आहे.

असो व्याख्यानानंतर घेतलेल्या *श्रोत्यांच्या प्रतिक्रिया* ऊर्जा देणाऱ्या होत्या. एक शिक्षक म्हणाले की *"मी आत्ता पर्यंत गांधींना अहिंसेला चुकीचे समजत होतो आणि त्याबद्दल काहीही वाचणे टाळत होतो. पण आपल्या व्याख्यानातून त्यांच्याबद्दल चे गैरसमज दूर झाले. आता गांधी नव्याने वाचणार आहे."* विशेष म्हणजे त्यांचे एक विद्यार्थीही तेथे उपस्थित होते त्यांनीही हेच सांगितले . ज्यांचा निबंध स्पर्धेत क्रमांक आला त्या शोभाजींनी *"मी स्वतः गांधी विचार आचरणात आणनार असून माझ्या 8 वर्षाच्या मुलाला ही त्या मार्गावर नेणार आहे "* असे सांगितले. अजूनही बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. 
*खरतर गांधीजींना जाऊन 75 वर्ष झाले पण तरी आजही त्यांची बदनामी करणारे विविध चित्रपट काढले जातात 📺🎥आणि त्यांच्या विरुद्ध खोटे भडक साहित्य📰📲 प्रसारित केले जाते ते यासाठी की लोकांनी त्या बदनामीला भुलून जाऊन गांधीना #मजबूरी समजून वाचुच नये.*
 *लोकांनी गांधी वाचले तर ते पुन्हा जागे होऊन जाती धर्माच्या कट्ट्ररतेच्या बाहेर येतील आणि प्रश्न विचारतील, खऱ्या हक्कांसाठी आंदोलने करतील. मजबुती का नाम गांधी समजून स्वतः ही मजबूत होतील.* ❤️❤️

👹👺 *विवेक बिंद्रा, गुंड #कालीचरण, कंगना राणावत, वामन मेश्राम, पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ आणि यांच्या सारख्या अनेक व्यक्ती आपापल्या क्षेत्रात गांधीजींबद्दल सतत काही ना काही खोटे साहित्य तयार करून नियमित प्रसारित करत असतात त्याचे कारणही हेच.*

 महात्मा गांधी यांची हत्या त्याच सनातन्यांनी  केली *ज्यांनी ज्ञानेश्वर, तुकाराम, महात्मा फुले यांना त्रास दिला.* गांधी हत्येचे कारण होते *त्यांनी समतेसाठी केलेले कार्य*. पूर्वी राजकारणात *ठराविक वर्गाचे वर्चस्व होते ते गांधीजींनी संपवले आणि सामान्य माणसाला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात स्थान दिले.त्यामुळे ज्यांचे जातीय वर्चस्व गांधींनी संपवले त्या वर्गातील प्रतिनिधी गोडसे याने गांधींची हत्या केली* 

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर विद्यापीठ व गोंडवाना विद्यापीठ मराठी परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉक्टर गणेश मोहोड होते. माजी आमदार अमर काळे, विदर्भ मतदार चे संपादक राजू गोरडे, प्रहार सोशल फोरमचे संस्थापक बाळा जगताप हे प्रमुख अतिथी होते. 

याप्रसंगी वैष्णव जन तो... या सुमधुर गीताने  कवी व संगीतकार हरीश तांबोळी यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक प्रा. संजय वानखडे सरांनी केले. माझा तेथे परिचय आदरणीय डॉक्टर प्रसन्नकुमार बंब सरांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. दर्शन चामभारे यांनी केले तर आभार प्रा. राजेश सोळंकी यांनी मानले.

*सर्वांचे खूप खूप आभार* 
*#प्रेम प्रसार करत राहूया ❤️❤️❤️*

संकेत मुनोत

Sunday, December 25, 2022

डॉक्टरांशी गांधी विचारांवर संवाद

*पुण्यातील अनेक  डॉक्टरांच्या पर्यंत  गांधीविचार* पोहोचवण्याची काल संधी मिळाली. 👩🏻‍⚕👨🏼‍⚕🥼🏥❤️❤️

माझे *Knowing Gandhi Doctors* मधील मित्र *डॉ देवेंद्र संचेती (कॅन्टोन्मेंट विधानसभा अध्यक्ष )* यांनी मला *राष्ट्रवादी डॉक्टर सेल* च्या *“वॉक अँड टॉक “ सोबत “थिंक टॅंक“* या उपक्रमात डॉक्टरांशी गांधीजी वर *संवाद*🎙️ साधण्यासाठी बोलवले होते. 








सध्या देशात *जात, धर्म आणि वेगवेगळ्या गोष्टींचे कट्टर गट निर्माण होऊन द्वेष वाढत* आहे. जो तो आमचा महामानव आणि आमची जात कशी श्रेष्ठ याची स्पर्धा करत आहे. यातून *संघर्ष* होऊन *देश तुटण्याची* शक्यता निर्माण झाली आहे. याला उपाय म्हणजे *पूर्ण देशाला प्रेमाने जोडणारे स्वतः च्या पाठीमागे कुठलीही जात, धर्म नसणारे महात्मा गांधीचे विचार पुन्हा मना मनात पोहोचवणे.❤️❤️* 
पण वेगवेगळ्या समाज माध्यमातून एवढा *द्वेष त्यांच्याबद्दल पसरवला जातो* की *सत्य समोर येतच नाही*.त्यामुळे *ते गैरसमज दूर करत त्यांचे विचार आज समाजात प्रेम आणि संवाद वाढवण्यासाठी कसे आवश्यक आहेत* हे मी मांडले. यात *माझे आवडते म्हणजे प्रश्र्नोत्तरांचे सत्र ही छान झाले , खूप चांगले प्रश्न* आले. कार्यक्रमाच्या समारोपात *सर्वांना  पंचसूत्रीची शपथ घेतली आणि शेवटी सर्वांना महात्मा गांधीजींची पुस्तके आणि जयहिंद पत्रके देऊन  चळवळ जॉईन करण्याचे आवाहन केले.* 

यात *डॉ सुनील जगताप प्रदेशाध्यक्ष रा. डॉ. सेल महाराष्ट्र राज्य, डॉ शशिकांत कदम पुणे शहराध्यक्ष रा. डॉ. सेल, डॉ राहुल सूर्यवंशी , डॉ राजेश साठे , डॉ हेमंत तुसे, डॉ राजश्री पोखरण ,डॉ रणजीत निकम, डॉ अनुपमा गायकवाड, डॉ देवेंद्र  संचेती, डॉ संगीता माने,  डॉ फैज मणियार, डॉ धनंजय देशमुख, डॉ विजयसिंह पाटील, डॉ ज्योती देवरे, डॉ सारिका परदेशी, डॉ मृणाल जमदाडे श्रीमती कमल ननावरे* आदी उपस्थित होते. 👩🏻‍⚕

(खरतर नागपूर ते पुणे तिकीट confirm न झाल्याने ट्रेन मध्ये सीट खाली झोपून प्रवास करावा लागला. ज्यात तेथील थंडी मुळे सर्दी खोकला वगैरे झाले होते पण या सर्व डॉक्टर्स सोबत सकाळी सकाळी चालल्याने सर्दी निघून गेली😊. )

संकेत मुनोत
8668975178

Thursday, December 22, 2022

शेकडो अनाथ मुलांची आई गुंजनताई गोळे

मी #अमरावती येथे येत असल्याचे समजल्यावर गुंजनताई गोळे यांचा फोन आला. त्यांनी त्याच दिवशी नागपूरला जाण्याऐवजी त्यांच्या साईनगर येथील निवासस्थानी राहून दुसऱ्या दिवशी जाण्याचे सुचवले. त्यामुळे तिथे राहून दुसऱ्या दिवशी पहाटे 5.30 वाजता तेथून नागपूरला ट्रेनने निघालो.
गुंजनताईशी संध्याकाळी भेट झाली. आम्ही अनेकदा फोनवर बोललो होतो. त्या पुण्यात आल्यावर भेटायचेही ठरले होते पण भेट कधी झाली नाही. आमच्या दोघांची ओळख झाली ती शेतीतज्ञ आणि जेष्ठ गांधीवादी मनोहर खकें काकांमुळे.  

२०११ साली अमरावतीच्या राजकमल चौकात एक मनोरुग्ण गरोदर स्त्री अतिशय वाईट परिस्थीती मध्ये गुंजनताई गोळे यांना दिसून आली. मनोरुग्ण असूनही कुणाच्या तरी वासनेला ती शिकार झाली एव्हढी विकृत मानसिकता आपल्या आसपास आहे हा विचार त्यांना असह्य करून गेला. त्या महिलेला तेथून दवाखाण्यात नेऊन तिच्या डिलिव्हरी पर्यत सर्व जबाबदारी गुंजनताईने पार पाडली. त्यावेळी अनेक अडचणींना त्यांना समोर जावे लागले. तेव्हाच मनाशी एक गोष्ट पक्की केली कि अश्या घटना फक्त बघून, हळहळ व्यक्त करून नाही चालणार तर एक नैतिक, सामाजिक जबाबदारी म्हणून स्ततःपासून सुरूवात करून कृतीतून बदल घडवायचा. तब्बल एक दशकापूर्वी घडलेल्या या प्रसंगापासून घेतलेले सेवाव्रत आजपर्यंत निरंतर सुरू आहे. शेकडो निराधार, गरजू महिला, वंचित, HIV बाधीत अनाथ, मुले/मुली, बेवारस वृध्द यांच्या पुनर्वसनाचे शाश्वत कार्य आजवर करण्यात आले तेही कुठलीही सरकारी मदत नसताना. हे सर्व सेवाकार्य अधिक व्यापक स्वरूपात करण्यासाठी वुमन्स फाऊंडेशन, अमरावती या संस्थेची २०१५ साली स्थापना करण्यात आली.

अनाथ HIV बाधित मुले व मुली यांच्यासाठी गोकुळ आश्रम हा निवासी प्रकल्प सुरू करून त्यांना शैक्षणिक, वैद्यकीय, रोजगार, लग्न, इत्यादी सर्व प्रकारे मदत करून पुनर्वसन करणे हे यामार्फत सुरू आहे.

 अनेक नवजात बाळांना स्वतःचे दुध पाजून 'दुध दान चळवळ' सुरू करून स्तनदा मातांना मार्गदर्शन व सहकार्य त्या करतात

शहरातील बेवारस मृतदेहांचा स्वखर्चातून अंतिमविधी करतात 

कुमारी मातांच्या मनोबल वाढीसाठी कार्य तसेच त्यांना वैद्यकिय व कायदेशीर सर्व बाबींमध्ये मदत करून पुनर्वसन करण्याचे कार्य त्या करतात

तर अश्या गुंजन ताईंना आपणही कार्यात हातभार लावुया..

संकेत मुनोत 
( फोटो - रुक्मिणी वल्लभ या रेस्टॉरंट मधला . गुंजनताई येथे जेवणास घेऊन गेल्या आणि तेथे सोल्याची भाजी, भाकरी, पुरणपोळी असे मस्त जेवण केले. )
अमरावती - गाठी भेटी
#अवलिया_माणसे

Comment, Share ,Follow and Subscribe.

Thursday, December 15, 2022

पहिल्यांदा अशी मस्त window सीट मिळाली ...स्वारी फूल खुश.. पण सोडावी लगाली...


पहिल्यांदा अशी मस्त window सीट मिळाली ...स्वारी फूल खुश..😊
यापूर्वी कधी मधली , कधी दरवाजातील आणि कधी वरच्या सीटने किंवा उभे राहून प्रवास केला होता..
 ही सीट (side lower)आणि हा डबा दोन्ही छान होते ...समोरच 2 cute चिमुकले होते. एक चिमुकला खेळत खेळत जवळ येऊन hi करत होता त्याचे गाल आणि केस एकदम cute.. च..
 गाडी सुरू व्हायला वेळ होता त्यापूर्वी एक जेष्ठ काका आले आणि त्यांनी विचारले..
"आप फैमिली के साथ हो?" 
मी - नही
ते - तो आप हमे ये सीट हमे दे सकते हो प्लीज , मुझे और मेरी वाइफ को दूसरे डब्बे में middle सीट मिली है पर wife को breathing में problem आ सकती है। नीचे की सीट मिली तो अच्छा होगा। मैं उसी डिब्बेमे रहुंगा खाली वाइफ यहां आएगी
मी चालेल म्हटले , नकार देऊ शकलो नाही पण एवढ्या लांबून ते माझ्याकडेच का आले? समजले नाही, कदाचित इतर ठिकाणी विचारत-विचारत आले असावेत. 
नंतर पुन्हा काही वेळाने बॅग ठेवायला आले आणि समोर एका सीटवाल्या तरुणाला त्यांनी विचारले की तुम्ही एकटे असाल तर तिकडे जाऊ शकता का ?माझ्या wife ला यांची सीट मिळाली आहे तर मला इथेच भेटली जवळ तर बरे होईल.त्याची मिडलच सीट होती तर तो तयार झाला. 
खिडकीची मस्त view असलेली आरामदायी सीट गेली, त्याचे थोडेसे दुःख झाले पण मला त्या काकांचे प्रेम भारी वाटले🤩🥰…. त्यांची सीट असलेल्या डब्यात आणि नंतर या डब्यात अनेक जणांना त्यांनी याबद्दल विचारले असावे नकार ही भेटला असेल पण निराश न होता विचारत राहिले...
मी अर्धा तास तिथेच बसलो , त्यांच्याशी गप्पा मारल्या...आणि मग दुसऱ्या डब्यात आलो... हा तेव्हाचा फोटो त्यांनीच काढला..
ती सीट भेटल्यावर काकांची smile भारी होती..😊

उद्या दुपारी #नागपूर मध्ये पोहचेल,.. भेटूया..❤️❤️
Comment, Share ,Follow and Subscribe.

Wednesday, December 14, 2022

Great Interaction with Dr. Amit Shinde, Sangamner

परवा सन्मित्र डॉ अमित शिंदे भेटण्यास आले होते. अनेक दिवसापासून भेटणे-भेटणे म्हणत होतो पण फायनली परवा भेट झाली.
डॉ.अमित स्त्रीरोगतज्ज्ञ असून संगमनेर मध्ये त्यांचे हॉस्पिटल आहे. आयुर्वेद महाविद्यालयात ते प्राध्यापकही आहेत.
फोनवर अनेकदा गप्पा व्हायच्या पण प्रत्यक्ष भेटून जास्त वेळ मनमोकळ्या गप्पा मारण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी. मागे #valentinewithGandhi कार्यक्रमात आले होते पण तेव्हा दोघेही गडबडीत होतो. काल कोल्ड कॉफी सोबत मोठी वैचारिक मेजवानी सुद्धा मिळाली.
कुरुंदकर , ओशो, गांधी आणि वेगवेगळ्या विषयावर छान विचारमंथन झाले. स्वामी विवेकानंद म्हणतात की एका विचारी माणसासोबत गप्पा मारणे म्हणजे अनेक पुस्तके वाचणे आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला. लहानपणी वेळ होता आवड होती पण पुस्तक आणायची आर्थिक परिस्थिती नव्हती आता थोडी आर्थिक परिस्थिती झाली पण जबाबदाऱ्या आणि व्याप एवढे एवढ्या वाढल्या की पुस्तके आणून ही वाचायला वेळ मिळत नाही. पण मग अश्या विचारी व्यक्तीसोबत गप्पा म्हणजे खूप चांगले काम होते.
गांधी असो , ओशो असो वा अन्य कोणी आम्ही कोणाचेही भक्त नाही आणि त्यांच्यातही उणिवा होत्या यांची आम्हाला जाणीव आहे त्यामुळे खूप कमी जणांशी wavelength जुळते ती डॉ अमित शिंदेशी जुळाली. सगळेच खूप छान छान म्हणणारी गोल गोल वाटतात अमित सर तसे नाहीत विचार clear आहेत. म्हणाजे ओशो चे चांगले विचार discuss केले तसे त्यांनी मांडलेल्या अनेक
चुकीच्या गोष्टी ही आम्ही discuss केल्या.
विविध मासिकात अमित शिंदे सरांच्या कथा आणि कविता येत असतात,'पी सी ओ एस' हे त्यांचे वैद्यकीय मार्गदर्शन पर पुस्तक मागच्याच वर्षी प्रकाशित झाले आहे.
अहमदनगर मधील स्पर्धेत लोकांना भरपूर हसवणाऱ्या 'परफेक्ट बायको कशी शोधावी' याचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. या नाटकात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा मानवी नात्यांवर होणारा परिणाम आणि माणूस व यंत्र यांतील मिटत चाललेले अंतर हा आहे.विशेष बाब म्हणजे सुरवातीला प्रेक्षकांना भरपूर हसवणाऱ्या या नाटकाच्या दुसऱ्या भागात स्त्रियांना पुरातन काळापासून आत्तापर्यंत कसे यंत्र समजले जाते हे मनुस्मृती पासून अनेक ग्रंथांतील उतार्यासह सांगितले आहे.सोबत त्यांनी सध्याच्या व्यवस्थेवरही काही चिमटे काढले आहेत जसे की मुलगा जोडीदार शोधताना म्हणतो की "मला अंधभक्त पत्नी नको वगैरे"...पण याच कारणामुळे नाट्य समितीने या प्रेक्षकांची प्रचंड दाद मिळालेल्या नाटकाला एकही बक्षीस दिले नाही.
याच प्रमाणे 'मी पण नथुराम गोडसेच बोलतोय' आणि 'खेळ मांडियेला' या दोन्ही वास्तव दाखवणाऱ्या नाटकांवर ही असाच अन्याय झाला आहे.त्यांनाही प्रेक्षकांची चांगली दाद मिळून आणि कथानक चांगले असूनही एकही बक्षीस दिले गेले नाही.
कारण अर्थातच परीक्षक संघविचारी(RSS) आहेत त्यांना हे वास्तव विचार आणि सत्य कसे पचेल?परिक्षकांची फेसबुक वॉल जरी चाळून पाहिली तर कारण लगेच लक्षात येईल.
असो हे नाटक जर कोणी व्यावसायिक किंवा प्रायोगिक रंगभूमीवर करणार असेल तर त्यासाठी हवी ती सर्व मदत पुरविण्याची डॉ अमित यांची तयारी आहे. त्या नाटकातील काही भागाची लिंक कमेंट मध्ये देत आहे नक्की पहा.
#संगमनेर मधील भेटी गाठी
एक #शिंदे असेही 😉
संकेत मुनोत



Comment, Share ,Follow and Subscribe.

Tuesday, December 6, 2022

अकोला मधील उद्योजक विवेक पारसकर यांची भेट


#अकोला मधील भेटी गाठी 
माझे whatsapp वरील मित्र Ujwal bachhav हे नेहमीच माझ्या लेखांना चांगलीं प्रतिक्रिया देत असतात आणि काही गोष्टीही सुचवत असतात.  मी अकोल्यात आहे अस समजले तेव्हा त्यांनी मला त्यांचे मेहुणे विवेक पारसकर यांचा संपर्क पाठवला आणि त्यांनाही सामजिक कामात रस असून भेटण्यास सांगितलें. Subhash Gadiya सरांच्या घरी असताना  विवेकजींचा फोन आला आणि त्यांनी भेटण्यास बोलवले. 

विवेक सर उद्योजक असून राजकारणातही सक्रिय आहेत. त्यांनी निवडणूक ही लढवली होती.त्यांनी आमच्याकडून आम्ही नेमकी काय काम करतो ? गांधी विचार आज relevant कसे आणि अनेक गोष्टी समजून घेतल्या. Knowing Gandhism Global Friends Akola, जयहिंद लोक चळवळ यांच्यासाठी व्याख्याने आणि किंवा इतर उपक्रम घेण्यासाठी परफेक्ट स्टडी सेंटर चा हॉल नेहमी उपलब्ध असेल हे त्यांनी या चर्चेत सांगितले. सन्मित्र Amol Saraf सोबत होते. 
 (इथे असतानाच माजी मंत्री Azhar Husain सरांचा सुभाष गादिया सरांची आमच्या भेटीची पोस्ट वाचून फोन आला आणि त्यांनी त्यांच्या घरी भेट ठेवली त्यावर लवकरच लिहणार आहे.)
संकेत मुनोत 
Share ,Follow and Subscribe.

Sunday, December 4, 2022

औरंगाबाद मधील #प्रेमळ लोक - आज त्यातील #तांदळे कुटुंब पाहूया

MIT, औरंगाबाद येथे "सोशल मीडियाचा चांगला वापर कसा करावा" या विषयावरील व्याख्यानासाठी गेलो होतो तेव्हा सोशल मीडियावर जुळलेल्या पण प्रत्यक्ष कधीही न भेटलेल्या लोकांना ही भेटून येऊ म्हटले. दुसऱ्या दिवशी काहींना भेटून पुणे रिटर्न येणार होतो पण अजून एक दिवस राहावे लागले कारण खूप प्रेमळ लोक येथे भेटले.आज त्यातील #तांदळे कुटुंब पाहूया
जस आठवतय तसे तोडके मोडके लिहतो.
व्याख्यानाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी संजीवनी तांदळे मॅमचा यांचा नाश्ता करण्यास येताय ना? असा फोन आला. मी त्यांना म्हटल आपण नक्की भेटूया, पण नाश्ता नाही करू शकणार त्यासाठी क्षमस्व. कारण नाश्तासाठी सुबोध सरांकडे चाललो आहे, त्यांनी काल रात्रीच आजचे निमंत्रण दिले आहे.तर त्या हसत म्हणाल्या "तुम्ही माझ्याच घरी येत आहात, सुबोध माझा मुलगा आहे. 😄"
नाश्त्याला गेलो तर सगळ्या कुटुंबीयांशी मस्त गप्पा झाल्या.
संजीवनी तांदळे मॅम उद्योजक असून त्यांनी गेल्या 32 वर्षापासून हॉटेल व्यवसायात मोलाचे योगदान दिले आहे. एकहाती व्यवसाय सांभाळून महिलांसाठी एका नव्या व्यवसायाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली आहे. "साईकृपा लॉज" च्या रुपात अत्यंत मोकळे आणि घरगुती वातावरण टिकवले जाते. महीनों महीने घरापासून लांब राहून काम करणार्या सर्वांसाठी हे एक सुरक्षित वातावरणातील ठिकाण त्यांनी निर्माण केले आहे. हॉटेल व्यवसायातील चांगले वाईट आणि थरारक असे अनेक अनुभव यांचा खजिनाच त्यांच्या कडून ऐकायला मिळेल.
विशेष म्हणजे त्यांचा आणि Adv. फुलचंद तांदळे सरांचा 42 वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला आहे ज्यासाठी त्यांनी बराच संघर्ष केला होता. त्यांच्या घरातून कडक विरोध असतांना एकमेकांना साथ देऊन, एकमेकांसाठी खंबीर उभे राहून संसार फुलवला.
Dr. Shubhangi Tandale-Palwade या स्त्री रोग तज्ज्ञ असुन त्या पलाश maternity व IVF हॉस्पिटल येथे कार्यरत असतात. गांधीविचारांबद्दल आग्रही भूमिका हीच आज त्यांची ओळख आहे. त्यांना वाचनाची आवड होतीच पण महात्मा गांधी आंतररारष्ट्रीय विद्यापीठ सेवाग्राम, वर्धा येथे एमबीबीएस ला प्रवेश घेताना प्रवेश परीक्षेत (CET exam) एक पेपर महात्मा गांधी वर होता तेव्हा त्या वाचनाने गांधीजी बद्दल अधिक आदर निर्माण झाला. त्यांनी याबद्दल कार्य ही सुरू केले आहे. (अश्या परीक्षा ठिकठिकाणी घ्यायला हव्यात मागच्या वर्षी वर्धा येथे मित्र सुयोग त्याच्या घरी जेवणास घेऊन गेला तेव्हा माहित पडले की त्याच्या पत्नीही हीच entrance परीक्षा देतांना गांधी विचारांकडे आकर्षित झाल्या आणि आजही डॉक्टर म्हणून कार्य करताना त्या गांधी विचारांचे तत्व जपत असतात. एका सुखवस्तू व्यापारी घरात जन्म घेऊनही त्यांना जोडीदार हा इतर मुलींसारखा पैशांनी नव्हे तर मनाने श्रीमंत असलेला आणि समाजाबद्दल तळमळ असलेला हवा होता जो शोधताना खूप अडचण येत होती पण नंतर सुयोग चे स्थळ मित्राने सुचवले आणि या गांधी विचारांमुळे त्यांचे लग्न झाले त्यांची स्टोरीही लवकरच लिहणार आहे)
सुबोध तांदळे हे बांधकाम व्यावसायिक असून पुण्यात बाणेर सह औरंगाबाद येथे त्यांचे अनेक प्रकल्प सुरू आहेत. त्यांच्या पत्नी स्नेहाताई आर्किटेक्ट आहेत त्या सुद्धा घरच्या दोन्ही व्यवसायात चांगल्या सक्रिय आहेत आणि शुभांगी ताई सोबत गांधी विचाराबद्दल ही अनेक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतात.
आणि त्यांचाही आंतरजातीय विवाह दोन्ही घरच्या मान्यतेने झालेला आहे.
आई मुली पेक्षा कैक पटीने घट्ट विणलेल्या नात्याचा एक सुरेख बंध संजीवनी mam आणि स्नेहाताई यांनी निर्माण केला आहे.
यात विशेष बाब ही सुद्धा की त्यांच्या इथे जेवण बनवणारे आचारी व घरकामातील मदतनीस मुस्लिम सुद्धा आहेत ज्यावर त्यांच्या काही परिचितांनी विरोध केला पण महात्मा गांधी सारखेच निर्भयतेने तांदळे कुटुंब आपल्या तत्वावर ठाम राहिले. सर्वांचा घरातील वावर अतिशय मोकळा आहे.
त्यांच्या इथे नाश्ता एवढा फूल झाला की जेवण करण्यास पोटात जागाच राहिली नाही.
आमच्या फोटो सोबतच त्यांचे मॅनेजर दत्ता सपकाळ यांनीही फोटो काढला तेही माझे लेख वाचत असतात हे पाहून आनंद वाटला. खेड्यातील वातावरणातून येऊन गेल्या 22 वर्षापासून ते संजीवनी यांच्या मातृछत्रा खाली पत्नी व मुली सह परिवारातील सदस्य होऊन राहत आहेत. वैचारिक आणि सामाजिक कार्यात तांदळे परिवारासह उत्साहाने सहभागी होत असतात.
तेथून मला घेण्यासाठी माझे जेष्ठ मित्र माजी पोलीस अधिकारी प्रेमसागर चांद्रमोरे सर आले होते. यानिमित्त त्यांचा आणि तांदळे कुटुंबांचा परिचय आणि छान गप्पा झाल्या.
जात धर्म न बघता केवळ माणूसकी आणि प्रामाणिकपणा या तत्त्वावर सर्वांना प्रेमाने सोबत घेऊन पुढे जात असलेल्या या घराची दारे सर्वांसाठी कायम खुली आहेत.
तर महात्मा गांधी असे अनेक ठिकाणी विचारांनी जिवंत आहेत आपल्याला गरज आहे ती सर्वांना एकमेकांशी जोडण्याची..
लिहतना काही चुकले असेल तर क्षमस्व...
संकेत मुनोत
#भेटीगाठी




Comment, Share ,Follow and Subscribe.

Tuesday, November 29, 2022

वेगवेगळ्या धर्मगुरूंशी संवाद साधून धर्म समजून घेत महात्मा गांधींबद्दल मते जाणून घेताना आलेले काही अनुभव

आम्ही महिन्यात किमान २ दिवस काढून वेगवेगळ्या धर्मगुरूना भेटतो. त्यात सुरवातीला श्रध्देने त्यांच्याकडून त्यांचे धार्मिक विचार समजून घेतो. त्यानंतर महात्मा गांधी यांचा विषय काढून "त्याबद्दल आपल्याला काय वाटते?" हे विचारतो. त्यात ते जेव्हा व्यक्त होतात त्यात त्यांच्या पर्यंत कुठले विचार पोहोचले हे लक्षात येते. यातील बहुतेक ठिकाणी आम्हाला त्यांच्याबद्दलच्या अफवा पोहोचल्याचे लक्षात आले आणि जेव्हा आम्ही त्यांच्याशी याबाबत संवाद साधून सत्य सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यातील काहीनी आमचे ऐकून घेत पुढे संवादही साधला. यात आम्हाला असेही काही साधू साध्वी भेटले जे स्वतः गांधीवादी होते आणि ठामपणे भूमिका घेत होते. जे समाजात विष पसरवतात त्यांना ते विरोध करत होते पण आपल्या कुठल्या चळवळीशी कुठेच जुळले नव्हते. ते म्हणाले की आमच्याकडे स्वतः ला गांधीवादी म्हणवणारे राजकीय पक्षाचे लोकही येतात पण ते त्यांच्या निवडणुकीच्या वेळेस आमच्या जाहीर सभेत मत मागायला किंवा आमच्या एखाद्या कार्यक्रमात त्यांच्या एखाद्या नेत्याला घेऊन दर्शनाला येतात आणि जातात. पण अशी चर्चा करायला असा संवाद साधायला त्यांच्यातील कोणी कधी येत नाही. तेच संघातील लोक नियमितपणें येतात. सगळ्यात सुरवातीला महात्मा गांधी बद्दल द्वेष पेरतात नंतर हळू हळू नेहरू बद्दल मग मुस्लिम ,ख्रिस्चन आणि इतर धर्मियांच्या बद्दल द्वेष पेरणे सारख्या गोष्टी केल्या जातात. या सततच्या मार्यामुळे आमच्यातील बरेचसे साधू त्यांच्या प्रवचनात तश्या गोष्टी मांडतात. पण तुम्ही करताय तसे घडले तर काही प्रमाणात का होईना इकडचे लोकही संवादातून बदलू शकतील. आणि समजा त्यातील अनेक लोक बदलले नाही तरी त्यांना एवढे जरी माहित पडले की असे कोणीतरी आहे तर ते पुढच्या वेळी महात्मा गांधींच्या विरुद्ध प्रक्षोभक वक्तव्ये करताना थोडी काळजी घेतील. म्हणजे आम्हाला काही ठिकाणीं असे साधू-साध्वी पण भेटले जे एकदम याच्या विरूद्ध होते . एक जैन साध्वी तर डायरेक्ट बोलल्या की त्या गोडसेला मानतात त्याने गांधीहत्या करून चांगले काम केले. या साध्वीना हे तुम्हाला कुठे समजले असे विचारले तर त्यांनी पुष्पेद्र कुलश्रेष्ठ, विवेक बिंद्रा आणि अश्याच काही महाभागांचे व्हिडिओज पाहिल्याचे सांगितले . म्हणजे विशेष कार्यक्रमही त्यासाठी आयोजित जर्ण्यात येतात ज्यात असे व्हिडिओस दाखवण्यात येतात .मी त्यांना चर्चेसाठी वेळ मागितला पण त्यांनी नकार दिला पण ही चर्चा सुरू असताना तिथे एक कपड्याचे व्यापारी त्यांचे दर्शन करायला आले होते. त्यांनी आमची चर्चा ऐकून माझ्याशी नंतर बसून संवाद केला. महात्मा गांधी बद्दल सुरवातीला प्रश्न विचारले. त्यानंतर मुस्लिम लोकसंख्या आणि इतर अनेक प्रश्न विचारले त्याची उत्तरे त्यांना पटली.आता ते समूहात आहेत आणि ठामपणे भूमिका घेतात इकडचे मेसेज त्यांच्या समूहात पाठवतात. यामुळे त्यांना Troll ही केले जाते, काही समूहातून काढलेही गेले पण ते तरी ठामपणे भूमिका घेतात. गांधी समजल्याचा हा परिणाम म्हणता येईल. एका साध्वीजींनी आम्हाला महात्मा गांधींच्या गोष्टींची हिंदीत पाठवायला सांगितल्या, या गोष्टी ते त्या प्रवचनात मांडतील असे त्यांनी सांगितले. त्या जर असे मांडू लागल्या तर खूपच चांगले होईल त्यांचे हजारो लाखो भक्त ते ऐकतील. म्हणजे ही प्रोसेस तशी खूप स्लो आहे आणि अपयशच बहुतेक ठिकाणी मिळते पण हे निरंतर करत राहिले पाहिजे असे माझे मत आहे. चळवळीतील काही मित्रांना सुरवातीला सोबत घेऊन गेलो तर त्यांना तिथे वाट बघणे आणि इतर धार्मिक गोष्टी पटल्या नाहीत ज्यामुळे ते नंतर आले नाहीत. प्रत्येक धर्मात अनेक चांगल्या गोष्टी आहेत त्यांच्या आधारे लोकांना जोडून घेत संवाद साधत राहिले तर प्रबोधन करणे अधिक सोपे जाते. महात्मा गांधी होते तेव्हा ही बहुतेक धार्मिक माणसे त्यांच्या मागे होती आज त्यातले बरेच कट्टरतेकडे गेले यात त्यांना समजत नाही म्हणून ते तिकडे गेले असे म्हणत त्यांना मूर्ख ठरवण्याऐवजी आपण त्यांच्याशी संवाद करण्यात कुठे कमी पडलो ते शोधून त्यावर काम करायला हवे असे वाटते.
महात्मा गांधींचे हे वैशिष्ट्य होते कि प्रत्येक धर्मातील चांगले शुद्ध चरित्राचे धर्मगुरू त्यांच्याशी जुळलेले होते . ते आचार्य विनोबा भावे , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज , परमपूज्य साध्वीजी उज्वलकुंवरजी महाराज , राष्ट्रसंत गाडगे बाबा , मौलाना आणि असे अनेक साधू साध्वी आणि संत . संकेत मुनोत #Randomthoughts

Monday, November 28, 2022

मला समजलेले महात्मा फुले - 28 Nov 2016

मला माहित आहे फेसबुक whatsapp सारख्या ठिकाणी मोठा लेख कुणी वाचणार नाही तरी कमीत कमी शब्दात मांडायचा प्रयत्न करत आहे

आज जिथे *मोठं-मोठी भाषणे झाडणे , स्वतःच्या चुका लपवण्यासाठी भाषणातून रडणे, लाखोंचे कोट घालणे, स्वतःची पदवी खोटी सांगून लाखोंचा पेन वापरणे, जाहिराती करणे,अभिनय करणे  वगैरे फॅशन होत चालली आहे* तेव्हा महात्मा फुलेंची आठवण प्रकर्षाने होते 
त्यांना काय कमी त्रास झाला असेल ?
जेव्हा ते रस्त्यावरून जात असत  तेव्हा लोक त्यांच्यावर कचरा फेकत, थुंकत , शिव्या देत , अंगावर शेण फेकत आणि वेगवेगळ्या प्रकारे उपद्रव देत , ज्या समाजाच्या उत्थानासाठी ते झटत होते सनातन्यांनी त्याच समाजातील माणसाला सुपारी देऊन त्यांचा खून करायला पाठवले होते या सर्वांच्या काय कमी वेदना झाल्या असतील त्यांना (तो मारेकरी स्वतःची चूक लक्षात आल्यावर बदलला आणि त्याची पुढची पिढी महात्मा फुलेंची अनुयायी बनली त्यामुळे सनातन्यांनी पुढच्या वेळी गांधीजींच्या हत्येच्या वेळी स्वजातीतील गोडसेला खून करायला पाठवले) पण एवढा त्रास होऊनही ते ना कधी रडले ना इतरांना दोष देत बसले , अविरतपणे शेवटपर्यंत परखडपणे आपले विचार मांडत सोबत कार्य करत राहिले

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1311756648875383&id=100001231821936

आपल्याकडे समाजसुधारणा, जातिव्यवस्था  यावर बोलणारे अनेक बोलघेवडे समाजसुधारक होऊन गेले पण कर्ते  फार कमी ,
*बाहेर मोठं मोठे तत्वज्ञान सांगायचे पण स्वतःवर आल्यावर मात्र तत्वाला तिलांजली द्यायची* असे ते प्रकार
पण महात्मा फुले तसे नव्हते
 महात्मा फुले हे कर्त्या सुधारकांतील सर्वश्रेष्ठ उदाहरण होते
म्हणजे *बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले* असे ते व्यक्तिमत्व 

*राष्ट्रपिता महात्मा गांधींनीही ज्याला महात्मा म्हटले असे ते महात्मा*

खालील प्रसंग पहा

त्यांचे लग्न होऊन बरीच वर्षे लोटली तरी मुल-बाळ नव्हते हे पाहून  काही नातेवाईकांनी  म. फुलेकडे सावित्री बाईना मुल होत नसल्याचे सांगून ज्योतीबांनी दुसरे लग्न करावे असा प्रस्ताव त्यांच्या समोर मांडला तेव्हा नातेवाईकांना ज्योतिबांनी खालील उत्तर दिले होते 

*माझे दुसरे लग्न करून सावित्रीला सवत आणण्यापेक्षा सावित्रीचेच एका दुसर्या पुरुषाशी दुसरे लग्न करून मलाच सवता आणूया आणि त्याच्यापासून जे मुल होईल त्याला मी स्वतःचे नाव देवून त्याचा सांभाळ करीन. पण मी मात्र सावित्रीला सोडणार नाही किवा तिला सवतहि आणणार नाही.बघा पटते का ?"*

आणि सांगा जगातील कोणताही पुरुष असा प्रस्ताव मांडेल?

 विधवा मुलींचे नाव्ह्यांनी डोक्याचे केस कापू नयेत म्हणून त्याचे शिष्य *नारायन मेघाजी लोखंडे यांच्या मार्फत त्यांनी कामगारांचा संप घडवून आणला होता.*आजकाल पगारवाढीसाठी(सातवे वेतन) संप केला जातो. पण अशा *सामाजिक प्रश्‍नासाठी संपाचे शस्त्र* ज्योतिबा फुलेंनी उगारले हे जगातील त्यावेळचे पहिले उदाहरण असेल

*प्राथमिक शिक्षण मोफत, सक्तीचे व सार्वत्रिक* झाले पाहिजे अशी मागणी १३० वर्षापूर्वी देशात सर्वप्रथम करणारे द्रष्टे महात्मा होते.

*विद्ये विना मती गेली। मती विना निती गेली॥*
      *निती विना गती गेली। गती विना वित्त गेले।।*
      *वित्त विना शुद्र खचले। एवढे अनर्थ एका अविद्येने केले॥*

*एकाच घरात एक भाऊ मुस्लिम एक ख्रिस्ती एक बौध्द असावा अशी त्यांची सर्व धर्म समभावाची व व्यक्ती स्वातंत्र्याची कल्पना होती.*
      
आजकाल काही जाणती विचारवंत मंडळीही दारूबंदीला विरोध करतात त्त्यांनी महात्मा गांधी,डॉ .आंबेडकर , महात्मा फुले दारुबाबत या महापुरुषांनी दारूबंदी चे समर्थन का केले होते याबाबत वाचायला हवे 
महात्मा फुले याबाबत म्हणतात-
      *‘थोडे दिन तरी मद्य वर्ज करा।*
      *तोच पैसा भरा। ग्रंथासाठी॥’*
१८८० मध्ये त्यांनी दारु विक्रीला तीव्र विरोध केला होता.

सत्यशोधक समाजाची स्थापना करून देशाच्या खेड्यापाड्यात *शिक्षण, विज्ञाननिष्ठा, अंधश्रद्धा निर्मुलन, जाती निर्मुलन, स्त्रीपुरुष समता, धर्मचिकित्सा, संसाधनांचे फेरवाटप, आंतरजातीय विवाह, लोकजागृती आणि प्रबोधन* यासाठी ते झटले.

  साहित्य किंवा लेखन
 सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून 'दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे.सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.

असो
, *१८४८ मध्ये देशातील पहिली मुलींची शाळा  काढणारे धोर समाजसुधारक,शिक्षणतज्ज्ञ,धर्मचिकित्सक,पहिले शिवशाहिर,नाटककार, साहित्यिक,इतिहास संशोधक ,अंधश्रद्धा विरोधक, समतानायक तथा शेतकर्यांचे कैवारी क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले* यांच्या स्मृतीदिनानिमित्त  त्यांच्या विचार व कार्यकर्तृत्त्वास विनम्र अभिवादन!!!
🙏🙏🙏💐💐💐🙏🙏🙏
लिहिण्यात काही चुकले असल्यास क्षमस्व

28 Nov 2016
संकेत मुनोत
8668975178

संदर्भ-
1- महात्मा फुले चरित्र
2-दत्तात्रय जाधव यांचा लेख
3- केशवराज वाघमारे यांचा लेख
4-महात्मा फुलेंवरील पुस्तके
http://www.mahatmaphule.com/marathiBooksonMahatmaPhule.htm
5- 
https://m.wikisource.org/wiki/Author:जोतीराव_गोविंदराव_फुले
6-http://www.mpscworld.com/maharashtratil-samaj-sudharak-jyotiba-phule
7-
https://hi.m.wikipedia.org/wiki/ज्योतिराव_गोविंदराव_फुले
5-http://www.mpscworld.com/maharashtratil-samaj-sudharak-jyotiba-phule


Comment, Share ,Follow and Subscribe.

महात्मा फुले आणि महात्मा गांधी दोघांचा काळ वेगळा, लढा वेगवेगळा.पण तरीही दोघे जवळचे का वाटतात ?

मला महात्मा फुले आणि महात्मा गांधी हे दोन्ही खूप जवळचे वाटतात.खरतर या दोघांचा काळ वेगळा, लढा वेगवेगळा.पण तरीही दोघे जवळचे का वाटतात काय माहित..?
मला त्यांची करुणा, संवेदनशीलता, भूमिका घेणे वगैरे जास्त भावते.
दोघांचेही ह्रदय सामान्य माणसासाठी , पीडितासाठी भरून येत होते.
दोघांना जनतेने महात्मा म्हटले..
ज्योतिबा सावित्री
मोहनदास कस्तुरबा
दोघांनाही जोडीदाराची साथ चांगली मिळाली
दोघांनी साधा वेष परिधान केला
शेतकरी हा दोघांसाठी ही प्रिय
सनातन्यांच्या रडार वर दोघे ही होते...
महात्मा फुलेंची चळवळ वेगळ्या प्रकारे गांधींनी पुनः पुढे नेली..
महात्मा फुलेंवर जसे हल्ले झाले तसे गांधींवर ही झाले आणि त्यात त्यातील अनेक हल्लेखोरांचे अनुयायी झाले हेही साम्य
त्यात उशीरा का होईना एकाचा खून करण्यात यशस्वी झाले सनातनी..
महात्मा गांधींनी किंवा महात्मा फुलेंनी विपुल लिखाण केले पण दोघांची कृती लिखाणापेक्षा जास्त मोठी होती...
दोघांचे आणि त्यातल्या त्यात सावित्रीबाई फुले यांचे लिखाण काढले तर ते संदर्भाशिवाय मांडले तर त्यात चुका काढता येतात किंवा उणिवा काढता येतात कारण दोघेही इतरांसारखे खूप बुद्धिप्रामाण्यवादी किंवा बोलके सुधारक नव्हे तर कर्ते सुधारक होते..
याबाबत प्रबोधनकार ठाकरे यांनीही छान मांडणी केली आहे ती आणि इतर काहींचे साहित्य कंमेंट मध्ये मांडतो..
संकेत मुनोत

Comment, Share ,Follow and Subscribe.


Monday, November 7, 2022

यथार्थ स्वातंत्र्य - जागर परिवर्तनाचा मध्ये प्रकाशित लेख

यथार्थ स्वातंत्र्य 
आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त  हे  स्वातंत्र्य आपण अबाधित कसे ठेवायचे आणि भविष्यात देशाची वाटचाल अजून चांगली कशी होईल हे आपण पाहायला हवे. त्याला मुख्य कारण म्हणजे आज आपला देश पुन्हा तुटण्याच्या मार्गावर आहे
. ७५ वर्षांपूर्वी फक्त भारत देश स्वातंत्र्य नाही झाला तर त्यादरम्यान अनेक देश स्वतंत्र झाले पण भारत वगळता बहुतेक देश जास्त काळ टिकले नाहीत. अनके ठिकाणी लष्करशाही , हुकूमशाही आली तर काही ठिकाणी नागरिकांनी स्वतःच्या राष्ट्रप्रमुखालाच फाशी वगैरे दिली. यातील अनेक देश उध्वस्तही झाले. आपला देश ७५ वर्षानंतर आजही मजबूत आहे त्याला कारण आहे गांधीजींनी अनेक दशके लोकचळवळ घडवून लोकांची घडवलेली मने. समोरच्यावर हातही उचलणार नाही आणि अंगावर लाठी पडत असताना पळूनही जाणार नाही असे वागायला खूप धैर्य लागते ते होते म्हणून इतर देशांच्यासारख्या हिंसक दंगली झाल्या नाहीत . 
फक्त भारतावरच नव्हे तर जगभर सूर्य मावळत नाही तिथपर्यत साम्राज्य असणारे विल्स्टन चर्चिल म्हणले होते कि यांना स्वातंत्र्य देऊ नका यांच्यात एवढे मतभेद आहेत कि काही वर्षात शेकडो तुकडे होतील.आणि त्यांचे अनेक अंशी खरे ही होते.  अवघे दिड लाख ब्रिटिश आपल्या देशातील ४० कोटी लोकांवर राज्य करू शकले त्याला कारण होते इथली विषमता, भेदभाव  आणि आपापसातील द्वेष. महात्मा गांधीजींच्या भारतीय राजकारणात उदय होईपर्यत स्वातंत्र्यलढा हा फक्त देशातील काही उच्चभ्रू वर्गापुरता मर्यादित होता . सामान्य माणसाला त्याचे काही देणे घेणे नव्हते. राज्य करणारे  ब्रिटिश असो , पेशवे असो किंवा मुगल किंवा अन्य कोणी असो त्यांना तर गुलामीतच जगावे लागत होते . उलट काहींना  ब्रिटिश त्यातल्या त्यात बरे वाटत होते कारण ते पेशव्यांसारखा जातीवरून अन्याय तर ब्रिटिश करत नव्हते आणि सतीप्रथा बंदी आणि अनेक सुधारणावादी कायदे त्यांनी पारित केले जे इथल्या सनातनी लोकांनी स्वतःच्या सत्तेत कधी होऊ दिले नसते. 
 महात्मा गांधींनी नेतृत्व हाती घेतल्यावर सर्वप्रथम हा जात, धर्म, वर्ग पंथ वगैरे मधला भेद मिटवला आणि लोकांना देशप्रेम आणि खादीच्या धाग्याने एकत्र आणले. पूर्वी देशात २ गट होते एक गट म्हणायचा 'आधी स्वातंत्र्य मग सुधारणा' तर दुसरा गट म्हणायचा 'आधी सुधारणा मग स्वातंत्र्य' . गांधी म्हणाले कि स्वातंत्र्य आणि सुधारणा या गोष्टी सोबत होऊ शकतात आणि ते त्यांनी करून दाखवले .
.त्यांनी कोट्यवधी लोकांमध्ये स्वातंत्र्य मिळवण्याची प्रेरणा जागवलीच पण सोबत सुधारणावादी धोरणही जागविले. सवर्णामध्ये पश्चातापाची भावना जागी करून त्यांना आपण एक पायरी खाली उतरायला हवे हे सांगीतले तेच ज्यांना त्याकाळी अस्पृश्य म्हटले जाई त्यांच्यामध्ये त्यांनी आत्मविश्वासाची भावना निर्माण केली. याचे साधे उदाहरण घ्यायचे तर खादी टोपी घ्या पूर्वी जातीनिहाय पगड्या होत्या ज्याची जेवढी जात मोठी तेवढे  पगडीत पीळ जास्त आणि त्यावरून त्याला सलाम ठोकला जाई . गांधींनी सर्वांना सारखी खादी टोपी घालून हा फरक संपवला. गांधीजींच्या उपवासामुळे शेकडो वर्षांपासून अस्पृश्यांना बंद असलेली मंदिरे खुली झाली , विहिरी एकत्र झाल्या . जिथे अस्पृश्यांना घरात  प्रवेश नव्हता तिथे लोक एकत्र जेवू लागले .फक्त उच्चभ्रू वर्गापुरता  मर्यदित असणारा पक्ष सर्वांचा झाला आणि गांधीजींच्या या सुधारणावादी धोरणामुळे दहशतवादी गोडसेला गांधींचा खून करावा लागला . त्याने  ५५ कोटी , फाळणी वगैरे खोटी कारणे सांगितली असली तरी खरे कारण हे गांधीजींचे सुधारणावादी धोरण हेच होते .. कारण गांधीजवर १९३४,१९४२,१९४४ या काळात जवळपास ७ हल्ले झाले ज्यातून गांधी वाचले तेव्हा ना फाळणीचा विषय होता ना ५५ कोटींचा . कारण एकच होते गांधींनी बहुजनांना मुख्य प्रवाहात घेणे सोबत या कामात आचार्य विनोबा भावे , साने गुरुजी आणि अनेक विद्वान ब्राम्हण ही साथ देत होते ज्याची गोडसेच्या मनात जास्त चीड होती.
तर चर्चिल ने सांगितले ते आज खरे होऊ लागले आहे आज धर्म, जात , वर्ग , पंथ इ वरून मोठ्या प्रमाणात द्वेष पसरवला जाऊन देश हळूहळू तुटत आहे . आपल्याला जर देश पुढे न्यायचा असेल तर हा द्वेष थांबवून  आपापसात प्रेम आणि संवाद वाढवायला हवा . पंडित नेहरू जेव्हा देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा देशात सुई ही तयार होत नव्हती.पण नेहरू कधी हे नाही म्हटले कि ब्रिटिशांनी १५० वर्षे घाण करून ठेवली आता मी काय करू मला अजून वेळ द्या वगैरे ?  उलट त्यांनी कारखाने , प्रयोगशाळा , धरणे , वैज्ञानिक संस्था आणि अनेक गोष्टी उभारून आधुनिक भारताची निर्मिती केली. नेहरू इथे जेव्हा या गोष्टी करत होते त्याच वेळी पाकिस्तान आणि अन्य काही देशात धर्माच्या नावाखाली मोठं-मोठी धार्मिक स्थळे आणि तत्सम गोष्टींवर जोर दिला गेला. आज ते कुठे आणि आपण कुठे त्यातील प्रमुख अंतर हे धोरणातील आहे . आपल्या देशात रोजगार, शिक्षण , औद्योगिकता , आरोग्य , अर्थव्यवस्था , आरोग्य व्यवस्था  इ गोष्टी मजबूत करण्याकडे भर दिला गेल्यामुळे देशातील लोक आणि देश पुढे जाऊ शकला.आज या मूळ गोष्टींकडे दुर्लक्ष करून लोकांना धर्मांधतेकडे वळवले जात आहे ते थांबायला हवे  नाहीतर आपल्या देशाचेही जर्मनी , श्रीलंका इ सारखे हाल होतील धार्मिक असणे आणि धर्माध असणे यात खूप मोठा फरक आहे . गांधी , मौलाना आझाद , खान अब्दुल गफार खान ही धार्मिक माणसे ज्यांचा धर्म त्या धर्मातील  सामन्यातील सामान्य माणसाचे कल्याण कास होईल ते पाहत होता तर तेच गोडसे , लादेन इ सारख्या धर्मांध लोकांचा धर्मांधपणा इतर धर्माचा द्वेष करून स्वतःच्याच धर्माचे मोठे नुकसान करतो . .

तर चला बदल घडवूया बदलाची सुरवात स्वतःपासून करूया 

संकेत मुनोत
 8668975178
changalevichar1@gmail.com


Comment, Share ,Follow and Subscribe.

Saturday, November 5, 2022

संभाजी भिडे यांचे टिकली बद्दलचे विधान हे त्यांच्या स्त्रियांना कमी लेखण्याचे एक छोटेसे उदाहरण

संभाजी भिडे यांचे कुंकू -टिकली बद्दलचे विधान हे त्यांच्या स्त्रियांना कमी लेखण्याचे एक छोटेसे उदाहरण आहे. हिंदूराष्ट्र निर्माण झाले तर असे अनेक नग तयार होतील, जे स्त्रियांनी काय करावे याबद्दल ज्ञान देतील आणि "मग तू असे असे केले तरच मी हे-हे करेन" म्हणत त्यांच्याशी व्यवहार करतील.
हे इतिहासात पण घडले आहे. राजा राम मोहन रॉय आणि सुधारकांनी जेव्हा सती प्रथेस (पतीच्या निधना नंतर त्याच्या पत्नीलाही त्याच्या चितेवर जाळण्यास) विरोध केला तर हे आमचे संस्कृती बुडवायला आणि धर्माचा अपमान करायला निघाले आहेत असे म्हटले गेले. सावित्रीबाई फुले यांनी जेव्हा मुलींना शिकवणे सुरू केले तेव्हा त्यांच्यावर याच विचारसरणीच्या लोकांनी शेण फेकले आणि प्रचंड त्रास दिला. महात्मा गांधी जेव्हा म्हणाले की महिलांनी चूल आणि मूल पुरते मर्यादित न राहता लोक चळवळ केली पाहिजे तेव्हाही त्यांना प्रचंड विरोध झाला. गांधीजींनी स्त्रीयांनी पडद्याआड राहणे , घुंघट वगैरे ला विरोध करणारे विधान केले तेव्हा सनातनी त्यांच्यावर प्रचंड चिडले होते पण त्यावेळी देशभर स्त्रियांनी या प्रथेविरुद्ध आंदोलने केली आणि त्या गोष्टी सोडल्या.
स्त्रियांनी याबद्दल वेळीच सतर्क राहिले पाहिजे. नाहीतर हे वारे वाढत राहिले तर पुढे हा काळ त्यांच्यासाठी अवघड असेल. इतिहासात याची असंख्य उदाहरणे आहेत.
महात्मा फुले यांच्यापासुन प्रेरणा घेऊन शल्य विशारद सती जाण्यास यांनी आपली लाडकी कन्या बाहुली हिला शिकवण्यास सुरुवात केली. त्यांना सनातन्यांनी जातीतून बहिष्कृत करण्याची धमकी दिली.पण डॉ.घोले यांनी कुठल्याही अडचणीला भीक घातली नाही.शेवटी काही नतद्रष्ट नातेवाईक व्यक्तिंनी काचा कुटुन घातलेला लाडू बाहुलीस खावयास दिला. ती ६-७ वर्षाची चिमुकली तो लाडू खाल्ल्यामुळे अंतर्गत रक्तस्राव होऊन मृत्युमुखी पडली. तिच्या स्मृतिप्रीत्यर्थ डॉ घोले यांनी शुक्रवार पेठ येथे बाहुली हौद बांधला.
त्यांना आवडले तर #टिकली लावतील नाही आवडले तर नाही लावणार. तेच #बुरखा #हिजाब किंवा इतर गोष्टी बद्दलही. #itsherchoice

संकेत मुनोत
Comment, Share ,Follow and Subscribe.

Sunday, July 31, 2022

महावीरांचे विचार #तत्वज्ञ आणि #विचारवंत म्हणून इतर समाजासमोर मांडण्याची गरज माझा यंदाच्या जैन जागृती मध्ये आलेला लेख

महावीरांचे विचार #तत्वज्ञ आणि #विचारवंत म्हणून इतर समाजासमोर मांडण्याची गरज
माझा यंदाच्या जैन जागृती मध्ये आलेला लेख

काही जैन मित्रांशी चर्चा करत होतो की त्यांना महावीरांबद्दल नेमकी काय - काय माहित आहे?"तर 14 स्वप्ने, कानात खिळे ठोकणे वगैरे कथा सोडल्या तर त्यांची बहुतेक मित्रांना माहित नव्हती.
सामजिक चळवळीतील मित्रांना, मान्यवरांना विचारले तर ते म्हणे गौतम #बुद्ध यांच्यासारखेच काही तरी तत्वज्ञान दिले महावीरांनी त्यांच्याबद्दल जास्त माहिती नाही.
#अनेकांतवाद आणि सध्याच्या रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या महावीरांच्या महत्वाच्या विचारांबद्दल लोकांना माहीत नाही हे पाहून आश्चर्य वाटले त्यामुळे हा लेख ...
गौतम बुद्धांच्या पूर्वी काही वर्षे महावीरांचा जन्म झाला .#महावीर कुठल्याही देवी-देवतेचा अवतार नव्हते ना महावीरांनी कधी कुठल्या चमत्कार वा अंधश्रद्धांचे समर्थन केले पण त्यांनी सामाजात चालत असलेल्या चुकीच्या गोष्टींच्या विरुद्ध, विषमते विरुद्ध ठामपणे भूमिका घेतली आणि समतेची शिकवण दिली..
सविस्तर सोबतच्या लेखात ..
कसा वाटला नक्की सांगा..❤️❤️






 
Comment, Share ,Follow and Subscribe.

Wednesday, July 27, 2022

मोरवाडी जेष्ठ नागरिक संघ येथे गांधीविचारांतून प्रेम प्रसार विषयावर व्याख्यान

नेहमी तरुणांसमोर बोलत असतो यावेळी जेष्ठ नागरिकांसमोर बोलण्याची संधी मिळाली खूप छान वाटले. ❤️❤️🌸
एवढ्या आज्जी आजोबांचे प्रेम आणि आशीर्वाद मिळाले.
मला तसे आज्जी आजोबांचे प्रेम 8 वी पर्यंत च मिळाले. पप्पांकडचे आज्जी आजोबा मी पहिली दुसरीत असतानाच वारले असावेत त्यांच्याबद्दल एवढे आठवत नाही. पण आईचे आईवडील म्हणजे नाना-नानी यांच्याबद्दल बरेच आठवते. मी चौथीत असताना नाना वारले तर आठवीत असताना नानी. त्यातही नानांचा मी सर्वधिक लाडका त्यांना ७ मुली होत्या. आम्ही १७ नातवंडे त्यात मी सुट्टीला गेल्यावर नाना मलाच एकट्याला पेढा आणून गुपचूप खायला देत. कोणी पाहुणे आले की प्रश्न उत्तरे द्यायला माझे नाव घेत. सकाळीच उठून त्यांच्यासोबत मारुतीच्या आणि देवीच्या मंदिरात जाणे आणि तिथे साखर खाणे हा खूपच मस्त क्षण होता. मी पहिलीत असतानाच माझे मारुती स्तोत्र तोंडपाठ होते तर गावातील मारुती मंदिरात जेव्हा हरिपाठ चले तेव्हा म्हणे तर शंकरलालजींचा नातू म्हणत माझी ओळख होई आणि नाना मायेने डोक्यावरून हात फिरवत. लेकराला जप असा ठळक उल्लेख त्यांच्या आईला लीहलेल्या पत्रात असे. आज त्यांना माझे हे काम पाहून खूप आनंद झाला असता.
मा. माडगूळकर गुरुजी यांचे विशेष आभार की त्यांनी मला येथे व्याख्यानासाठी बोलवले. साने गुरुजी कथामाला आणि मोरवाडी जेष्ठ नागरीक संघ यांनी हे व्याख्यान आयोजित केले होते.
गांधी विचारातून समाजात प्रेम आणि संवाद कसा वाढवता येईल यावर गप्पा झाल्याच पण सोबत या आज्जी आजोबांच्या ही व्यथा समजून घेता आल्या.
त्यानिमित्त एवढे सांगू इच्छितो की त्यांनी तुमच्यासाठी आपल्या रक्ताचे पाणी केलेले असते त्याच घराच्या एका कोपर्यात टाकू नका, प्रेमाने 2 शब्द बोलले तुम्ही तरी त्यांच्यासाठी ते खूप असते.❤️🌸
जेणेकरून आपण खरच योग्य बोलतोय का योग्य मार्गावर चाललोय का ते समजावे म्हणून व्याख्यानानंतर श्रोत्यांच्या प्रतिक्रिया...यावेळी लाईव्ह घेतल्या - https://youtu.be/93zRHZ109ZM
तर #प्रेम पसरवत राहूया














संकेत मुनोत
Comment, Share ,Follow and Subscribe.